Skip to main content

रामाचं राजकारण आणि आमचं पुणे पुण्यातले आम्ही,,,2

*कुठल्याही विधायक कामासाठी कस एकत्र येऊ नये उलट जागृत समाजाची ताकद कशी फुग्याला टाचणी लावल्या सारखी काढून टाकावी त्याच उत्तम उदाहरण*

काल वाचलं होतं रामाने वालीला मारल्या नन्तर सुग्रीवला राजा आणि वाली पुत्र अंगदाला युवराज घोषित करून सुग्रीव आणि वाली गटाला एकत्र बांधून ठेवलं कारण देव कार्य करायचं असेल तर हेवेदावे रुसवे फुगवे मान अभिमान हे दूर ठेवून एकत्र यायचं असत,,
हे दोन्ही गट एकत्र आले नसते लंका दहन झालं असत का??
पण नाही मीच काय तो शहा-णा ही भूमिका आडवी आली की माणूस आणि त्याच्या इच्छा आडव्या झाल्या शिवाय रहात नाहीत त्याची ही आठवण,,,,,
*संघटणाला झालेला विरोध हा इतिहास कधीही विसरत नाही*,,,
सन 1993 मुंबईत दिवाळीत फटाके फुटावेत तसे एका मागोमाग एक बॉम्बस्फोट झाले,,
ते दुबई मार्गे झाले ते बाहेरून आलेल्या अतिरेक्यांनी केले हे उघड झालं,,, पण बाहेरून आलेले हे त्यांना इथे संभाळले कुणी ? इथे त्यांची जेवायची रहायची व्यवस्था कुणी केली?,,हे काम झाल्यावर ते सही सलामत त्यांच्या मुक्कामी कसे पोचवले गेले?? इथे येऊन ते राहिले कुठे याचा शोध घेताना सरकारच्या अस लक्षात आलं ,,,,
धार्मिक कार्यसाठी मुंबईत आपण एक हज हाऊस बांधलय,, ते धार्मिक स्थळ असल्यामुळे त्याची कधी फारसी तपासणी केली जात नसे नाही,,
आणि हे सारे अतिरेकी ह्याच हज हाऊसच्या आसर्याने आले गेले राहिले हे सरकारी रिपोर्टने उघड सिद्ध केलं आहे,,,
आता मग भारत सरकारने उपाय काय केला?? तर,,
2008 ची निवडणूक जिंकण्यासाठी 1993 चा अनुभव गाठीशी असूनही भारत ( काँग्रेस) सरकारने बिनडोक घोषणा केली की मुंबईतील एक हज हाऊस कमी पडत तेव्हा देशाच्या विविध भागात आम्ही 200 हज हाऊस आम्ही आमच्या खर्चाने बांधून देऊ😏😏😡😡
हे जाहीर केल्या नन्तर देशातील विविध प्रतिक्रिया उमटल्या मी त्यावेळी नेमका पुण्यात होतो तिथली गोष्ट सांगतो,,,
असल्या तर्हेचे हज हाऊस बांधलं जाऊ नये म्हणून पुण्यात मोर्चा काढण्यात आला बरेच समविचारी मित्र लोकांच्या मंडळांच्या दारोदारी जात होतो त्यांनी या मोर्चात सहभागी व्हावं एकत्र यावे आणि सरकारवर या गोष्टीचा निश्चितच दबाव पडेल आणि सरकार असा कुठलाही निर्णय घेताना विचार करेल नव्हे नव्हे सरकार त्यांचा हा विचारच रद्द करेल अशी माफक अपेक्षा घेऊन आम्ही दारोदारी जात होतो,,,,
*कुठल्याही विधायक कामासाठी कस एकत्र येऊ नये जागृत समाजाची ताकद कशी फुग्याला टाचणी लावल्या सारखी काढून टाकावी त्याच उत्तम उदाहरण*,,,
अरे मित्रा आपल्याला हज हाऊस व्हायला नको ना?
समोरचा तो:- हो हो नकोच ते काय करायचं
उगाच या लोकांचे लाड पूरवतय सरकार
आम्ही:- मग येतात ना?
तो:- गप्पप्प,,,
हो ही नाही आणि नाही ही नाही😏😡
त्यातून थोडं बोललाच तर,,,
अजून कोण कोण येतंय???
आम्ही:- ते सनातन , अनिरुद्ध बापू, गजानन महाराज वाले,, असे येनार आहेत,,
तो:- अच्छा अजून आपल्या पैकी??
आम्ही:- थोडं चिडूनच,,
हो हो माझे आई वडील बहीण भाऊ काका मामा आत्या येणार ना अरे काय चाललंय आम्ही काय लग्नाचं आमंत्रण द्यायला आलोय का?
तो:- थोड वरमून,,
नाही तस नाही इतके सारे येणार म्हणजे तस मी यायची काही गरज दिसत नाही
आम्ही:- अरे विरोध दर्शवायला हवा की नको ? उद्या ते अतिरेकी आलेच तर तू मोर्चाला नव्हतास म्हणून सोडून का देणार तुला??😏😡
असा सार्वत्रिक अनुभव बर हे झालं लोकांचं जे तयार झाले ते त्यांच्या पेक्षा जास्त वरचढ सनातन वाले म्हणणार ते अनिरुद्ध वाल्यांचं बघा ह जरा त्यांचं नि आमचं ,, म्हणजे समजलं ना
मग नरेंद्र महाराज वाले साई नाथ वाले असतील आमचं काय काम असा सगळा गोंधळ😏😡😡
*अरे एका समान मुद्यावर तुमचं एकमत आहे ना?*
मग या की लेको एकत्र😏😡 पण नाही त्या मोर्चात प्रत्येक जण आपापल्या पक्षाची संस्थेची पाटी घेऊन आला असता तर सरकारला तुमचं एक मत ऐका विशिष्ठ मुद्य्यावर आहे हे दिसलं असत पण मुदलातच खोट😡
बर सगळ्यांची इच्छा होतीच की हज हाऊस होऊ नये
पण नाही मग माझा झेंडा कसा फडकणार याची चिंता त्या पेक्षा जास्त,,😏😡
एका समान मुद्यावर एका मोर्चात एकत्र येऊ शकत नाही त्यात एकत्र येण्याने कुठे कुणात विलीन होणार होत का??
एकत्र येणे म्हणजे तो एक प्रकारचा गोपाळकाला असतो त्यात सगळं असलं तरी प्रत्येकाची चव अबाधित असते पण देव देश कार्यासाठी एकत्र आले तर प्रसाद होतो ना आणि विरोधकांना ही प्रसाद देता येतो संघटनेत शक्ती आहे,
पण *मी भले बुडालो तरी पण माझ्या मुळे सगळ्याच भल होणार असेल तर मी होऊ देणार नाही ही प्रवृत्ती*😏😏😡😡😡
*कार्यक्रम कुणी घेतला कोण कोण उपस्थित राहणार त्यांचं आपलं मत एक आहे की नाही या पेक्षा या हिंदू हिताच्या कार्यक्रमाला मी किमान 5 मिनिटं उपस्थित ही राहू शकत नाही याची किमान लाज ही वाटू नये❓😏😡*
तात्पर्य:- सुग्रीव सत्तेत आहे मग वालीच्या मुलाचा काय संबंध? तो कोण आला मोठा? त्याच्या मुलालालाच कशाला हवं युवराज पद? सुग्रीव सत्तेत तर युवराज देखील सुग्रीवाचाच मुलगा
हे असले इगो उद्योग करणार
तर पुढल्या पिढीला कसला संघटनेचा मंत्र देणार कसला आदर्श ठेवणार??
*जे पेराल तेच उगवणार किमान पाच मिनिटं लोक मोर्चाला उपस्थित राहू शकत नाही? तिथे तुमचे नेते काय एकत्र होणार मग हिंदुराष्ट्रच्या नावे गळे काढण्यात काय अर्थ आहे?*😏😡

Comments

Popular posts from this blog

पुन्हा ते कधी हरले नाहीत,,

ऑलिंपिक ज्योतीचे गुरुवारी ग्रीस मध्ये प्राचीन ओलीमपिया येथे पारंपारिक  पद्धतीने प्रज्वलन करण्यात आले. या ऑलिंपिकची एक आठवण  ऑलिंपिक स्पर्धेत बास्केट बॉल हा एक प्रसिध्द खेळ , बास्केटबॉल चा समावेश १९३६ मध्ये करण्यात आला  तो पर्यंत ८ ऑलिंपिक स्पर्धेत ६३ सामने खेळताना अमेरिका एकही सामना हरला नव्हता. १९७२ मध्ये म्युनिच ऑलिंपिक या खेळातील सुवर्णपदकासाठी  अमेरिका रशिया याच्यात सामना झाला ,,आणि, सामन्याचे काही सेकंद बाकी असताना अमेरिकेने ५०\४९ अशी आघाडी  घेवून चेंडू रशियाच्या हातात दिला रशियाने  टाईम-आउट मागीतला ,अमेरिकेने तो नियमबाह्य असल्याचे  अपील केले , मात्र ते अपील पंचांनी फेटाळले, रशियन खेळाडूने चेंडू बास्केट करण्याचा प्रयत्न केला पण चेंडू काही केल्या  बास्केट होईना , पंचांनी सामना संपल्याची शिट्टी वाजवली आणि,, सामना अमेरिकेचा हाती गेला पंचांनी अमेरिका जिंकल्याचे घोषित केले, अमेरिका जिंकली पण ,,, गोष्ट ईथे संपत नाही , आता रशियन समर्थकांनी स्कोररला घेराव घातला, त्याने  पंचांच्या आदेशां नंतरही घड्याळ ३ सेकंदांनी रिसेट केले नव्...

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्य...

आशेवर_असलेल्या_गाढवाची

 कृपया नमोंधांनी ही गोष्ट फार मनाला लावून घेऊ नये त्यांनी बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला अस म्हणत लांडोरच्या तालावर ताल धरावा आशेवर,,,,, काल माझे मित्र sameer gore यांनी घोड्याच चित्र टाकलं होतं आणि मला एकदम *#आशेवर_असलेल्या_गाढवाची* गोष्ट आठवली,,,, एक मस्त खाऊन पिऊन जाड जुड गाढव आणि दुसरं लुकड मरतुकड,,,, ते दोघे रोज नदीवर भेटत,,  दोघेही एकाच जातीचे असल्यामुळे एकमेकांची सुख दुःख हालचाल विचारत असत ,,, मग गप्पा मारता मारता मग काय ,,, अस बोलत ते धष्ट पुष्ट गाढव मग त्याच्या मालकाच कौतुक करत असे माझा मालक कसा चांगला आहे काम करून घेतो पण माझी काळजी ही तितकीच घेतो आणि भरपेट खायला देतो वेळच्या वेळी लागली तर दवा दारू ही करतो आराम करायला वेळ देतो थंडीत विशेष काळजी घेतो अगदी लहान मुलासारखं जपतो काय सांगू मित्रा अंथरून पांघरून ही घालतो खूप चांगला आहे *माझा मालक*,,,,, हे सारं ऐकताना दुसऱ्या गाढवाच्या डोळ्यात पाणी येत असे ,,, अरे काय सांगू मित्रा माझा मालक, उठता बसता लाथा घालतो वेळेवर जेवायला देत नाही अंथरून पांघरून सोड आजारी पडलो तर वेळेवर दवा दारू ही करत नाही,, अस ते गाढव रोजच तक्रार ...