Skip to main content

Posts

गरीब कोण ?

अर्थात नजरेचा फरक ,,,,,, एकदा एक अति श्रीमंत माणूस आपल्या मुलाला जवळच्याच एका खेड्यातल्या शेतावर गेला, तिथली ती गरिबी त्यालोकांच दारिद्र्य आपल्या मुलाने अनुभवाव म्हणून तो त्याला घेवून गेला , आणि मग त्याला आपल्या संपत्तीच महत्व आणि अपूर्वाई आपोआप कळेल .त्यामुळे त्याला आपल्या श्रीमंतीचा सदैव अभिमान राहील असा विचार करून त्या खेड्यात त्या मुलाला तो घेवून आला होता. ते दोघ बाप लेक त्या गरीब शेतकऱ्याच्या शेतावर दोन दिवस राहिले . आणि मग आपल्या गहरी परतल्यावर त्या बापाने आपल्या श्रीमंती गुर्मीत विचारले काय मग कशी वाटली ट्रीप? बघितलस ना गरीब लोक कस जगतात ? यावर तो मुलगा म्हणाला हो हि ट्रीप मला खूपच आवडली, आणि लक्षात  आल कि आपणच त्यांच्या पेक्षा जास्त गरीब आहोत,,,,,, हे ऐकून बाप बेशुद्ध व्हायचा तेव्हडा बाकी होता,,, बाप म्हणाल ते कस काय? मुलगा म्हणाला आपल्याकडे एक कुत्रा आहे ,त्यांच्या कडे चार कुत्रे आहेत, आपल्या अंगणात पोहायचा छोटासा तलाव आहे त्यांच्या कडे खूप मोठी खाडी आहे , ती कुठे संपते ते दिसतच नाही, आपल अंगण गेट पर्यंत आहे त्याचं अंगण क्षितिजाला जावून टेकल आहे, आ...

पत्रास कारण कि , ,,,,,,

||श्री|| ||खंडोबा प्रसन्न|| स.न.वि.वि. प त्रा स कारण कि , मित्रांनो खूप वर्ष लोटली,  कु णाचे मला पत्र आले नाही कि  मी कुणाला पाठविले नाही. तुम्ही शेवटचे आंतरदेशी पत्र , पोस्टकार्ड कुणाला पाठवले?  किंवा तुम्हाला कुणाचे आले? जर आठवून पाहा . .! आज कपाट साफ करता करता एक पोस्टकार्ड फाईल मधून खाली पडले . . आणि गहीवरुन आले . . एक काळ होता किती महत्त्व होते . .या पोस्टकार्ड, आंतरदेशी पत्र ,चिठ्ठी, तार यांना . . यांच्या शिवाय माणसांची नाती एकमेकांत घट्ट राहणे मुश्किल होते . . काकांचे, मामांचे ,आजोळचे पत्र आले की ते वाचताना  सर्व मंडळी कशी त्या पत्रात डोळ्यासमोर साक्षात उभी राहत . . त्या काळी आम्हा लहान मुलांचा पण खूप रुबाब होता .  त्यावेळी मी चौथी ,पाचवीला असेन . रस्त्यावर कुठे पोस्टमन कुणाचे घर शोधत असला तर . . लगबगीने ओ काका मला माहीत आहे त्यांचे घर . .चला मी दाखवतो . . मग त्यांना त्या घरी नेऊन शाबासकी मिळवायची . . जर त्या घरात कुणाला वाचता येत नसेन तर आपला रुबाब अजून वाढला . . ऐ पिंटू हे पत्र वाच जरा कुणाचे आले आहे ? मग त्यांना ते वाचून दाखवून...

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्य...

नीती आणि मूल्य

काल दुपारी मी रेडिओवर एका तळ्यात होती बदके पिले सुरेख हे गाण ऐकत होतो आणि नकळत त्या गाण्यात गुंतत गेलो खूप छान गाण आहे ते स्वतःची ओळख करून देणारे ,, स्वतःला जागे करणारे ,आपण कुणी तरी वेगळे आहोत मग कुणी का किती टिंगल करेना आपण आपला मार्ग सोडायचा नाही , जमेल तितक स्वतःला आरशात पाहायचं कारण मनुष्याचा खरा मित्र कोण असेल तर तो आरसा . या आरशात डोकावलं कि तुम्ही कोण आहात ते कळत. स्वत्वाची जाणीव होते स्वतःच वेगळेपण जाणवत , अशावेळी ज्याला जाणीव झालीय स्वत्वाची स्वतःत असलेला राजहंस पणाची त्याने तळ्यातला बद्कात राहू नये त्याच्या साठी मोत्याचा चारा वाट पाहत असतो त्याने झेप घ्यावी आसमंतात आणि हे राजहंस पण केवळ लाल बहादूर शास्त्रीं मध्ये होत. म्हणून ते वेगळे होते ,,,, बाकी सारीच तळ्यातली बदक .. ..... स्वर्गीय लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान असतानाची गोष्ट , शास्त्रीजींचा मुलगा सुनील याला अलिशान मोटार गाड्यांचे खूप आकर्षण , परंतु शास्त्रीजींकडे न स्वतःची गाडी नव्हती त्याला त्याची ईच्छा दाबून ठेवावी लागे, मात्र शास्त्रीजींकडे पंप्रधान म्हणून सरकारी गाडी होती . ती मात्र अत्यंत महागडी आ...

वादळा पूर्वीची तयारी ,,,,,,,,,

काल fb वरील मित्राने सांगितले एयर पोर्टवर कस मुबई च्या ऐवजी bombay  लिहिलंय बाळासाहेबांकडे हि तक्रार मांडा ह्या भैया बिहार्यांचा माज उतरवला पाहजे. शिवसेनेनी काही तरी ठोस भूमिका घेतली पाहिजे . अस बराच काही बोलला,,,, आणि अचानक एक जुनी गोष्ट आठवली ,,, एका व्यक्तीला त्याच्या समुद्र किनार्यावरील फार्म हौस साठी तिथल काम सांभाळणाऱ्या व्यक्तीची गरज होती , त्या ठिकाणी वेळोवेळी येणाऱ्या  वादळान मुळे त्या मालकाचे वेळोवेळी बरेच नुकसान होत असे आणि म्हणून त्या ठिकाणी कुणी कामास हि राहत नव्हते ,,,,,,,, आणि अशा वेळी एक बुटका माणूस  ती नोकरी करावयास तयार झाला. त्या मालकाने त्याला विचारले तुला हे काम येते का? आधी कुठे तू काम केले आहेस का? पण त्या बुटक्या चक्रम माणसाने उत्तरही चमत्कारिक दिले. तो म्हणाल मी वादळा मध्ये शांत झोप घेवू शकतो ,,,,,, मालक थोडा गोंधळला हे उत्तर ऐकून पण कुणीच नाही तर हा तरी म्हणून त्याला कामावर ठेवले,, आणि तो मालक आपली कामे करायला गेला संध्याकाळी आपली कामे आटोपून घरी येतो काय? त्याला वादळाची कल्पना आली आणि धावतच नोकर कस काम करतोय हे पाहण्यास...

भारत देश नेमका कसा आहे?

भारत देश नेमका कसा आहे? जिथे पिज्झा हा नेमका  पोलिस आणि अम्ब्युलंस पेक्षा लवकर घरी येतो,,,,,,,,,  भारत देश नेमका कसा आहे? जिथे कार लोन ५% आणि शिक्षनासाठी १२% कर्जाने मिळत  ,,,,,,,,,,,,,,     भारत देश नेमका कसा आहे? जिथे ४० रुपये दराने तांदूळ तर  १ ० रुपयाला सिमकार्ड मिळत ,,,,,,,,,, १ जिथे २० वर्षापूर्वी,,,, वडापाव ५० पैसे आणि , std कॉल ७ रस, होता आणि आता , वडापाव ७ rs , तर std कॉल ५० पैसे आहे  भारत देश नेमका कसा आहे? जिथे लोक गाव गप्पा मारण्यासाठी  चहाच्या टपरीवर जमतात ,,, वृत्तपत्र हातात घेतात आणि  टपरीवाल्या कड़े  पाहत म्हणतात या लहान मुलांना  कामाला ठेवनार्या लोकांना भर चौकात फाशी दिली पाहिजे,,,, आणि थोड्याच वेळात ओरडतात  ऐ पोर्या दोन कटिंग आण रे,,,,,, हा आहे भारत ........ 

बाप- नियम

बापाच महत्व वाढवताना येथे मला आईच महत्व कमी नाही   करायचं  पण,,,, कायम उपेक्षित ,दुर्लक्षित ,रागाच,वाईट पणाचा धनी , होणार्या   बापाच महत्व हि कमी नाही हे सांगायचा  अल्पसा प्रयत्न,,,, आई प्रत्येक बाबतीत रडून मोकळी होते  पण बापाने ,,,नाही,, नियमच असतो तो ,,, ज्योती पेक्षा समईने च तापायच असत ,,नियमच,,, जेवण करणारी आई लक्षात   राहते, पण आयुष्याच्या शिदोरीची व्यवस्था करणाऱ्या बापाला  विसरतो आपण ,,नियमच,,, स्वतःचा बाप वारला तरी रडता येत नाही ,,नियमच,,,, बहिणींसाठी भावांसाठी आधार व्हायचा असत ,,नियमच,,, देवकी यशोदेच कौतुक करतो सहज पण ,,, कंसाच्या कराल दाढेतून वाचवणारा बापच असतो,,नियमच,,, कौसल्येचा राम असेल हि पण,,, पुत्र वियोगाने जातो दशरथ च ,,,नियमच,,,, मुलाबाळांना चांगल चुंगल देताना जो फाटका राहतो  तो बापच,,, नियमच,,, आमच्या नशिबाची भोक कायम त्याच्या  बनियानवर ,,,नियमच,,, आम्ही १०\१५० सहज खरचतो सलून   मध्ये, तो मात्र अंगाचा साबण दाढीला लावतो,,,नियमच,,, आमच्या आजारपणात धावणारा बाप  स्वतःमात्र ताप अंगावर काढतो,,,नियमच  ,,, आजाराला ना...

प्रश्‍नांची उत्तरं ???????????????????

जरा या पुढे दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या पाहू - १ - जगातल्या पहिल्या दहा सर्वांत श्रीमंत माणसांची नावं सांगा पाहू. २ - गेल्या पाच वर्षांत विश्‍वसुंदरी किताब मिळवणऱ्यांची नावं आठवतायत ? ३ - या वर्षीच्या पाच नोबेल विजेत्यांची नावं सांगता येतील ? ४ - गेल्या दोन वर्षांतल्या ऑस्कर विजेत्यांची नावं लक्षात आहेत का ? हं! काहितरीच काय विचारताय ? असं तर वाटलं नाही ना तुम्हाला ? पण , असं वाटलं नसलं तरी , या प्रश्‍नांची उत्तरं देमं तसं सोपं नाहीच , नाही का ? टाळ्यांचा कडकडाट हवेत विरून जातो. पदकं आणि चषक धूळ खात पडतात. जेत्यांचाही लवकरच विसर पडतो. आता या चार प्रश्‍नांची उत्तरं द्या पाहू - १ - तुमच्यावर ज्यांचा प्रभाव आहे अशा तीन शिक्षकांची नावं सांगा बरं. २ - तुम्हाला अगदी तातडीची गरज असताना मदत करणाऱ्या तीन मित्रांची नावं सांगता येतील ? ३ - आपण म्हणजे अगदी महत्त्वाची व्यक्ती आहोत , असं तुम्हाला वाटायला लावणाऱ्या एखाद- दोघांची नावं सांगता येतील तुम्हाला ?   ४ - तुम्हाला ज्यांच्याबरोबर वेळ घालवायला आवडतो अशा पाच जणांची नावं सांगा बरं. क्षणभर विचार करा. आयुष्य अगदी छोटं आहे....

एक गोष्ट सिएटलच्या ऑलिम्पिकची.

ही एक गोष्ट आहे काही वर्षांपूर्वीची. सिएटलच्या ऑलिम्पिकमध्ये शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेत सहभागी झालेले  नऊ स्पर्धक स्पर्धा सुरू होण्याच्या संकेताची वाट पाहात  जय्यत तयार उभे होते.  ही सारी मुलं शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या अपंग होती. पिस्तुलाचा आवाज झाला आणि शर्यत सुरू झाली.  साऱ्यांनाच पळता येत होतं असं नाही. पण , प्रत्येकाला स्पर्धेत भाग घ्यायचा होता आणि महत्त्वाचं म्हणजे जिंकायचं होतं. धावता धावता एकाचा तोल गेला. काही कोलांट्या खाऊन तो पडला आणि रडू लागला. त्याच्या रडण्याचा आवाज ऐकून अन्य आठही जण पळायचे थांबले. सारे मागे फिरले... सारे जण... डाउन्स सिन्ड्रोम ' ची व्याधी असलेली एक मुलगी त्याच्या जवळ बसली. तिने त्याला मिठी मारली आणि मग विचारलं , " आता बरं वाटतंय ?'' मग सार्यांनी त्याला उभं केलं आणि अंतिम रेषेपर्यंत सारे खांद्याला खांदा लावून चालत गेले. ते दृष्य पाहून मैदानावर उपस्थित असलेले सारेजण हेलावून गेले.  उभे राहून मानवंदना देत साऱ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. बराच काळ त्या टाळ्यांचा आवाज आसमंतात गुंजत होता......... त्यावेळी त...

दमलेल्या बाबाची कहाणी ,,,

आज आपल्याला अमिताभ किंवा सन्नी देओल ,सचिन का आवडतात ? तर एका शब्दात सांगायच तर आपल्याया जे करू वाटत ते ते करून दाखवतात ,  अशक्य ते शक्य करून दाखवतात ,,,, मग डॉ.सलिल कुलकर्णी,आणि संदीप खरे का आवडतात ? त्यासाठी त्यांच गाण ऐकल पाहिजे , त्यांच संगीत ऐकल पाहिजे, त्यांच्या तालावर नाचणारे शब्द पाहिले(अनुभव) पाहिजेत, आणि मग लक्षात येत अरे मलाही हेच म्हणायच होत की ,,,, आणि त्यात ही दमलेला बाबा ऐकला की आपलाच आपण जोपासलेला अहमपना गलुन पडतो ,,, आणि लक्षात येत अरे मी ही आज बाबा आहे खरा पण,,, मी कुठे प्रयत्न केला माझ्या बाबांना शोधायचा ? मी कुठे प्रयत्न केला त्याना समजुन घेण्याचा? मी कुठे प्रयत्न केला त्यांच्यातल्या वास्सल्याला समजुन घेण्याचा ? मी कुठे त्यांच्या कड़क आवरनाखाली त्यांची माया शोधली? एखायाला जसे काही अघटित घडल की त्याला आईच दूध आठवत  अगदी तसाच ,,, दमलेला बाबा ऐकला की आपला बाप आठवतो,,,,,,,,,,,,, आणि नकळत आपल्या ही पापण्या ओलावातात जुन्या आणि नव्या बाबाच्या ही,,, ही त्याचीच कहाणी,  कोमेजुन  निजलेली एक परी रानी उतरले तोंड डोळा सुकलेले पाणी ...

आपल वैवाहिक आयुष्य खरच सुखाचं आहे?"

हे लग्न झालेल्यांनी , न झालेल्यांनी   आणि लग्न होणार असलेल्यांनी ...... नक्कीच वाचा : विचार करा . एका रात्री तो  घरी आलो ते मनाशी काही ठरवूनच . जेवताना त्याने  तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला , " मला तुझ्याशी काही बोलायचं आहे ." तिच्या डोळ्यांत वेदना उमटली ;  तरीही ती शांतपणे जेवत होती ,    सगळे शब्द जुळवून त्याने तीला   सांगितलं ,  मला घटस्पोट हवाय ." तिने शांतपणे विचारल ,- " का ?" तिचा प्रश्न त्याने टाळला , ती भडकली .  समोरच ताट तिने भिरकावून दिलं .  लग्न मोडायला नेमकं काय कारण आहे , हे तिला जाणून घ्यायचं   होत ;    पण माझं मन दुसऱ्या   स्त्रीवर आलय हे तो तिला   स्पष्टपणे सांगू   शकत नव्ह्तो . माझा बँक ब्यालन्स , कार , घर , सगळ मी तिला देऊ केलं :    पण त्याने समोर केलेल्या घटस्पोटाच्या कागदाचे तिने तुकडे केले . दुसऱ्या दिवसी तिने त्याच्या समोर घटस्पोटा विषयीच्या अटीचा कागद समोर केला . तिला ...

"ना- ताळ"

एकमेकांशी ज्यांचा नसतो "ताळ" ते साजरा करतात "ना- ताळ" आणि काही का असेना हे आमच नाही ही सभ्यता ? आमची नाही सरत्या वर्षाला निरोप  तोही मद्य धुंद अवस्थेत आम्ही देत नाही आम्ही उगवत्या सुर्याचे उपासक आहोत हेच विसरत आहोत ? देव दास मधील चुनी बाबु म्हणतो ,, "द" से दर्द ,दोस्ती, तसेच आजचे शिकले सवरलेले,, कॉलेज बाबु "ड" से डिसेंबर  तो ही 31first चा म्हणु लागलेत आणि दिमतीला आहेतच टिव्ही च्यानेल्स  ,, ह्या असल्या निरोप समारंभातुन काय सध्या होते? हे विचारायचे नाही,, आणि विचारलेच तर ,,? काय नाय यार जस्ट enjoyyyyyyyy काय नाय यार फ़क्त मजा करायची असा हा आता "मजा" करण्याचा भाग जरी हलका फुलका वाटला तरी उद्या तो डोइ जड़ ठरणार आहें हेच विसरतो आहोत  तात्पर्य- "चैत्र पाडव्याला महत्त्व देण्या ऐवजी ,, आम्ही ३१ डिसे. ची वाट पाहणार असू तर ,, तो आमच्याच "वैचारिक दीवाळ खोरिचा भाग मानावा लागेल "

"माझ्या डोळ्यांची काळजी घे."

ती जन्मताच आंधळी, त्यामुळे सगळ्यांच्याच तिरस्कारास पात्र.आई-वडील, सख्खे भाऊ, बहिणींही एक डोक्यावरचंन टाळता येणार ओझं म्हणून सहन करणारे.ह्यात एकच समाधानाची बाब म्हणजे तिचा प्रियकर.तिच्यावर जिवापाड प्रेम करणारा, तिच्या अंधपणाचा कोणताही बाऊ न करता.मग तिला वाटायचे आपण खुप नशिबवान आहोत.तिने कित्येक वेळेस त्याला म्हंटले सुद्धा, "जर मला दृष्टी लाभली असती तर तुझ्याशीच लग्न करून, शेवट पर्यंत साथ दिली असती."आणी अचानक एके दिवशी चमत्कार झाला.कोणीतरी तिला आपले डोळे देण्यास तयार झाला.शेवटी यशस्वी शस्त्रक्रिये नंतर दिला दिसू लागले.सर्व प्रथम तिने प्रियकराला पाहण्याचा हट्ट धरला.त्याला पाहताच तिला जबरदस्त धक्का बसला.तो चक्क आंधळा होता.तेवढ्यात त्याने विचारले, "करशील आता माझ्याशी लग्न?"तिने सहजतेने त्याचा प्रस्ताव नाकारला.त्याने कांहीही प्रतिक्रीया व्यक्त केली नाही.तिच्यापासुन दुर जाताना फक्त एवढेच म्हणाला, "माझ्या डोळ्यांची काळजी घे."आणि,,,,, ती उघड्या डोळ्यांनी पहातच राहिली. तात्पर्य  ....... डोळे आल्यावर स्वार्थ जागा जाला निरपेक्ष प्रेम हरल.    

धंदा

परवा सकाळी एका दुकानात गेलो माझ्या मित्राच आहे ते  आणि दोन बाप बेट्याँचा संवाद  कानी पडला ,,, मगन शेटने गल्ल्यावर बसता बसता पोराला विचारले  "तो आयपीएल चा काय जाला रे  ,,,,? बापू ..ते सचिन चा सेंच्युरी नाय जाला अजुन पण ते करेल , कुम्बले बी चांगली बोलिंग करते , मगन शेट,,साला इतका वरस जाला  पण तुला  धंदयाची वात जमते नाय... मगन शेट थोड चिडून च बोलले , पण बापू तुमीच विचारले ना आयपीएल चा काय ते ? अरे साला गांडा मी तुला विचारले आयपीएल चा काय  म्हणजे ते ललित मोदिचा काय जाला ? इतका करोडोचा धंदा त्याने जमवला ते कसा?  ते रायला बाजूला अन साला  तु ते टीवी ला चिटकुन बसते , आणि टाईमपास करते .. साला तुला कसा सुचला नाय ते क्रिकेटचा धंदा करायला ? ते ललित मोदी बग कसला भेजा हाय तेचा , तेनी क्रिकेटचा नुसता धंदाच नाय केला , तर प्लयेअर ला बाजारात बसवाला तेचा बी मार्केट केला , पोलीटेशीयानला ते बाजारात आणला , सिनेमा वाल्यांचा पैसा लावला , आण तु स्साला नुसता टाएम वेस्ट केला ,,,,? ते साला सचिन सचिन करते ते काय तुला पैसा देणार हाय काय? हातचा ध...