Skip to main content

*नको देवराया अंत आता पाहू,,*

देवा ये लवकर तुझ्या पराक्रमाच्या गोष्टी खूप वाचल्या रे आमचा विश्वास ही आहेच त्यावर पण ये आता आता तूच या अदृश्य कोरोनाशी लढ आणि मुक्त कर☹

*प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी तू सदैव उभा राहतोस म्हणे,,*
मग आमचे प्रयत्न दिसत नाही का रे देवा☹

जगाचा पालन कर्ता असलास तरी या भरतभूमीवर तुझं विशेष प्रेम,,सार जग सोडून तू तुझे सारे अवतार याच भरतवंशीयांसाठी सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच निर्दालन करण्यासाठी घेतलेस,,,
*मग आजच असा निष्ठुर कठोर पाषाण हृदयी का झालास😏☹😡*
अरे आम्ही तुझीच लेकरं ना रे
मग आमची अवघ्या मनुष्य जातीची चाललेली परवड तुला दिसत नाही की अजून
शेषशैये वरून उठायची वेळच झाली नाही की तुझा कुंभकर्ण झालाय देवा?
*उठ रे दादा उठ*☹

मला माहिती आहे केवळ प्राण्यांची असलेली ही भूमी तू गुण्या गोविंदाने हे मनुष्यप्राणी ही राहतील या मोठया आशेने आम्हला ती  आंदण दिलीस☹
*पण आम्ही कपाळकरंटे रे ओरबाडली अक्षरशः ही भूमी ओरबाडली*😏😡

जीवन जगण्याच्या स्पर्धेत *आमचा बकासुर कधी झाला* ते आमचं आमच्याच कळलं नाही *आमचा हव्यास कधी संपेल माहिती नाही*

आमची आयुष्य एकमेकांचा धर्म उणिदुनी काढण्यातच जाणार अस दिसतंय आता तर मानवाचाच राक्षस होण्याकडे कल दिसू लागलाय☹
*तुला अभिप्रेत असलेला धर्माचा अर्थ हा कर्माचा सिद्धांत होता हे माणसाला कळलेला नाही असं दिसतंय*
*पण या ही बाबतीत मी तुलाच दोषी धरेन*😏😡
अरे ज्या प्रेमाने आणि कर्तव्यभावनेने तू अर्जुनाला गीता समजावून संगीतलीस
तशी आम्हला का जवळ घेऊन तू संगीतलीस😏😡
*तो अर्जुनच फक्त तुझा लाडका होता का रे?*

आम्ही ही अर्जुनच की रे,,
हो त्याच लक्ष्य एकच होते
आमचं मात्र ,,
 *जगण्याचा नादात किती लक्ष्य रोजच बदलू लागली त्याला आम्ही स्पर्धा अस गोंडस नाव दिल आणि या दलदलीत फसलो रे देवा*☹

आता वेळ आलीय देवा तू आम्ही मानवाला दिलेल्या वचनाला जागण्याची
ये देवा यदा यदा ही धर्मस्य,,,
*हे वचन खर करून दाखव*,,,
अरे तुझं नाव घेतलं तरी पापुतून मुक्ती मिळते असा विश्वास असणाऱ्या लेकरांना तूच माफ करणार नाही तर कोण करणार?
*आमच्या हावरट पणाची एव्हडी मोठी शिक्षा देऊ नकोस 😏☹😡*
हवं तर या कोरोनाच्या महामारीत मानवाने निर्माण केलेल सार नष्ट कर पण आमच्यावर रागवण्याच्या नादात तूच निर्माण केलेली सृष्टी अशी ओकी बोकी करू नकोस शहर शहर गाव गाव नगर नगर गाव गाव गल्ली बोळ ओस पडत आहेत लाखो लोक आपल्या कच्या बच्या सह सोडून देशोधडीला लागेल आहेत कुठे ही त्यांना आश्वासक चेहरा दिसत नाही
जो आश्वस्त करेल
*आम्ही सारेच हतबल झालो आहोत*
तुला हे सारे दिसत नाही
अस समजू का आम्ही😡?
की कंटाळलास आम्हला?
मला काय निर्माण करायच होत आणि हे काय निर्माण झालं असा विचार तर मनात येत नाही ना तुझ्या???
*अरे किती ही नालायक असली तरी आईला तीच लेकरू लाडकच असत हे विसरू नकोस*
तुझ्या निर्मितीची हेळसांड तुला पाहवते तरी कशी
ये देवा ये नको अंत पाहू
प्राण हा सर्वथा जाऊ पाहे,,,

देवा माझं हे पसायदान नक्की ऐकशील या आशेवर तुला पाठवत आहे आजच्या घडीला मी जिवंत आहे कारण तुझी माझ्यावर कृपा आहे पण मी एकटा नाही ना रे हे विसरू नकोस
या महामारीत माझे कुणी ,,,,
*माझे सोड सर्व मानव जातच नसेल तर तुझं देवपण तरी कुठे आणि कुणासाठी असेल*
*पुढची पिढी कुठल्या तोंडाने तुझं गुणगान गाईल?*
तुझच लेकरू
सुनील प्रभाकर भूमकर

Comments

Popular posts from this blog

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्या तपकिरी गाई कड़े वळ

राजा-माकड-आणि आपण ,,,

हि आहे एका आळशी आणि बुद्धू राजाची गोष्ट एकदा ह्या राजाला एक माकड काही तरी मदत करते. आणि त्यामुळे राजा त्याला आपला सेवक म्हणून तैनात करतो. प्रधान हे पाहून वैतागतो,राजाला समजावण्याचा प्रयत्न करतो पण राजा मानत नाही, प्रधान कपाळावर हात मारतो-  एकदा-दोनदा-तिनदा... असे ब-याचदा होते. एके दिवशी राजा झोपलेला असतो, माकड वारा घालत असते. एक माशी सारखी राजाच्या नाकावर बसायचा प्रयत्न करते. माकड तिला हकलायचा प्रयत्न करते, पण तरी ती पुन्हा पुन्हा येते म्हणून शेवटी चिडून माकड राजाच्या तलवारीने तिला मारायचा प्रयत्न करतो... आणि... राजाचे नाकच कापले जाते.. प्रधानजी हसतो... तात्पर्य -- ज्यांची लायकी नाही पात्रता नाही अशांच्या हातात जबाबदारी सोपवली कि काय होत ते हि गोष्ट सांगते ??,,,,,,,,,,,, आज नेमकी हि गोष्ट आठवायचं कारण ,,, शक्ती मिल कंपाउंड मध्ये जो फोटोग्राफर मुलीवर बलात्कार झाला त्यावर ईथे नेहमी प्रमाणे येवून सगळ्यांनी आपापली मत मांडली नेहमी प्रमाणे बांगड्या भरा ,चपलेने बडवा ,सरकार नालायक अशी मत मांडली गेली पण हि झाली फक्त चर्चा याच्या मुळाशी कुणीच प्रयत्न करू ईच्छित नाही आणि नेमकी कधी काळी वाचलेल