Skip to main content

आई साधू आणि राजा

लहानपणी आई बरेचदा वशिष्ठऋषींनी रामाला राक्षसांना मारायला घेऊन गेल्याची गोष्ट सांगत असे,,,
आणि माझा नेहमी गोंधळ उडत असे की वसिष्ठ ऋषी च जर यज्ञ करवून राम ला जन्माला घालू शकत होते त्याला शिक्षण देऊन लढाई करण्या योग्य बनवत होते आणि ते शिक्षण घेऊन जर राम राक्षसांचा निःपात करू शकत होता तर ,,,,🤔 मुळात वसिष्ठ स्वतःच हे काम करू शकत होते च की त्यासाठी राम जन्माला येण्याची तो मोठा होण्याची वाट का पहात होते ते स्वतः राक्षसांचा निःपात करू शकत नव्हते का❓,,,,
आणि आईच उत्तर ठरलेलं असे *बाळा ते साधू होते* साधू ने साधुचं काम साधूने कराव राजाने राजाचं,,,,
मी मात्र पटवून घ्यायला तयार नसे ,,,,,
मात्र काल दुपारी घरी गेलो तर tv वर नातू कार्टून पहात होता त्यावर देखील एका म्हाताऱ्या आजारी राजाची गोष्ट चालू होती मी ही पाहू लागलो,,,
सारे मंत्री संत्री प्रधान राजाच्या पायाशी चिंताक्रांत बसलेले असतात राजा निपुत्रिक असल्यामुळे आता राजाच्या पश्चात कोण❓ असा प्रश्न सर्वांनाच सतावत होता,, सगळ्यांनी शेवटच्या दिवशी विचारलं काय मग राजा तुमच्या मनात तरी कसं काय काय करावं आम्ही कुणाला राजा बनवू? ,,,
तेव्हा राजा म्हणाला मी गेल्या नन्तर दुसऱ्या दिवशी सक्काळी सक्काळी जो मनुष्य पूर्वे कडून येईल त्याला राजा बनवा,,,,,,
दुसऱ्या दिवशी सगळे महालाच्या गच्चीवर उभे राहतात तोच त्यांचं लक्ष एका  पूर्वेकडून येणाऱ्या साधुकडे जात,,,
साधू सक्काळी सक्काळी प्रातर्विधी उरकून हाती लोटा घेऊन निघालेला असतो,,
हे सारे मंत्रीगण त्या साधू समोर हात जोडून उभे राहतात आणि हे साधू तू आमचा राजा बन अशी विनंती करतात,,
साधू:- पण मी कस काय मला काहीच अनुभव नाही राजा बनायचं म्हणजे काय करायचं?
मंत्री:- जास्त काही नाही भाषण द्यायचं मी अमुक तमुक करेन अस आश्वासन द्यायचं,,
साधू मनात म्हणाला चलो या मुळे तरी काही दिवस मजेत जातील बघू पुढचं पुढे,,
राज कारभार सुरू झाला,, दिवसा मागे दिवस जात होते आणि एक दिवस प्रधानला हेरांनी बातमी दिली की शेजारच्या राजाला माहिती कळली की एक साधू राजा झालाय म्हणजे आता या राज्यावर चढाई करायला काहीच हरकत नाही आणि त्याची तो तयारी करतोय,,,
प्रधानाने लगोलग ही बातमी राजाला कळवली आणि आपण ही सज्ज झाल युद्धाची तयारी केली पाहिजे अशी विनंती केली,,,
साधू म्हणाला तयारी आणि युद्धाची🤔❓ ती का ?
युद्ध करून कुणाचं भल झालाय?,,,,,,
बघू आपण त्याला शांतीपर भाषण देऊ,,,
थोड्याच दिवसात प्रधान पुन्हा येतो राजा शत्रू आता राज्याच्या सीमेवर आलाय तुम्ही आज्ञा द्या सर्व नागरिकांना सज्ज करूया,,,
शत्रू 🤔❓इथे कुणी कुणाचा शत्रू नाही तुम्ही मानव तसाच तो ही मानव च
अस म्हणत प्रधानची बोळवण केली
दुसऱ्या दिवशी प्रधान पुन्हा राजाकडे आला अहो राजा शत्रू आता आपल्या महाला बाहेर उभा आहे तो तुम्हला आम्हला सगळ्यांना मारेल😔😔
साधू राजा:- मारेल🤔 मला कोण कशाला मारेल मी कुणाचं काय वाकड केलंय❓ *ए आणा रे ती माझी झोळी आणि लोटा मी चाललो*
तात्पर्य:-
आणि माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला आईने सांगितलं होतं *साधूने साधूच राहावं राजाने राजा*  म्हणून समर्थ काय तुकोबाराय काय सर्वच साधू संत सत्ते पासून दूर राहिले
*राजाची कर्तव्य कळली की मग 4 दिवसांसाठी 64 हजार अकलेलेच दिवे पाजळले जात नाहीत*
भूमकर
सुनील प्रभाकर भूमकर
कडवट शिवसैनिक

Comments

Popular posts from this blog

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्या तपकिरी गाई कड़े वळ

*नको देवराया अंत आता पाहू,,*

देवा ये लवकर तुझ्या पराक्रमाच्या गोष्टी खूप वाचल्या रे आमचा विश्वास ही आहेच त्यावर पण ये आता आता तूच या अदृश्य कोरोनाशी लढ आणि मुक्त कर☹ *प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी तू सदैव उभा राहतोस म्हणे,,* मग आमचे प्रयत्न दिसत नाही का रे देवा☹ जगाचा पालन कर्ता असलास तरी या भरतभूमीवर तुझं विशेष प्रेम,,सार जग सोडून तू तुझे सारे अवतार याच भरतवंशीयांसाठी सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच निर्दालन करण्यासाठी घेतलेस,,, *मग आजच असा निष्ठुर कठोर पाषाण हृदयी का झालास😏☹😡* अरे आम्ही तुझीच लेकरं ना रे मग आमची अवघ्या मनुष्य जातीची चाललेली परवड तुला दिसत नाही की अजून शेषशैये वरून उठायची वेळच झाली नाही की तुझा कुंभकर्ण झालाय देवा? *उठ रे दादा उठ*☹ मला माहिती आहे केवळ प्राण्यांची असलेली ही भूमी तू गुण्या गोविंदाने हे मनुष्यप्राणी ही राहतील या मोठया आशेने आम्हला ती  आंदण दिलीस☹ *पण आम्ही कपाळकरंटे रे ओरबाडली अक्षरशः ही भूमी ओरबाडली*😏😡 जीवन जगण्याच्या स्पर्धेत *आमचा बकासुर कधी झाला* ते आमचं आमच्याच कळलं नाही *आमचा हव्यास कधी संपेल माहिती नाही* आमची आयुष्य एकमेकांचा धर्म उणिदुनी काढण्यातच जाणा

राजा-माकड-आणि आपण ,,,

हि आहे एका आळशी आणि बुद्धू राजाची गोष्ट एकदा ह्या राजाला एक माकड काही तरी मदत करते. आणि त्यामुळे राजा त्याला आपला सेवक म्हणून तैनात करतो. प्रधान हे पाहून वैतागतो,राजाला समजावण्याचा प्रयत्न करतो पण राजा मानत नाही, प्रधान कपाळावर हात मारतो-  एकदा-दोनदा-तिनदा... असे ब-याचदा होते. एके दिवशी राजा झोपलेला असतो, माकड वारा घालत असते. एक माशी सारखी राजाच्या नाकावर बसायचा प्रयत्न करते. माकड तिला हकलायचा प्रयत्न करते, पण तरी ती पुन्हा पुन्हा येते म्हणून शेवटी चिडून माकड राजाच्या तलवारीने तिला मारायचा प्रयत्न करतो... आणि... राजाचे नाकच कापले जाते.. प्रधानजी हसतो... तात्पर्य -- ज्यांची लायकी नाही पात्रता नाही अशांच्या हातात जबाबदारी सोपवली कि काय होत ते हि गोष्ट सांगते ??,,,,,,,,,,,, आज नेमकी हि गोष्ट आठवायचं कारण ,,, शक्ती मिल कंपाउंड मध्ये जो फोटोग्राफर मुलीवर बलात्कार झाला त्यावर ईथे नेहमी प्रमाणे येवून सगळ्यांनी आपापली मत मांडली नेहमी प्रमाणे बांगड्या भरा ,चपलेने बडवा ,सरकार नालायक अशी मत मांडली गेली पण हि झाली फक्त चर्चा याच्या मुळाशी कुणीच प्रयत्न करू ईच्छित नाही आणि नेमकी कधी काळी वाचलेल