Skip to main content

Posts

कारण सीतेकडून घेतलेले वचन,,,,,आणि तिने दिलेली कबुली

कारण सीतेकडून घेतलेले वचन,,,,, श्रीराम कस्तुरी मृगा मागे गेल्या नन्तर मायावी मारीच रामाच्या आवाजात लक्ष्मणा धाव सीते सीते असे आवाज देतो तेव्हा सीता लक्ष्मणाला खूप आग्रह करत अगदी कामातुर ठरवत रामाला शोधायला पाठवते,,, शेवटी लक्ष्मण लक्ष्मण रेषा आखतो आणि सीते कडून वचन घेतो की काहीही झालं तरी ही लक्ष्मण रेषा ओलांडून तू पलीकडे जाणार नाही आणि ही ओलांडून गेलीस आणि न जाणो तुझं बर वाईट झालं तर जबाबदार मी असणार नाही,,,,,, लक्षात घ्या आपण सारे हे रामायण घडलं त्याला कधी दशरथ, कैकयी, मंथरा, रावण विभीषण ह्या साऱ्यांना दोषी मानतो पण आज पर्यन्त कुणीही लक्ष्मणाला दोषी मानलं नाही,,,, कारण सीतेकडून घेतलेले वचन,,, उलट हनुमंताची लंकेत भेट झाल्यावर रामाला खुण पटावी म्हणून चुडामनी देत असताना तिने हनुमंता कडे लक्ष्मणाची माफी ही मागितली लक्षात घ्या हे कुठे ही लिखित वचन नव्हतं #न_की_जाहीर_मीडिया_समोर_दिलेली_कबुली तरीही सीतेने कबुलीनामा हनुमंता कडे पाठवला  आणि माझी चूक झाली मी लक्ष्मणाच ऐकलं नाही अशी कबुली दिली ज्या बद्दल ना रामाला माहिती होती न की हनुमंताला*,, प्राण जाये पर वचन ना जाये हे शिकवत...

आज इतिहासाच पान उलटताना,,, घोरी आणि भाजप

महा क्रूर गोष्टींनी भरलेला 711 नन्तरचा इतिहास सांगतो,,,, पण या आक्रमांनी ही आम्ही हिंदूं त्यातून काही बोध घेऊ काही शिकू अस आजवर घडलेलं नाही अलेक्झांडर आला परंतु त्याने काही कुणाला ग्रीक करायच्या भानगडीत पडला नाही शक आले हुन आले परंतु त्यांनी कुणी कुणाला कुशाण बनवलं नाही उलट तेच या मातीत बौद्ध किंवा जैन बनून मिसळून गेले परन्तु नन्तर 711 ला महंमद बिन कासीमची सिंध च्या बाजूनं स्वारी झाली त्या नंतर मात्र जो बटवा बाटवी चा हैदोस सुरू झाला त्याला तोड नव्हती परन्तु तेव्हाही हिंदू राजे या साऱ्या आक्रमणाला प्रतित्युत्तर द्यायला कमी नाही पडले नव्हे ते शौर्यात कमी नव्हतेच,, या देशाला पहिली किळस आली ती क्रौर्याची,,, हे युद्ध फक्त राजे रजवड्यां पुरत नव्हतं तर समोर जे जे दिसेल ते ते लुटालूट करावं जाळपोळ करावी बटवा बाटवी करावी लेकी सुना पळवाव्यात त्यांची अब्रु वेशीवर टांगवी धिंड काढावी देव देवळं बेचिराख करावी मूर्ती भंजन करावं मालमत्ता लुटून घ्यावी *या सगळ्यात आपलीची लोक बळजबरीने धर्मांतरित केली जावी आणि आपल्यातील धर्ममार्तंडांनी राजाने दुर्लक्ष करावं त्यांना पुन्हा हिंदू करवून घ्यावं अशी...

तुटलेला दात आणि सोडून गेलेले मित्र नातेवाईक

*आपले दात आणि आपले नातेवाईक*,,,,, काल एक मित्र अचानक भेटला भर थंडीत ही त्याला घाम आला होता बसला होता  एक बाजूला   सोसायटीच्या आवारात मला बघताच एक उसनं अवसान आणून हसायचा प्रयत्न करू लागला,, तस त्याला मी विचारलं तर खुणेनेच बोलला हा बघ दात पडला ,,,मला खर तर हसू येत होतं पण काळजीने विचारलं की कारे कुठे पडलास की काय? की केलीस मारामारी तो- पुन्हा खुणेनेच नाही म्हणाला मी-मग हलत होता का? नीट रोज दोन वेळा दात साफ ब्रश करत नाही का? तो- सध्या हलत होता पण मी दात दोनदा काही घासत नाही जमत नाही उशिरा येतो मग जेवतो आणि लगेच झोपतो,,, सकाळी मात्र घासतो रोज *मी- अरे हलत होता तर डॉ कडे का नाही गेलास? आणि आता 45 वर्षाचा आहेस आता दात गेला तर येत नाही रे काळीजी घ्यावी कस आहे आपल्या जन्मासोबत नाक कान घसा जीभ सगळं आपोआप येत दात हे नंतर येतात आपल्या तोंडात जे जे काही पडेल त्याच योग्य चर्वण करून ते आपल्या मदतीसाठी आयुष्यभर स्वतःची झीज करवून घेत असतात ते ही गप्प बसून सोसत असतात आपल्यासाठी तात्पर्य:- *आपल्या सोबत राहणाऱ्या प्रत्येक गोष्टीची मग ते दात असो नातेसंबन्ध,मित्र, सगेसोयरे यांची काळ...

*"जीभेने दाता ला दिलेले उत्तर,,"*

*"जीभेने दाता ला दिलेले उत्तर,,"* सकाळीच श्री कबिरांचा दोहा वाचनात आला,,,,, आणि सरकार स्थापून सुरू ही झालय तरीही हातातून गेलेली सत्ता समोरच्याला बोचतच राहते आणि माझ्या सारखा समोर आला की आपसूकच त्यांचे #मगरीचे_अश्रू बाहेर येतात पण माझ्या समोर मात्रा चालत नाही तरीही आपलं मत मांडायचं म्हणून मग,,,,, अत्यंत साळसूद पणाचा आव आणत समोरचा विचारतो ,,,, नाही पण ते कुठे 53 कुठे 105 थोडा तरी ताळमेळ ,,नाही म्हणजे तुम्हला तरी पटत का,? अस म्हणत आपल्याला शब्दात फसवायचा अडकवायचा केविलवाणा प्रयत्न करतात मी तो ही उडवून लावतो,,, पण सकाळीच कबिरांचा हा दोहा वाचनात आला,,,,, *" दात दम देतात;-हम बत्तीस तू अकेली, जरासी कतर खाऊ, चाबाऊ तो फिर्याद कहा ले जाये जीभ उत्तरते;-एक बात टेडी बोलू तो अरे बत्तीस निकल जाये"* हा कबिरांचा दोहा बरच काही सांगून जातो मुळात कबिरांचा जन्मच मला वाटत चुकलेल्या लोकांच्या कानाखाली मारण्यासाठी झाला असावा,,, *"जीभेंला जेव्हा 32 दात दरडावतात की तू एकटी आहेस आम्ही बत्तीस आहोत जास्त नाटक करशील ना तर खैर नाही तुझी हा हे लक्षात ठेव दुसऱ्याच क्षणी दणकन तुकडाच...

आई साधू आणि राजा

लहानपणी आई बरेचदा वशिष्ठऋषींनी रामाला राक्षसांना मारायला घेऊन गेल्याची गोष्ट सांगत असे,,, आणि माझा नेहमी गोंधळ उडत असे की वसिष्ठ ऋषी च जर यज्ञ करवून राम ला जन्माला घालू शकत होते त्याला शिक्षण देऊन लढाई करण्या योग्य बनवत होते आणि ते शिक्षण घेऊन जर राम राक्षसांचा निःपात करू शकत होता तर ,,,,🤔 मुळात वसिष्ठ स्वतःच हे काम करू शकत होते च की त्यासाठी राम जन्माला येण्याची तो मोठा होण्याची वाट का पहात होते ते स्वतः राक्षसांचा निःपात करू शकत नव्हते का❓,,,, आणि आईच उत्तर ठरलेलं असे *बाळा ते साधू होते* साधू ने साधुचं काम साधूने कराव राजाने राजाचं,,,, मी मात्र पटवून घ्यायला तयार नसे ,,,,, मात्र काल दुपारी घरी गेलो तर tv वर नातू कार्टून पहात होता त्यावर देखील एका म्हाताऱ्या आजारी राजाची गोष्ट चालू होती मी ही पाहू लागलो,,, सारे मंत्री संत्री प्रधान राजाच्या पायाशी चिंताक्रांत बसलेले असतात राजा निपुत्रिक असल्यामुळे आता राजाच्या पश्चात कोण❓ असा प्रश्न सर्वांनाच सतावत होता,, सगळ्यांनी शेवटच्या दिवशी विचारलं काय मग राजा तुमच्या मनात तरी कसं काय काय करावं आम्ही कुणाला राजा बनवू? ,,, तेव्हा राजा म...

रामाचं राजकारण आणि आमचं पुणे पुण्यातले आम्ही,,,2

*कुठल्याही विधायक कामासाठी कस एकत्र येऊ नये उलट जागृत समाजाची ताकद कशी फुग्याला टाचणी लावल्या सारखी काढून टाकावी त्याच उत्तम उदाहरण* काल वाचलं होतं रामाने वालीला मारल्या नन्तर सुग्रीवला राजा आणि वाली पुत्र अंगदाला युवराज घोषित करून सुग्रीव आणि वाली गटाला एकत्र बांधून ठेवलं कारण देव कार्य करायचं असेल तर हेवेदावे रुसवे फुगवे मान अभिमान हे दूर ठेवून एकत्र यायचं असत,, हे दोन्ही गट एकत्र आले नसते लंका दहन झालं असत का?? पण नाही मीच काय तो शहा-णा ही भूमिका आडवी आली की माणूस आणि त्याच्या इच्छा आडव्या झाल्या शिवाय रहात नाहीत त्याची ही आठवण,,,,, *संघटणाला झालेला विरोध हा इतिहास कधीही विसरत नाही*,,, सन 1993 मुंबईत दिवाळीत फटाके फुटावेत तसे एका मागोमाग एक बॉम्बस्फोट झाले,, ते दुबई मार्गे झाले ते बाहेरून आलेल्या अतिरेक्यांनी केले हे उघड झालं,,, पण बाहेरून आलेले हे त्यांना इथे संभाळले कुणी ? इथे त्यांची जेवायची रहायची व्यवस्था कुणी केली?,,हे काम झाल्यावर ते सही सलामत त्यांच्या मुक्कामी कसे पोचवले गेले?? इथे येऊन ते राहिले कुठे याचा शोध घेताना सरकारच्या अस लक्षात आलं ,,,, धार्मिक कार्यसाठी...

वाली वधा नन्तर श्री रामांनी काय राजकारण केलं??

समसमान वाटणी करायची वेळ आली तेव्हा श्रीरामांनी काय केलं,,,???? जेव्हा *राम हनुमंत यांचं ठरलं होतं सुग्रीव मित्र झाला होता वालीला मारायचं ठरलं* आणि सीता शोधार्थ ही सारी वानरसेना घेऊन लंकेवर स्वारी करायची आणि सीता सोडवून आणायची त्या नन्तर ची ही गोष्ट,,,,, तेव्हा सुग्रीवला सांगितलं की तू वालीला युद्धा साठी बोलव ते युद्ध सुरू असताना मी वालीला मारेन,,, युद्ध सुरू झालं दोघे ही वीर एकमेकांना भिडले दोघ ताकद पणाला लावून मल्लयुद्ध करत होते पण कुठे तरी लहान भाऊ मोठ्या भावावर कमी पडताना दिसत होता मग हनुमंताने शक्कल लढवली सुग्रीवा च्या गळ्यात तुळशीची माळ घातली,, तेंव्हा पासून देवाला देखील कळलं की जो माळ धारण करतो तो आपला,,, असो, आणि मग रामाने बरोबर निशाणा साधला आणि वालीला मारलं,, हे जरी इतकं सोप्प होत तरी खरा पेच पुढे होता कारण राम सुग्रीवला राजा बनवणं हे क्रमप्राप्त होत हनुमंताने तिथेच रामाला मदत केली रामा,, रामा सावध इथे वानरसेनेत दोन गट आहे कसाही होता तरीही वालीला मानणारा एक गट आहे एक गट सुग्रीवाला मानणारा आहे आणि *लंका दहणासाठी* आपल्याला संपूर्ण वानर सेनेची गरज आहे तेव्हा एकट्या सुग्...

आईचा मंत्र, मी आणि भाजपची सत्ता लालसा,,,

परवा नेहमी प्रमाणे fb वरची कुस्ती खेळत होतो तोच तिथे माझे मामा आले आणि म्हणाले *कुणीही आपली सत्ता आपला पक्ष वाढणारच फायदा बघणारच,,,* आणि मला नेमक्या दोन घटना नेमक्या काल आठवल्या,,, एक तर लहानपणी आईने दिलेला मंत्र आणि दुसरा हॉस्पिटल मध्ये असलेला माझा मित्र,,,, लहानपणी लक्ष सार खेळण्याकडे असे आणि मग गडबडीत जेवण खान वैगेरे चालत असे त्यात *आई जे बनवेल ते भारीच असे आणि ते मग भर भर भरायचं तोबरा भरल्या सारख, पण आवडीचं म्हणून तोबारा भरायचा नसतो तो चावता ही येत नाही आणि गिळता ही येत नाही गिळला तर ठसका लागणं उलटी होणं किवा मग हळू हळू पाणी पीत तो घास कसा बसा गिळण,,* *परन्तु असा गिळलेला घास त्याची ना चव घेता येत असे नाही तो अंगी लागत असे* त्यावेळी आईने तो आईने दिलेला मंत्र मी आजही विसरलेलो नाही *आई म्हणायची आवडलं म्हणून तोबारा भरू नकोस हळू हळू तोंड स्वीकारेल इतकंच खा तोंड म्हणजे पोट नाही जे भरून ठेवशील आणि पोटाची ताकद तेव्हडीच आहे जेव्हड तोंड स्विकार करेल या उलट वागशील तर अपचन हे ठरलेलं,,,* आजही तो जेवायचा नियम सगळीकडे लागू होतो आणि त्यामुळे*मी व्यवसाय करतो धंदा करत नाही*,, उग...

पोपट मुका झालाय (मेलाय ),,,

एकदा एक राजा नेहमी प्रमाणे शिकारीला जंगलात गेला असता नेहमी प्रमाणे सैन्याची आणि त्याची चुकामूक झाली,,, नेहमी प्रमाणे मग जंगलातील आदिवासींनी राजाला पकडून नेलं,,, पुढे त्यांच्यात देवीला राजाचा बळी द्यायचा त्यासाठी योग्य वेळ मुहूर्त पाहून दुसऱ्याच दिवशी सक्काळी सक्काळी सूर्य उगवतात देवीला बळी द्यायचं ठरलं,, त्यासाठी राजाला वधस्तंभावर दोरखंडाने बांधण्यात आल,,, परन्तु बळी चा मुहूर्त पाहणाऱ्या पेक्षा राजाचं नशीब जोरावर होत,, उद्याच्या मरणाची वाट पाहणारा राजा असहाय होत वर देवा कडे पहात होता संध्याकाळ झाली रात्र झाली आणि अचानक कुठूनसा एक पोपट उडत उडत तिथे आला त्याने राजाला त्या अवस्थेत पाहिलं आणि हळू हळू तो त्या दोरखंडाच्या गाठी सोडवू लागला, राजाला तर देवच पावला होता थोड्याच वेळात राजा त्या दोरखंडातुन मुक्त झाला राजाला खूप आंनद झाला तत्क्षणी राजाने त्या पोपटाला सोबत घेत आपल्या राज्याकडे निघाला इकडे पहाट झाली होती आदिवासी जागे होत पहातात तो काय राजा गायब झाला होता,,, इकडून आदिवासी तिकडून राजाचे सैनिक देखील तो पर्यंत शोधायला बाहेर पडले होते सुदैवाने तो पर्यंत राजा आपल्या सैनिकांसह राज्या...

मेक्सिको महापौर ,*न्यायासाठी थेट कारवाई करणारे नागरिक* आणि आपण

मेक्सिको माफिया, मेक्सिको फूड,मेक्सिकोने पटकावले नोबेल पुरस्कारावर तर नावच कोरलेलं , याचा जसा आदर्श जनसामान्यांना असेल तर मला वाटत *न्यायासाठी थेट कारवाई करणारे नागरिक*  हा आदर्श देखील लोकांनी ठेवायला हवा,,,  तर झालंय अस की मेक्सिकोतील चिआपास हे सर्वात लहान गरीब पण प्राचीन *माया संस्कृती* चा वेध आणि शोध घेणाऱ्यांचे अतिशय आवडते राज्य  या *चिआपास मधील ही परवाची गोष्ट,,,,*  चिअसपास मधील सांतारिटा या गावातील सामान्य शेतकरी इतके संतापले की त्यांनी,, *आपल्या महापौराला त्याच्या कार्यालयातून खेचून काढले  त्याचे हसत पाय बांधून नन्तर ट्रकच्या दोरखंडाने जखडले आणि सरळ त्याचज धिंड काढली*  तो महापौर जॉर्ज लुईस हरणांडेझ याचा गुन्हा एकच होता तो म्हणजे,,,,*  *निवडून येण्याआधीपासून आणि सतत नन्तरही तो नागरिकांना सांगत असे की आता आपले सगळे रस्ते चांगले होणार बघा आता मी कसे सगळे रस्ते गुळगुळीत करतो ते*  त्याच्या या अच्छेदिनच्या वायद्यावर नागरीकांनी विश्वास ठेवला बरेच दिवस वाट पहिली,,,  परंतु हा महापौर म्हणजे नुसतेच *शब्द बापुडे केवळ वारा,,,* आहे *एक न...

लालबहादुर शास्त्रीजी, अनंत दंडवत....

......फार आग्रह केल्यानंतर वरदक्षिणा म्हणून फक्त चरखा मागणारे शास्त्रीजी  ....  परिवहन मंत्री असताना भारतातल्या पहिल्या महिला कंडक्टर ची नेमणूक करणारे शास्त्रीजी ....... गृहमंत्री म्हणून काम करताना लाठी ऐवजी पाणी वापरण्यास सांगणारे शास्त्रीजी ...... वयाच्या दीड वर्षी वडील गमावल्यानंतर कित्येक मैल भर दुपारी अनवाणी चालत काॅलेजला जाणारे शास्त्रीजी ...... पुस्तके डोक्यावर बांधून दररोज दोन वेळा नदी पोहून शाळेत जाणारे शास्त्रीजी ..... एका रेल्वे अपघातात अनेक जणांना जीव गमवावा लागल्यामुळे  स्वत:ला जबाबदार ठरवत रेल्वेमंत्री पदाचा राजीनामा देणारे शास्त्रीजी ....... गरीब लोकांची घरे पाडावी लागू नये म्हणून घरी पायी जाणारे पंतप्रधान शास्त्रीजी  ...... पंतप्रधान असताना मुलाच्या काॅलेज अर्जावर आपला हुदा सरकारी कर्मचारी लिहिणारे शास्त्रीजी ...... पाकिस्तानला सर्वात प्रथम पाणी पाजणारे, जय जवान जय किसान जयघोष करत सैनिकांसाठी पुर्ण देशासोबत दर सोमवारी उपवास करणारे शास्त्रीजी  ...... पंतप्रधान असताना खासगी कामासाठी सरकारी गाडी वापरल्यावर लगेच त्याचे पैसे सरकारी...

परशुरामांचा शाप आणि मोडिशा राजकारण

परशुरामांचा शाप आणि मोदीशा राजकारण,,, परिस्थितीने केवळ सुत पुत्र असा शिक्का बसलेला कर्ण जेव्हा धनुर्विध्या शिकायचं ठरवतो कारण उद्याच्या संभाव्य युद्धात तोच एक अर्जुनाला भारी पडेल असा प्रतिस्पर्धी असतो त्या प्रमाणे सगळ्यांकडे जातो हात जोडून विनंती करतो परन्तु वेगवेगळी कारण देत त्याच शिक्षण नाकारलं जात शेवटी तो भगवान परशुरामांकडे जातो,, आणि मी ब्राम्हण आहे मला धनुर्विद्या शिकवा अस खोट बोलतो,, भगवान परशुराम त्याला शिकवतात देखील, परंतु एकदा दोघे अरण्यात गेले असता दुपारच्या रणरणत्या उन्हात दोघे सावली खाली बसले असता श्री परशुराम कर्ण| च्या मांडीवर डोकं ठेवून झोपी जातात आणि खाड्या वेळाने एक भुंगा येतो आणि त्याच्या मांडीला चावतो , आता त्याला हाकलाल तर गुरूंची झोप मोडेल या विचाराने कर्ण त्या भुंग्याच्या चावण्याकडे दुर्लक्ष करतो परन्तु थोडं थोडं म्हणत तो भुंगा त्याची मांडी पोखरून काढतो ते रक्त सगळीकडे पसरत ते गार गार रक्त जेव्हा परशुरामांच्या बाजूनं जात त्या गारव्याने त्यांना जाग येते बघतात तो कर्ण अगदी ते सारं सहन करत शांत बसला आहे तेव्हा त्यांच्या लक्षात येत हे सारं सहन करायची ताकद साध...

लेकिस पत्र

प्रत्येक आईवडिलांनी त्यांच्या लेकीला/लेकींना लिहावे असे पत्र चार्ली चॅप्लीन यांनी त्यांच्या जेराल्डिन नावाच्या मुलीला लिहिले आहे. हे एका बापाने त्याच्या लाडक्या लेकीला दिलेलं मूल्यशिक्षण तर आहेच आणि प्रेमाने केलेले मार्गदर्शनही आहे. तसेच  माणुसकीचा धडा शिकवणारं, मनाचा तळ ढवळून काढणारं, डोळ्याच्या कडा ओलावणारं साहित्यातील एक तेजस्वी, सळसळतं पान आहे! " लेकीस पत्र " प्रिय मुली, ही रात्रीची वेळ आहे. नाताळची रात्र. माझ्या या घरातील सगळी लुटुपुटूची भांडणं झोपली आहेत. तुझे भाऊ-बहीण झोपेच्या कुशीत शिरले आहेत. तुझी आईही झोपी गेलीय. पण मी अजुनही जागा आहे. खोलीत मंद प्रकाश साकळतोय. तू किती दूर आहेस माझ्यापासून पण विश्वास ठेव, ज्यादिवशी तुझा चेहरा माझ्या डोळ्यांपुढं तरळणार नाही, त्या दिवशी आंधळं होऊन जाण्याची माझी इच्छा असेल. तुझा फोटो तिथं टेबलवर आहे आणि इथं ह्रदयातही. पण तू कूठं आहेस? तिथं, स्वप्नांसारख्या पॅरिस शहरात! तू 'चॅम्प्स एलीसिस'च्या भव्य रंगमंचावर नृत्य करत असशील. रात्रीच्या या शांततेत मला तुझ्या पावलांचा आवाज येकू येतोय. हिवाळ्यातील आकाशात असणा...

कर्ण,अश्वसेन, आणि राज्यकर्ते

घर आमचं माळकरी त्यामुळे पूर्वी ग्रंथवाचन वारी ह्या सामान्य गोष्टी होत्या(आताशा अवघड वाटू लागल्यात ) त्यामुळे रामायण महाभारत हे ही रोजच्याच कथा मग हळूहळू शाळेत देखील मुलांना वाचनाची गोडी लागावी म्हणून खास पुस्तक मुलांना वाचायला देत असत काही शिक्षक मग कधी कधी त्यावर प्रश्न ही विचारत ,, अशी ती ऐकण्याची वाचनाची गोडी लागलेला मी त्या ग्रंथ वाचनात हमखास कर्णाची गोष्ट येत असे,, इतकंच कळायचं की तो दुष्ट लोकांसोबत आहे आणि विजय पांडवांचाच होणार,, हे गणित ग्रंथ संपायच्या आधीच डोक्यात फिट्ट झालेलं असायचं, पण,,,, मनात मात्र कायम एक हुरहूर असायची जळो मेल ते युद्ध वैगेरे,, पांडव भले ही युद्ध जिंकोत पण कर्ण मात्र हरयला नको,,, कारण हळू हळू राधेय वैगेरे सारखी पुस्तक वाचनात येऊ लागली होती पण तरीही तो शत्रू सोबत लढतो हे मात्र मनात ठसलेलं असून ही तो हरू नये हे मनाने ठरवलेलं असायचं,, मग एक दिवस माझे आजोबा आईचे वडील ,, पुण्याला गावी गेलो असताना त्यांना मनातला प्रश्न विचारला,, की अस का ? मीच नव्हे माझे बरेच समवयस्क मित्र देखील असच म्हणतात की कर्ण जिंकायला हवा,,, अस नक्की खरच होत का?? *त्यावेळी आजोब...

चोर_आणि_घंटा

पूर्वी जेव्हा आमचं गाव हे गाव होत त्यावेळची आठवण,,, शेती वाडी गाई गुरू म्हैस गाढव कोंबड्या बकरे हे जवळपास प्रत्येक घरात पाळीव असतच,, त्यामुळे अशा समृद्ध घरात गाई गुरू म्हशी यांच्या चोऱ्याचं प्रमाण ही जास्त असे,,,, परंतु बरेचदा चोर चोरी करताना पकडला जात असे मग काय,, दे दना दन,,,  असा कार्यक्रम ठरलेला असे,, पण चोर हा कायम तुमच्या हुशारीच्या चार पावलं पुढे असतो,,, हळू हळू चोरांनी चोरीची पद्धत बदलली एकटे दुकटे येणारे चोर आता हळू हळू,, टोळक्या टोळक्याने येऊ लागले मग ते ही जनावर चोरताना आधी ते #गळ्यातील_घंटा काढू लागले मग त्या चोरां पैकी एक जण ती घंटा घेऊन निघून जात असे #मालकाची_दिशाभूल_करण्यासाठी आणि उरलेले विरुद्ध दिशेने,,,, अर्थातच मालक मग घंटेचा आवाजाचा मागोवा घेत पकडायला धावत असे पण काही अंतरावर तो चोर ती घंटा कुठे तरी आडोशाला टाकून निघून जात असे आणि इकडे ज्यांच्या हाती ते चोरलेलं जनावर गाय, म्हैस जे असेल ते शांत पणे घेऊन जात असे मधल्या मध्ये #मालक मात्र मस्त #फसत असे #हिंदूंच्या गाई म्हशी:-- राम मंदिर, 370, कश्मीर,पाकिस्तान, भ्रष्टाचार, आरक्षण, या सारखी हिंदू हिताच...
टोट्टा पटाखा आयटम माल’ : पुरुषांनाही बलात्काराची भीती वाटली पाहिजे? नक्की वाटेल?? 8च्या आत घरात ही बंधन पुरुषांना देखील पाळावीशी वाटायला हवीत,, हा विचार घेऊन हा नेटफ्लिक्स वरचा सिनेमा पहायला मिळाला,,,,, एक सिनेमा. नावावरून काहीच अर्थ लागेना. म्हटलं जरा डोकावून पाहूया. नाव होतं- टोट्टा पटाखा आयटम माल. आणि मी हादरलो हा सिनेमा होता चौघींचा. चारचौघींसारख्या त्या चौघी. शहरी, निमशहरी कुठेही या चौघी सापडतील अशाच. पुरुषी क्रूरतेला बळी पडलेल्या.  दिल्लीतल्या निर्भया हत्याकांडानं खजील झालेल्या.  पुरुषी ताकदीवर अनेक बलात्कार घडतात, पण लहानपणापासून स्त्री ही अशक्त, कमजोर, लाचार असण्याची भावना ठासून उरी बाळगणाऱ्या चौघी कुठेतरी आत धुमसत असतात.,,, त्या पेटून उठतात, *जेव्हा एक धडधाकट, अतिशय माजोरडा साडेसहा फूट उंचीचा तरुण त्यांची छेड काढतो.* सुरुवातीला दुर्लक्ष्य करण्याचा पवित्रा घेणाऱ्या या चौधी शेवटी त्याला धडा शिकवण्याचे ठरवतात. कणखर वृत्तीची कराटे टीचर *चित्रा* त्याला झुंज देते, तरी नाजूक स्त्री शरीर आणि माजलेला सांड, या दोघांत जुंपत नेहमीसारखा पुरुष हावी ह...

संतुर्की-- संत्या आणि सुरकीची गोष्ट

*संतुर्की* संत्या आणि सुरकीची गोष्ट,, मराठीतील वेब सिनेमा,, खूपच छान सिनेमा,,, कुठे ही जाती व्यवस्थेवर दगड फिरकवला जात नाही,, खूप मोठा डायरेक्टर नाही,, परदेशी लोकेशन नाही,, प्रसिद्ध गीतकार सोबत नाहीत,, गरीब श्रीमंत असा रोजचा घीसापिटा फॉर्म्युला नाही,, 20 वर्षांपूर्वीचा बापाच्या खुनाचा बदला वैगेरे,, भूत भुताटकी, देव देवतांवर टीका,,, हिंदू धर्मावर टीका,, अस्स काहीही नाही,,, उंच पुरा तगडा हिरो 2 पीस मधील हिरोईन महागड्या गाड्या त्यांची तोडफोड जुडो कराटे येणारा सर्वगुणसंपन्न हिरो मटेरियल नाही दारू सिगरेट मोबाईल यांची रेलचेल नाही *आणि तरीही दोन तास सिनेमा तुम्हाला धरून ठेवतो* मोठी शाळा कॉलेजेस नाहीत भारी गुळगुळीत रस्ते नाहीत आणि *आयटम सॉंग* तर बिलकुल नाही *आणि तरीही दोन तास सिनेमा तुम्हाला धरून ठेवतो* सहज साधं निर्मळ प्रेम कुठेही त्याचा अतिरेक नाही तू माझी नाही तर कुणाचीही होणार नाही ही भूमिका नाही आजच्या पिढीच नेतृत्व कबीर सिंग प्रेमभंगात दारुडा हिंसक होतो आणि लोकांना तो आवडतो ही😏 त्या कबीर सिंग वाल्यांनी तर हा सिनेमा तर आवर्जून पहावा अरे प्रेमाचा पाया त्...

विकास,,,,

चक्रव्यूह सिनेमातील एक भाग यातील माओवाद आणि नक्षली हे दोन शब्द वगळून हा सीन पहा आपल्याच विकासाच्या हव्यसा पायी सरकार कुठल्या थराला आपला इप्सित साध्य करत पहा  हे पाहून समजून घेतल्या नन्तर ही केवळ विकास हवा म्हणून मोदींची साथ देणं योग्य आहे विकासाचा भसम्या झालाय आपल्याला फक्त हवंय पण नक्की काय किती कशाला हे मात्र माहिती नाही आणि विचार करायची इच्छा ही नाही बस्स गंधारीने बांधली म्हणून आपण ही डोळ्यावर झापड चढवून घेतली आहेत फक्त हवंय,,,, मग त्यासाठी काहीही करावं लागलं कुठल्याही थराला जावं लागलं तरीही सरदार पटेलांची मूर्ती उत्तम उदाहरण  नर्मदेच्या खोऱ्यातील विस्थिपित केले गेलेल्या लोकांना आधी जागा द्यायला हवी की पटेलांच्या मूर्तीला ? पटेल सुध्दा ह्यासाठी मोदींना शापच देतील पण ऐकणार कोण? सरकारला साम दांम दंड भेद वापरून विकास करायचा आहे आणि आम्हाला तो हवा आहे मग विकासपुरुष आहेतच दंड थोपटून उभे त्या हवंय च्या नादात आम्ही कधी ओरबाडू लागलो आणि त्या राक्षसी लवासाला विकास अस नाव कधी देऊन बसलो ते अजूनही आम्हला कळलं नाही

त्या दिवशी खर्या अर्थाने मदर्स डे साजरा होईल

एका खेडे गावात एक आई आणि तिचा १०-१२ वर्षाचा मुलगा राहत होते, उद्या आपला मुलगा जत्रेला जाणार त्याच्या हातात १० रुपये तरी असावे, पण घरात १० रुपये नाही म्हणून त्या माऊलीने बाजूच्या शेतात ... राबायला गेली संध्याकाळी मजुरीचे पैसे आणले, तितक्यात मुलगा शाळेतून आला आई ला म्हणाला मला जेवायला दे मी लवकर झोपतो उद्या जत्रेला जायचे आहे सकाळी लवकर उठेन. म...ुलगा सकाळी लवकर उठला त्या माऊलीला पण उठवले, मुलगा अंघोळीला जाताना आईला म्हणाला आई लवकर न्याहारी तयार ठेव मी लगेच अंघोळ करून घेतो माऊलीने भाकर करून ठेवली, दुध चुलीवर होते, मुलगा अंघोळ करून आला आई जवळ बसला आणि आई ला म्हणाला मला लवकर दुध आणि भाकरी दे मला उशीर होतोय आई ने आजू बाजूला पहिले दुध उतरवायला काहीच सापडत नव्हते पुन्हा मुलाचा आवाज आला आई लवकर कर माउलीने विचार न करता तसाच दुधाचा टोप हाताने उतरवला गरम दुधाच्या टोपाचे चटके मस्तकाला वेदना देऊ लागल्या हाताची लाही लाही झाली, पुन्हा मुलाचा आवाज आला आई लवकर कर न उशीर होतोय त्या माउलीने पुन्हा टोप उचलून दुध प्यालात ओतले आणि मुलाला दिले, त्या माऊलीच्या डोळ्यातले अश्रू...

रंग,,,

निवडणुकीची रणधुमाळी tv वर आणि बाहेरही चालू होती,,, एकंदरीत सर्वच प्रचार प्रसार माध्यमांनी मोदींना झुकत माप दिल होत,,, आणि त्या पार्श्वभूमीवर आमचे नातू महाराज हातात पेन्सिल घेऊन चित्र रेखाटत होते हातात वेगवेगळ्या पक्षाचे झेंडे नाचवणारे कार्यकर्ते, त्यांचे नेते, त्यांच्या झेंड्यांचे रंग त्याला जस जमेल तस तो रंगवत होता आणि नेमका माझं लक्ष नसताना tv त गुंग होतो बातम्या ऐकत त्याने अचानक त्याने प्रश्न केला दादा या दोघांना कुठला रंग देऊ?? आणि माझ्या तंद्रीतुन बाहेर आलो,, म्हंटल कुणाला रे बघू,, म्हणत त्याच चित्र हाती घेतलं तर त्याने अगदी बरेचसे योग्य रित्या कार्यकर्ते त्यांचे पक्ष त्यांचे झेंडे अगदी साजेसे रंग त्यात भरले होते,, त्यात कम्युनिस्ट ते वंचीत त्यांचे हिरवे निळे लाल,,, काँग्रेसचा तुटलेलता पंजात धरलेला तिरंगी ,,तिरंगी शाल अंगावर पांघरले सोनिया राहुल ,, बेरकी पवार त्यांच्या निधर्मी रंगात घड्याळाची  टिकटिक हिकमतीने थांबवलेला तिरंगी झेंडा, सारे हिंदुत्व मानणारे त्यांना साजेसं भगवे रंग,, असे सारे मुक्तहस्ते रंग भरूनही त्याला या दोन नेते कुठल्या रंगात रंगवायचे ते कळत नव्ह...