Skip to main content

परशुरामांचा शाप आणि मोडिशा राजकारण

परशुरामांचा शाप आणि मोदीशा राजकारण,,,

परिस्थितीने केवळ सुत पुत्र असा शिक्का बसलेला कर्ण जेव्हा धनुर्विध्या शिकायचं ठरवतो कारण उद्याच्या संभाव्य युद्धात तोच एक अर्जुनाला भारी पडेल असा प्रतिस्पर्धी असतो त्या प्रमाणे सगळ्यांकडे जातो हात जोडून विनंती करतो परन्तु वेगवेगळी कारण देत त्याच शिक्षण नाकारलं जात शेवटी तो भगवान परशुरामांकडे जातो,, आणि मी ब्राम्हण आहे मला धनुर्विद्या शिकवा अस खोट बोलतो,,
भगवान परशुराम त्याला शिकवतात देखील,
परंतु एकदा दोघे अरण्यात गेले असता दुपारच्या रणरणत्या उन्हात दोघे सावली खाली बसले असता श्री परशुराम कर्ण| च्या मांडीवर डोकं ठेवून झोपी जातात आणि खाड्या वेळाने एक भुंगा येतो आणि त्याच्या मांडीला चावतो , आता त्याला हाकलाल तर गुरूंची झोप मोडेल या विचाराने कर्ण त्या भुंग्याच्या चावण्याकडे दुर्लक्ष करतो परन्तु थोडं थोडं म्हणत तो भुंगा त्याची मांडी पोखरून काढतो ते रक्त सगळीकडे पसरत ते गार गार रक्त जेव्हा परशुरामांच्या बाजूनं जात त्या गारव्याने त्यांना जाग येते
बघतात तो कर्ण अगदी ते सारं सहन करत शांत बसला आहे तेव्हा त्यांच्या लक्षात येत हे सारं सहन करायची ताकद साधारण ब्राम्हणात नाही आणि मग रागावून विचारल्या दरडावून चौकशी खर खोटं केल्यावर ते त्याला शाप देतात की,, *जा मला फसवून तू ही जी विद्या माझ्या कडून शिकलास तीच विद्या तुला ऐन वेळी दगा देतील तुझा स्मृती भ्रंश होईल मी शिकवलेलं तुला काही एक आठवणार नाही,,,,*
तात्पर्य:-
आजच्या मोडिशा राजकारणाने सुद्धा जनता रुपी परशुरामाला फसवलं आहे ज्या काँग्रेस ला संपवून हा देश काँग्रेसमुक्त करायचं वचन दिले होते त्याला न जागता
सारी काँग्रेस,,,
सारे देव द्रोही,,,
सारे हिंदुत्व विरोधक,,,
सारे भगवा विरोधक,,
सारे गांधी समर्थक,,,
सारे प्रादेशिक पक्ष संपवत साऱ्या रावणाच्या नाभीवर हल्ला करायच्या ऐवजी त्याची मुंडकी उडवत आपल्यात सामील करत आहेत मुंडक्यांना जीवदान देत ,, *पुन्हा काँग्रेसचीच हिंदू द्रोह्यांची ताकद वाढवत आहेत*
जनतेला दिलेल्या शब्दाशी फारकत घेत आहेत
*पण काळजी नको*
ही परशुराम रुपी जनता असल्या खोटरड्यांची मतदानाच्या या युद्धात त्यांचा स्मृतिभ्रंश केल्या शिवाय राहणार नाही
*हा श्री परशुरामांचा शाप आहे खोटं बोलून, फसवून, कमावलेली मग ते विद्या असो वा धन आयत्यावेळी दगा दिल्या शिवाय राहणार नाही मग भले सांम दांम दंड भेद करत विरोधी पक्षाला फोडून आपल्या पक्षात घेऊन आपली ताकद  वाढवली या भ्रमात राहत आपल्या खोट्या दिग्विजयाचा रथ कुणी ना कुणी तरी बिकट प्रसंगी अडवल्या शिवाय राहणार नाही हे मोडिशा प्रवृत्तीने आणि समर्थक भक्तांनी आजच लक्षात घेतलं तर बरं कारण तो शाप परशुरामांचा आहे तो कधीही खोटा ठरत नाही*

Comments

Popular posts from this blog

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्या तपकिरी गाई कड़े वळ

*नको देवराया अंत आता पाहू,,*

देवा ये लवकर तुझ्या पराक्रमाच्या गोष्टी खूप वाचल्या रे आमचा विश्वास ही आहेच त्यावर पण ये आता आता तूच या अदृश्य कोरोनाशी लढ आणि मुक्त कर☹ *प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी तू सदैव उभा राहतोस म्हणे,,* मग आमचे प्रयत्न दिसत नाही का रे देवा☹ जगाचा पालन कर्ता असलास तरी या भरतभूमीवर तुझं विशेष प्रेम,,सार जग सोडून तू तुझे सारे अवतार याच भरतवंशीयांसाठी सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच निर्दालन करण्यासाठी घेतलेस,,, *मग आजच असा निष्ठुर कठोर पाषाण हृदयी का झालास😏☹😡* अरे आम्ही तुझीच लेकरं ना रे मग आमची अवघ्या मनुष्य जातीची चाललेली परवड तुला दिसत नाही की अजून शेषशैये वरून उठायची वेळच झाली नाही की तुझा कुंभकर्ण झालाय देवा? *उठ रे दादा उठ*☹ मला माहिती आहे केवळ प्राण्यांची असलेली ही भूमी तू गुण्या गोविंदाने हे मनुष्यप्राणी ही राहतील या मोठया आशेने आम्हला ती  आंदण दिलीस☹ *पण आम्ही कपाळकरंटे रे ओरबाडली अक्षरशः ही भूमी ओरबाडली*😏😡 जीवन जगण्याच्या स्पर्धेत *आमचा बकासुर कधी झाला* ते आमचं आमच्याच कळलं नाही *आमचा हव्यास कधी संपेल माहिती नाही* आमची आयुष्य एकमेकांचा धर्म उणिदुनी काढण्यातच जाणा

राजा-माकड-आणि आपण ,,,

हि आहे एका आळशी आणि बुद्धू राजाची गोष्ट एकदा ह्या राजाला एक माकड काही तरी मदत करते. आणि त्यामुळे राजा त्याला आपला सेवक म्हणून तैनात करतो. प्रधान हे पाहून वैतागतो,राजाला समजावण्याचा प्रयत्न करतो पण राजा मानत नाही, प्रधान कपाळावर हात मारतो-  एकदा-दोनदा-तिनदा... असे ब-याचदा होते. एके दिवशी राजा झोपलेला असतो, माकड वारा घालत असते. एक माशी सारखी राजाच्या नाकावर बसायचा प्रयत्न करते. माकड तिला हकलायचा प्रयत्न करते, पण तरी ती पुन्हा पुन्हा येते म्हणून शेवटी चिडून माकड राजाच्या तलवारीने तिला मारायचा प्रयत्न करतो... आणि... राजाचे नाकच कापले जाते.. प्रधानजी हसतो... तात्पर्य -- ज्यांची लायकी नाही पात्रता नाही अशांच्या हातात जबाबदारी सोपवली कि काय होत ते हि गोष्ट सांगते ??,,,,,,,,,,,, आज नेमकी हि गोष्ट आठवायचं कारण ,,, शक्ती मिल कंपाउंड मध्ये जो फोटोग्राफर मुलीवर बलात्कार झाला त्यावर ईथे नेहमी प्रमाणे येवून सगळ्यांनी आपापली मत मांडली नेहमी प्रमाणे बांगड्या भरा ,चपलेने बडवा ,सरकार नालायक अशी मत मांडली गेली पण हि झाली फक्त चर्चा याच्या मुळाशी कुणीच प्रयत्न करू ईच्छित नाही आणि नेमकी कधी काळी वाचलेल