कारगीलच्या युद्धात शहिद झालेल्यांच्या घरीही
आज दीपावली साजरी होत असेल. आणि का नाही...
त्यांचा हक्क सर्वात प्रथम आहे. पण,,,,
कंदिलाच्या जागी त्यांच्या दारात शौर्यपदक, तर,,,
पणत्यांच्या जागी मुलाची शौर्यगाथा असेल, हाच काय तो एक फरक,
त्यांच्या आणि आपल्या घरातला.
नसेल आज सोबत त्यांचा मुलगा...
जो दरवर्षी मोठया आनंदाने त्यांच्याबरोबर दीपावली साजरी करायचा.
पण म्हणून काय झाले! त्याच्या लहानसहान आठवणीच पुरेशा आहेत,
वृद्ध आईवडिलांच्या कोमेजलेल्या ओठांवर हसू आणायला.
त्यांना अभिमान असेल की,
आज संपूर्ण हिंदुस्थानात जी मोठया आनंदाने ही दीपावली साजरी होत आहे.
याला एकचं गोष्ट कारणीभूत आहे.
आणि ती म्हणजे त्यांच्या शूरवीर मुलाने, आपल्या देशाच्या रक्षणांसाठी, शांतीसाठी हसतमुखाने दिलेली आपल्या प्राणांची आहुती ! हिच गोष्ट पुरेशी आहे त्यांच्या कुटुंबियांस हि दीपावली साजरी करण्यास.
ठाऊक आहे मला लिहीणं आणि बोलणं खूप सोपं असतं. ज्याचं जळत ... त्यालाच त्याच दु:ख कळत.
म्हणूनचं ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली ते, आणि जे आजही सीमेवर निधडया छातीने देशाचे संरक्षण करण्यासाठी दिवसरात्र तेनात आहेत ते. जांच्या विश्वासावरच आपण हि दीपावली आज निर्धास्तपणे साजरी करू शकतो अश्या त्या सर्व वीर जवानांना, आणि त्यांच्या कुटुबियांना हि दीपावली सुखा समाधनाची जावो हीच सदिच्छा !
तुम्हां सर्वाना दिपावलीच्या आणि नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
आज दीपावली साजरी होत असेल. आणि का नाही...
त्यांचा हक्क सर्वात प्रथम आहे. पण,,,,
कंदिलाच्या जागी त्यांच्या दारात शौर्यपदक, तर,,,
पणत्यांच्या जागी मुलाची शौर्यगाथा असेल, हाच काय तो एक फरक,
त्यांच्या आणि आपल्या घरातला.
नसेल आज सोबत त्यांचा मुलगा...
जो दरवर्षी मोठया आनंदाने त्यांच्याबरोबर दीपावली साजरी करायचा.
पण म्हणून काय झाले! त्याच्या लहानसहान आठवणीच पुरेशा आहेत,
वृद्ध आईवडिलांच्या कोमेजलेल्या ओठांवर हसू आणायला.
त्यांना अभिमान असेल की,
आज संपूर्ण हिंदुस्थानात जी मोठया आनंदाने ही दीपावली साजरी होत आहे.
याला एकचं गोष्ट कारणीभूत आहे.
आणि ती म्हणजे त्यांच्या शूरवीर मुलाने, आपल्या देशाच्या रक्षणांसाठी, शांतीसाठी हसतमुखाने दिलेली आपल्या प्राणांची आहुती ! हिच गोष्ट पुरेशी आहे त्यांच्या कुटुंबियांस हि दीपावली साजरी करण्यास.
ठाऊक आहे मला लिहीणं आणि बोलणं खूप सोपं असतं. ज्याचं जळत ... त्यालाच त्याच दु:ख कळत.
म्हणूनचं ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली ते, आणि जे आजही सीमेवर निधडया छातीने देशाचे संरक्षण करण्यासाठी दिवसरात्र तेनात आहेत ते. जांच्या विश्वासावरच आपण हि दीपावली आज निर्धास्तपणे साजरी करू शकतो अश्या त्या सर्व वीर जवानांना, आणि त्यांच्या कुटुबियांना हि दीपावली सुखा समाधनाची जावो हीच सदिच्छा !
तुम्हां सर्वाना दिपावलीच्या आणि नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
Prashant Mandpe हो, पण त्या घरचे सोडून कुणाच्या मनात त्यांच्या आठवणी तेवत असतील?
ReplyDeleteOctober 28 at 9:54am · Like
Balaji Hiware हो ते तर आहेच साहेब त्या वीरान्च्या बलिदानामुळेच आपल्या घरी दिवाळीचे दिवे जळतात, " जेन्व्हा आपन साजरी करतो दिवाळी, आपले शुर शिपाही आपल्या निधड्या छातीवर झेलतात गोळी, " पण त्यान्च्या बद्धल आपले काय म्हनने आहे सुनील जी, जे लोक शान्ती बहाली म्हनुन आपले "शुर सैनीक" भारत अधीक्रुत काश्मीर मधुन माघे घेत आहेत . ???
ReplyDeleteOctober 28 at 12:22pm · Like · 2
Jayashree Joshi-mulay
ReplyDeleteअशी जवानांची काही साईट असेल किंवा लिंक माहित असेल तर इथे देवू शकेल का कोणी ? कारगिल मधली मुले,प्रत्येक युद्ध आणि युद्धसदृश स्थितीत जीवाची बाजी लावून आपल्याला इथे दिवाळी साजरी करण्याची संधी देणारे हे सैनिक ! खरेच, आपल्या परिवारापासून महिनीन महिने ते दूर राहतात . आपल्या देशबांधवांच्या रक्षणासाठी..कुणी म्हणेल- " ते वेतन घेतात याचे ,ते त्यांचे कामच आहे." मग ,सांगा ,सुहृदांनो,गलेलठ्ठ वेतन घेऊनही चकाट्या पिटणारे आपल्या अवती भोवती किती दिसतात. साधेसे काम हे नीट करत नाहीत.आणि सैनिक मात्र उन,पूस,थंडी ,बर्फ याचा बु न करता जीवावर उदार होऊन ,डोळ्यात तेल घालून आपण कारात्यांचे प्रेमाने -आपलेपणाने रक्षण करतात . याची जाण आपण ठेवलीच पाहिजे ना ?
3 hours ago · LikeUnlike · 1 person
October 28 at 12:23pm · Unlike · 1
Jayashree Joshi-mulay
ReplyDeleteJayashree Joshi-mulay १९७४ मध्ये जन्म झालेल्या मुलाचे १९९९ मधले वय काय असेल ?२५ वर्षे ! म्हणजे अगदी बरोब्बर गद्धे पंचविशीच !! या वयातली बरेच मुले शिक्षण आटोपून पोटापाण्याला लागली असतात खरी ,पण परिपक्व मात्र सारीच फारशी झालेली नसतात. प्रेम ,मुलीन्कडे जरा विशेष लक्ष,मौज -मजा,मित्र कट्टे ,फेसबुक,ओर्कुट,,खाणे-पिणे, नोकरी व्यवसाय यात ह्या वयातील तरुण गुंग असतात. यात चूक ते काय ? पण याच वयाचा एक ध्येयवेडा ,शूर शिपाई मुलगा देशासाठी हसतहसत जीवाची बाजी लावतो. मृत्यू समोर असताना,आपल्या युद्ध क्षेत्रातील शिपाई मित्रांचीच काळजी वाहतो.त्यांना प्रेरक मंत्र देतो हे सारे किती अद्भुत ,अतर्क्य आहे n ?सिनेमाचे कथानक वाटते आहे ? हो, यावर सनेमा बनला आहे. पण तो सत्य घटनेवर आधारित. कोण आहे हा real life hero ?ओळखलेत न?हो,तेच कॅप्टन विक्रम बात्रा.!कारगिल युद्धातील शूर सेनानी! मरणोपरांत परम्विर्चाक्र हा सर्वोच्च सन्मान मिळवणारा वाघाचा बच्च .त्याचे लाडाचे नावच होते मुळी शेर शहा ! ९-९-७४ला पालमपुर भागात (हिमाचल प्रदेश )जन्मलेला हा मुलगा २२व्य वर्षी देहारादुंच्या सैनिकी प्रशिक्षण देणाऱ्या ,खडतर जीवन शैलीच्या ,प्रतिष्ठित.संस्थेत दाखल झाला. अभ्यासक्रम पूर्ण होताच लेफटनंट आणि उत्तम कागीरीच्या जोरावर लगेच बढती घेऊन कॅप्टन पद मिळवले या धडाडीच्या मुलाने.आता पोस्टिंग मिळाली काश्मीरच्या सोपोर भागात.
October 28 at 3:22pm · Unlike · 1
Jayashree Joshi-mulay
ReplyDelete९९ च्या उन्हाळ्या.मध्ये नापाक पाक सैन्याने ,आपल्या काश्मीरच्या कारगिल भागात घूसखोरी करून युद्धास तोंड फोडले.१ जून ला विक्रम आणि त्याच्या मित्रांना तेथे रुजू व्हायचे होते सुमारे २०००० फुट उंचीवर. अनपेक्षित स्थितीत अनोख्या रीतीने लढायचे होते. आव्हानाला घाबरेल तो विक्रम कसला? आपल्या ५ सहकाऱ्यांसह त्याने या उंच शिखरावर रात्री चढाई करायचे ठरवले. रोमहर्षक चढाई करून अंधारातच हे सारे वीर या शिखराच्या टोकाच्या जवळ ,पाठीमागच्या बाजूने पोचले. तोच शत्रूला चाहूल लागून गोळीबार सुरु झाला.विक्रमने शौर्य गाजवून एकट्याने तीन शत्रूंना धारतीर्थ पाजले.एकदम खातमाच ! आणि नंतर लगेच पाक सैन्याची सक्रीय मदत असलेला एक अतिरेकी तिथे होता त्यालाही यमसदनी धाडले.पाकला रेदिओ संदेश पाठवणारा एक कमानडर विक्रमला म्हणाला "तू आता परत जात नाहीस,मेलासच " यावर शूर शिपाई विक्रमने करारी उत्तर दिले," एका तासात तुला खरे काय ते कळेल ,कि आता इथे वर जिवंत कोण असेल " या वीरश्रीयुक्त उत्तरा दराम्यानच प्रचंड गोळीबार होऊन कॅप्टन विक्रम गंभीर जखमी झाले. आपल्या जखमांची पर्वा न करता सोबत्यांना आवेशात धीर देणे सुरूच होते.त्यांच्या प्रेरणादायी नेतृत्त्वाने २० जून ला पहाटे ३च्या सुमारास ८-१० पाकी सैनिकांना आसमान दाखवून त्याचा मोठा शास्त्र -साठा ताब्यात मिळवला.आणि एका मागोमाग तीन ठाणी (टेकड्या -शिखरे )जिंकली.यानंतर ४-५ दिवसांची विश्रांती घेऊन नव्या जोमाने हे साहसी वीर निघाले ४७५० या शिख्ररा कडे ! येथेही शत्रूने ललकारले- " तू मेलास तर आता तुझे प्रेत न्यायला कोणी उरणार नाही " यावर विक्रमने असे बाणेदार उत्तर दिले कि ज्याचे नाव ते! आपल्या या वाघाने प्रत्युत्तर दिले कि " तू तुझेच बघ आणि अल्लाची प्रार्थना कर कि तुझे रक्षण होवो !" अतुलनीय पराक्रम गाजवून ४७५० सोबतच अधिक एक ठाणे जिंकून या तरुण मुलांनी विजय साजरा केला .या काळात सुप्रसिद्ध झालेली टायगर हिल हि याच वेळी याच चमूने परत घेतली. आणि तेथे आपला ध्वज डौलाने फडकवला. मात्र ४८७५ शिखर जिंकताना ७ जून रोजी पहाटे घनघोर संग्राम झाला . बेफाम गोळीबार आणि स्फोट झाले त्यात विक्रम बात्रा अति गंभीर जखमी झाले.शेवटच्या घटकेपर्यंत हा शूर सेनानी सोबत्यांना धीर देत लढला. त्याचे शेवटचे शब्द होते रणरागिणी दुर्गेचा जयजयकार!दुष्टांचा संहार करणाऱ्या या देवीचा "जय मातादी
"असा जयघोष करतच त्याने अखेरचा श्वास घेतला. मात्र शेवटच्या घटकेपर्यंत ते आपले राष्ट्र आणि सहकारी यासोबत होते आणि आपले परमप्रिय निहित कर्तव्य त्यांनी सोडलेच नाही. मृत्युनंतर अतुलनीय धैयाबद्दल त्यांना शासन आणि सैन्याकडून ५२ व्या स्वातंत्र्यदिनाच्या समारोहात राष्ट्रपती श्री K .R. नारायणन यांच्या हस्ते सर्वश्रेष्ठ परमवीर चक्र देण्यात येऊन गौरवण्यात आले.असा हा महान योदधा , भारत मातेचा एक लाडका सुपुत्र आणि बात्रा दाम्पत्त्याचा शूर वीर मुलगा !
Sunil Bhumkar kunachaya manat yetil te mahtvache tumhala nemak kay vatat tya anam javananchy babtit mahtvache.
ReplyDeleteOctober 29 at 11:46am · Like · 1
Sunil Bhumkar kharach ya saranchya jivavar tr divali sajari karato aapan.
ReplyDeleteJayashree Joshi-mulay kal koni link dilee asatee tar kahi taree bahinichya premache owalnipar lihile asate. arthat ya warwarchya goshtinna taree kay arth ahe mhana !
ReplyDeleteOctober 29 at 11:49am · Like
Sunil Bhumkar बालाजी या मुर्खान मुळे तर कसाब सारखे मूर्ख जे आपल्या जवानाच्या चालेपाशी उभे रहायची लायकी नाही ते आपल्या जवानांना टक्कर देतात यांचा dhikkar करावा तितका कमीच ...
ReplyDeleteOctober 29 at 11:53am · Like · 2