Skip to main content

तमसो मा ज्योतिर्गमय...लाइम लाइट .

तमसो मा ज्योतिर्गमय...
दिवाळी अंधारातून प्रकाशाकडे नेणारी
अंधारावर मात करणारी
रात्रीच्या अंधारातच प्रकाश दडलेला असतो तुम्ही तो शोधायचा असतो हे सांगणारी दिवाळी ...
प्रत्येकाला दिवाळीच अप्रुप असतच मग तो गरीब असो वा श्रीमंत ..
कुणाची फटाक्यांची तर कुणाची फराळाची,
नवीन कपड्यांची आणि आताशा नविन मोबाइलची
पण धुंधी ही असतेच दिवाळीची ,
मग कुणी दिवाळीच्या शुभेच्छा पठवत
कुणी मेल करत
कुणी मीठाई पाठवत
अनेक प्रकारे दिवाळी साजरी होते,
पण,,,
आनंदात सगळे भेद भाव विसरून सहभागी
व्हायचे असते तेव्हाच दिवाळी साजरी होते ,
असा म्हणतात ,
सण आणि ऊसव हे जिथे साजरे होतात,
तो समाज जीवंत आहें असे समजले जाते
पण आजच्या या यांत्रिक युगात आम्ही खरच जिवंत आहोत ?,,
जगातिकी करनाच्या जमान्यात आम्ही आगतिक झालोय अस नाही वाटत?
परस्पर सीमारेषा धूसर होत आहेत
आपली मानस दुरावतायतात ,परस्पर संवाद कमी होत आहेत
दिवाळी हा एक आनंदोत्स्व आहें तो कोरड्या मनाने
कोरड्या शुभेच्छांनी नाही साजरा होत .
दोन वा अनेक जणानी, मनानी, भावनाना
जोडणारे दुवे नाती याच खर्या शुभेच्छा असतात.
त्यांच्या गैर हजेरित हा सण साजरा होऊ शकत नाही.
सकाळी पत्नीने,बहिणीने,आईने
हाका मारून ऊठवावे .
साखर झोपेतच उठवावे. आणि
सक्तीने अभ्यंग स्नान घालावे .
इतकी आपुलकी दिवाळीत असावी लागते.
ही आंघोळ साधी नसते .
तुमच्या आमच्या
नात्यावर साचलेला कडू मळ ही
आंघोळ काढत  असते
भावा बहिणीच्या  नात्याला घट्ट करत असते
नवरा बायको च्या नात्याला ,
आई मुलाच्या नात्याला ,
ही आंघोळ घट्ट करत असते
वसु बारस,नरक चतुर्थी ,लक्ष्मी पूजन आणि
भाऊबिज अर्थात यमद्वितीया साक्षात् यमाची बहिन
आपली असल्यावर आपल्याला
मृत्यचे भय ते काय  ?
असाच ती सांगत असते
या सार्या मागे
घरातल्यांचे आर्शीवाद भावना यांचे बळ असते.
यासाठी श्रीमंतिची पैशाची गरज नसते ,
पाच पन्नास रुपयाचे कापड नवे कापड खरेदी करूनही
दिवाळी एवढ्या जोरात साजरी होते की ,,
लाखो रुपये खर्च करून सुध्हा हा दिवाळीचा आनंद मिळत नाही
श्रीमंताना आनंद शोधावा लागतो ,कुठे आणि किती खर्च
करून कोणती खरेदी करावी यासाठी डोक चालवाव लागत.
आणि म्हनुनच,,
या सणाचा निर्भेळ आनंद लुटन्यासाठी
सार्यानी ,,
एक दिवा ,,
ऊसाहाचा  ,,
नाविन्याचा ,,
नात्याचा ,,
मैत्रीचा ,,
आपुलकीचा ,,
सामाजिक बंधिलकिचा,,
आणि
एकमेका वरील
विश्वासाचा दिवा लावला तर आपल्या खर्या
अर्थाने दिवाळी साजरी होइल यात शंका नाही.
कारण,,
हे सारे सण म्हणजे आपुलिकिचे कट्टे आहेत .
हे कट्टे मजबूत झाले की,,
जिव्हाळ्याच्या बेटात रूपांतर
सहज शक्य होइल.
इथे मला ,,
चार्ली चाप्लीनचा लाइम लाइट ..नावाचा
एक सुंदर सिनेमा आठवतो ,,
त्यात त्याने,
रंग भुमिवरून बाहेर फेकल्या गेलेल्या
त्याच्या झगमगाटा दूर फेकल्या गेलेल्या
नटाची भूमिका केली आहें
त्यातील एक प्रसंग ,,,
हा नट जरी बाहेर फेकला गेला असला
तरी तो रोज थियेटर वर यायचा आणि तिथल्या
लोकांच्या रोज शिव्या प्रसंगी मारही खायचा
हे सर्व पाहून त्याच्या वर माया असणारी
प्रेम करणारी
नटी एक दिवस त्याला म्हणते
अरे रोज इथे येवून तू मार खातोस
लोकांची बोलनी खातोस
या सर्वांचा राग येत नाही घृणा वाटत नाही
का येतोस का इथे ?त्यावर ,,
चार्ली म्हणतो ,,
येतोना मलाही राग येतो
घृणा वाटते अग
त्या रस्त्यावर सांडलेल्या
माझ्या रक्ता कड़े
पाहून देखिल मला घृणा वाटते
पण काय करू ?
माझ्या नसा नसात तेच आहेना ?
मी कसा त्याचा राग राग करू
मी कसा त्याच्या पासून पलु  ?
 ,,,,मला वाटत ,,
आपुलकीचे हे कट्टे असेच मजबूत झाले
तर आपल्याला सुध्हा आपल्यातील
असंख्य कुरबुरिंची घृणा येणार नाही राग येणार नाही
परस्परांवीशई आपुलकीचा दिवा असाच
निर्व्याज तेवत ठेवला तर ,,
रोजच दिवाळी..साजरी करता येइल.

Comments

Popular posts from this blog

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्या तपकिरी गाई कड़े वळ

*नको देवराया अंत आता पाहू,,*

देवा ये लवकर तुझ्या पराक्रमाच्या गोष्टी खूप वाचल्या रे आमचा विश्वास ही आहेच त्यावर पण ये आता आता तूच या अदृश्य कोरोनाशी लढ आणि मुक्त कर☹ *प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी तू सदैव उभा राहतोस म्हणे,,* मग आमचे प्रयत्न दिसत नाही का रे देवा☹ जगाचा पालन कर्ता असलास तरी या भरतभूमीवर तुझं विशेष प्रेम,,सार जग सोडून तू तुझे सारे अवतार याच भरतवंशीयांसाठी सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच निर्दालन करण्यासाठी घेतलेस,,, *मग आजच असा निष्ठुर कठोर पाषाण हृदयी का झालास😏☹😡* अरे आम्ही तुझीच लेकरं ना रे मग आमची अवघ्या मनुष्य जातीची चाललेली परवड तुला दिसत नाही की अजून शेषशैये वरून उठायची वेळच झाली नाही की तुझा कुंभकर्ण झालाय देवा? *उठ रे दादा उठ*☹ मला माहिती आहे केवळ प्राण्यांची असलेली ही भूमी तू गुण्या गोविंदाने हे मनुष्यप्राणी ही राहतील या मोठया आशेने आम्हला ती  आंदण दिलीस☹ *पण आम्ही कपाळकरंटे रे ओरबाडली अक्षरशः ही भूमी ओरबाडली*😏😡 जीवन जगण्याच्या स्पर्धेत *आमचा बकासुर कधी झाला* ते आमचं आमच्याच कळलं नाही *आमचा हव्यास कधी संपेल माहिती नाही* आमची आयुष्य एकमेकांचा धर्म उणिदुनी काढण्यातच जाणा

राजा-माकड-आणि आपण ,,,

हि आहे एका आळशी आणि बुद्धू राजाची गोष्ट एकदा ह्या राजाला एक माकड काही तरी मदत करते. आणि त्यामुळे राजा त्याला आपला सेवक म्हणून तैनात करतो. प्रधान हे पाहून वैतागतो,राजाला समजावण्याचा प्रयत्न करतो पण राजा मानत नाही, प्रधान कपाळावर हात मारतो-  एकदा-दोनदा-तिनदा... असे ब-याचदा होते. एके दिवशी राजा झोपलेला असतो, माकड वारा घालत असते. एक माशी सारखी राजाच्या नाकावर बसायचा प्रयत्न करते. माकड तिला हकलायचा प्रयत्न करते, पण तरी ती पुन्हा पुन्हा येते म्हणून शेवटी चिडून माकड राजाच्या तलवारीने तिला मारायचा प्रयत्न करतो... आणि... राजाचे नाकच कापले जाते.. प्रधानजी हसतो... तात्पर्य -- ज्यांची लायकी नाही पात्रता नाही अशांच्या हातात जबाबदारी सोपवली कि काय होत ते हि गोष्ट सांगते ??,,,,,,,,,,,, आज नेमकी हि गोष्ट आठवायचं कारण ,,, शक्ती मिल कंपाउंड मध्ये जो फोटोग्राफर मुलीवर बलात्कार झाला त्यावर ईथे नेहमी प्रमाणे येवून सगळ्यांनी आपापली मत मांडली नेहमी प्रमाणे बांगड्या भरा ,चपलेने बडवा ,सरकार नालायक अशी मत मांडली गेली पण हि झाली फक्त चर्चा याच्या मुळाशी कुणीच प्रयत्न करू ईच्छित नाही आणि नेमकी कधी काळी वाचलेल