Skip to main content

मुळशी पॅटर्न, आणि विकासाचा भसम्या*


*#मुळशी_पॅटर्न*
पाहिला आणि प्रचंड अस्वस्थ झालो
प्रवीण तरडे ची अप्रतिम कलाकृती आहे ....
ही गोष्ट एका जिल्ह्याची नव्हे तर,,,
ही गोष्ट आहे बेसुमार वाढलेल्या तुमच्या आमच्या *#हव्यासाची* आहे,,,
ही गोष्ट आहे आपल्यामुळेच जन्माला आलेल्या *#बकासुरची*,,,
ही गोष्ट आहे *#विकासाचा_भसम्या* झालेल्या सर्वांची,,,
ही गोष्ट आहे केवळ तुमचा आमच्या हव्यासापाई *#वाट्टेल_त्या_थराला* जाणाऱ्या लोकांची,,,,
हे असे लोक आहेत ज्यांची वाट चुकवली गेलेली आहे
खर तर सगळ्याच सिनेमात चांगल्याचा वाईटावर विजय अशीच गोष्ट असते
इथे ती नेमकी नाही इथे ती कायम राहते
#*प्लास्टिक* च्या रुपात ,,
कारण या जगाचा अंत जरी उद्या झाला तरी #*प्लस्टिक मात्र*  उरणारच आहे
हे प्लस्टिक म्हणजे नेमकं काय ते सिनेमा पाहिल्याशिवाय कळणार नाही
परंतु ते प्लस्टिक समूळ नष्ट होऊ शकत त्यासाठी आपणच आपला विकासाचा हव्यास सोडून दिला पाहिजे
आणि केवळ आपल्या हव्यासा पायी केवळ मला पगार जास्त माझी कमाई जास्त मग दारात एक गाडी तर दुसरी का नको आमच्या हव्यासाला काही मर्यादा राहिल्या नाहीत आणि त्याचाच फायदा घेत
बिल्डर ,राजकारणी, आणि गुंड वाट्टेल त्या मार्गाने
आपल्या मागण्या पूर्ण करण्याच्या नादात
भ्रष्टाचार खून दरोडे गुंडगिरी करत असतात
आणि आपण मात्र अत्यन्त साळसूद पणे व्हाट्सएप fb  वर व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य घेत,,गुंड राजकारणी याना शिव्या देत
Ac ची हवा खात बस आपली सोय झाली ना बाकी दुनिया गेली,,,,
आपण विचारच करत नाही
एखादी जागा घेताना गाडी घेताना ऐशोआराम खरेदी करताना किती जणांनी स्वेच्छेने हा व्यवहार केला असेल ,,
किती जणांनी मजबुरी म्हणून,,,
किती जणांनी जीवाला घाबरून,,
किती जणांना फसवून हा व्यवहार झाला असेल कितीं गळफास घेतला असेल ,,
पण *#जाणिवा_बोथट* झालेले आपण मात्र माझी मस्त सोय झाली ना या नादात सगळ्या गोष्टींना मान्यता देतो तेव्हा यातूनच *#लवासा होतो* आणि आपण तो आनंदाने स्वीकारतोही आपल्याला त्याच काही सोयसुतक नसत कारण आपलं काहीच गेलेलं नसत पण कुणाला तरी #बेघर करत हवेतला *#स्वच्छ_ऑक्सिजन* खरेदी करत असतो कुणाला तरी #बेघर केलेलं असत हे आपल्या गावी ही नसत
त्या जमिनीचा योग्य मोबदला ,
व्यवहार राजीखुषीने झाला की नाही,
याची पुसटशी देखील कल्पना नसणारे या सगळ्याला एक प्रकारे पाठिंबाच देत असतो
या सगळ्या प्रकारात हतबलपणे अडकलेले पोलीस मग मध्यम मार्ग स्वीकारतात ज्यांची वाट चुकवली गेली आहे अशा लोकांनां ही नकळत पणे टोळीयुद्धात संपवून नामानिराळे राहतात
या सगळ्या प्रकाराला कुठे तरी आपणच सारे जबाबदार आहोत याची थोडी जरी जाणीव आपणा सर्वांना झाली तरी खूप आहे
मराठी भाषिक लोकांनी हा चित्रपट आवर्जून पहावा
नटसम्राट बद्दल बोलताना असा नट होणे नाही
पण आज बोलावसं वाटत प्रवीण तरडे सारखा दिग्दर्शक होणे नाही
ही चुणक एका प्रसंगात हिरोवर कानावर वार होतो
पुढच्या सिनमध्ये अर्थातच कानावरची पट्टी काढलेली असते पण हिरोचा कान ठळकपणे शिवलेला दिसतो
आणि ओम भूतकर काय बोलावं ह्या हिरो बद्दल?
एका प्रसंगात,,, अरे तो यम देखील रेड्यावर बसून आला ना तर त्याची आपल्याला बघून फाटली पाहिजे,,, आणि ती कशी फाटली पाहिजे याचा त्याने जो *टर्रर्रर्र,,,,,,,अभिनय* करून दाखवला आहे तो लाजवाब,,, अर्थात संपूर्ण चित्रपटच त्याने खांद्यावर घेतला आहे त्याच्या या एका सीन बद्दल काय बोलावं,,वकील तर कल्लू मामा पेक्षा ही भारी
*आणखी काय बोलावं?? अररारारा,,,,, खतरनाक*
माहितीये एका पिक्चर ने काय सुधारणार नाही तुम्ही, पण तरीही काय फरक पडला तरी बरंय...
भूमकर
सुनील प्रभाकर भूमकर
***** (फाय स्टार) सिनेमा

Comments

Popular posts from this blog

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्या तपकिरी गाई कड़े वळ

*नको देवराया अंत आता पाहू,,*

देवा ये लवकर तुझ्या पराक्रमाच्या गोष्टी खूप वाचल्या रे आमचा विश्वास ही आहेच त्यावर पण ये आता आता तूच या अदृश्य कोरोनाशी लढ आणि मुक्त कर☹ *प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी तू सदैव उभा राहतोस म्हणे,,* मग आमचे प्रयत्न दिसत नाही का रे देवा☹ जगाचा पालन कर्ता असलास तरी या भरतभूमीवर तुझं विशेष प्रेम,,सार जग सोडून तू तुझे सारे अवतार याच भरतवंशीयांसाठी सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच निर्दालन करण्यासाठी घेतलेस,,, *मग आजच असा निष्ठुर कठोर पाषाण हृदयी का झालास😏☹😡* अरे आम्ही तुझीच लेकरं ना रे मग आमची अवघ्या मनुष्य जातीची चाललेली परवड तुला दिसत नाही की अजून शेषशैये वरून उठायची वेळच झाली नाही की तुझा कुंभकर्ण झालाय देवा? *उठ रे दादा उठ*☹ मला माहिती आहे केवळ प्राण्यांची असलेली ही भूमी तू गुण्या गोविंदाने हे मनुष्यप्राणी ही राहतील या मोठया आशेने आम्हला ती  आंदण दिलीस☹ *पण आम्ही कपाळकरंटे रे ओरबाडली अक्षरशः ही भूमी ओरबाडली*😏😡 जीवन जगण्याच्या स्पर्धेत *आमचा बकासुर कधी झाला* ते आमचं आमच्याच कळलं नाही *आमचा हव्यास कधी संपेल माहिती नाही* आमची आयुष्य एकमेकांचा धर्म उणिदुनी काढण्यातच जाणा

राजा-माकड-आणि आपण ,,,

हि आहे एका आळशी आणि बुद्धू राजाची गोष्ट एकदा ह्या राजाला एक माकड काही तरी मदत करते. आणि त्यामुळे राजा त्याला आपला सेवक म्हणून तैनात करतो. प्रधान हे पाहून वैतागतो,राजाला समजावण्याचा प्रयत्न करतो पण राजा मानत नाही, प्रधान कपाळावर हात मारतो-  एकदा-दोनदा-तिनदा... असे ब-याचदा होते. एके दिवशी राजा झोपलेला असतो, माकड वारा घालत असते. एक माशी सारखी राजाच्या नाकावर बसायचा प्रयत्न करते. माकड तिला हकलायचा प्रयत्न करते, पण तरी ती पुन्हा पुन्हा येते म्हणून शेवटी चिडून माकड राजाच्या तलवारीने तिला मारायचा प्रयत्न करतो... आणि... राजाचे नाकच कापले जाते.. प्रधानजी हसतो... तात्पर्य -- ज्यांची लायकी नाही पात्रता नाही अशांच्या हातात जबाबदारी सोपवली कि काय होत ते हि गोष्ट सांगते ??,,,,,,,,,,,, आज नेमकी हि गोष्ट आठवायचं कारण ,,, शक्ती मिल कंपाउंड मध्ये जो फोटोग्राफर मुलीवर बलात्कार झाला त्यावर ईथे नेहमी प्रमाणे येवून सगळ्यांनी आपापली मत मांडली नेहमी प्रमाणे बांगड्या भरा ,चपलेने बडवा ,सरकार नालायक अशी मत मांडली गेली पण हि झाली फक्त चर्चा याच्या मुळाशी कुणीच प्रयत्न करू ईच्छित नाही आणि नेमकी कधी काळी वाचलेल