Skip to main content

दिव्यांची पूजा " कि " गटारात लोळण 2

दिव्यांची आवस

सुकरासी विष्ठा माने सावकाश
मिष्ठानणा ची त्यास काय गोड़ी-
संत शिरोमणि श्री तुकोबाराय

फेसबुक आणि व्हाट्स ऐप वर येणारे मेसेज पाहून
*गटारी हां देखिल 31डीसे* प्रमाने राष्ट्रीय सण होणार की काय अस वाटू लागलय,,,
वास्तविक ज्याला आज गटारी अमावस्या अस अगदी काही क्यालेंडर मधे ही लिहल आणि बोलल जातय
खर तर
तमसो मा जोतिर्गमयचा खर्या अर्थाने संदेश देणारा हा सण-
ज्या दिव्याने या देशातील 33 कोटि देवदेवतांना ओवाळल जात
पूजल जात त्या दिव्यांची पूजा करायचा हां दिवस*
 या दिवशी दिव्यान्ना घासून पुसून लक्ख केल जात नवी वात नव तेल घातल जात कारण
या दिव्याच्या अवसेपासून
श्रावण चालू होतो
या महिन्यात खुप सण वार येतात
गौरी गणपति इ.
त्या नंतर नवरात्र त्यात तर नऊ दिवस दिवा तेवत ठेवायचा असतो पुढे बाकीचे सण वार अशावेळी सर्वात पुढे असतो तो दिवा त्याच हे पूजन ,,,,
पण आजकाल हे सार मागे पडून
आता काय महिनाभर खायला
मिळणार नाही घ्या खावुन
आता मिलनार नाही घ्या पिवुन
त्या निमित्ताने घ्या गटारात लोलून
 असे सण आपन साजरे करू लागलो
पहिल्यांदा मानवाने अंधारवर विजय प्रकाशाच्या सहाय्याने मिळवला
अमावस्या अंधारावर मात करायला शिकवते
अमावस्या
दिव्या सारखे लक्ख प्रकाश लोकांना दया अस शिकवते
आजकाल आषाढ़ अमावस्या म्हणजे काय ते आधी घरी शिकवत नाहित मग इंग्रजी मीडियमला का दोष द्यावा
गटार हे घाण वाहून न्यायच काम करत आणि आम्ही नेमकी त्या दिवशी घाण जवळ करतो
दिव्यांची अवस*  हे नाव आज किती जणांना माहीत आहे देव जाणे
आषाढ अमावस्या (गटारी अमावस्या
आषाढ अमावस्या म्हटले कि सहसा कुणाच्या लक्षात ये वाहून नेते, गाव स्वच्छ ठेवते, रोगराई दूर सारते, पण शहरे वाढली, गटारे स्वच्छ होईन महिना हा रोगराईचा महिना समजला जातो. ती होऊ नये मग श्रावण महिन्यात मांसाहार साधारण पणे केला जात नाही. पुढील संपुर्ण श्रावण महिना उपवास घडणार असल्याने श्रावण सुरु होण्यापुर्वीच्या अमावस्येदिवशी भरपेट मांसाहार करुन पुढील महिन्याची उणीव भरुन काढण्याचा प्रयत्न केला जातो. नेहमी मांसाहार करणारी मंडळी श्रावण महिन्यात मांसाहाराचे नाव काढत नाहीत. कारण श्रावणात धार्मिक कार्य जास्त असल्याने असा मांसाहार केला जात नाही.श्रावणात सगळीकडे हिरवेगार वातावरण असते. या दिवसात वर्षभर न दिसणार्या रानभाज्या बाजारात येतात, निसर्गातील ताजेतवाने पणा, मनाची प्रसन्नता, आणि संयमित आहार विहार म्हणजे सदा सर्वकाळ श्रावण असणे होय. समुद्रावर जाण्यासाठी कोळी बांधव नारळी पुनवेची वाट पाहत असतात. माशांचा प्रजोत्पादन काळ व माशांची सशक्त पैदास होण्या करता तसेच निसर्गाचा पूर्णपणे आस्वाद घेण्याकरता जणू काही सृष्टीने मानवाला एक छोटासा ब्रेक दिला आहे. विविध रान वनस्पती ह्या निरनिराळे रसस्वाद देतात त्यांचा हिm पोषक पणा शरीरास मिळणे जरुरीचे असते. याच महिन्यात आपले बरेचसे सणही येतात आणि पावसाचे दिवस असल्याने मांसाहार पचायला देखील जड असते. म्हणुनच या महिन्यात मांसाहार वर्ज्य मानला जातो. आता तुम्हीच ठरवा आषाढ अमावस्या कशी साजरी करायची.

*दिव्यांची पूजा बांधुन कि गटारात लोळण * घेउन???

सुनील प्रभाकर भुमकर

Comments

Popular posts from this blog

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्या तपकिरी गाई कड़े वळ

*नको देवराया अंत आता पाहू,,*

देवा ये लवकर तुझ्या पराक्रमाच्या गोष्टी खूप वाचल्या रे आमचा विश्वास ही आहेच त्यावर पण ये आता आता तूच या अदृश्य कोरोनाशी लढ आणि मुक्त कर☹ *प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी तू सदैव उभा राहतोस म्हणे,,* मग आमचे प्रयत्न दिसत नाही का रे देवा☹ जगाचा पालन कर्ता असलास तरी या भरतभूमीवर तुझं विशेष प्रेम,,सार जग सोडून तू तुझे सारे अवतार याच भरतवंशीयांसाठी सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच निर्दालन करण्यासाठी घेतलेस,,, *मग आजच असा निष्ठुर कठोर पाषाण हृदयी का झालास😏☹😡* अरे आम्ही तुझीच लेकरं ना रे मग आमची अवघ्या मनुष्य जातीची चाललेली परवड तुला दिसत नाही की अजून शेषशैये वरून उठायची वेळच झाली नाही की तुझा कुंभकर्ण झालाय देवा? *उठ रे दादा उठ*☹ मला माहिती आहे केवळ प्राण्यांची असलेली ही भूमी तू गुण्या गोविंदाने हे मनुष्यप्राणी ही राहतील या मोठया आशेने आम्हला ती  आंदण दिलीस☹ *पण आम्ही कपाळकरंटे रे ओरबाडली अक्षरशः ही भूमी ओरबाडली*😏😡 जीवन जगण्याच्या स्पर्धेत *आमचा बकासुर कधी झाला* ते आमचं आमच्याच कळलं नाही *आमचा हव्यास कधी संपेल माहिती नाही* आमची आयुष्य एकमेकांचा धर्म उणिदुनी काढण्यातच जाणा

राजा-माकड-आणि आपण ,,,

हि आहे एका आळशी आणि बुद्धू राजाची गोष्ट एकदा ह्या राजाला एक माकड काही तरी मदत करते. आणि त्यामुळे राजा त्याला आपला सेवक म्हणून तैनात करतो. प्रधान हे पाहून वैतागतो,राजाला समजावण्याचा प्रयत्न करतो पण राजा मानत नाही, प्रधान कपाळावर हात मारतो-  एकदा-दोनदा-तिनदा... असे ब-याचदा होते. एके दिवशी राजा झोपलेला असतो, माकड वारा घालत असते. एक माशी सारखी राजाच्या नाकावर बसायचा प्रयत्न करते. माकड तिला हकलायचा प्रयत्न करते, पण तरी ती पुन्हा पुन्हा येते म्हणून शेवटी चिडून माकड राजाच्या तलवारीने तिला मारायचा प्रयत्न करतो... आणि... राजाचे नाकच कापले जाते.. प्रधानजी हसतो... तात्पर्य -- ज्यांची लायकी नाही पात्रता नाही अशांच्या हातात जबाबदारी सोपवली कि काय होत ते हि गोष्ट सांगते ??,,,,,,,,,,,, आज नेमकी हि गोष्ट आठवायचं कारण ,,, शक्ती मिल कंपाउंड मध्ये जो फोटोग्राफर मुलीवर बलात्कार झाला त्यावर ईथे नेहमी प्रमाणे येवून सगळ्यांनी आपापली मत मांडली नेहमी प्रमाणे बांगड्या भरा ,चपलेने बडवा ,सरकार नालायक अशी मत मांडली गेली पण हि झाली फक्त चर्चा याच्या मुळाशी कुणीच प्रयत्न करू ईच्छित नाही आणि नेमकी कधी काळी वाचलेल