Skip to main content

Posts

Showing posts from November 21, 2010

माकड आणि बाप

सध्या मी एक जाहिरात पाहतोय पीयर्स साबणाची त्यात ती आई आपल्या मुलीला शिकवतेय आंघोळ घालताना बाबरचा मुलगा हुमायु,हुमायुचा मुलगा अकबर ,,,,,,,,,,? आणि अचानक मला टोपी विक्याची गोष्ट आठवली ,,,, एक टोपी विक्या असतो , त्याच्या टोप्या माकड पळवतात मग रागाने तो डोक्यावरची  टोपी खाली टाकतो आणि मग माकड हि टोप्या खाली टाकतात मग खुश होत त्या टोप्या उचलून घरी जातो वैगेरे वैगेरे ,,,,,आता त्यानंतरची गोष्ट ,,,,,, टोपी विक्या पार्ट २, कालांतराने त्या टोपी विक्याचा मुलगा मोठा होतो, आता टोपीचा व्यवसाय तो मुलगा करू लागतो बापाच्या मार्गदर्शनाखाली ,,,,,, तो रोज टोपी विकायला गावोगावी जात असे .कधी या गावी तर कधी त्या गावी बाप सांगेल तसा तो धंदा करत असे आणि एक दिवस  त्याला त्याच जंगलातून जावे लागणार  असते दुसर्या गावी टोपी विकायला ज्या जंगलात माकडांनी त्याच्या बापला त्रास दिलेला असतो,, हे समजल्यावर ईकडे बाप चिंतेत पडतो पण, सावरतो आणि सारा घटनाक्रम मुलाला सांगतो , आणि मग कस वागायचं ते हि सांगतो .त्याला बजावून सांगतो कि, बाबारे त्या जंगलातून जाताना सावध बरका!तिथे ती माकड आहेत ज्यांनी मला खूप

प्रामाणिक माणूस.

एकदा एका कारखान्याच्या अध्यक्षांनी आपल्या सर्व अधिकार्‍यांची वार्षिक बैठक बोलावली. अध्यक्षांनी बैठक संपवताना घोषणा केली कि थोड्या वेळाने सर्वांना एक मातीची कुंडी, एका पिशवीत माती व काही बियाणे देण्यात येतील. जो कुणी पुढच्या वर्षी वार्षिक बैठकीत सर्वात चांगले झाड दाखवेल त्याचा त्या बैठकीत सत्कार करण्यात येईल. सर्व अधिकार्‍यांनी घरी गेल्यावर ते बियाणे दिलेल्या मातीतच पेरले. वर्ष उलटले व परत वार्षिक बैठकीची वेळ आली. बैठकीचा हॉल विविध प्रकारांच्या सुंदर झाडानी भरुन गेला. काही झाडांना तर फुलेही आली होती. पण या सर्वात एक अधिकारी हिरमुसलेला पडल्या चेहर्‍याने दिलेली कुंडी व माती तशिच घेऊन एका कोपर्‍यात बसुन होता. सर्वांची झाडे बघितल्यावर अध्यक्षांनी मंचावर जावून माईक हाती घेतला व भाषण आटोपतांना त्या हिरमुसलेल्या अधिकार्‍याला बक्षिस जाहिर केलं. सर्व थक्क झाले. त्याने तर फक्त कुंडी व माती तशिच आणली होती. सत्कार झाल्यावर अध्यक्ष बोलले," तुम्हा सर्वात हा एकच प्रामाणिक माणूस आहे. तुम्हाला देण्यात आलेले बियाणे पाण्यात उकळण्यात आले होते. त्यामुळे त्यातुन झाडे लागणे अशक्य होते !

लाइम लाइट ,,,,,

परवाच एक सुंदर सिनेमा बघण्यात आला "लाइम लाइट",,,चार्ली चा एक अत्यंत सुंदर सिनेमा, त्यात त्याने रंग भूमिवरील झगमगटा पासून दूर फेकल्या गेलेल्या नटाची भूमिका केली आहें त्या चार्लिला कुणी विचारित नाही तरी हा बाबा  रोज जिथे नाटकाच्या  तालिमी चालल्या असतील तिथे हा रोज जावून उभा रहात असे. त्याच्या कड़े इतर लोकांच लक्ष गेल्यावर सहाजिकच ते सारे हा कशाला आला इथे कडमड़ायला असा एकंदर सुर असे आणि मग राग काढन्यासाठी यथेच्छ धुलाई आणि मानहानी ही ठरलेलीच इतक सार सहन करून ही तो पुन्हा दुसर्या दिवशी मार खायला तिथे हजर असे . पण तिथे एक त्याच्या वर प्रेम करणारी त्याच्यावर माया असणारी हीरोइन असते  तिला हे सार सहन होत नसे आणि एक दिवस ती त्याला रागावून बोलते अरे ,, "कुठल्या मातीचा बनला आहें तु तुला राग येत नाही  हे लोक तुझ दुस्वास करतात शिवीगाळ करतात तुला राग येत नाही घृणा नाही येत ?" त्यावर चार्ली म्हणतो ,येते ना  "मला त्या रस्त्यावर पडलेल्या सांडलेल्या माझ्या ही रक्ताची ही घृणा येते" पण काय करू ? माझ्या नासनासत तेच वाहते आहेना? त्याचा राग राग करून कसे चालेल? मला

राम आणि मी

आज लोकसत्ता मधे हा जोक आला होता त्यावरून मला १५ वर्षा  पूर्वीची  गोष्ट  आठवली जॉर्ज ब्यानार्ड शौ आपल्या मिस्कील स्वभावाबद्दल आणि उदगारां बद्दल प्रसिध्द होते . एकदा ते बाथरूम मध्ये टबात उघड्याने आंघोळ करत होते ,,,,,,,,, त्यांना भेटायला आणि मुलखात घ्यायला काही पत्रकार आल्याचे त्यांच्या नोकराने सांगितले . ते ती आंघोळ तशीच टाकून उघड्या अंगाने त्या पत्रकारांसमोर आले आणि ,,,,,,,,, मग मात्र सारा घोळ त्यांच्या लक्षात आला पण आता काय करणार? त्यांनी लगेच त्यांचा हजार जबाबी पण दाखवला आणि म्हणाले,,,,,,,,, "मला काहीच लपवायचे नाही तुम्ही काहीही विचारू शकता " आणि मला एक गोष्ट आठवली ती अशी,,,,,,,,, साधारण १५\१६ वर्ष झाली अयोध्येचा काळ होता  दंगल वैगेरे होवून गेली होती मी सकाळी दुकानात बसलो होतो सकाळचे ८ वाजले होते . साधारण ७५ चे rss ओक गुरुजी मला भेटायला आले . आणि आमच्या गप्पा मारून झाल्या अच्छा मी निघतो असे म्हणत निघाले. आणि लगेचच ओ ओक साहेब म्हणून आवाज आला दुकाना जवळच एक पोलीस चौकी आहे त्यात एक rpi चा पडेल उमेदवार बिचुकले बसत असे बिड्या फुंकीत ,,,,,,,,, शेजारीच असल

पिल्लू कि छावा ,,,,?

एक दिवस जंगलाचा राजा सिंह  शिकारीला बाहेर पडला. खुप दुरवर जावुनही त्याला शिकार मिळाली नाही . निराश मनाने परतत असता रस्त्यात   एक  कोल्ह्याचे पिल्लू त्याला सापडते. चला काहीतरी व्यवस्था झाली या विचारत  तो  असतानाच . ते पिल्लू केविलवाण झाल आणि माफ़ी मागू लागल.. आणि त्या सिंहातला बाप जागा झाला    ,,, आणि त्याला सोडायचे  ठरवले  पण  नंतर त्याने  , विचार  केला  कि  मी सोडतोय  पण  बाहेर  कुणी  सोडणार  आहे का ? कुणीना कुणी ह्याला खावून टाकणार ,,, असा विचार  करून  त्याने त्या पिल्लाला आपल्या घरी  नेले  आणि आपल्या छाव्यांना सांगितले हा तुमचा  नवीन  मित्र  आहे किंवा भावू  समजा ,,,, दिवस  जात होते , एक दिवस  ते  तिघंही  जंगलात दूरवर खेळायला गेले  . आणि वाट चुकले आणि अचानक त्यांच्या समोर  महाकाय हत्ती उभा राहिला  ,,,,,,, आता काय  करायचे  ? या विचारात असतानाच त्या सिंहाच्या छाव्यांनी  त्या हत्तीवर झडप घालायचा पवित्र  घेतला  , पण लगेचच त्या कोल्ह्याच्या पिल्लाने  सांगितलं  कि हत्ती हा आपल्या कुळाचा शत्रू आहे तेव्हा त्याच्या नादी लागू नये हे बर तुम्ही घरी चला ,,,,, ते सारे घर

व्यर्थ भीती

सप्टेंबरचा शेवटचा आठवडा , परराष्ट्र मंत्री एसेम कृष्णा अमेरिकेने पाकिस्तानला दिलेल्या मदतीवर बोलत होते जणू काही तमाम भारतीयांच्या मनातली भीतीच ते बोलून दाखवत होते . पूरग्रस्तांसाठी दिलेली मदत पाकिस्तान दहशतवादी कारवायांसाठी वापरेल,,,, आणि एकदम दोन गोष्टी आठवल्या १-व्हियेतनाम युद्धाची, व्हियेतनाम मुक्ती लढ्याला नेस्तनाबूत करण्यासाठी अमेरिकन फौजा दाखल झाल्या होत्या . प्रचंड फौजा,भरपूर पैसा,मोठ सामर्थ्य ,नवनवे डावपेच होते अमेरिकेकडे , होते अमेरिकेकडे पण त्यांना विजय मिळत नव्हता ,,,,,,,,,, आणि नुकसान मात्र भरपूर होत होते . आणि व्हियेतनामी ,,,,? बस्स स्थानिक असण हीच त्यांची ताकद होती, मिकांग नदीचा परिसर त्यांच्या परिचयाचा होता . काळे बुटके अर्धपोटी तिथल्या व्हियेटकोंगणे साम्राज्यवाद्यांचा छळ सहन केला होता. म्हणूनच अन्यायाच्या विरोधात ते तुटून पडले होते . अमेरिकन्सला ते भारी पडत होते, अमेरीकंसला पळवून लावण्यासाठी ते विविध तंत्राचा प्रयोग करत होते. त्यांची तंत्र गावठी मागासलेली होती,पण अमेरिकन्सला भारी पडत होती, कित्येक वेळा अचानक छापे टाकून ते  त्यांचे रेडीओ सेट्स ,हत्य