Skip to main content

खाजा नसुरुद्दिनची गोष्ट

खाजा नासुरुद्दीनला लोकंना मूर्ख बनवायची खूप हौस असते
एक दिवस खाजा नासुरुद्दिन जाहीर करतो कि
कुराणवर वर जाहीर प्रवचन करणार आहे अर्थातच लोकात
समज असतो कि हा काय बोलणार कुराणवर ?
पण तरीही लोक त्याचा विचार ऐकायला जमा होतात
सगळी मानस जमल्यावर नसरुद्दिन विचारतो
आज मी काय बोलणार कशावर बोलणार आहे तुम्हाला माहित आहे का?
त्यावर माणस म्हणाली नाही आम्हाला काही कल्पना नाही
त्यावर नासुरुद्दिन म्हणतो जा मग घरी ज्यांना मी काय बोलणार
आहे ते माहित नाही अशा अशिक्षित अडाणी लोकांसमोर मी बोलणार नाही चालते व्हा ,,,,
परत पुन्हा काही दिवसांनी तो पुन्हा जाहीर करतो
कि कुराणवर बोलणार आहे
पहिला अनुभव गाठीशी असल्यामुळे लोकांनी ठरवलं आता हो बोलायचं
आणि त्या प्रमाणे नासुरुद्दिन विचारतो कि काय आणि कशावर बोलणार
तुम्हाला माहित आहे का?
सारे एकजात हो म्हणतात त्यावर नासुरुद्दिन म्हणतो ,,
मग तुमच्या समोर बोलायची काय गरज तुम्हाला सर्व ठावूक आहे ,,,
चला चालते व्हा अस म्हणत परत एकदा लोकांना मूर्ख बनवतो,,,
लोक चिडतात पण काय करणार गप्प बसतात,
परत काही दिवसांनी नसुरुद्दिन जाहीर करतो मी
कुराणवर बोलणार आधीचे अनुभव गाठीशी असलेले लोक शहाणे होतात
आणि काही करून याला आज फसायचं नाही उलट यालाच फसवायच
आणि जमल तर फटके हि द्यायचे,,,
असे सारे लोक कट करतात कि जमलेल्या अर्ध्या लोकांनी
हो बोलायचं अर्ध्या लोकांनी नाही बोलायचे
ठरल्या प्रमाणे नासुरुद्दिन विचारतो मी काय बोलणार आहे माहित आहे का?
आणि ठरल्या प्रमाणे अर्धे लोक हो आणि अर्धे लोक नाही म्हणतात
त्यावर नसरुद्दिन म्हणतो चला तर मग ज्यांना माहित नाही त्यांना माहित असलेल्यांनी समजावून सागा
चला चालते व्हा
तात्पर्य----
अशा बदमाश लोकांच्या नदी लागू नये त्यांची बदमाशी वेळीच ओळखून त्यांची करमणूक
करून आपल हस करून घेवू नये. ज्यांना ईतरांना त्रास देण्यात आनंद वाटतो त्यांच्या पासून दूर राहावे
आपल्या आसपास हि अशी बरीच मानस असतात आपणही वेळीच सावध झालेलं बर
त्यांना उत्तर देण्यात आपली शक्ती विनाकारण खर्च होते अशा लोकांना आपणच म्हंटल पाहिजे चला
चालते व्हा तुमच्या करमणुकीसाठी आमच्या कडे वेळ नाही .



Comments

  1. अशा लोकांना आपणच म्हंटल पाहिजे चला
    चालते व्हा तुमच्या करमणुकीसाठी आमच्या कडे वेळ नाही .

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्या तपकिरी गाई कड़े वळ

*नको देवराया अंत आता पाहू,,*

देवा ये लवकर तुझ्या पराक्रमाच्या गोष्टी खूप वाचल्या रे आमचा विश्वास ही आहेच त्यावर पण ये आता आता तूच या अदृश्य कोरोनाशी लढ आणि मुक्त कर☹ *प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी तू सदैव उभा राहतोस म्हणे,,* मग आमचे प्रयत्न दिसत नाही का रे देवा☹ जगाचा पालन कर्ता असलास तरी या भरतभूमीवर तुझं विशेष प्रेम,,सार जग सोडून तू तुझे सारे अवतार याच भरतवंशीयांसाठी सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच निर्दालन करण्यासाठी घेतलेस,,, *मग आजच असा निष्ठुर कठोर पाषाण हृदयी का झालास😏☹😡* अरे आम्ही तुझीच लेकरं ना रे मग आमची अवघ्या मनुष्य जातीची चाललेली परवड तुला दिसत नाही की अजून शेषशैये वरून उठायची वेळच झाली नाही की तुझा कुंभकर्ण झालाय देवा? *उठ रे दादा उठ*☹ मला माहिती आहे केवळ प्राण्यांची असलेली ही भूमी तू गुण्या गोविंदाने हे मनुष्यप्राणी ही राहतील या मोठया आशेने आम्हला ती  आंदण दिलीस☹ *पण आम्ही कपाळकरंटे रे ओरबाडली अक्षरशः ही भूमी ओरबाडली*😏😡 जीवन जगण्याच्या स्पर्धेत *आमचा बकासुर कधी झाला* ते आमचं आमच्याच कळलं नाही *आमचा हव्यास कधी संपेल माहिती नाही* आमची आयुष्य एकमेकांचा धर्म उणिदुनी काढण्यातच जाणा

राजा-माकड-आणि आपण ,,,

हि आहे एका आळशी आणि बुद्धू राजाची गोष्ट एकदा ह्या राजाला एक माकड काही तरी मदत करते. आणि त्यामुळे राजा त्याला आपला सेवक म्हणून तैनात करतो. प्रधान हे पाहून वैतागतो,राजाला समजावण्याचा प्रयत्न करतो पण राजा मानत नाही, प्रधान कपाळावर हात मारतो-  एकदा-दोनदा-तिनदा... असे ब-याचदा होते. एके दिवशी राजा झोपलेला असतो, माकड वारा घालत असते. एक माशी सारखी राजाच्या नाकावर बसायचा प्रयत्न करते. माकड तिला हकलायचा प्रयत्न करते, पण तरी ती पुन्हा पुन्हा येते म्हणून शेवटी चिडून माकड राजाच्या तलवारीने तिला मारायचा प्रयत्न करतो... आणि... राजाचे नाकच कापले जाते.. प्रधानजी हसतो... तात्पर्य -- ज्यांची लायकी नाही पात्रता नाही अशांच्या हातात जबाबदारी सोपवली कि काय होत ते हि गोष्ट सांगते ??,,,,,,,,,,,, आज नेमकी हि गोष्ट आठवायचं कारण ,,, शक्ती मिल कंपाउंड मध्ये जो फोटोग्राफर मुलीवर बलात्कार झाला त्यावर ईथे नेहमी प्रमाणे येवून सगळ्यांनी आपापली मत मांडली नेहमी प्रमाणे बांगड्या भरा ,चपलेने बडवा ,सरकार नालायक अशी मत मांडली गेली पण हि झाली फक्त चर्चा याच्या मुळाशी कुणीच प्रयत्न करू ईच्छित नाही आणि नेमकी कधी काळी वाचलेल