क्रांतिकारक अनंत लक्ष्मन कान्हेरे यांनी ज्याकसन चा वध केला.
सुरवातीचे शिक्षण इंदूर नंतर संभाजीनगर येथे झाल्यानंतर स्वातंत्र्याच्याविचाराने प्रेरित होऊन स्वातंत्र्यवीर सावरकरांनी नाशिक येथे स्थापन केलेल्या
अभिनव भारत या क्रांतीकारकाच्या संघटनेचे ते सदस्य झाले.
त्यांच्या बरोबर त्याकाळात अण्णा कर्वे तसेच विनायक देशपांडे जे त्याकाळी नाशिक पंचवटीत शिक्षक होतेव पुढे त्यांच्या बरोबर जाक्सन खटल्यात आरोपी देखील होते.
एका भारतीयाने एका इंग्रजाच्या गोल्फ च्या बॉल ला हाथ लावला म्हणून त्याला मरेस्तोवर मारण्यात आले,,,,
दुसऱ्या एका घटनेत एक युवक कालिका मंदिरा कडून येणाऱ्या रस्त्यात " वंदे मातरम " चा मंत्रघोष करीत होता.
म्हणून त्याच्यावर देशद्रोहाचा खटला लादण्यात आला,,,
त्याचे वकील पत्र घेणाऱ्या बाबासाहेब खरे यांच्या घरावर त्यांनी वकील पत्र घेतल्यामुळे जप्ती आणली,,,
तर त्यांना वकिली करण्यापासून आजन्म बंदी घातली,,,
बाबाराव सावरकरांनी १६ पानी कवितेचे पुस्तक "कवी गोविंद"
प्रकाशित केले म्हणून त्यांच्यावर खटला भरून त्यांना अटक केली,,
ज्याक्सन ची नाशिक ची कारकीर्द हि अशी वादग्रस्त ठरत होती.
आणि ज्याक्सनची अशी मनोधारणा असे की येथील माणसे गुलामीत देखील सुरक्षित आहेत.
तो स्वतःला पूर्वजन्मीचा वैदिक ब्राह्मण समजत असे.
या सगळ्याचा बदला घ्यायचा हे कान्हेरे व त्यांच्या सहकार्यांनी ठरवले.व त्याला निमित्त ही मिळाले .
ज्याक्सनला बढती मिळून ज्याक्सन मुंबई येथे कमिशनर म्हणून नियुक्त झाला .
त्याच्या सन्मानार्थ विजयानंद नाट्यगृहात "शारदा"या नाटकाचा खेळ आयोजित केला गेला.
ठरल्याप्रमाणे ज्याक्सन आला तसे अनंत कान्हेरे यांनी त्याच्यावर एकापाठोपाठ एक चार गोळ्या झाडल्या.
आणि ज्याक्सन कोसळला.
आधी ठरल्याप्रमाणे अनंत कान्हेरे कुठलाही पुरावे राहू नये म्हणून स्वतःवर नंतर गोळ्या झाडून घेणार होते पण हे साध्य झाले नाही .
दुर्दैव त्यांना तिथें जमलेल्या लोकांनी पकडून दिले !!
त्यांच्या बरोबर अनंत कर्वे व विनायक देशपांडे यांना सुद्धा अटक झाली.खटला चालला.व यांना फाशीची शिक्षा सुनावली गेली.
फाशी ची अंमलबजावणी ठाणे कारागृहात १९ एप्रिल १९१० रोजी करण्यात आली
त्यावेळी त्यांच्या कुठल्याही नातेवाईकास भेटण्यास परवानगी नाकारण्यात आली,,
तसेच फाशी नंतर त्यांची पार्थिवे सुद्धा त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आली नाही,,,
त्यांच्या अस्थी देखील ब्रिटीश अधिकार्यांनी मुंबई जवळ समुद्रात टाकून दिल्या,,,
कोटी कोटी प्रणाम ..........!
त्या अंजनीच्या सुताला
अनंत कान्हेरे यांचा जन्म १८९१ साली खेड,
रत्नागिरी जिल्ह्यातील अंजनी या छोट्या खेड्यात ब्राह्मणवाडीत झाला.
भारत माता की जय ! वंदे मातरम !
आजही अभिनव भारत ची वास्तु व ते विजयानंद ( आता त्याचे चित्रपट गृह झाले. )
नाट्यगृह जसे च्या तसे जुन्या नाशकात आहे.
अभिनव भारत च्या त्या वास्तुत प्रवेश केल्यावर वेगळीच अनुभूती प्राप्त होते.
त्या वास्तुत तळमजल्यावर आपणास "अनंत कान्हेरे कक्ष " असा मोडी लिपीतला नामफलक दिसतो.
तर ज्या ठिकाणी अभिनव भारत च्या गुप्त बैठका होत असत तो कक्ष पहिल्या मजल्यावर आहे.
कोटी कोटी प्रणाम ..........!
ReplyDeleteत्या अंजनीच्या सुताला
अनंत कान्हेरे