Skip to main content

Posts

Showing posts from August 7, 2011

जिंदगी फिर ना मिलेगी दोबारा,,,,,,,,,,,,

माझा मित्र जितेंद्र जोशी याच्या बर्याच आग्रहा वरून मी हा सिनेमा पहिला आणि,,,,,,, हा सिनेमा म्हणजे नितांत सुंदर स्वानुभव ,,,,, आधुनिक युगाच्या जीवनशैलीवर हसत खेळत बोचरी टीका करत जीवनाचं तत्वज्ञान आपल्या समोर मांडतो,,,,,,,, कि का जगाव? कस जगाव ?कुणासाठी जगाव? कधी जगाव ? आपल्या  ईतक्या धावपळीचा खरच काही उपयोग आहे का? उद्या जगण्यासाठी खरच आज मरण गरजेच आहे का ? आजच्या एकंदरीतच हरवलेपणाच्या जगण्यावर ,, भाष्य करणारा चित्रपट,,,,,' घडाळ्याच्या काट्यावर ,,आणि मोबाईलच्या तालावर जगणार्यांनी पाहावा असा चित्रपट,,, मिळवायच्या शर्यतीत आपण आपल्याच माणसांपासून कसे दूर जात आहोत हे सांगणारा चित्रपट,,, जगण्यासाठी आपल्याला नक्की काय लागत ते सांगणारा चित्रपट,,, तर हा सिनेमा आहे तीन घट्ट मित्रांचा ,,,,,,,,,,, सुरवात होते अभय देओलच्या लग्न गाठी वरून ,, आणि ठरत लग्न व्हायच्या आधी एक ब्याचालर पार्टी करावी त्यासाठी तिघांनी बाहेर पडायचं अस ठरत ,,,,,, पण, ह्रितिक साहेब  कामात गळ्यापर्यंत बुडालेले असतात माझ्या मित्राच्या भाषेत श्वास घ्यायला देखील वेळ नसतो,,,,, खूप मिनतवारी केल्यावर ह्रितिक स

बाळा तुला लागल तर नाही ना,,,,,,?

कालच्या सोमवारी तारीख ८.२.११ माझ्या मामाची आईचा माझी आजीचा दहावा होता त्या निमित्त मी हि पुण्याला गेलो होतो . घाटावर आळंदीहून आलेले महाराज आई या विषयावर प्रवचन करत होते आ म्हणजे आत्मा ई म्हणजे ईश्वर कानावरून जात होत ,,,, काल घरी आलो टीव्ही वर सिरीयल मध्ये हि आईचं महात्म्य एक आई आपल्या मुलीला सांगत होती ,,, सांगत होती बाळा तुला सासू खूप चांगली मिळेल हि परंतु पायात काटा अडकल्यावर धावत काटा काढायला धावत येईल हि  परंतु आई तो कटाच पायात अडकू देणार नाही त्या त्याझ्या पायाखाली आपला हात ठेवेल ती,,,,, आणि हे सर्व आठवताना त्या माझ्या आजीच चित्र माझ्या समोरून जात नव्हत माझी ती आजी अगदी तशीच होती,,,,,, आणि नकळतच आजीच्या आठवणीत जात मी अचानक माझ्या ४ थी च्या वर्गात गेलो ,,,,,, आम्हला शिकवायला त्यावेळी शुक्ला म्याडम होत्या एके दिवशी त्यांनी आम्हाला आईची गोष्ट सांगितली होती ती अवजड गोष्ट समजण्याच वय होत कि नाही कुणास ठावूक परंतु माझी हि अवस्था थोडी गोष्टीतल्या तरुणा सारखीच होती कारण त्यावेळी मी शाळा शिकायला उल्हास नगरला माझ्या आत्याकडे राहायला उल्हास नगरला होतो त्यामुळे माझ्या हि