Skip to main content

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,,
एका जंगलात
पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या.
अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता .
पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत .
कारण त्या एकत्र असत .
बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता.
काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता ,
एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला
आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे ,
मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई
करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते .
तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे .
तुम्ही तिकडे जा,,,,,,,
तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली ,
काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण?
सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे ,
या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे ,
म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का?
हुरळलेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,,
याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,,
पण तो शांत थोडाच बसणार होता?
दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा
त्या तपकिरी गाई कड़े वळवला
म्हणाला मुर्ख गाई मारायला हो आता तुझी पाळी,,,,,,,,,,,,

गाय म्हणाली होय महाराज मी मूर्खच आहे .पण एक विनंती आहे मारायच्या महाराज आधी मला
तीन वेळा 
आक्रोश करु दे.
सिंह म्हणाला तीन वेळा?
गाय हो तीन वेळा,,,,,

१ पहिल्यांदा मी तुझ्याशी मैत्री केली त्यासाठी,,,,,,,,
२-दुसर्यांदा तू पांढरी गाय खाल्लीस त्यासाठी ,,,,,
३-तिसर्यांदा तू काळ्या गायीचा चट्टा मट्टा केलास त्यासाठी,,,,,,,
आणि तिने हंबरडा फोडला शेवटी स्वतःच्या मरणासाठी ,
तेव्हा मित्रहो ,
हि गोष्ट खरतर आपणा सर्वांसाठी आहे .
या तीन गायी म्हणजे तुम्ही आम्ही भोळी भाबडी जनता
आणि तो बेरकी सिंह म्हणजे,,,,,,,,,,,?
सांगितलच पाहिजे का?
तो सिंह म्हणजे सोनियाच्या हातातलं खेळण
म्हणजेच आपले पंत प्रधान मनमोहन सिंग पर्यायाने कोन्ग्रेस
जी गेली कित्येक वर्षे आम्हाला भूलथापा देवून
निवडून येतेय आणि सुखानावे राज्य करतेय,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
तुमच्या आमच्यात फुट पाडून
कुणाला जातीच आमिष दाखवून,,
कुणाला पैशाच आमिष दाखवून,,
कुणाला पक्षाच आमिष दाखवून,,,
कुणाला सत्तेच आमिष दाखवून,,,
कुणाच्या जातीपातीत भांडण लावून,,
कुणाला मंडल आयोग  ,,,,,
कुणाला ३७० कलम,,,,,
कुणाला सीमाभागात डांबून,,
कधी १०५ हुतात्म्यांचा अपमान करून ,,,,,
तर कधी दादोजींचा पुतळा काढून,,,
अशी बरीच कारण आहेत ज्याला काँग्रेस ईतकेच आपणही जबादार आहोत .
तात्पर्य-जस त्या गायीच्या लक्षात तीच चूक आली
तशी आपल्या जेव्हा हि चूक लक्षत येईल कि
काँग्रेसला  मत म्हणजे ,,,,,,,,
देशाच्या विभाजनाला मत,,,,,
स्वताच्या असुर्क्षेला मत ,,
३७० कलमाला मत,,,,
मंडल आयोगाला मत ,,,
कसबाला मत
अफझलला मत,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
तेव्हा विचार करा मित्रानो उद्या जगण्यासाठी आज मराव लागल तरी चालेल पण  कोन्ग्रेस्सला जवळ करू नका नाहीतर ,,,,,,
त्या गायी सारखा हंबरडा फोडन्या पलीकडे आपण काहीही करू शकणार नाही. नव्हे,, 

तो हंबरडा ऐकायला तरी कुणी असेल कि नाही अशी शंका येते .



Comments

  1. हम्म..अतिशय योग्य विचार आहेत ..काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मुळे देशाची इतकी अधोगती होत जातेय की त्याचीच खंत वाटत आहे आता,इजिप्त सारखी क्रांती हवी

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

*नको देवराया अंत आता पाहू,,*

देवा ये लवकर तुझ्या पराक्रमाच्या गोष्टी खूप वाचल्या रे आमचा विश्वास ही आहेच त्यावर पण ये आता आता तूच या अदृश्य कोरोनाशी लढ आणि मुक्त कर☹ *प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी तू सदैव उभा राहतोस म्हणे,,* मग आमचे प्रयत्न दिसत नाही का रे देवा☹ जगाचा पालन कर्ता असलास तरी या भरतभूमीवर तुझं विशेष प्रेम,,सार जग सोडून तू तुझे सारे अवतार याच भरतवंशीयांसाठी सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच निर्दालन करण्यासाठी घेतलेस,,, *मग आजच असा निष्ठुर कठोर पाषाण हृदयी का झालास😏☹😡* अरे आम्ही तुझीच लेकरं ना रे मग आमची अवघ्या मनुष्य जातीची चाललेली परवड तुला दिसत नाही की अजून शेषशैये वरून उठायची वेळच झाली नाही की तुझा कुंभकर्ण झालाय देवा? *उठ रे दादा उठ*☹ मला माहिती आहे केवळ प्राण्यांची असलेली ही भूमी तू गुण्या गोविंदाने हे मनुष्यप्राणी ही राहतील या मोठया आशेने आम्हला ती  आंदण दिलीस☹ *पण आम्ही कपाळकरंटे रे ओरबाडली अक्षरशः ही भूमी ओरबाडली*😏😡 जीवन जगण्याच्या स्पर्धेत *आमचा बकासुर कधी झाला* ते आमचं आमच्याच कळलं नाही *आमचा हव्यास कधी संपेल माहिती नाही* आमची आयुष्य एकमेकांचा धर्म उणिदुनी काढण्यातच जाणा

राजा-माकड-आणि आपण ,,,

हि आहे एका आळशी आणि बुद्धू राजाची गोष्ट एकदा ह्या राजाला एक माकड काही तरी मदत करते. आणि त्यामुळे राजा त्याला आपला सेवक म्हणून तैनात करतो. प्रधान हे पाहून वैतागतो,राजाला समजावण्याचा प्रयत्न करतो पण राजा मानत नाही, प्रधान कपाळावर हात मारतो-  एकदा-दोनदा-तिनदा... असे ब-याचदा होते. एके दिवशी राजा झोपलेला असतो, माकड वारा घालत असते. एक माशी सारखी राजाच्या नाकावर बसायचा प्रयत्न करते. माकड तिला हकलायचा प्रयत्न करते, पण तरी ती पुन्हा पुन्हा येते म्हणून शेवटी चिडून माकड राजाच्या तलवारीने तिला मारायचा प्रयत्न करतो... आणि... राजाचे नाकच कापले जाते.. प्रधानजी हसतो... तात्पर्य -- ज्यांची लायकी नाही पात्रता नाही अशांच्या हातात जबाबदारी सोपवली कि काय होत ते हि गोष्ट सांगते ??,,,,,,,,,,,, आज नेमकी हि गोष्ट आठवायचं कारण ,,, शक्ती मिल कंपाउंड मध्ये जो फोटोग्राफर मुलीवर बलात्कार झाला त्यावर ईथे नेहमी प्रमाणे येवून सगळ्यांनी आपापली मत मांडली नेहमी प्रमाणे बांगड्या भरा ,चपलेने बडवा ,सरकार नालायक अशी मत मांडली गेली पण हि झाली फक्त चर्चा याच्या मुळाशी कुणीच प्रयत्न करू ईच्छित नाही आणि नेमकी कधी काळी वाचलेल