Skip to main content

लिंबाराम,,,,

https://youtu.be/ii2Ru3JOH2A

लिंबाराम आज हे किती जणांना माहिती असेल , आठवत असेल कुणास ठाऊक????
परंतु तीन वेळा भारताचा झेंडा ऑलिम्पिक मध्ये फडकवणारा,, लिंबाराम
ज्याच्या चपळतेने डोळ्याचे पारणे फिटत होते तो ,,,लिंबाराम
तो लिंबाराम आज स्वतः मात्र असहाय, अपंग, अवस्थेत धपडतोय,,
भारतीय धनुर्विध्या चमुचा प्रशिक्षक, आंतरराष्ट्रीय खेळाडू आज मात्र दोन शब्द बोलण्याच्या ही अवस्थेत नाही, आज त्याची दृष्टीच बाधित झालीय
नीट चालू ही शकत नाही,
श्रेष्ठ धनुर्विद्या वीर प्रशिक्षक लिंबाराम ची ही आजची अवस्था
*दिल्लीच्या एम्स इस्पितळात जनरल वार्डात आज त्याचा मृत्यूशी संघर्ष सुरू आहे*
46 व्या वर्षी आलेल्या स्नायू विकाराने चपळ लिंबाराम अकाली म्हातारा झालाय
धनुष्याच्या प्रत्येक टनत्काराने धनुष्याला कंपन आणणार्या हातालाच आज कम्प सूटलाय,,
तो कुणालाही ओळखू शकत नाही
2013 मध्ये या आजाराने पहिले आक्रमण केले ते त्याच्या नेमके त्याच्या डोळ्यावरच,,,
आणि काही दिवसातच हे दुखणे पायापर्यंत पोहचले
हालचालच थांबली,
लिंबाराम ला आज आर्थिक मदतीसाठी याचना करावी लागत आहे
क्रीडामंत्री राज्यवर्धन राठोड यांनी मदत केली देखील पण ती तुटपुंजी ठरली उपचरातच संपली
भारतीय धनुर्विद्या संस्था  आणि भारतीय क्रीडा प्राधिकरणाकडून सध्या तरी ठोस सहाय्य मिळालेले नाही लिंबाराम अजूनही ठेचकळतो आहेच अजूनही रोगमुक्त झाला नाही मात्र योग्य उपचार झाले झाले तर आजार नियंत्रीत केला जाऊ शकतो हे अजुनही डॉक्टरांना वाटते1991 अर्जुन पुरस्कार
2012 ला पूरस्काराने सन्मानित सुपरस्टार क्रीडापटू आशा गर्तेत फेकला जावा हेच डोकं सुन्न करणार आहे
1992 बीजिंग एशियन कप स्पर्धेतील त्यांची कामगिरी चमकदार होती
2010 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत तो प्रशिक्षक होता
पत्नी जेनी सध्या त्याची काळजी घेतेय
आपल्या गावात क्रीडाप्रशिक्षण केंद्र आणि वसतिगृह त्याचा संकल्प आज तरी अंधाराने वेढला आहे *मात्र कधी काळी लक्ष्यावर दृष्टी ठेवणार्या धनुर्धराची नजर मात्र शून्यात हरवली आहे*
या आधी ही असे अनेक खेळाडू जे खरोखर देशासाठी खेळले ते जवळ पास संपले आहेत
*पानसिंग तोमर हे त्यापैकी एक नाव,,,,*
*त्याच ही दुर्दैव असच जेव्हा तो विक्रमावर विक्रम करत होता तेव्हा त्याची कुणीही दखल घेत नव्हतं मात्र तो डाकू झाला आणि त्याच नाव रेडिओवर रोज झळकू लागलं ही या देशातील गुणवंत खेळाडुंची उपेक्षा नाही तर काय?*
क्रिकेट सोडून या देशात अजून अनेक खेळ आहेत हे आम्हला कधी कळणार?
*त्यातही क्रिकेट हे कधीच देशासाठी खेळल जात नाही हे ही कधी लक्षात घेणार??*

Comments

Popular posts from this blog

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्या तपकिरी गाई कड़े वळ

*नको देवराया अंत आता पाहू,,*

देवा ये लवकर तुझ्या पराक्रमाच्या गोष्टी खूप वाचल्या रे आमचा विश्वास ही आहेच त्यावर पण ये आता आता तूच या अदृश्य कोरोनाशी लढ आणि मुक्त कर☹ *प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी तू सदैव उभा राहतोस म्हणे,,* मग आमचे प्रयत्न दिसत नाही का रे देवा☹ जगाचा पालन कर्ता असलास तरी या भरतभूमीवर तुझं विशेष प्रेम,,सार जग सोडून तू तुझे सारे अवतार याच भरतवंशीयांसाठी सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच निर्दालन करण्यासाठी घेतलेस,,, *मग आजच असा निष्ठुर कठोर पाषाण हृदयी का झालास😏☹😡* अरे आम्ही तुझीच लेकरं ना रे मग आमची अवघ्या मनुष्य जातीची चाललेली परवड तुला दिसत नाही की अजून शेषशैये वरून उठायची वेळच झाली नाही की तुझा कुंभकर्ण झालाय देवा? *उठ रे दादा उठ*☹ मला माहिती आहे केवळ प्राण्यांची असलेली ही भूमी तू गुण्या गोविंदाने हे मनुष्यप्राणी ही राहतील या मोठया आशेने आम्हला ती  आंदण दिलीस☹ *पण आम्ही कपाळकरंटे रे ओरबाडली अक्षरशः ही भूमी ओरबाडली*😏😡 जीवन जगण्याच्या स्पर्धेत *आमचा बकासुर कधी झाला* ते आमचं आमच्याच कळलं नाही *आमचा हव्यास कधी संपेल माहिती नाही* आमची आयुष्य एकमेकांचा धर्म उणिदुनी काढण्यातच जाणा

राजा-माकड-आणि आपण ,,,

हि आहे एका आळशी आणि बुद्धू राजाची गोष्ट एकदा ह्या राजाला एक माकड काही तरी मदत करते. आणि त्यामुळे राजा त्याला आपला सेवक म्हणून तैनात करतो. प्रधान हे पाहून वैतागतो,राजाला समजावण्याचा प्रयत्न करतो पण राजा मानत नाही, प्रधान कपाळावर हात मारतो-  एकदा-दोनदा-तिनदा... असे ब-याचदा होते. एके दिवशी राजा झोपलेला असतो, माकड वारा घालत असते. एक माशी सारखी राजाच्या नाकावर बसायचा प्रयत्न करते. माकड तिला हकलायचा प्रयत्न करते, पण तरी ती पुन्हा पुन्हा येते म्हणून शेवटी चिडून माकड राजाच्या तलवारीने तिला मारायचा प्रयत्न करतो... आणि... राजाचे नाकच कापले जाते.. प्रधानजी हसतो... तात्पर्य -- ज्यांची लायकी नाही पात्रता नाही अशांच्या हातात जबाबदारी सोपवली कि काय होत ते हि गोष्ट सांगते ??,,,,,,,,,,,, आज नेमकी हि गोष्ट आठवायचं कारण ,,, शक्ती मिल कंपाउंड मध्ये जो फोटोग्राफर मुलीवर बलात्कार झाला त्यावर ईथे नेहमी प्रमाणे येवून सगळ्यांनी आपापली मत मांडली नेहमी प्रमाणे बांगड्या भरा ,चपलेने बडवा ,सरकार नालायक अशी मत मांडली गेली पण हि झाली फक्त चर्चा याच्या मुळाशी कुणीच प्रयत्न करू ईच्छित नाही आणि नेमकी कधी काळी वाचलेल