Skip to main content

पत्रास कारण कि , ,,,,,,

||श्री||
||खंडोबा प्रसन्न||

स.न.वि.वि.
त्राकारण कि , मित्रांनो खूप वर्ष लोटली, 
कुणाचे मला पत्र आले नाही कि 
मी कुणाला पाठविले नाही.
तुम्ही शेवटचे आंतरदेशी पत्र , पोस्टकार्ड कुणाला पाठवले? 

किंवा तुम्हाला कुणाचे आले? जर आठवून पाहा . .!
आज कपाट साफ करता करता एक पोस्टकार्ड फाईल मधून खाली पडले . .

आणि गहीवरुन आले . .
एक काळ होता किती महत्त्व होते . .या पोस्टकार्ड, आंतरदेशी पत्र ,चिठ्ठी, तार यांना . .
यांच्या शिवाय माणसांची नाती एकमेकांत घट्ट राहणे मुश्किल होते . .
काकांचे, मामांचे ,आजोळचे पत्र आले की ते वाचताना 

सर्व मंडळी कशी त्या पत्रात डोळ्यासमोर साक्षात उभी राहत . .
त्या काळी आम्हा लहान मुलांचा पण खूप रुबाब होता . 

त्यावेळी मी चौथी ,पाचवीला असेन .
रस्त्यावर कुठे पोस्टमन कुणाचे घर शोधत असला तर . .

लगबगीने ओ काका मला माहीत आहे त्यांचे घर . .चला मी दाखवतो . .
मग त्यांना त्या घरी नेऊन शाबासकी मिळवायची . .
जर त्या घरात कुणाला वाचता येत नसेन तर आपला रुबाब अजून वाढला . .
ऐ पिंटू हे पत्र वाच जरा कुणाचे आले आहे ?
मग त्यांना ते वाचून दाखवून खावू पण मिळवायचा . .किती रे हुशार तु . . आम्ही मेले अडाणी . .
किधी कुणाची चिठ्ठी, पत्र लिहून दे . . .
घरात वरती कौलालाच्या लाकडाला . . 

ऐका तारेमध्ये कित्येक वर्षाची जुनी पत्रे जपून घुसवून अडकवलेली असायची . . .
किधी गरज पडली तर उपयोग होयचा . .शाहनिशा करायला . . 
कधी कधी आजोबा आजीच्या मनात आले , तर पिंटू ते जरा टपाल काढून वाचून दाखव रे . .!
तार आली म्हणजे तर पोटात धडकिच यायची . .आता कोण गेले ? 

असा पहिला विचार मनात येयाचा . .कधी कधी तर वाचण्या अगोदर घरात रडारडी सुरु होयाची . .
आपल्या गावचा कोणी गाववाला जर गावावरुन आला तर त्याच्या कडे हमकास चिठ्ठी देलेली असणारच . .
आता मात्र ते काही राहीले नाही . . 

तो कागूद, पोस्टकार्ड ,तार, आंतरदेशी पत्र ,चिठ्ठी , सांगावा , निरोप , पतार . . . 
सर्व भुतकाळ झाला आहे . .
तरी आता मी माझे पत्र संपवत आहे . . 

तुम्ही सर्व आंनदात राहो हीच प्रार्थना करतो . .
येथील आजी, आजोबा यांना शाष्टांग दंडवंत . .

काका, काकी , मामा,मामी , मित्र यांना सप्रेम नमस्कार , 
आणि लहानांना शुभ आशिर्वाद आणि गोड गोड पापा . . 
आपलीही खुशाली जरुर कळवावी आतुरतेने वाट पाहत आहे . .
कळावे
लोभ असावा . .
आपला

सुनील भूमकर  

Comments

  1. chhan lihile aahe..wachatana gahiwarun aale..pan shewati badal ha swikaravach lagato nahika..karan thambala to sampala

    ReplyDelete
  2. हो विकास खर आहे तुझा पण सर्व जून टाकून द्यायचं अस नाही ना ?
    आणि वेळ जर आपल्या माणसांसाठी नसेल तर करायचा काय असल पुढे जाण
    पुढे जाताना बरोबर आपली माणस हि हवीतच ना? नाही तर सब टीव्ही ची जाहिरात आठवते?
    तो एकटाच माणूस आपला वाढदिवस साजरा करत असतो ,,,
    आणि उदासवाणा हसत असतो मग खाली ओळ येते मजा सब के साथ है अकेले मी नाही..

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

पुन्हा ते कधी हरले नाहीत,,

ऑलिंपिक ज्योतीचे गुरुवारी ग्रीस मध्ये प्राचीन ओलीमपिया येथे पारंपारिक  पद्धतीने प्रज्वलन करण्यात आले. या ऑलिंपिकची एक आठवण  ऑलिंपिक स्पर्धेत बास्केट बॉल हा एक प्रसिध्द खेळ , बास्केटबॉल चा समावेश १९३६ मध्ये करण्यात आला  तो पर्यंत ८ ऑलिंपिक स्पर्धेत ६३ सामने खेळताना अमेरिका एकही सामना हरला नव्हता. १९७२ मध्ये म्युनिच ऑलिंपिक या खेळातील सुवर्णपदकासाठी  अमेरिका रशिया याच्यात सामना झाला ,,आणि, सामन्याचे काही सेकंद बाकी असताना अमेरिकेने ५०\४९ अशी आघाडी  घेवून चेंडू रशियाच्या हातात दिला रशियाने  टाईम-आउट मागीतला ,अमेरिकेने तो नियमबाह्य असल्याचे  अपील केले , मात्र ते अपील पंचांनी फेटाळले, रशियन खेळाडूने चेंडू बास्केट करण्याचा प्रयत्न केला पण चेंडू काही केल्या  बास्केट होईना , पंचांनी सामना संपल्याची शिट्टी वाजवली आणि,, सामना अमेरिकेचा हाती गेला पंचांनी अमेरिका जिंकल्याचे घोषित केले, अमेरिका जिंकली पण ,,, गोष्ट ईथे संपत नाही , आता रशियन समर्थकांनी स्कोररला घेराव घातला, त्याने  पंचांच्या आदेशां नंतरही घड्याळ ३ सेकंदांनी रिसेट केले नव्...

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्य...

आशेवर_असलेल्या_गाढवाची

 कृपया नमोंधांनी ही गोष्ट फार मनाला लावून घेऊ नये त्यांनी बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला अस म्हणत लांडोरच्या तालावर ताल धरावा आशेवर,,,,, काल माझे मित्र sameer gore यांनी घोड्याच चित्र टाकलं होतं आणि मला एकदम *#आशेवर_असलेल्या_गाढवाची* गोष्ट आठवली,,,, एक मस्त खाऊन पिऊन जाड जुड गाढव आणि दुसरं लुकड मरतुकड,,,, ते दोघे रोज नदीवर भेटत,,  दोघेही एकाच जातीचे असल्यामुळे एकमेकांची सुख दुःख हालचाल विचारत असत ,,, मग गप्पा मारता मारता मग काय ,,, अस बोलत ते धष्ट पुष्ट गाढव मग त्याच्या मालकाच कौतुक करत असे माझा मालक कसा चांगला आहे काम करून घेतो पण माझी काळजी ही तितकीच घेतो आणि भरपेट खायला देतो वेळच्या वेळी लागली तर दवा दारू ही करतो आराम करायला वेळ देतो थंडीत विशेष काळजी घेतो अगदी लहान मुलासारखं जपतो काय सांगू मित्रा अंथरून पांघरून ही घालतो खूप चांगला आहे *माझा मालक*,,,,, हे सारं ऐकताना दुसऱ्या गाढवाच्या डोळ्यात पाणी येत असे ,,, अरे काय सांगू मित्रा माझा मालक, उठता बसता लाथा घालतो वेळेवर जेवायला देत नाही अंथरून पांघरून सोड आजारी पडलो तर वेळेवर दवा दारू ही करत नाही,, अस ते गाढव रोजच तक्रार ...