Skip to main content

कर्ण,अश्वसेन, आणि राज्यकर्ते

घर आमचं माळकरी त्यामुळे पूर्वी ग्रंथवाचन वारी ह्या सामान्य गोष्टी होत्या(आताशा अवघड वाटू लागल्यात ) त्यामुळे रामायण महाभारत हे ही रोजच्याच कथा मग हळूहळू शाळेत देखील मुलांना वाचनाची गोडी लागावी म्हणून खास पुस्तक मुलांना वाचायला देत असत काही शिक्षक मग कधी कधी त्यावर प्रश्न ही विचारत ,,
अशी ती ऐकण्याची वाचनाची गोडी लागलेला मी त्या ग्रंथ वाचनात हमखास कर्णाची गोष्ट येत असे,,
इतकंच कळायचं की तो दुष्ट लोकांसोबत आहे आणि विजय पांडवांचाच होणार,, हे गणित ग्रंथ संपायच्या आधीच डोक्यात फिट्ट झालेलं असायचं,
पण,,,,
मनात मात्र कायम एक हुरहूर असायची
जळो मेल ते युद्ध वैगेरे,, पांडव भले ही युद्ध जिंकोत पण कर्ण मात्र हरयला नको,,,
कारण हळू हळू राधेय वैगेरे सारखी पुस्तक वाचनात येऊ लागली होती पण तरीही तो शत्रू सोबत लढतो हे मात्र मनात ठसलेलं असून ही तो हरू नये हे मनाने ठरवलेलं असायचं,,
मग एक दिवस माझे आजोबा आईचे वडील ,,
पुण्याला गावी गेलो असताना त्यांना मनातला प्रश्न विचारला,, की अस का ? मीच नव्हे माझे बरेच समवयस्क मित्र देखील असच म्हणतात की कर्ण जिंकायला हवा,,, अस नक्की खरच होत का??
*त्यावेळी आजोबा म्हणाले हो कर्ण चांगलाच होता
इतका की नीती , चारित्र्य, शब्द,वचन, सत्य,दानशूर हे सारे शब्द इतिहासात फक्त त्यांच्यासाठीच बनले असावेत,,,,,,*
म्हणजे झालं अस की त्याबाबतची एक गोष्टच त्यांनी मला सांगितली,,,
महाभरताच युद्ध सुरू झालेलं असत आज युद्धाच सेनापती पद हे कर्ण कडे असते आणि सगळ्यांना माहिती असत ,, अगदी भगवान श्री कृष्ण देखील जाणून असतात की अर्जुनाला जर कुणी मारू शकतो तर तो केवळ कर्ण,,,
आणि एक कुशल सारथी काय करू शकतो ते श्रीकृष्ण त्या युद्धात करून दाखवतात जेव्हा जेव्हा कर्ण अर्जुन भिडणार तेव्हा तेव्हा मोठ्या शिताफीने
रथ वळवत असे पण एक वेळ अशी आली की कर्ण आणि अर्जुन सामोरा समोर आलेच,,
आणि कर्नाच्या धनुष्यातून बाण सुटलाच पण सावध असलेल्या श्रीकृष्णांनी आपला रथ दोन बोट खाली जमिनीत दाबला,, बाण अर्जुनाच्या मुकुटला उडवून गेला अर्जुन वाचला,,, पण इथेच मोठी गम्मत झाली तो बाण फिरून पुन्हा कर्नाकडे आला
कर्ण चपापला हे कस शक्य??
त्यावेळी त्या बाणावर आरूढ अश्वसेन नाग तो हात जोडून उभा होता,,,
कर्नाने त्याला विचारलं तू कोण त्यावेळी त्या अश्वसेनाने त्याची गोष्ट सांगितली अर्जुनाने जे खांडव वन जाळले त्यात माझे आई वडील तक्षक सारे कुटुंबीय नाहक मारले गेले , त्यामुळे या अर्जुनाचा जीव घेण्यासाठी वारंवार प्रयत्न केले परन्तु अर्जुनला एक तुम्हीच मारू शकता हे मी जाणून होतो
आणि म्हणूनच मी तुमच्या बाणावर आरूढ झालो यावेळी थोडी रथ अचानक दाबल्यामुळे माझा अंदाज चुकला पण परत पुन्हा तुमच्या बाणा वर आरूढ व्हायची परवानगी द्या यावेळी मी चुकणार नाही अर्जुनाचा जीव घेतल्याशिवाय परत येणार नाही,,,
*त्यावेळी कर्ण त्या तक्षकाला हात जोडत बोलला नागराज तुमचा राग मी समजू शकतो परन्तु माझ्या युद्धशास्त्रात नितीमत्तेत हे बसत नाही त्यामुळे तू आधी माझी परवानगी न घेता बाणावर गेलास ठीक माफ केलं पण आता जाणून बुजून मात्र अर्जुन माझा किती मोठा शत्रू असला तरीही मी तुझा पुन्हा वापर करणार नाही त्यावेळी तक्षकाने कर्नाला आशीर्वाद दिला कर्ना जा या युद्धात जरी तुझा पराभव झाला तरी तू या महाभारताचा खलनायक नक्कीच नसशील*
इतकं बोलून आजोबा थांबले
*मला जवळ घेतलं आणि त्यांनी सांगितलं सुनील
अंगाला लागलेला मळ जसा आंघोळीनं दूर होतो तसा मनाला नितीमत्तेला चारित्र्याला लागलेला मळ हरिकथा वाचून त्याप्रमाणे वागून दूर होत असतो*
त्यावेळी इतकं जड जड ऐकायची समजायची समज नव्हती तशी ती आजही नाहीच नाही
पण नीतिमत्ता सोडून वागू नये इतकं मात्र नक्की लक्षात राहील मग भले आपलं नुकसान झालं तरी चालेल
आजचे राज्यकर्ते यातून धडा घेतील काय??

Comments

Popular posts from this blog

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्या तपकिरी गाई कड़े वळ

*नको देवराया अंत आता पाहू,,*

देवा ये लवकर तुझ्या पराक्रमाच्या गोष्टी खूप वाचल्या रे आमचा विश्वास ही आहेच त्यावर पण ये आता आता तूच या अदृश्य कोरोनाशी लढ आणि मुक्त कर☹ *प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी तू सदैव उभा राहतोस म्हणे,,* मग आमचे प्रयत्न दिसत नाही का रे देवा☹ जगाचा पालन कर्ता असलास तरी या भरतभूमीवर तुझं विशेष प्रेम,,सार जग सोडून तू तुझे सारे अवतार याच भरतवंशीयांसाठी सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच निर्दालन करण्यासाठी घेतलेस,,, *मग आजच असा निष्ठुर कठोर पाषाण हृदयी का झालास😏☹😡* अरे आम्ही तुझीच लेकरं ना रे मग आमची अवघ्या मनुष्य जातीची चाललेली परवड तुला दिसत नाही की अजून शेषशैये वरून उठायची वेळच झाली नाही की तुझा कुंभकर्ण झालाय देवा? *उठ रे दादा उठ*☹ मला माहिती आहे केवळ प्राण्यांची असलेली ही भूमी तू गुण्या गोविंदाने हे मनुष्यप्राणी ही राहतील या मोठया आशेने आम्हला ती  आंदण दिलीस☹ *पण आम्ही कपाळकरंटे रे ओरबाडली अक्षरशः ही भूमी ओरबाडली*😏😡 जीवन जगण्याच्या स्पर्धेत *आमचा बकासुर कधी झाला* ते आमचं आमच्याच कळलं नाही *आमचा हव्यास कधी संपेल माहिती नाही* आमची आयुष्य एकमेकांचा धर्म उणिदुनी काढण्यातच जाणा

राजा-माकड-आणि आपण ,,,

हि आहे एका आळशी आणि बुद्धू राजाची गोष्ट एकदा ह्या राजाला एक माकड काही तरी मदत करते. आणि त्यामुळे राजा त्याला आपला सेवक म्हणून तैनात करतो. प्रधान हे पाहून वैतागतो,राजाला समजावण्याचा प्रयत्न करतो पण राजा मानत नाही, प्रधान कपाळावर हात मारतो-  एकदा-दोनदा-तिनदा... असे ब-याचदा होते. एके दिवशी राजा झोपलेला असतो, माकड वारा घालत असते. एक माशी सारखी राजाच्या नाकावर बसायचा प्रयत्न करते. माकड तिला हकलायचा प्रयत्न करते, पण तरी ती पुन्हा पुन्हा येते म्हणून शेवटी चिडून माकड राजाच्या तलवारीने तिला मारायचा प्रयत्न करतो... आणि... राजाचे नाकच कापले जाते.. प्रधानजी हसतो... तात्पर्य -- ज्यांची लायकी नाही पात्रता नाही अशांच्या हातात जबाबदारी सोपवली कि काय होत ते हि गोष्ट सांगते ??,,,,,,,,,,,, आज नेमकी हि गोष्ट आठवायचं कारण ,,, शक्ती मिल कंपाउंड मध्ये जो फोटोग्राफर मुलीवर बलात्कार झाला त्यावर ईथे नेहमी प्रमाणे येवून सगळ्यांनी आपापली मत मांडली नेहमी प्रमाणे बांगड्या भरा ,चपलेने बडवा ,सरकार नालायक अशी मत मांडली गेली पण हि झाली फक्त चर्चा याच्या मुळाशी कुणीच प्रयत्न करू ईच्छित नाही आणि नेमकी कधी काळी वाचलेल