Skip to main content

उन्हे ये जिद के हम बुलाते हमे ये उमीद के वो पुकारे आणि मदर्स डे


संपूर्ण गाण्याचं सार या दोन ओळीत आहे
काल दिवसभर मदर्स डे चे मेसेज वाचता वाचता एकीकडे हे गाणं ऐकत झोपणार होतो तोच या या दोन ओळींनी माझी पार झोप उडवून दिली,,,
आणि एका मित्राने एक विनोद म्हणून सांगितलेली गोष्ट अचानक आठवली,,
एका मुलाचं एका मुलीवर प्रेम असत कस बोलायच, कस बोलायच म्हणत मित्रांच्या मदतीने त्या मुलीला एका पुस्तकात प्रेम पत्र लिहून देतो सगळ्या भावना व्यक्त करतो आणि माझं प्रेम वैगेरे लिहितो वर अस लिहितो की तुला जर मी आवडत असेन तर लाल ड्रेस घालून उद्या कॉलेज वर आलीस तर मी समजेन तुझं माझ्यावर खर प्रेम आहे,,
रात्र कशी बशी काढतो सकाळीच कॉलेजवर जाऊन बसतो बरीच वाट पाहिल्यावर ती येते पण पिवळ्या रंगाचा ड्रेस घालून आणि पुस्तक परत करते,,
ती तिच्या रस्त्याने तो त्याच्या रस्त्याने पुढे जातो,,
कालांतराने त्या मुलीचं लग्न होत पुढे मुलं बाळ होतात दिवस चाललेले असतात मुलगा मात्र नाराजीच जीण जगत असतो एक दिवस घरातील टाकाऊ भंगार विकायला काढतो आणि सहजच त्याच लक्ष त्या पुस्तकावर पडत सहजच ते उचलतो आणि प्रेमाने आठवण कुरवळावी तस ते पुस्तक हाताळताना त्यात तिने त्याला लिहलेल पत्र सापडत,,
आणि स्वतःचेच केस ओढत दोन सणसणीत कानाखाली मारत काय करून बसलो अस नशिबाला दोष देत तो मटकन खाली बसतो,,,
त्या पत्रात लिहलेल असत
*हो माझ्या राजा माझं ही तुझ्यावर प्रेम आहे पण लाल रंगाचा ड्रेस नसल्यामुळे मी हा माझा आवडता पिवळा ड्रेस घालून आलीय कशी दिसते ते नक्की सांग तुझीच लाडकी प्रिया*
ही गोष्ट सांगताना माझा मित्र हसत होता की कसा त्या मुलाचा मामा झाला मी ही त्यावेळी हसल्याच
आठवलं हे गाणं ऐकताना ,,,
पण काल मात्र गाणं ऐकलं आणि उलगडा झाला
*संवाद हा आयुष्यात किती महत्वाचा असतो ते लक्षात आलं*
उन्हे ये जिद के हम बुलाये हमे उम्मीद के वो बुलाये
आपणही आयुष्यात असेच वागत असतो
एकमेकांशी संवाद टाळतो बोलतच नाही मनातलं
आणि मग गैरसमज करून बसतो 
ती किंवा तो स्वतः आधी का बोलला नाही असं अडून बसतो आणि माणूस, वेळ, संधी, निघून गेली की आयुष्याला, नशिबाला दोष देत बसतो, कधी कधी
 यात कधी कधी मग जीव ही गमावून बसतो
पुस्तक देणाऱ्या मुलीने पुस्तक देता देता त्याला सांगितलं असत की यात चिठ्ठी आहे ती वाच तर???
किमान ती मुलगी आल्यावर ह्या मुलाने स्वतः पुढाकार घेत विचारलं असत का लाल ड्रेस घातला नाही तर???
आज दोघेही सुखाने संसार करताना दिसले असते
पण आपल्याच *मी का?* मध्ये अडकून बसतो
मग ती प्रेयसी असेल बहीण असेल अगदी आपल्या आईशी तरी आपण कुठे बोलतो?
जिने 9 महिने उदरात ठेवत आपल्याला नव्या जगात आणताना काळजी नको रे मी आहे तुझ्या सोबत असा विश्वास देते तिलाच मोठे झाल्यावर केवळ कामधंद्यायच कारण काढून *आई तू कशी आहेस? काही हवं का? बर वाटतंय ना?* इतके साधे चार शब्द लाख रुपये कमावणाऱ्या मुलाला महाग असावेत? पण हे करत नाही मग गेलेल्या आईची आठवण काढत रडतानाचे आई घास भरवतानाचे फोटो fb वर अपलोड करत मदर्स डे साजरा करतो
*असले डे साजरे करण्यापेक्षा संवाद साधा रे* आपल्या लोकांपासून केवळ पैसे कमावण्याच्या नादात अनवधानाने सुद्धा लांब जाण टाळा
न जाणो पाश्चातापाणे कधी रडायची वेळ आपल्यावर ही येईल


Comments

Popular posts from this blog

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्या तपकिरी गाई कड़े वळ

*नको देवराया अंत आता पाहू,,*

देवा ये लवकर तुझ्या पराक्रमाच्या गोष्टी खूप वाचल्या रे आमचा विश्वास ही आहेच त्यावर पण ये आता आता तूच या अदृश्य कोरोनाशी लढ आणि मुक्त कर☹ *प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी तू सदैव उभा राहतोस म्हणे,,* मग आमचे प्रयत्न दिसत नाही का रे देवा☹ जगाचा पालन कर्ता असलास तरी या भरतभूमीवर तुझं विशेष प्रेम,,सार जग सोडून तू तुझे सारे अवतार याच भरतवंशीयांसाठी सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच निर्दालन करण्यासाठी घेतलेस,,, *मग आजच असा निष्ठुर कठोर पाषाण हृदयी का झालास😏☹😡* अरे आम्ही तुझीच लेकरं ना रे मग आमची अवघ्या मनुष्य जातीची चाललेली परवड तुला दिसत नाही की अजून शेषशैये वरून उठायची वेळच झाली नाही की तुझा कुंभकर्ण झालाय देवा? *उठ रे दादा उठ*☹ मला माहिती आहे केवळ प्राण्यांची असलेली ही भूमी तू गुण्या गोविंदाने हे मनुष्यप्राणी ही राहतील या मोठया आशेने आम्हला ती  आंदण दिलीस☹ *पण आम्ही कपाळकरंटे रे ओरबाडली अक्षरशः ही भूमी ओरबाडली*😏😡 जीवन जगण्याच्या स्पर्धेत *आमचा बकासुर कधी झाला* ते आमचं आमच्याच कळलं नाही *आमचा हव्यास कधी संपेल माहिती नाही* आमची आयुष्य एकमेकांचा धर्म उणिदुनी काढण्यातच जाणा

राजा-माकड-आणि आपण ,,,

हि आहे एका आळशी आणि बुद्धू राजाची गोष्ट एकदा ह्या राजाला एक माकड काही तरी मदत करते. आणि त्यामुळे राजा त्याला आपला सेवक म्हणून तैनात करतो. प्रधान हे पाहून वैतागतो,राजाला समजावण्याचा प्रयत्न करतो पण राजा मानत नाही, प्रधान कपाळावर हात मारतो-  एकदा-दोनदा-तिनदा... असे ब-याचदा होते. एके दिवशी राजा झोपलेला असतो, माकड वारा घालत असते. एक माशी सारखी राजाच्या नाकावर बसायचा प्रयत्न करते. माकड तिला हकलायचा प्रयत्न करते, पण तरी ती पुन्हा पुन्हा येते म्हणून शेवटी चिडून माकड राजाच्या तलवारीने तिला मारायचा प्रयत्न करतो... आणि... राजाचे नाकच कापले जाते.. प्रधानजी हसतो... तात्पर्य -- ज्यांची लायकी नाही पात्रता नाही अशांच्या हातात जबाबदारी सोपवली कि काय होत ते हि गोष्ट सांगते ??,,,,,,,,,,,, आज नेमकी हि गोष्ट आठवायचं कारण ,,, शक्ती मिल कंपाउंड मध्ये जो फोटोग्राफर मुलीवर बलात्कार झाला त्यावर ईथे नेहमी प्रमाणे येवून सगळ्यांनी आपापली मत मांडली नेहमी प्रमाणे बांगड्या भरा ,चपलेने बडवा ,सरकार नालायक अशी मत मांडली गेली पण हि झाली फक्त चर्चा याच्या मुळाशी कुणीच प्रयत्न करू ईच्छित नाही आणि नेमकी कधी काळी वाचलेल