Skip to main content

खाजा नसुरुद्दिनची गोष्ट

खाजा नासुरुद्दीनला लोकंना मूर्ख बनवायची खूप हौस असते
एक दिवस खाजा नासुरुद्दिन जाहीर करतो कि
कुराणवर वर जाहीर प्रवचन करणार आहे अर्थातच लोकात
समज असतो कि हा काय बोलणार कुराणवर ?
पण तरीही लोक त्याचा विचार ऐकायला जमा होतात
सगळी मानस जमल्यावर नसरुद्दिन विचारतो
आज मी काय बोलणार कशावर बोलणार आहे तुम्हाला माहित आहे का?
त्यावर माणस म्हणाली नाही आम्हाला काही कल्पना नाही
त्यावर नासुरुद्दिन म्हणतो जा मग घरी ज्यांना मी काय बोलणार
आहे ते माहित नाही अशा अशिक्षित अडाणी लोकांसमोर मी बोलणार नाही चालते व्हा ,,,,
परत पुन्हा काही दिवसांनी तो पुन्हा जाहीर करतो
कि कुराणवर बोलणार आहे
पहिला अनुभव गाठीशी असल्यामुळे लोकांनी ठरवलं आता हो बोलायचं
आणि त्या प्रमाणे नासुरुद्दिन विचारतो कि काय आणि कशावर बोलणार
तुम्हाला माहित आहे का?
सारे एकजात हो म्हणतात त्यावर नासुरुद्दिन म्हणतो ,,
मग तुमच्या समोर बोलायची काय गरज तुम्हाला सर्व ठावूक आहे ,,,
चला चालते व्हा अस म्हणत परत एकदा लोकांना मूर्ख बनवतो,,,
लोक चिडतात पण काय करणार गप्प बसतात,
परत काही दिवसांनी नसुरुद्दिन जाहीर करतो मी
कुराणवर बोलणार आधीचे अनुभव गाठीशी असलेले लोक शहाणे होतात
आणि काही करून याला आज फसायचं नाही उलट यालाच फसवायच
आणि जमल तर फटके हि द्यायचे,,,
असे सारे लोक कट करतात कि जमलेल्या अर्ध्या लोकांनी
हो बोलायचं अर्ध्या लोकांनी नाही बोलायचे
ठरल्या प्रमाणे नासुरुद्दिन विचारतो मी काय बोलणार आहे माहित आहे का?
आणि ठरल्या प्रमाणे अर्धे लोक हो आणि अर्धे लोक नाही म्हणतात
त्यावर नसरुद्दिन म्हणतो चला तर मग ज्यांना माहित नाही त्यांना माहित असलेल्यांनी समजावून सागा
चला चालते व्हा
तात्पर्य----
अशा बदमाश लोकांच्या नदी लागू नये त्यांची बदमाशी वेळीच ओळखून त्यांची करमणूक
करून आपल हस करून घेवू नये. ज्यांना ईतरांना त्रास देण्यात आनंद वाटतो त्यांच्या पासून दूर राहावे
आपल्या आसपास हि अशी बरीच मानस असतात आपणही वेळीच सावध झालेलं बर
त्यांना उत्तर देण्यात आपली शक्ती विनाकारण खर्च होते अशा लोकांना आपणच म्हंटल पाहिजे चला
चालते व्हा तुमच्या करमणुकीसाठी आमच्या कडे वेळ नाही .



Comments

  1. अशा लोकांना आपणच म्हंटल पाहिजे चला
    चालते व्हा तुमच्या करमणुकीसाठी आमच्या कडे वेळ नाही .

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

पुन्हा ते कधी हरले नाहीत,,

ऑलिंपिक ज्योतीचे गुरुवारी ग्रीस मध्ये प्राचीन ओलीमपिया येथे पारंपारिक  पद्धतीने प्रज्वलन करण्यात आले. या ऑलिंपिकची एक आठवण  ऑलिंपिक स्पर्धेत बास्केट बॉल हा एक प्रसिध्द खेळ , बास्केटबॉल चा समावेश १९३६ मध्ये करण्यात आला  तो पर्यंत ८ ऑलिंपिक स्पर्धेत ६३ सामने खेळताना अमेरिका एकही सामना हरला नव्हता. १९७२ मध्ये म्युनिच ऑलिंपिक या खेळातील सुवर्णपदकासाठी  अमेरिका रशिया याच्यात सामना झाला ,,आणि, सामन्याचे काही सेकंद बाकी असताना अमेरिकेने ५०\४९ अशी आघाडी  घेवून चेंडू रशियाच्या हातात दिला रशियाने  टाईम-आउट मागीतला ,अमेरिकेने तो नियमबाह्य असल्याचे  अपील केले , मात्र ते अपील पंचांनी फेटाळले, रशियन खेळाडूने चेंडू बास्केट करण्याचा प्रयत्न केला पण चेंडू काही केल्या  बास्केट होईना , पंचांनी सामना संपल्याची शिट्टी वाजवली आणि,, सामना अमेरिकेचा हाती गेला पंचांनी अमेरिका जिंकल्याचे घोषित केले, अमेरिका जिंकली पण ,,, गोष्ट ईथे संपत नाही , आता रशियन समर्थकांनी स्कोररला घेराव घातला, त्याने  पंचांच्या आदेशां नंतरही घड्याळ ३ सेकंदांनी रिसेट केले नव्...

एकच थप्पड पण तीच वेळीच मारली असती तर?

माझ्या लहान पणी ऐकलेली गोष्ट एका चोराची एक लहान मुलगा त्याला कुणीच खेळायला घेत नसे. या गोष्टीचा आईला हि त्याच्या खूप राग येत असे वाईट वाटत असे एकदा काय झाल त्या खेळणाऱ्या मुलांचा बॉल चुकून या मुलाच्या घरात शिरतो त्या मुलाची आई तो बॉल आलेला पाहते आणि आपल्या मांडी खाली लपवते.  जेणे करून तो आपल्या मुलाला खेळायला मिळेल. ती खेळणारी मुल येतात आणि "काकू आमचा बॉल आला का हो ईकडे "अस विचारतात. आई अर्थातच नाही अस खोटच सांगते मुलगा हे सर पाहत असतो आणि त्यातून काय बोध घ्यायचा तो घेतो . हळू हळू त्या लहान मुलाला हि तशीच सवय लागते तो लहान सहन चोर्या करू लागतो . आणि आईला आणून देवू लागला.आई हि माझ्या राजा म्हणून त्याला कुरवाळत असे. कालांतराने तो थोडा मोठा झाल्यावर तो मोठ्या चोर्या करू लागला . मग अर्थातच पुढे डाके घालू लागला आणि एक दिवस डाका घालायला गेला असता त्याच्या हातून खून होतो अथक प्रयत्ना नंतर पोलीस त्याचा छडा लावतात आणि त्याला मुद्देमालासकट अटक करतात खटला होतो न्यायालय त्याला फाशीची सजा सुनावत. आणि तो दिवस उजाडतो त्याच्या फाशीचा ,,, न्यायालय त्याला शेवटची ईच्छ विचारते तो...

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्य...