Skip to main content

Posts

Showing posts from May 20, 2018

महाभारत कथा

एका ईमेल मधून आलेली ही सुंदर महाभारत कथा सर्वाबरोबर वाटून घ्यावी म्हणून देत आहे. यातून खूप चांगले विचार चांगली शिकवण मिळते. बोधपर आणि वैचारिक असल्याने आस्वाद सदरातून देतो आहे. लेखक (किमान मला तरी) अज्ञात आहे. कोणाला माहिती असेन तर सांगावे ही विनंती. महाभारत कथा महर्षी व्यासांच्या प्रतिभेचा उत्तुंग आविष्कार असणारे महाभारत, आपल्याला अजूनही अनेक गोष्टी सांगत, शिकवत असते. महाभारतातील युद्धकांड तेवढेच प्रसिद्ध आहे. जवळपास ४० लाख योद्‌ध्यांचा समावेश असलेले हे युद्ध मानवी भावभावनांचे अनेक कंगोरे स्पष्ट करते. या युद्धाचा अभ्यास केला असता, त्यातून आजच्या व्यवस्थापनाचे अनेक नियम दिसतात. एका वाचकाने "प्रेरणा' पुरवणीसाठी आवर्जून ई-मेलने हा मजकूर पाठविला. भारतीय युद्ध आणि व्यवस्थापन यांचा संबंध यातून स्पष्ट होतो. ....... ---------------------------------------------------------------------------- पार्श्‍वभूमी भारतीय युद्धामध्ये मनुष्यबळ आणि योद्‌ध्यांचा विचार केला, तर कौरवांचे पारडे जड दिसते. कौरवांचे सैन्य ११ अक्षौहिणी, तर पांडवांचे सात अक्षौहिणी होते. (एक अक्षौहिणी = २१,८७० र

वनस्पती शास्त्राच्या अभ्यासक डॉ.हेमा साने

चला हवा येऊ द्या मुळे जगाला माहित झालेली थोर व्यक्ती पुण्यातील वनस्पती शास्त्राच्या अभ्यासक डॉ.हेमा साने यांनी त्यांच्या बालपणापासून वीज वापरलीच नाही, असे काल 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमात ऐकल्यानंतर या महान स्त्रीबद्दल खूप आदर वाटला. उत्सुकता म्हणून त्यांची अजून माहिती काढली तेव्हा त्या  M.Sc, Ph.D. in Botany & M.A, M.Phil in Indology आहेत असे वाचण्यात आले. त्यांचा इतिहासाचादेखील गाढा अभ्यास आहे. त्यांनी गरवारे कॉलेजच्या वनस्पतीशास्त्र विभागाच्या माजी प्रमुख म्हणून काम केलंय... त्या पाणी   विहिरीवरून आणतात! त्यांनी टेलिफोन वापरलेला  नाही...  त्यांनी वनस्पती शास्त्राशी संलग्न काही पुस्तके लिहिलीत.. पाठ्यपुस्तके लिहिलंत...तीही कंदिलाच्या उजेडात!  आता त्या सौर उजेचा दिवा वापरतात! ..नोकरीतील शेवटची दहा वर्ष जबाबदारी असल्याने त्यांनी लुना वापरली ...तोपर्यंत त्या पायीच जात होत्या. त्यानंतरदेखील नोकरी व्यतिरिक्त इतरत्र त्या पायीच जात..! ... आश्चर्य वाटते नं!.. आपण फक्त बोलतो...त्या प्रत्यक्ष आचरणात आणतात..! . 'साधी राहणी उच्च विचारसरणी'चे तंतोतंत उदाहरण असलेल्य

अब_बस_कर_मोदी

#अंडज_बोलतात #करे_कोई_भरे_कोई_हे_सगळं_पाप_काँग्रेसचं ,,, तेव्हा माझ्या लग्नाची गोष्ट आठवते आज 34 वर्षे झाली त्यावेळी नुकतीच नोकरिवाली बायको पाहिजे अशी नवी फेशन सुरू झाली होती ( आज ती गरज असली तरी मला मंजूर नाही असो,,,) तर त्यावेळी मला ही काही मित्रांनी सल्ला दिला अरे नोकरी वालीच बघ नुकताच मिसरूड फुटलेला मी ही सहज बोलून गेलो नोकरीवालीच बघू तसा बापाने कानाखाली जाळ काढला भडव्या जी लक्ष्मी करून घरी आणायची तीला बाहेर कामाला पाठवणार होय रे??? जी मुलगी करून आणणार तिला सांभाळायची ताकद तुझ्या मनगटात नसेल तर गाढवा लग्नच करू नकोस #लग्न म्हणजे #जबाबदारी तिच्या बापाला ती जड आहे म्हणून तुझ्याशी लग्न नाही लावत आहेत ते आमच्यवरचा विश्वास आणि तुझी कर्तबगारी आपलं समाजातल वजन प्रतिष्ठा पाहून तुला ते मुलगी देत आहेत तू जर #ही_जबाबदारी_पेलायला स्वतःला त्या लायकीचा समजत नसशील तर लग्नच करू नकोस तुझ्या मनगटात जोर नसेल तर हे शिवधनुष्य उचलूच नकोस तो दिवस आहे आणि आजचा दिवस कानात शिस ओतल्यासारखे पडलेले शब्द मी विसरलो नाही आणि आज जेव्हा ही 56 इंची पिलावळ दंड थोपटून आम्ही यावं करू त्याव करू ( खर