Skip to main content

फरक तुझ्या माझ्यातला ,,,,

एक सुंदर गोष्ट वाचायला मिळाली
आपण कसे आहोत हे कळण्यासाठी सतत स्वतः कडे लक्ष असणे खूप गरजेचे असते
मग इतरांनी ते कितीही सांगितलं कि तुम्ही कसे आहात तरीही त्याकडे दुर्लक्ष करत तुम्हाला तुमची चाल ठरवता येते आणि मग "अरे गेलो असतो तर बरे झाले असते "असे वाटणे. आणि चालल्यावर "अरे थांबलो असतो तर ?"

"उगाचच बोललो " असे वाटणे बंद होते कारण तुम्ही तुमच्या मतांवर आणि विचारांवर ठाम असता
दुसरा त्याचा काहीही अर्थ काढो,,,कारण
"जे आहे ते आहे जे नाही ते नाही " अस वैराग्य एकदा प्राप्त
झाल कि दुसऱ्याच्या श्रीमंतीचा डामडौल पाहून चळत नाही वळत नाही
एका गुरुची आणि राजाची ही अशीच गोष्ट ,,,
त्या राजाला वारंवार वाटे कि आपल्या गुरूने देखील आपल्या
सारखच आपल्या राजवाडयात राहव ,,,काय आहे त्या जंगलात ?
दरवेळेस राजा आमंत्रण देई ,राजाने दरवेळेस आमंत्रण द्यावे
"चला साहेब राजवाड्यात" आणि गुरूने बोलावे,"नकोरे बाबा मी ईथेच बरा आहे " गुरु बोले "ईथे काय आणि तिथे काय "सारखच
तुका म्हणे धन आम्हा मृत्तिके समान ,,,,
परंतु राजाला वाटे कि गुरु खोट बोलतोय कदाचित राजवाड्यात आल्यावर त्याला मोह आवरता येणार नाही कदाचित आपला सुख बघून आपलाही पाय घसरेल,,,
एक दिवस राजा गुरूच्या खनपटीला बसला कि काय नुसतच बोलता
"ईथे काय तिथे काय मला दोन्ही सारखेच "
अस जर आहे मला तिथे राहून दाखवा ,,अस जवळ जवळ
आव्हानच दिल,,,,
कसेबसे तयार होत गुरुवर्य म्हणाले बघ हा निट विचार कर
नंतर पस्त्वाशील? तुला वाटेल कुठून याला बोलावले ?
राजा म्हणाला गुरुजी असकस म्हणेन मी मला तुम्ही वंद्य आहात,
देवासारखे आहात, अहो माझे गुरु आहात,
तस गुरुजी ताडकन उभे राहत म्हणाले "चल" झाले
दोघाही राजवाडयात आले ,राजाने गुरूला साऱ्या आरामदायी
सोयी करून दिल्या ,दास दासी ,नोकरचाकर दिमतीला ठेवले ,,
दिवस मजेत चालले होते ,,,,,,,
एके दिवशी गुरूने मद्य मागवून मदिरापान केले असे राजाला कळले
तर एकेदिवशी गुरूंनी मांसाहार केला असेही कळले ,,,
आणि एकदा तर गुरूंनी स्त्रीसंग केला हे ही राजाला कळले
हे कळल्यावर मात्र राजाचा धीर सुटला
तो तडक गुरूला भेत्याला गेला बघतो तर गुरु एकदम मजेत होते ,
राजाला ते पाहून खूप राग आला हेटाळणीच्या आवाजात
राजा गुरूला म्हणाला आता सांगा गुरुजी तुमच्यात आणि माझ्यात फरक काय ?
गुरुजी पुन्हा ताडकन उभे राहिले आणि म्हणाले चल सांगतो ,,,
सांगतो सांगतो म्हणत ते राजाला राजवाड्याबाहेर घेवून गेले,
पुढे राजधानीची सीमा ओलांडली तरी गुरु बोलेना ,
सांगत होते थांब जरा सांगतो ,,,पुढे गेल्यावर सांगतो असच सांगत होते, आता जंगलाची वाट सुरु झाली तसा राजाचा धीर सुटला
आता याच्यापुढे मी नाही येवू शकत.
माझ सैन्य, सरदार,राण्या ,राजवाडा ,प्रजा यांना सोडून मी या पुढे येवू शकत नाही
तसे गुरु म्हणाले ,राजा हाच तुझ्यात आणि माझ्यात फरक आहे
तुझ ते राज वैभव सोडून मी बाहेर पडलोय मला त्याचा मोह नाही
आणि तुला मोह सोडवत नाही मी हे सार वैभव जस उपभोगू शकतो
तसच ते सोडू ही शकतो परंतु तुझ्या मानत माझ्या विषयी
किल्मिष आले आता मी जातो अस म्हणत साधू निघून गेले पुन्हा
आपल्या चंद्रमौळी झोपडीत राहण्यासाठी
तात्पर्य --आपल्याला जे सांगायचे आहे तसेच वागता येणे बोलता येणे हे फार थोड्या लोकांना जमते "बोले तैसा चाले हे त्यासाठीच,,,
हे जमल नाही कि मग मला अस बोलायचं नव्हत तर तस बोलायचं होत अशी थुंकी बदलावी लागत नाही 


Comments

  1. Atishay chaan Bhumkar saheb.
    Ha tola aaplya paikich ekala tar nahi na...?

    ReplyDelete
    Replies
    1. हा हा हा नाही हो पण अस असल पाहिजे

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्या तपकिरी गाई कड़े वळ

*नको देवराया अंत आता पाहू,,*

देवा ये लवकर तुझ्या पराक्रमाच्या गोष्टी खूप वाचल्या रे आमचा विश्वास ही आहेच त्यावर पण ये आता आता तूच या अदृश्य कोरोनाशी लढ आणि मुक्त कर☹ *प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी तू सदैव उभा राहतोस म्हणे,,* मग आमचे प्रयत्न दिसत नाही का रे देवा☹ जगाचा पालन कर्ता असलास तरी या भरतभूमीवर तुझं विशेष प्रेम,,सार जग सोडून तू तुझे सारे अवतार याच भरतवंशीयांसाठी सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच निर्दालन करण्यासाठी घेतलेस,,, *मग आजच असा निष्ठुर कठोर पाषाण हृदयी का झालास😏☹😡* अरे आम्ही तुझीच लेकरं ना रे मग आमची अवघ्या मनुष्य जातीची चाललेली परवड तुला दिसत नाही की अजून शेषशैये वरून उठायची वेळच झाली नाही की तुझा कुंभकर्ण झालाय देवा? *उठ रे दादा उठ*☹ मला माहिती आहे केवळ प्राण्यांची असलेली ही भूमी तू गुण्या गोविंदाने हे मनुष्यप्राणी ही राहतील या मोठया आशेने आम्हला ती  आंदण दिलीस☹ *पण आम्ही कपाळकरंटे रे ओरबाडली अक्षरशः ही भूमी ओरबाडली*😏😡 जीवन जगण्याच्या स्पर्धेत *आमचा बकासुर कधी झाला* ते आमचं आमच्याच कळलं नाही *आमचा हव्यास कधी संपेल माहिती नाही* आमची आयुष्य एकमेकांचा धर्म उणिदुनी काढण्यातच जाणा

राजा-माकड-आणि आपण ,,,

हि आहे एका आळशी आणि बुद्धू राजाची गोष्ट एकदा ह्या राजाला एक माकड काही तरी मदत करते. आणि त्यामुळे राजा त्याला आपला सेवक म्हणून तैनात करतो. प्रधान हे पाहून वैतागतो,राजाला समजावण्याचा प्रयत्न करतो पण राजा मानत नाही, प्रधान कपाळावर हात मारतो-  एकदा-दोनदा-तिनदा... असे ब-याचदा होते. एके दिवशी राजा झोपलेला असतो, माकड वारा घालत असते. एक माशी सारखी राजाच्या नाकावर बसायचा प्रयत्न करते. माकड तिला हकलायचा प्रयत्न करते, पण तरी ती पुन्हा पुन्हा येते म्हणून शेवटी चिडून माकड राजाच्या तलवारीने तिला मारायचा प्रयत्न करतो... आणि... राजाचे नाकच कापले जाते.. प्रधानजी हसतो... तात्पर्य -- ज्यांची लायकी नाही पात्रता नाही अशांच्या हातात जबाबदारी सोपवली कि काय होत ते हि गोष्ट सांगते ??,,,,,,,,,,,, आज नेमकी हि गोष्ट आठवायचं कारण ,,, शक्ती मिल कंपाउंड मध्ये जो फोटोग्राफर मुलीवर बलात्कार झाला त्यावर ईथे नेहमी प्रमाणे येवून सगळ्यांनी आपापली मत मांडली नेहमी प्रमाणे बांगड्या भरा ,चपलेने बडवा ,सरकार नालायक अशी मत मांडली गेली पण हि झाली फक्त चर्चा याच्या मुळाशी कुणीच प्रयत्न करू ईच्छित नाही आणि नेमकी कधी काळी वाचलेल