Skip to main content

सैराट झालं जी,,,,,

काल बहुचर्चित **सैराट **
पाहिला
आणि एका वाक्यात वर्णन करायचं झालं तर,,,
** सुरवात चुकवू नका आणि शेवट सांगू नका**

आणि एका शब्दात म्हणाल तर,,
** सैराट**
बस्स बाकी काही नाही

सिनेमा लागायच्या आधीपासून
त्याची पद्धतशीर बदनामी मोहीम
चालवली गेली ,,
आधी वाटलं होत कि सिनेमावालेच
स्वतः निगेटिव्ह जाहिरात करत तर नाही ना??
हा त्यांचा प्रसिद्दीचा फंडा तर नाही ना??
त्यातूनही काही जणांना नागराज मंजुळे ची जात दिसली
आणि मग सुरु झालं संस्कृती बचवाच काम
कसा लहान मुलांना घेऊन हा चित्रपट
बनवला आहे कस त्यांना प्रेम
(चाळे) करायला लावलं आहे

मग अर्थातच सिनेमाच्या मदतीला
ब्रिगेडी धावून आले ते ओरडू लागले
मनुवादी कसे या सिनेमाला
विरोध करत आहेत
जातीव्यवस्थेला चपराक वैगेरे,,

**तर सांगायचं इतकंच कुणी
या चित्रपटाच्या निमित्ताने
विरोध करणारे त्यांनी आधी सर्वांनी
आधी तो चित्रपट प्रामाणिकपणे
पहावा आणि मग आपली मत टाकावीत
न पाहताच फक्त ऐकीव माहितीवर
विरोध करणारे
मग ते ब्रिगेडी असो वा बामन
दोघेही एकाच माळेचे,,,***
माझ्या मुलाने एक व्हाटसप स्टेट्स
टाकलं होत
ते वाचून खूप हसलो होतो
त्याने लिहिलं होत
जो झिंगाट गाण्यावर नाचत नाही तो
देशद्रोही ,,,,मला आता हि हसूच येतंय,,
पण ज्या पद्धतीने आणि जे लोक टीका करत आहेत एका चागल्या सिनेमावर आणि वर त्याला दोन्ही कडून फक्त जातीची लेबल लावून
त्यावर बोलत असतील मत प्रदर्शन
करत असतील तर ते खरच
देशद्रोही आहेत

या चित्रपटात कुठेही जातीव्यवस्थेवर भाष्य केलेलं नाही
जे आलं असेल ते फक्त
सहज प्रवृत्तीतून
ते हि आपण गरीब आहोत त्यांची आपली बरोबरी नाही होऊ शकत
वैगेरे वैगेरे,,
अशा पद्धतीचे संवाद
मग पाटलाच्या तोंडी असतील
नाही तर ठाकूर च्या तोंडी
आपल्याला ते खूप पूर्वी पासून ऐकत
आलो आहोत
आज मग विरोध का ??

बर सिनेमात काय नाही,,,
हिरो हिरोईन बुलेट चालावतात
घोडा चालवतात
हिरोईन ट्रेकटर चालवते
दणादण विहिरीत उडया मारतात
हिरो छान क्रिकेट खेळतो
मस्त धमाल नाचतात
बर बुलेट मोटारसायकलचा वापर तर
आजवर इतक्या छान पद्धतीने
सिनेमात दहशतीसाठी ताकद दरारा
दाखवण्यासाठी  कधीही झाला नसेल इतका छान झालाय,,

बर माझ्या आकलना प्रमाणे
हिरो हिरॉइनच जे वागणं आहे
ते कुठल्याही नवथर मुला मुलींचं
जस असेल तसच आहे
फक्त आजची नवतरुण पिढीच
नेतृत्व ते लोक करतात इतकंच,,
माझ्या मते या सर्वांचा अनुभव मजा
घेण्याचा प्रयत्न ज्यांना जमत ते घेतातच काही जण फक्त गप्पा मारतात

सिनेमाची सुरवातच गावच्या राजकारणवर चर्चा करत
एकीकडे हिरो चौकार मारत असतो
आणि दुसरीकडे नागराज उपहासातात्मक बोलत असतो
आणि हि चौकाराची आतषबाजी
मग ती क्रिकेट मधील असो वा
हिरो हिरोईन त्याचे मित्र यांच्या
अभिनया बाबत असेल
मस्त फटकेबाजी चालू असते कुठेही
विचार करायला वेळ देत नाही
हो मात्र अशा पद्धतीने
पळून जाऊन लग्न केलत तर मात्र
काय दिव्य पार करावं लागत त्याची
जाणीव मात्र नक्की करून देत
अगदी सध्या सध्या प्रसंगातून
तरुण मुलांनी गुटका खाऊ नये
एखाद्या व्यंग असलेल्या मित्राला
त्याच्या व्यंगावरून चिडवू नये
अशी शिकवनच सिनेमा देतो
आणखी काय पाहिजे
जर शाळा चालत असेल,,
जर बालक पालक bp
चालत असेल,,
किल्ला चालत असेल,
सई ताम्हणकर चालत असेल,,
जर टायट्यानिक चालत असेल
त्यातील उघड्यावागड्या प्रेमाला
रोमान्स अस नाव देत असाल,,
राजाहिन्दुस्थानीतील प्रसिद्ध किसिंग सिन त्याला प्रेम म्हणत असाल,
मग ते बॉबीतल असेल
मेरा नाम जोकर आठवत असेलच,,
ह्या आणि अशा अनेक चित्रपटांची जंत्री देता येईल हे सारे चावट चित्रपट
प्रेमपट म्हणून पहात असाल तर
सैराट ,,, लै भारी खूपच उजवा आहे

उगाचच पळून गेल्यावर लग्न केलंय
आता दाखवा सुहागरात ,,
असलं काही एक दाखवलं नाही
आणि तरीही चित्रपटावर टीका??

हा आता प्रेमविवाहाला,, पळून जाऊन लग्न करण्याला मान्यता देण न देणं हा ज्याचा त्याचा व्ययक्तिक
प्रश्न आहे
माझा स्वतःचा प्रेमविवाहाला विरोध आहे
कारण साधी जनावर पण तीही त्यांच्या जातीबाहेर सम्बन्ध ठेवत नाहीत कधी कुत्र्या पोटी मांजर??
कधी मांजरी पोटी बेडूक??
किंवा वाघा पोटी सिंह जन्मला
अस कधी झालं नाही होणार नाही
मग माणसाने लग्न करताना जात
का पाहू नये???
आता जात म्हणजे आपण आपल्या परीने आपली एक पायरी ठरवलेली
असते कि अमुक पायरी पर्यंत म्हणजे
तो चांगला आणि हे प्रयेक वर्गाचं
एक गणित ठरलेलं आहे
त्यात गैर काहीच नाही
मनुष्य हा कळपाने राहणारा प्राणी
आहे आणि कळप हा अमुक एका विचारांच अमुक एका संस्कृतीच
प्रतिनिधित्व करत असतो
त्यामुळे आपल्या कळपातील मुलगा मुलगी बाहेर वेगळ्या कळपात जाऊ नये इतकी माफक अपेक्षा असते
आणि त्यातूनच विरोध होत असतो
हा आता यातील जो रस्ता
बाप पकडतो ( शेवट )
तो मात्र अमानवी नक्कीच आहे
अर्थात तो सिनेमा आहे
हे हि तितकंच खर कि अशा प्रकारच्या घटना समाजात घडत असतात अशी अनेक घटना वृत्तपत्रात वाचायला मिळतात देखील
आणि सिनेमा अशाच गोष्टींचं
प्रतिनिधित्व करत असतो
आता अशा घटना घडू नयेत यासाठी
आपल्यालाच बदलाव लागेल
आपल्या मुलांना प्रेम कुणावर आणि का करावं ते सांगावं लागेल
ज्यांचा आदर्श होते राम कृष्ण ते शिवराय झाले प्रेम शिवरायांनी केलं
ते या मातृभूमीवर प्रेम भंगतसिंगानीं केलं लोकमान्य सावरकर चाफेकर
यांनी हि प्रेम केलं कारण त्यांना शिकवण तशी मिळाली होती
जिजाबाई शहाजी राजे जर शिवरायांना सोबत घेऊन लफडी
टीव्ही मालिका बघत असते तर??
सावरकर  मोबाईवर गेम खेळत बसले असते तर??
लोकमान्य सर्कशीतले सिंह बनले असते तर??
चाफेकर रामोशांना हाताशी धरून
लढ्याच्या ऐवजी चोऱ्या करत बसले असते तर बाबू गेनू सारखी
तरुण मूल पॉर्नसाइट बघत राहीले असते तर??
पण अस काही झालं नाही????

कारण आई वडील जागे होते,,
समाज जागा होता,,
नितीमत्तेची चाड होती,,
दिलेला शब्द पाळण्यासाठी जीवाचं रान करणारी माणस होती,,
आता,,,
या उपरही काही विचारलं पाहिजे???
जास्त काही नाही
तुमचा प्रत्येकाचा मोबाईल
काय बोलतो ते फक्त प्रामाणिक
पणे मनाला विचारा आणि मगच
तात्त्विक विरोध करा
स्वतः बदला देश बदलेल
प्रेम एकमेकांवर करा
प्राणिमात्रांवर करा
झाडाझुडपावर करा
इथल्या मातीवर करा
या देशावर इथल्या संस्कृतीवर करा
आणि

सैराटवर त्याच्या टीमवर नागराज मंजुलेवर अजय अतुलवर
पर्यायाने
मराठी सिनेमावर करा
जय मराठी
भूमकर
सुनील प्रभाकर भूमकर

Comments

Popular posts from this blog

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्या तपकिरी गाई कड़े वळ

*नको देवराया अंत आता पाहू,,*

देवा ये लवकर तुझ्या पराक्रमाच्या गोष्टी खूप वाचल्या रे आमचा विश्वास ही आहेच त्यावर पण ये आता आता तूच या अदृश्य कोरोनाशी लढ आणि मुक्त कर☹ *प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी तू सदैव उभा राहतोस म्हणे,,* मग आमचे प्रयत्न दिसत नाही का रे देवा☹ जगाचा पालन कर्ता असलास तरी या भरतभूमीवर तुझं विशेष प्रेम,,सार जग सोडून तू तुझे सारे अवतार याच भरतवंशीयांसाठी सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच निर्दालन करण्यासाठी घेतलेस,,, *मग आजच असा निष्ठुर कठोर पाषाण हृदयी का झालास😏☹😡* अरे आम्ही तुझीच लेकरं ना रे मग आमची अवघ्या मनुष्य जातीची चाललेली परवड तुला दिसत नाही की अजून शेषशैये वरून उठायची वेळच झाली नाही की तुझा कुंभकर्ण झालाय देवा? *उठ रे दादा उठ*☹ मला माहिती आहे केवळ प्राण्यांची असलेली ही भूमी तू गुण्या गोविंदाने हे मनुष्यप्राणी ही राहतील या मोठया आशेने आम्हला ती  आंदण दिलीस☹ *पण आम्ही कपाळकरंटे रे ओरबाडली अक्षरशः ही भूमी ओरबाडली*😏😡 जीवन जगण्याच्या स्पर्धेत *आमचा बकासुर कधी झाला* ते आमचं आमच्याच कळलं नाही *आमचा हव्यास कधी संपेल माहिती नाही* आमची आयुष्य एकमेकांचा धर्म उणिदुनी काढण्यातच जाणा

राजा-माकड-आणि आपण ,,,

हि आहे एका आळशी आणि बुद्धू राजाची गोष्ट एकदा ह्या राजाला एक माकड काही तरी मदत करते. आणि त्यामुळे राजा त्याला आपला सेवक म्हणून तैनात करतो. प्रधान हे पाहून वैतागतो,राजाला समजावण्याचा प्रयत्न करतो पण राजा मानत नाही, प्रधान कपाळावर हात मारतो-  एकदा-दोनदा-तिनदा... असे ब-याचदा होते. एके दिवशी राजा झोपलेला असतो, माकड वारा घालत असते. एक माशी सारखी राजाच्या नाकावर बसायचा प्रयत्न करते. माकड तिला हकलायचा प्रयत्न करते, पण तरी ती पुन्हा पुन्हा येते म्हणून शेवटी चिडून माकड राजाच्या तलवारीने तिला मारायचा प्रयत्न करतो... आणि... राजाचे नाकच कापले जाते.. प्रधानजी हसतो... तात्पर्य -- ज्यांची लायकी नाही पात्रता नाही अशांच्या हातात जबाबदारी सोपवली कि काय होत ते हि गोष्ट सांगते ??,,,,,,,,,,,, आज नेमकी हि गोष्ट आठवायचं कारण ,,, शक्ती मिल कंपाउंड मध्ये जो फोटोग्राफर मुलीवर बलात्कार झाला त्यावर ईथे नेहमी प्रमाणे येवून सगळ्यांनी आपापली मत मांडली नेहमी प्रमाणे बांगड्या भरा ,चपलेने बडवा ,सरकार नालायक अशी मत मांडली गेली पण हि झाली फक्त चर्चा याच्या मुळाशी कुणीच प्रयत्न करू ईच्छित नाही आणि नेमकी कधी काळी वाचलेल