Skip to main content

जग चाललय तर ते फक्त माझ्यामुळे ,,,,

एकदा भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता यांच्यात वाद सुरु असतो
लक्ष्मी मातेचं म्हणणं असं असतं, कि 
" जग चाललय तर ते फक्त माझ्यामुळे (पैशामुळे) ......... 
ज्या माणसाकडे पैसा नाही,
संपत्ती नाही....... त्याला काही किंमत नाही. 
माणूस ओळखतो........ जाणतो....... आणि बोलतो ते फक्त पैशानेच. "
यावर विष्णू भगवान हसून म्हणतात कि " असं काही नाहीये. "
पण लक्ष्मी माता येन केन प्रकारे पटवून देण्याचा प्रयत्न करत असते कि पैशालाच जास्त महत्व आहे.
तरीही विष्णू भगवान मान्य करत नाहीत म्हणून लक्ष्मी माता म्हणते, 
" ठीक आहे.
मी सिद्ध करून दाखवते. मग तरी मान्य कराल? 
" विष्णू भगवान हसून म्हणतात, " हो चालेल."
त्यावर लक्ष्मी माता पृथ्वी वरील एक दृश्य दाखवते. - 
एक शोकमग्न अंत्ययात्रा चालली असते...
लक्ष्मी माता आकाशातून धनाचा वर्षाव सुरु करते.... 
आणि लगेच अंत्ययात्रेतील सगळे लोक आपण कुठे जातोय हे विसरून पैसे गोळा करू लागतात. लक्ष्मी माता भगवान विष्णूंकडे पाहत म्हणते,
 " पाहिलंत? पैश्या समोर माणूस आपण कोणाला तरी कायमचे गमावून बसलोय हे दुखः देखील विसरतो." 
" अगं पण त्या चौघांच काय? जे मृत देहाला खांदा देऊन आहेत?
ते तर नाही ना वाकले पैसे उचलायला? " विष्णू भगवान म्हणाले.
लक्ष्मी माता म्हणली, " ठीक आहे....... हे घ्या." 
एवढे म्हणून लक्ष्मी मातेने खांदा दिलेल्या त्या चौघांसमोर धनाचा वर्षाव सुरु केला.........त्या चौघांनी प्रेत बाजूला ठेवलं आणि जमेल तितके पैसे गोळा करायला सुरुवात केली. यावर लक्ष्मी मातेने आपण जिंकलो या अविर्भावात भगवान विष्णूंना प्रश्न केला, " आता तरी पटलं? "
" अजून ही एकजण बाकी आहे......... " दृश्याकडे पाहत विष्णू भगवान म्हणाले. "
तो जो तिरडीवर झोपलाय.... तो तर नाही उठला पैसे उचलायला? "
लक्ष्मी माता म्हणली, " तो उठेल तरी कसा? तो मृत आहे. त्याच्या शरीरात आत्माच नाहीये. "
तत्क्षणी भगवान विष्णू म्हणाले, [ हे जरा काळजी पूर्वक वाचा! ] " हेच तर सांगायचं मला, जो पर्यंत मी शरीरात आहे तो पर्यंतच तुला ( पैश्याला/संपत्तीला ) मान आणि किंमत. 
ज्या क्षणी मी मनुष्य देहातून अंतर्धान पावलो त्या क्षणी त्या मनुष्यासाठी पैसा मातीमोल. 
देवी एक गोष्ट सांगतो,
ज्ञान,धन आणि विस्वास
तिघंही खूप चांगले मित्रा असतात ,
तिघंच एकमेकांवर खूप प्रेम
एक दिवस असा आला की त्यांना वेगळ व्हाव लागल,
तिघांनी एकमेकांना विचरल कोण कुठे जाणार ?
ज्ञान म्हणाल मी मंदिरात जाईन,
धन म्हणाले की मी श्रीमंत लोकात महालात राहीन,
पण विश्व्वास गप्पच होता दोघ म्हणाले तू काहीच बोलत नाहीस?
त्यावर विश्वास म्हणाला ,
माझ्या जाण्याची गोष्टच नका करू मी गेलो की परत नाही येत
आणि मते या मृत देहातला तो जगण्यातला जो प्राण
म्हणजेच मी म्हणजेच विश्वास मी एकदा का निघून गेलो की
पैशाची किंमत ती काय ?
माणसा बद्दल हेच तर आश्चर्य आहे कि तो पैश्यासाठी जीवन पणाला लावतो पण मग तोच पैसा त्याचा जीव का नाही वाचवू शकत..........? 
आयुष्य जगताना तो असा जगतो कि कधीच मरणारच नाही......... 
आणि मरताना असा मरतो कि कधी जगलाच नाही.........." .
काय? खरय ना............?
मित्रांनो मला ही गोष्ट सुचन्यामागची कारणे अशी की,
मी जेव्हा रोज ट्रेन ने प्रवास करतो....... तेव्हा मी पाहिलेले प्रसंग आणि अनुभव. आणि फक्त ट्रेन चा प्रवास नाही, तर इतर अनेक ठिकाणीसुद्धा. माणूस पैश्यामागे धावतोय....
अक्षरशः धावतोय आणि दम लागून जीव सोडतो. कमावलेला पैसा तुम्ही प्रेम करत असलेल्या जिवलगांना सुख संपत्ती देऊ शकतो, पण या खटाटोपात कायमचे दूर गेलेल्या कुणाच्या तरी बाबाला, दादाला, नवऱ्याला, मुलाला...नाही परत आणू शकत.
यावर नक्की विचार करा. आणि पैश्यापेक्षा सुद्धा लाख मोलाचा असलेला आपला जीव आणि आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्ती यांची काळजी घ्या
आणि राखी पौर्णिमेच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा .

Comments

Popular posts from this blog

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्य...

पुन्हा ते कधी हरले नाहीत,,

ऑलिंपिक ज्योतीचे गुरुवारी ग्रीस मध्ये प्राचीन ओलीमपिया येथे पारंपारिक  पद्धतीने प्रज्वलन करण्यात आले. या ऑलिंपिकची एक आठवण  ऑलिंपिक स्पर्धेत बास्केट बॉल हा एक प्रसिध्द खेळ , बास्केटबॉल चा समावेश १९३६ मध्ये करण्यात आला  तो पर्यंत ८ ऑलिंपिक स्पर्धेत ६३ सामने खेळताना अमेरिका एकही सामना हरला नव्हता. १९७२ मध्ये म्युनिच ऑलिंपिक या खेळातील सुवर्णपदकासाठी  अमेरिका रशिया याच्यात सामना झाला ,,आणि, सामन्याचे काही सेकंद बाकी असताना अमेरिकेने ५०\४९ अशी आघाडी  घेवून चेंडू रशियाच्या हातात दिला रशियाने  टाईम-आउट मागीतला ,अमेरिकेने तो नियमबाह्य असल्याचे  अपील केले , मात्र ते अपील पंचांनी फेटाळले, रशियन खेळाडूने चेंडू बास्केट करण्याचा प्रयत्न केला पण चेंडू काही केल्या  बास्केट होईना , पंचांनी सामना संपल्याची शिट्टी वाजवली आणि,, सामना अमेरिकेचा हाती गेला पंचांनी अमेरिका जिंकल्याचे घोषित केले, अमेरिका जिंकली पण ,,, गोष्ट ईथे संपत नाही , आता रशियन समर्थकांनी स्कोररला घेराव घातला, त्याने  पंचांच्या आदेशां नंतरही घड्याळ ३ सेकंदांनी रिसेट केले नव्...

*नको देवराया अंत आता पाहू,,*

देवा ये लवकर तुझ्या पराक्रमाच्या गोष्टी खूप वाचल्या रे आमचा विश्वास ही आहेच त्यावर पण ये आता आता तूच या अदृश्य कोरोनाशी लढ आणि मुक्त कर☹ *प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी तू सदैव उभा राहतोस म्हणे,,* मग आमचे प्रयत्न दिसत नाही का रे देवा☹ जगाचा पालन कर्ता असलास तरी या भरतभूमीवर तुझं विशेष प्रेम,,सार जग सोडून तू तुझे सारे अवतार याच भरतवंशीयांसाठी सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच निर्दालन करण्यासाठी घेतलेस,,, *मग आजच असा निष्ठुर कठोर पाषाण हृदयी का झालास😏☹😡* अरे आम्ही तुझीच लेकरं ना रे मग आमची अवघ्या मनुष्य जातीची चाललेली परवड तुला दिसत नाही की अजून शेषशैये वरून उठायची वेळच झाली नाही की तुझा कुंभकर्ण झालाय देवा? *उठ रे दादा उठ*☹ मला माहिती आहे केवळ प्राण्यांची असलेली ही भूमी तू गुण्या गोविंदाने हे मनुष्यप्राणी ही राहतील या मोठया आशेने आम्हला ती  आंदण दिलीस☹ *पण आम्ही कपाळकरंटे रे ओरबाडली अक्षरशः ही भूमी ओरबाडली*😏😡 जीवन जगण्याच्या स्पर्धेत *आमचा बकासुर कधी झाला* ते आमचं आमच्याच कळलं नाही *आमचा हव्यास कधी संपेल माहिती नाही* आमची आयुष्य एकमेकांचा धर्म उणिदुनी काढण्यातच ...