Skip to main content

तुटलेला दात आणि सोडून गेलेले मित्र नातेवाईक

*आपले दात आणि आपले नातेवाईक*,,,,,

काल एक मित्र अचानक भेटला भर थंडीत ही त्याला घाम आला होता बसला होता  एक बाजूला   सोसायटीच्या आवारात मला बघताच एक उसनं अवसान आणून हसायचा प्रयत्न करू लागला,, तस त्याला मी विचारलं तर खुणेनेच बोलला हा बघ दात पडला ,,,मला खर तर हसू येत होतं पण काळजीने विचारलं की कारे कुठे पडलास की काय? की केलीस मारामारी तो- पुन्हा खुणेनेच नाही म्हणाला
मी-मग हलत होता का? नीट रोज दोन वेळा दात साफ ब्रश करत नाही का? तो- सध्या हलत होता पण मी दात दोनदा काही घासत नाही जमत नाही उशिरा येतो मग जेवतो आणि लगेच झोपतो,,,
सकाळी मात्र घासतो रोज
*मी- अरे हलत होता तर डॉ कडे का नाही गेलास? आणि आता 45 वर्षाचा आहेस आता दात गेला तर येत नाही रे काळीजी घ्यावी कस आहे आपल्या जन्मासोबत नाक कान घसा जीभ सगळं आपोआप येत दात हे नंतर येतात आपल्या तोंडात जे जे काही पडेल त्याच योग्य चर्वण करून ते आपल्या मदतीसाठी आयुष्यभर स्वतःची झीज करवून घेत असतात ते ही गप्प बसून सोसत असतात आपल्यासाठी
तात्पर्य:-
*आपल्या सोबत राहणाऱ्या प्रत्येक गोष्टीची मग ते दात असो नातेसंबन्ध,मित्र, सगेसोयरे यांची काळीज योग्य ती घेतलीच पाहिजे दात गप्प सगळं सहन करतात म्हणून त्यांना गृहीत धरायच नसत ते काळजी घेतली नाही तर पडतात सोडून जातात मग उरत ते फक्त बोळक,जपलं पाहिजे आपले मित्र नातेवाईक सगेसोयरे हे देखील अशीच आयुष्यभर न बोलता कळत नकळत आपल्याला मदतच करत असतात आपणच त्यांची करणार नाही प्रत्येक गोष्टीत त्यांना गृहीत धरलं की एक दिवस ते आपल्याला एकट सोडून निघून जाणार हे ठरलेलं*
तेव्हा नवं वर्ष मग ते इंग्रजी असो वा आपलं भारतीय त्या शुभेच्छा देताना जे जे म्हणून कुणी आपले आहेत त्यांची नीट काळजी आपण घेत आहोत ना? त्यांच्याशी आपले संबन्ध नीट चांगले ठेवत आहोत ना? हे प्रश्न आधी स्वतःला विचारा
तरच नवीन वर्षात दात शाबूत राहून नवनवीन गोष्टींचा खाद्य पदार्थांचा आपण आस्वाद घेऊ शकू
जय श्रीराम

Comments

Popular posts from this blog

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्या तपकिरी गाई कड़े वळ

*नको देवराया अंत आता पाहू,,*

देवा ये लवकर तुझ्या पराक्रमाच्या गोष्टी खूप वाचल्या रे आमचा विश्वास ही आहेच त्यावर पण ये आता आता तूच या अदृश्य कोरोनाशी लढ आणि मुक्त कर☹ *प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी तू सदैव उभा राहतोस म्हणे,,* मग आमचे प्रयत्न दिसत नाही का रे देवा☹ जगाचा पालन कर्ता असलास तरी या भरतभूमीवर तुझं विशेष प्रेम,,सार जग सोडून तू तुझे सारे अवतार याच भरतवंशीयांसाठी सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच निर्दालन करण्यासाठी घेतलेस,,, *मग आजच असा निष्ठुर कठोर पाषाण हृदयी का झालास😏☹😡* अरे आम्ही तुझीच लेकरं ना रे मग आमची अवघ्या मनुष्य जातीची चाललेली परवड तुला दिसत नाही की अजून शेषशैये वरून उठायची वेळच झाली नाही की तुझा कुंभकर्ण झालाय देवा? *उठ रे दादा उठ*☹ मला माहिती आहे केवळ प्राण्यांची असलेली ही भूमी तू गुण्या गोविंदाने हे मनुष्यप्राणी ही राहतील या मोठया आशेने आम्हला ती  आंदण दिलीस☹ *पण आम्ही कपाळकरंटे रे ओरबाडली अक्षरशः ही भूमी ओरबाडली*😏😡 जीवन जगण्याच्या स्पर्धेत *आमचा बकासुर कधी झाला* ते आमचं आमच्याच कळलं नाही *आमचा हव्यास कधी संपेल माहिती नाही* आमची आयुष्य एकमेकांचा धर्म उणिदुनी काढण्यातच जाणा

राजा-माकड-आणि आपण ,,,

हि आहे एका आळशी आणि बुद्धू राजाची गोष्ट एकदा ह्या राजाला एक माकड काही तरी मदत करते. आणि त्यामुळे राजा त्याला आपला सेवक म्हणून तैनात करतो. प्रधान हे पाहून वैतागतो,राजाला समजावण्याचा प्रयत्न करतो पण राजा मानत नाही, प्रधान कपाळावर हात मारतो-  एकदा-दोनदा-तिनदा... असे ब-याचदा होते. एके दिवशी राजा झोपलेला असतो, माकड वारा घालत असते. एक माशी सारखी राजाच्या नाकावर बसायचा प्रयत्न करते. माकड तिला हकलायचा प्रयत्न करते, पण तरी ती पुन्हा पुन्हा येते म्हणून शेवटी चिडून माकड राजाच्या तलवारीने तिला मारायचा प्रयत्न करतो... आणि... राजाचे नाकच कापले जाते.. प्रधानजी हसतो... तात्पर्य -- ज्यांची लायकी नाही पात्रता नाही अशांच्या हातात जबाबदारी सोपवली कि काय होत ते हि गोष्ट सांगते ??,,,,,,,,,,,, आज नेमकी हि गोष्ट आठवायचं कारण ,,, शक्ती मिल कंपाउंड मध्ये जो फोटोग्राफर मुलीवर बलात्कार झाला त्यावर ईथे नेहमी प्रमाणे येवून सगळ्यांनी आपापली मत मांडली नेहमी प्रमाणे बांगड्या भरा ,चपलेने बडवा ,सरकार नालायक अशी मत मांडली गेली पण हि झाली फक्त चर्चा याच्या मुळाशी कुणीच प्रयत्न करू ईच्छित नाही आणि नेमकी कधी काळी वाचलेल