Skip to main content

बाप- नियम

बापाच महत्व वाढवताना येथे मला आईच महत्व कमी नाही करायचं 
पण,,,,
कायम उपेक्षित ,दुर्लक्षित ,रागाच,वाईट पणाचा धनी ,
होणार्या   बापाच महत्व हि कमी नाही हे सांगायचा 
अल्पसा प्रयत्न,,,,
आई प्रत्येक बाबतीत रडून मोकळी होते 
पण बापाने ,,,नाही,, नियमच असतो तो ,,,
ज्योती पेक्षा समईने च तापायच असत ,,नियमच,,,
जेवण करणारी आई लक्षात राहते,
पण आयुष्याच्या शिदोरीची व्यवस्था करणाऱ्या बापाला 
विसरतो आपण ,,नियमच,,,
स्वतःचा बाप वारला तरी रडता येत नाही ,,नियमच,,,,
बहिणींसाठी भावांसाठी आधार व्हायचा असत ,,नियमच,,,
देवकी यशोदेच कौतुक करतो सहज पण ,,,
कंसाच्या कराल दाढेतून वाचवणारा बापच असतो,,नियमच,,,
कौसल्येचा राम असेल हि पण,,,
पुत्र वियोगाने जातो दशरथ च ,,,नियमच,,,,
मुलाबाळांना चांगल चुंगल देताना जो फाटका राहतो 
तो बापच,,, नियमच,,,
आमच्या नशिबाची भोक कायम त्याच्या 
बनियानवर ,,,नियमच,,,
आम्ही १०\१५० सहज खरचतो सलून मध्ये,
तो मात्र अंगाचा साबण दाढीला लावतो,,,नियमच,,,
आमच्या आजारपणात धावणारा बाप 
स्वतःमात्र ताप अंगावर काढतो,,,नियमच  ,,,
आजाराला नाही घाबरतो एक महिन्याच्या आरामाला 
,,,नियमच,,,
पोरीच लग्न अन पोराच शिक्षण ,,,नियमच,,,
परीक्षेत निकाल आणि निक्काल लागल्यावर जवळ घेणारी आई लक्षात राहते 
पण तो हळूच जावून पेढे आणतो त्यालाच विसरतो  ,,नियमच,,,
ठेच लागली तर आई ग,,,
आणि मोठ्ठा रस्ता ओलांडताना ,
अचानक ट्रक करकचून ब्रेक दाबतो 
तोंडातून आपसूक निघत "बाप रे",,,नियमच,,,
छोट्या संकटासाठी आई आणि वादळाला टक्कर देण्यासाठी 
लढण्यासाठी बापच लागतो मग या बापच स्मरण 
कौतुक आपण नाही करणार तर कोण,,,?
कारण उद्या आपण हि बाप होणार असतो   ,,,
नियमच असतो तो,,,

Comments

  1. 1 comments:

    मैत्रेय१९६४ said...

    प्रिय सुनिल,
    मुंबईत ब्लॉगरच्या मेळाव्यात आपण भेटलो. मनाने कुठेतरी कौल दिला की आपले जमणार. मराठी असण्याचा योग्य अभिमाने आपल्या दोघांनाही आहे. तुझा ब्लॉग मी वाचला आहे. मनात असेल ते बेधडक पणे लिहीणे हे तुझ आंगभूत वैशिष्ट. अस लिहीण किती कठीण असत हे मला कळत. असो.
    आईच्या माये बद्दल खुप लिहील गेल आहे. पण बापाची पण माया असते हे तुझ्या सारखा बाप माणुसच स्पष्ट लिहू शकतो. आम्हा बाबा लोकांच्या भावना व्यक्त केल्या बद्दल आभार.
    लवकरच प्रत्यक्षात भेटु ही आशा.
    मैत्रेय१९६४ अर्थात देवेंद्र मराठे

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्या तपकिरी गाई कड़े वळ

*नको देवराया अंत आता पाहू,,*

देवा ये लवकर तुझ्या पराक्रमाच्या गोष्टी खूप वाचल्या रे आमचा विश्वास ही आहेच त्यावर पण ये आता आता तूच या अदृश्य कोरोनाशी लढ आणि मुक्त कर☹ *प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी तू सदैव उभा राहतोस म्हणे,,* मग आमचे प्रयत्न दिसत नाही का रे देवा☹ जगाचा पालन कर्ता असलास तरी या भरतभूमीवर तुझं विशेष प्रेम,,सार जग सोडून तू तुझे सारे अवतार याच भरतवंशीयांसाठी सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच निर्दालन करण्यासाठी घेतलेस,,, *मग आजच असा निष्ठुर कठोर पाषाण हृदयी का झालास😏☹😡* अरे आम्ही तुझीच लेकरं ना रे मग आमची अवघ्या मनुष्य जातीची चाललेली परवड तुला दिसत नाही की अजून शेषशैये वरून उठायची वेळच झाली नाही की तुझा कुंभकर्ण झालाय देवा? *उठ रे दादा उठ*☹ मला माहिती आहे केवळ प्राण्यांची असलेली ही भूमी तू गुण्या गोविंदाने हे मनुष्यप्राणी ही राहतील या मोठया आशेने आम्हला ती  आंदण दिलीस☹ *पण आम्ही कपाळकरंटे रे ओरबाडली अक्षरशः ही भूमी ओरबाडली*😏😡 जीवन जगण्याच्या स्पर्धेत *आमचा बकासुर कधी झाला* ते आमचं आमच्याच कळलं नाही *आमचा हव्यास कधी संपेल माहिती नाही* आमची आयुष्य एकमेकांचा धर्म उणिदुनी काढण्यातच जाणा

राजा-माकड-आणि आपण ,,,

हि आहे एका आळशी आणि बुद्धू राजाची गोष्ट एकदा ह्या राजाला एक माकड काही तरी मदत करते. आणि त्यामुळे राजा त्याला आपला सेवक म्हणून तैनात करतो. प्रधान हे पाहून वैतागतो,राजाला समजावण्याचा प्रयत्न करतो पण राजा मानत नाही, प्रधान कपाळावर हात मारतो-  एकदा-दोनदा-तिनदा... असे ब-याचदा होते. एके दिवशी राजा झोपलेला असतो, माकड वारा घालत असते. एक माशी सारखी राजाच्या नाकावर बसायचा प्रयत्न करते. माकड तिला हकलायचा प्रयत्न करते, पण तरी ती पुन्हा पुन्हा येते म्हणून शेवटी चिडून माकड राजाच्या तलवारीने तिला मारायचा प्रयत्न करतो... आणि... राजाचे नाकच कापले जाते.. प्रधानजी हसतो... तात्पर्य -- ज्यांची लायकी नाही पात्रता नाही अशांच्या हातात जबाबदारी सोपवली कि काय होत ते हि गोष्ट सांगते ??,,,,,,,,,,,, आज नेमकी हि गोष्ट आठवायचं कारण ,,, शक्ती मिल कंपाउंड मध्ये जो फोटोग्राफर मुलीवर बलात्कार झाला त्यावर ईथे नेहमी प्रमाणे येवून सगळ्यांनी आपापली मत मांडली नेहमी प्रमाणे बांगड्या भरा ,चपलेने बडवा ,सरकार नालायक अशी मत मांडली गेली पण हि झाली फक्त चर्चा याच्या मुळाशी कुणीच प्रयत्न करू ईच्छित नाही आणि नेमकी कधी काळी वाचलेल