Skip to main content

*हंस ,माणूस ,आज्जी आणि बगळे*

*हंस ,माणूस ,आज्जी आणि बगळे*

पूर्वी आजच्या सारखी परिस्थिती नव्हती सागर नद्या,
आकाश त्याचप्रमाणे माणसाच्या मनाचा तळ स्वच्छ दिसत असे
त्यामुळे तेव्हा tv मोबाईल इंटरनेट च जाळ नसल्यामुळे मुलांना खेळ लगोरी कबड्डी पतंग सूर पारंब्या असे मैदानी खेळ खेळले जात
आकाश निरभ्र असल्या मुळे रात्री हमखास आम्ही शहरात असल्यामुळे गच्चीवर झोपत असू मग आपसूकच टक्क उघड्या डोळ्यांनी जितकं आभाळ डोळ्यात सामावून घेता येईल तितकं सामावून घेत झोपी जात असू पण या दरम्यान बरेचदा संध्याकाळी
घरी हंस पक्षांचा थवा उडत जाताना दिसे,,,
मी बरेचदा टक लावून पहात बसत असे ते इंग्रजी *V* आकारात उडत असत मला नेहमी असा प्रश्न पडे की हे असेच का उडतात? मागच्याला पुढे जावस वाटत नाही का? की पुढचा मागच्याना उडुच देत नाही? बर ते मान्य केलं तरी मग मधले काय करतात? ते का जोर लावून पुढच्याला ढकलत किंवा बाजूला होत स्वतः उडत???
आता *त्यावेळी आमचा गुगल म्हणजे आमची आजी* तिच्याशिवाय कोण उत्तर देणार???
मग आजी उत्तर देत असे
अरे बाळा तू शाळेत जातोस की नाही ते तुझ्या पुस्तकात विमान पाहिलस की नाही? ते असच इंग्रजी *V* आकारासारखं असत मानवाला निसर्ग सारखा शिकवत असतो इंग्रजी *V* आकारामुळे त्याला हवा कापन सोपं जातं
पुढचा म्होरक्या जो असतो ते विमानाचं नाक येणारी संकट प्रथम ते झेलत ते झेलायला योग्य ती साथ मधली मंडळी करत असतात , मागच्याना थोडा आराम असतो आशा तर्हेने एका दमात ते 10 तास तरी नक्की उडत जातात अशावेळी पुढचा दमला तर मागचा त्याची जागा घेतो व नव्या दमाने तो संकटाला समोर जातो हे बदलत राहत पण कुणी शिस्त मोडत नाही बघ आपल्या घरात तुझे आजोबा आज सर्वात पुढचे राजहंस आहेत मागोमाग त्यांचे भाऊ बहीण काका मामा आम्ही या घरात आलेल्या लेकी सुना आहोतच सोबत आणि सर्वात मागे तू माझा लाडका सोन्या अस सगळं हंस पुराण सांगत जवळ घरात डोक्यावरुन हात फिरवत गालाचा मुका घेत असे त्या मुक्याच्या गोडीला कितीही किमती मिठाई पुढे ठेवली तरी फिकी पडेल,,
परन्तु कालांतराने जस जसा मोठा होऊ लागले तस तस जाणवू लागलो त्या हंसाच माहीत नाही आताशा दिसत नाहीत आकाशात *पण आज्जी खोट्टी आहे ती खोट बोलत होती* अस वाटू लागलं होतं तस जाणवत होतं आणि आता ते प्रकर्षाने प्रत्यक्ष दिसत देखील,,
आता माणस बदलली त्यांचे जगण्याचे संदर्भ बदलले त्यांचं प्रत्येकाचं स्वतंत्र आभाळ आहे आणि त्यात त्याला एकट्यालाच विहार करायचा आहे कुटुंबा सोबत उडायची मजा घेत 10 तसाच अंतर कापायच नाही तर ते स्वतःच्या जोरावर ते कापायचे आहे आणि ते अंतर कापताना अडथळा म्हणुन जर आपलीच नाती येत असतील तर तीही त्याला कपायचीच आहेत तो एकत्र उडण्यातला आनंद एक दमला तर दुसऱ्याने मदत करण्याचा आनंद त्याला आता नकोय
*आजी आजोबा ताई दाजी काका काकी मामा मामी* ही सारी कालबाह्य नाती आता त्याला जपायची नाहीत *प्रोफेशनल नाती मात्र जीवापाड जपतो तो आज*
हिंदी सिनेमातील एक गाणं आठवत,,
गैरो पे करम अपनो पे सितम ए जाने वफा,,,
आणि भगवान श्रीकृष्णच गीतेत एक वचन आहे
*जिथे मी आहे तिथे मी नाही आणि जिथे मी नाही तिथे मी आहे*
आणि हा कळत नकळतपणे आलेला मी पणा बाजूला सारला तरच *आयुष्यसोहळा* मजेत जगता येतो त्यापुढे मग सारच *स्वनिर्मित सोहळे* फिके ती फक्त कारण असतात एकत्र येण्याची
पुढची 10 तासांची उड्डाण नव्या दमाने नव्या गड्याने मोहीम हाती घेत आपल्या मजबूत कवेत एकत्र घेण्याची आता हे सोहळे त्या राजहंसारखे जगायचे की नाही हे तुम्ही ठरवायचं
बाकी आजच्या परिस्थिने जरी आज्जीच्या या गोष्टीला आणि आज्जीच्या विचारसरणीला खोटं ठतवल असलं तोंडघशी पाडलं असलं तरी
माझी आज्जी खोटी नव्हती नाही तिचे विचार
आता बरेचसे बगळे राजहंसारखे स्वतःला समजत असले तरी प्रत्यक्ष प्रतिबिंब पाहिल्यावर राजहंस त्या बगळ्यां मध्ये रमत नाही असं एक सुंदर मराठी गाणं देखील आहे *एका तळ्यात होती बगळे पिले सुरेख,,,* पण स्वत्वाची जाणीव झालेलं ते राजहंसी पिलू त्या बगळ्यांमध्ये राहत नाही उडून जात आपल्या माणसांकडे नव्या जोमाने आकाशात विहार करण्यासाठी आता आपण प्रत्येकाने ठरवलं पाहिजे तुम्ही राजहंस आहात की बगळे
भूमकर
सुनील प्रभाकर भूमकर

Comments

Popular posts from this blog

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्या तपकिरी गाई कड़े वळ

*नको देवराया अंत आता पाहू,,*

देवा ये लवकर तुझ्या पराक्रमाच्या गोष्टी खूप वाचल्या रे आमचा विश्वास ही आहेच त्यावर पण ये आता आता तूच या अदृश्य कोरोनाशी लढ आणि मुक्त कर☹ *प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी तू सदैव उभा राहतोस म्हणे,,* मग आमचे प्रयत्न दिसत नाही का रे देवा☹ जगाचा पालन कर्ता असलास तरी या भरतभूमीवर तुझं विशेष प्रेम,,सार जग सोडून तू तुझे सारे अवतार याच भरतवंशीयांसाठी सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच निर्दालन करण्यासाठी घेतलेस,,, *मग आजच असा निष्ठुर कठोर पाषाण हृदयी का झालास😏☹😡* अरे आम्ही तुझीच लेकरं ना रे मग आमची अवघ्या मनुष्य जातीची चाललेली परवड तुला दिसत नाही की अजून शेषशैये वरून उठायची वेळच झाली नाही की तुझा कुंभकर्ण झालाय देवा? *उठ रे दादा उठ*☹ मला माहिती आहे केवळ प्राण्यांची असलेली ही भूमी तू गुण्या गोविंदाने हे मनुष्यप्राणी ही राहतील या मोठया आशेने आम्हला ती  आंदण दिलीस☹ *पण आम्ही कपाळकरंटे रे ओरबाडली अक्षरशः ही भूमी ओरबाडली*😏😡 जीवन जगण्याच्या स्पर्धेत *आमचा बकासुर कधी झाला* ते आमचं आमच्याच कळलं नाही *आमचा हव्यास कधी संपेल माहिती नाही* आमची आयुष्य एकमेकांचा धर्म उणिदुनी काढण्यातच जाणा

राजा-माकड-आणि आपण ,,,

हि आहे एका आळशी आणि बुद्धू राजाची गोष्ट एकदा ह्या राजाला एक माकड काही तरी मदत करते. आणि त्यामुळे राजा त्याला आपला सेवक म्हणून तैनात करतो. प्रधान हे पाहून वैतागतो,राजाला समजावण्याचा प्रयत्न करतो पण राजा मानत नाही, प्रधान कपाळावर हात मारतो-  एकदा-दोनदा-तिनदा... असे ब-याचदा होते. एके दिवशी राजा झोपलेला असतो, माकड वारा घालत असते. एक माशी सारखी राजाच्या नाकावर बसायचा प्रयत्न करते. माकड तिला हकलायचा प्रयत्न करते, पण तरी ती पुन्हा पुन्हा येते म्हणून शेवटी चिडून माकड राजाच्या तलवारीने तिला मारायचा प्रयत्न करतो... आणि... राजाचे नाकच कापले जाते.. प्रधानजी हसतो... तात्पर्य -- ज्यांची लायकी नाही पात्रता नाही अशांच्या हातात जबाबदारी सोपवली कि काय होत ते हि गोष्ट सांगते ??,,,,,,,,,,,, आज नेमकी हि गोष्ट आठवायचं कारण ,,, शक्ती मिल कंपाउंड मध्ये जो फोटोग्राफर मुलीवर बलात्कार झाला त्यावर ईथे नेहमी प्रमाणे येवून सगळ्यांनी आपापली मत मांडली नेहमी प्रमाणे बांगड्या भरा ,चपलेने बडवा ,सरकार नालायक अशी मत मांडली गेली पण हि झाली फक्त चर्चा याच्या मुळाशी कुणीच प्रयत्न करू ईच्छित नाही आणि नेमकी कधी काळी वाचलेल