Skip to main content

वसुबारस-माझा गाय कापण्याला विरोध नाही ,,,,,१

आज दिवाळीचा पहिला दिवस,
वसुबारस (आश्विन वद्य द्वादशी /गोवत्सद्वादशी)
वसुबारस ह्याचा अर्थ-वसु म्हणजे द्रव्य
(धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी.
या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात.या दिवशी
गाईची पाडसासह संध्याकाळी पूजा करतात.
तीच गाय आपल्या पाडसाला पुरेल इतके दुध देवून अजूनही सात्विक दुध देवून मनुष्यावर उपकार करते.
यासाठी आपण सवत्स धेनूची पूजा करतो.
त्यात असे मागतो कि गाय म्हणजे जणू पृथ्वी जी विष्णुपत्नी आहे, ती जसे आपल्या पाडसाचे व जगाचे सात्विक अन्नाने भरण पोषण करते..तसे हे माते पृथ्वी, तुझ्यामुळे आम्ही उपकृत आहोत.

घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स
धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे.ज्यांच्याकडे घरी गुरे, वासरे आहेत त्यांच्याकडे
ह्यादिवशी पुरणावरणाचा स्वयंपाक
करतात. घरातील सवाष्ण बायका गाईच्या पायावर पाणी घालतात.
नंतर हळद-कुंकू, फुले, अक्षता वाहून र्चांयाच्या फुलांची माळ
त्यांच्या गळ्यात घालतात.निरांजनाने ऒवाळून केळीच्या पानावर
पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गाईला खाऊ घालतात. ह्या दिवसापासून
अंगणात रांगोळी काढण्यास सुरूवात करतात. पुष्कळ स्त्रियांचा ह्या दिवशी उपवास असतो.
ह्या दिवशी गहू, मूग खात नाहीत.स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शगाची भाजी खाऊन उपवास
सोडतात. आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात.
पण गमत अशी आहे कि वसुबारस ह्याचा अर्थ-वसु म्हणजे द्रव्य
(धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी.,,,,
गो धनाला ज्या देशात धन मनात आल त्या देशात गायींची सर्रास कत्तल केली जाते.
ज्या गो धनला वाचवण्यासाठी योगेश्वर श्री कृष्णाने साक्षात ईंद्राशी उभ्या दावा मंडला
.
भार्गव rishi जे परशुरामाचे वडील त्यांच्याकडे कामधेनु होती ती देखील
कार्तवीर्य अर्जुन याने बळजोरीने पळवून नेली आणि त्यासाठी मग
परशुरामाने हि पृथ्वी निक्षत्रिय केली ,
वशिषठांकडे असलेल्या गायीसाठी विश्वमित्रानीही युध्द केल
त्या कामधेनूला पळवून घेवून जाण्याचा घाट घातला
पण त्या कामधेनुच्या एका हुन्कारात ईतकी ताकद होती कि
त्यातून असंख्य सैनिक पैदा झाले आणि त्यांनी विश्वामित्रांना पळवून लावलं

गोब्राम्हण प्रतिपालक श्री छत्रपती शिवराय यांनीही गाय कापणार्या मुसलमानांना
कापण्यात धन्यता मानली..

त्या गोधनाला आज आपण वाचवणार कि नाही ?
सर्रास कत्तलखाने चालू आहेत मुसलमान आजही राजरोस गायींच्या कत्तली करत आहे .
आम्ही आमच सरकार मात्र अगदी तत्परतेने येथे मात्र
श्री. सावरकरांची बाजू घेत त्यांचा कसा गाय कापण्याला पाठींबा होता
हे पटवून देत.
खरतर हि जी बाजू आहे सावरकरांची ती नेमकी तोडून मोडून आपल्याला सांगितली जाते .
माझा गाय कापण्याला विरोध नाही ,,,,,
याची नेमकी विरुध्द बाजू सांगत नाहीत ,,
श्री सावरकरांनी माझा गाय कापण्याला विरोध नाही हे अशा साठी सांगितलं
कि पूर्वीपासून येथे येणाऱ्या आक्रमकांनी एक गोष्ट लक्षात घेतली होती,
हिंदू हे गायीला देवता मानतात तेव्हा ते जेव्हा जेव्हा आक्रमण करत
तेव्हा तेव्हा ते गायींच्या आडून हिंदुंवर हल्ले करत आणि
हिंदू आपली शस्त्र खाली टाकत आणि मग निशस्त्र हिंदूंना कापण
आक्रमकांना सहज शक्य होई बर अस शस्त्र खाली टाकल्याने
आक्रमक हिंदुंवर विजय तर मिळवत पण गायीही त्यातून वाचत नसत त्याही कापल्याच जात .
आणि म्हणून सावरकरांनी सांगितलं कि माझा गाय कापण्याला विरोध नाही
कारण,,,,
जर चार गायी कापल्या जावून हजार दोन हजार गायी आणि आपले हि प्राण वाचवून हल्ला
परतवला जात असेल तर त्या हल्ल्यात चार गायी कापल्या गेल्या तर माझा विरोध नाही .
आणि नेमक आपण हेच करत नाही आपण ईतिहासाची नेमकी पुनरावृत्ती करतो
नवा ईतिहास नाही लिहित
त्याच चुका दरवेळी नव्याने करत असतो
अगदी महाभारत काळात देखील डोकावलं तर अस जाणवत
कि शिखंडीला मारणार नाही अशी प्रतिज्ञा केल्यामुळे भिष्मना जग सोडव लागल,
आणि याच महाभारतात योगेश्वर श्री कृष्णाने आम्हाला धडा घालून दिला
दुश्मनाच रथाच चाक जर युध्द भूमीत गडाल गेल असेल तर युद्धाचे नियम पाळत बसू नको .
पार्था आताच तुझ धनुष्य चालव,,,,,

आणि आम्ही ??????????
आणि आम्ही आजही गाय कापणार्या कसाबाला पोसत आहोत.
आणि वसुबारस साजरी करतोय आपल्याला लाज वाटली पाहिजे
दिवाळीच्या या सार्या दिवसांची सुरवात दसर्या पासून होते
दसर्याला आपल्याकडे सिमोल्लानंगनास जाण्याची पद्धत आहे
आणि या स्वारीवर निघालेल्या जनतेला कोजागिरी विचारते को जागर्ति ?
जागे आहात ना? की झोपलात ?
जागे राहा जागे राहा आणि विजय मिळवून या
मग दिवाळी साजरी करा 


Comments

  1. Hi Sunil,
    Raman Kulkarni commented on your link.
    Raman wrote: "जागे राहा आणि विजय मिळवून या
    मग दिवाळी साजरी करा"

    See the comment thread

    Reply to this email to comment on this link.
    Thanks,
    The Facebook Team

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्य...

पुन्हा ते कधी हरले नाहीत,,

ऑलिंपिक ज्योतीचे गुरुवारी ग्रीस मध्ये प्राचीन ओलीमपिया येथे पारंपारिक  पद्धतीने प्रज्वलन करण्यात आले. या ऑलिंपिकची एक आठवण  ऑलिंपिक स्पर्धेत बास्केट बॉल हा एक प्रसिध्द खेळ , बास्केटबॉल चा समावेश १९३६ मध्ये करण्यात आला  तो पर्यंत ८ ऑलिंपिक स्पर्धेत ६३ सामने खेळताना अमेरिका एकही सामना हरला नव्हता. १९७२ मध्ये म्युनिच ऑलिंपिक या खेळातील सुवर्णपदकासाठी  अमेरिका रशिया याच्यात सामना झाला ,,आणि, सामन्याचे काही सेकंद बाकी असताना अमेरिकेने ५०\४९ अशी आघाडी  घेवून चेंडू रशियाच्या हातात दिला रशियाने  टाईम-आउट मागीतला ,अमेरिकेने तो नियमबाह्य असल्याचे  अपील केले , मात्र ते अपील पंचांनी फेटाळले, रशियन खेळाडूने चेंडू बास्केट करण्याचा प्रयत्न केला पण चेंडू काही केल्या  बास्केट होईना , पंचांनी सामना संपल्याची शिट्टी वाजवली आणि,, सामना अमेरिकेचा हाती गेला पंचांनी अमेरिका जिंकल्याचे घोषित केले, अमेरिका जिंकली पण ,,, गोष्ट ईथे संपत नाही , आता रशियन समर्थकांनी स्कोररला घेराव घातला, त्याने  पंचांच्या आदेशां नंतरही घड्याळ ३ सेकंदांनी रिसेट केले नव्...

*नको देवराया अंत आता पाहू,,*

देवा ये लवकर तुझ्या पराक्रमाच्या गोष्टी खूप वाचल्या रे आमचा विश्वास ही आहेच त्यावर पण ये आता आता तूच या अदृश्य कोरोनाशी लढ आणि मुक्त कर☹ *प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी तू सदैव उभा राहतोस म्हणे,,* मग आमचे प्रयत्न दिसत नाही का रे देवा☹ जगाचा पालन कर्ता असलास तरी या भरतभूमीवर तुझं विशेष प्रेम,,सार जग सोडून तू तुझे सारे अवतार याच भरतवंशीयांसाठी सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच निर्दालन करण्यासाठी घेतलेस,,, *मग आजच असा निष्ठुर कठोर पाषाण हृदयी का झालास😏☹😡* अरे आम्ही तुझीच लेकरं ना रे मग आमची अवघ्या मनुष्य जातीची चाललेली परवड तुला दिसत नाही की अजून शेषशैये वरून उठायची वेळच झाली नाही की तुझा कुंभकर्ण झालाय देवा? *उठ रे दादा उठ*☹ मला माहिती आहे केवळ प्राण्यांची असलेली ही भूमी तू गुण्या गोविंदाने हे मनुष्यप्राणी ही राहतील या मोठया आशेने आम्हला ती  आंदण दिलीस☹ *पण आम्ही कपाळकरंटे रे ओरबाडली अक्षरशः ही भूमी ओरबाडली*😏😡 जीवन जगण्याच्या स्पर्धेत *आमचा बकासुर कधी झाला* ते आमचं आमच्याच कळलं नाही *आमचा हव्यास कधी संपेल माहिती नाही* आमची आयुष्य एकमेकांचा धर्म उणिदुनी काढण्यातच ...