Skip to main content

Posts

Showing posts from January 2, 2011

बाप- नियम

बापाच महत्व वाढवताना येथे मला आईच महत्व कमी नाही   करायचं  पण,,,, कायम उपेक्षित ,दुर्लक्षित ,रागाच,वाईट पणाचा धनी , होणार्या   बापाच महत्व हि कमी नाही हे सांगायचा  अल्पसा प्रयत्न,,,, आई प्रत्येक बाबतीत रडून मोकळी होते  पण बापाने ,,,नाही,, नियमच असतो तो ,,, ज्योती पेक्षा समईने च तापायच असत ,,नियमच,,, जेवण करणारी आई लक्षात   राहते, पण आयुष्याच्या शिदोरीची व्यवस्था करणाऱ्या बापाला  विसरतो आपण ,,नियमच,,, स्वतःचा बाप वारला तरी रडता येत नाही ,,नियमच,,,, बहिणींसाठी भावांसाठी आधार व्हायचा असत ,,नियमच,,, देवकी यशोदेच कौतुक करतो सहज पण ,,, कंसाच्या कराल दाढेतून वाचवणारा बापच असतो,,नियमच,,, कौसल्येचा राम असेल हि पण,,, पुत्र वियोगाने जातो दशरथ च ,,,नियमच,,,, मुलाबाळांना चांगल चुंगल देताना जो फाटका राहतो  तो बापच,,, नियमच,,, आमच्या नशिबाची भोक कायम त्याच्या  बनियानवर ,,,नियमच,,, आम्ही १०\१५० सहज खरचतो सलून   मध्ये, तो मात्र अंगाचा साबण दाढीला लावतो,,,नियमच,,, आमच्या आजारपणात धावणारा बाप  स्वतःमात्र ताप अंगावर काढतो,,,नियमच  ,,, आजाराला नाही घाबरतो एक महिन्याच्या आरामाला  ,,,नियमच,,, पोरीच लग्न अन

प्रश्‍नांची उत्तरं ???????????????????

जरा या पुढे दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या पाहू - १ - जगातल्या पहिल्या दहा सर्वांत श्रीमंत माणसांची नावं सांगा पाहू. २ - गेल्या पाच वर्षांत विश्‍वसुंदरी किताब मिळवणऱ्यांची नावं आठवतायत ? ३ - या वर्षीच्या पाच नोबेल विजेत्यांची नावं सांगता येतील ? ४ - गेल्या दोन वर्षांतल्या ऑस्कर विजेत्यांची नावं लक्षात आहेत का ? हं! काहितरीच काय विचारताय ? असं तर वाटलं नाही ना तुम्हाला ? पण , असं वाटलं नसलं तरी , या प्रश्‍नांची उत्तरं देमं तसं सोपं नाहीच , नाही का ? टाळ्यांचा कडकडाट हवेत विरून जातो. पदकं आणि चषक धूळ खात पडतात. जेत्यांचाही लवकरच विसर पडतो. आता या चार प्रश्‍नांची उत्तरं द्या पाहू - १ - तुमच्यावर ज्यांचा प्रभाव आहे अशा तीन शिक्षकांची नावं सांगा बरं. २ - तुम्हाला अगदी तातडीची गरज असताना मदत करणाऱ्या तीन मित्रांची नावं सांगता येतील ? ३ - आपण म्हणजे अगदी महत्त्वाची व्यक्ती आहोत , असं तुम्हाला वाटायला लावणाऱ्या एखाद- दोघांची नावं सांगता येतील तुम्हाला ?   ४ - तुम्हाला ज्यांच्याबरोबर वेळ घालवायला आवडतो अशा पाच जणांची नावं सांगा बरं. क्षणभर विचार करा. आयुष्य अगदी छोटं आहे. तु

एक गोष्ट सिएटलच्या ऑलिम्पिकची.

ही एक गोष्ट आहे काही वर्षांपूर्वीची. सिएटलच्या ऑलिम्पिकमध्ये शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेत सहभागी झालेले  नऊ स्पर्धक स्पर्धा सुरू होण्याच्या संकेताची वाट पाहात  जय्यत तयार उभे होते.  ही सारी मुलं शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या अपंग होती. पिस्तुलाचा आवाज झाला आणि शर्यत सुरू झाली.  साऱ्यांनाच पळता येत होतं असं नाही. पण , प्रत्येकाला स्पर्धेत भाग घ्यायचा होता आणि महत्त्वाचं म्हणजे जिंकायचं होतं. धावता धावता एकाचा तोल गेला. काही कोलांट्या खाऊन तो पडला आणि रडू लागला. त्याच्या रडण्याचा आवाज ऐकून अन्य आठही जण पळायचे थांबले. सारे मागे फिरले... सारे जण... डाउन्स सिन्ड्रोम ' ची व्याधी असलेली एक मुलगी त्याच्या जवळ बसली. तिने त्याला मिठी मारली आणि मग विचारलं , " आता बरं वाटतंय ?'' मग सार्यांनी त्याला उभं केलं आणि अंतिम रेषेपर्यंत सारे खांद्याला खांदा लावून चालत गेले. ते दृष्य पाहून मैदानावर उपस्थित असलेले सारेजण हेलावून गेले.  उभे राहून मानवंदना देत साऱ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. बराच काळ त्या टाळ्यांचा आवाज आसमंतात गुंजत होता......... त्यावेळी तिथे उपस

दमलेल्या बाबाची कहाणी ,,,

आज आपल्याला अमिताभ किंवा सन्नी देओल ,सचिन का आवडतात ? तर एका शब्दात सांगायच तर आपल्याया जे करू वाटत ते ते करून दाखवतात ,  अशक्य ते शक्य करून दाखवतात ,,,, मग डॉ.सलिल कुलकर्णी,आणि संदीप खरे का आवडतात ? त्यासाठी त्यांच गाण ऐकल पाहिजे , त्यांच संगीत ऐकल पाहिजे, त्यांच्या तालावर नाचणारे शब्द पाहिले(अनुभव) पाहिजेत, आणि मग लक्षात येत अरे मलाही हेच म्हणायच होत की ,,,, आणि त्यात ही दमलेला बाबा ऐकला की आपलाच आपण जोपासलेला अहमपना गलुन पडतो ,,, आणि लक्षात येत अरे मी ही आज बाबा आहे खरा पण,,, मी कुठे प्रयत्न केला माझ्या बाबांना शोधायचा ? मी कुठे प्रयत्न केला त्याना समजुन घेण्याचा? मी कुठे प्रयत्न केला त्यांच्यातल्या वास्सल्याला समजुन घेण्याचा ? मी कुठे त्यांच्या कड़क आवरनाखाली त्यांची माया शोधली? एखायाला जसे काही अघटित घडल की त्याला आईच दूध आठवत  अगदी तसाच ,,, दमलेला बाबा ऐकला की आपला बाप आठवतो,,,,,,,,,,,,, आणि नकळत आपल्या ही पापण्या ओलावातात जुन्या आणि नव्या बाबाच्या ही,,, ही त्याचीच कहाणी,  कोमेजुन  निजलेली एक परी रानी उतरले तोंड डोळा सुकलेले पाणी  रोजचेच आहे सारे आज काह

आपल वैवाहिक आयुष्य खरच सुखाचं आहे?"

हे लग्न झालेल्यांनी , न झालेल्यांनी   आणि लग्न होणार असलेल्यांनी ...... नक्कीच वाचा : विचार करा . एका रात्री तो  घरी आलो ते मनाशी काही ठरवूनच . जेवताना त्याने  तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला , " मला तुझ्याशी काही बोलायचं आहे ." तिच्या डोळ्यांत वेदना उमटली ;  तरीही ती शांतपणे जेवत होती ,    सगळे शब्द जुळवून त्याने तीला   सांगितलं ,  मला घटस्पोट हवाय ." तिने शांतपणे विचारल ,- " का ?" तिचा प्रश्न त्याने टाळला , ती भडकली .  समोरच ताट तिने भिरकावून दिलं .  लग्न मोडायला नेमकं काय कारण आहे , हे तिला जाणून घ्यायचं   होत ;    पण माझं मन दुसऱ्या   स्त्रीवर आलय हे तो तिला   स्पष्टपणे सांगू   शकत नव्ह्तो . माझा बँक ब्यालन्स , कार , घर , सगळ मी तिला देऊ केलं :    पण त्याने समोर केलेल्या घटस्पोटाच्या कागदाचे तिने तुकडे केले . दुसऱ्या दिवसी तिने त्याच्या समोर घटस्पोटा विषयीच्या अटीचा कागद समोर केला . तिला त्याच्या कडून काहीही नको होते ,   फक्त एक महिन्याची नोट

"ना- ताळ"

एकमेकांशी ज्यांचा नसतो "ताळ" ते साजरा करतात "ना- ताळ" आणि काही का असेना हे आमच नाही ही सभ्यता ? आमची नाही सरत्या वर्षाला निरोप  तोही मद्य धुंद अवस्थेत आम्ही देत नाही आम्ही उगवत्या सुर्याचे उपासक आहोत हेच विसरत आहोत ? देव दास मधील चुनी बाबु म्हणतो ,, "द" से दर्द ,दोस्ती, तसेच आजचे शिकले सवरलेले,, कॉलेज बाबु "ड" से डिसेंबर  तो ही 31first चा म्हणु लागलेत आणि दिमतीला आहेतच टिव्ही च्यानेल्स  ,, ह्या असल्या निरोप समारंभातुन काय सध्या होते? हे विचारायचे नाही,, आणि विचारलेच तर ,,? काय नाय यार जस्ट enjoyyyyyyyy काय नाय यार फ़क्त मजा करायची असा हा आता "मजा" करण्याचा भाग जरी हलका फुलका वाटला तरी उद्या तो डोइ जड़ ठरणार आहें हेच विसरतो आहोत  तात्पर्य- "चैत्र पाडव्याला महत्त्व देण्या ऐवजी ,, आम्ही ३१ डिसे. ची वाट पाहणार असू तर ,, तो आमच्याच "वैचारिक दीवाळ खोरिचा भाग मानावा लागेल "