Skip to main content

सुभेदार "डाकू" पानसिंग तोमर ,,एक चपराक

आज सकाळीच "स्क्र्याच " नावाची गोष्ट वाचली
त्यात एक नव्याने श्रीमंत झालेला माणूस आपली नवी कोरी गाडी
घेवून रस्त्याने जात असतो स्वतःच्याच कौतुकास पात्र असा तो
मेहनतीने हे सार मिळवलेल असत आणि त्या खुशीत तो
चाललेला असतो आणि अचानक एक मोठ्ठी वीट त्याच्या गाडीवर येवून आदळते
अर्थातच त्याला खूप राग येतो आणि स्व कष्टाच्या कमाईचा कुणी असा
खेळ खंडोबा करत असेल तर कसे चालेल ?
आणि रागात तो खाली उतरतो पाहतो तर ,
एक लहान मुलगा हातात दगड घेवून पुन्हा मारायला तयार ,,,
हा माणूस त्याच्या कानाखाली मारणार तोच तो मुलगा विनवतो
साहेब मारू नका मी मगच पासून बर्याच गाड्यांना थांबवायचा
प्रयत्न करतोय माझा भाऊ अपंग आहे त्याला बराच लागल देखील आहे
आता तो माझ्याच्याने तो उचलवला  जात नाही ,म्हणून खूप गाडीवाल्यांना
मी विनंत्या केल्या कि मला मदत करा पण kunihi माझ ऐकल नाही
नीजालास्त्व मग मला दगड उचलून तुमच्या गाडीवर मारावा लागला
जेणे करून निदान त्या निमित्ताने खाली उतरला
माझी अडचण ऐकल्यावर मदत कराल ,,,,
गोष्टीतला तो अर्थातच त्याची मदत करतो वैगेरे वैगेरे,,,,
पण खरच विचार करा आपण सारे असे कुणावर  विश्वास ठेवून कुणी कुणाला मदत करत?
आणि तेच नेमक जर 
लष्करात सुभेदार असलेल्या डाकू पानसिंगच्या बाबतीत अस घडलं असत तर ,,,,?
एका सुभेदारापुढे "डाकू" हे विशेषण लागल नसत ,,,,,,,,,,
तर असा हा पानसिंग तोमर ,,
धावण्यात चपळ असल्यामुळे "स्टीपलचेस " शर्यतीत तो राष्ट्रीय विक्रम वीर ठरला .
आणि "ऐथ्याल्याटिक्स" चा शिक्का बसल्याने तो देशासाठी
युद्धात  उतरू शकला नाही पण मैदानात उतरून त्याने सात वेळा
राष्ट्रीय विजेता ठरला ,,,
निवृत्ती नंतर मात्र त्याच आयुष्य बदलत
त्याच्या गावी त्याला सुखाच जीवन जगायचं असत पण नियतीने वेगळाच
डाव माडलेला असतो त्याच्या साठी ,,,
जमिनीच्या वादातून त्याचे भावूबंद त्याच्या जीवावर उठतात ,
कायदेशीर मार्गाने तो न्याय मागतो,
पण पदरी निराशाच पडते,,,
अरे "देशासाठीच धावलो ना मी ?"
हा प्रश्न सतत त्याला पोखरत सातो,,,,
आणि आज न्याय व्यवस्थाच माझच दान माझ्या पदरात टाकायला
मला मदत करत नाही,,,?
मी कुठली भिक तर नाही नां मागत,,,?
अशा प्रश्नांच्या भडिमारात त्याच्या हाती मग कधी बंदूक येते
आणि तो कधी डाकू पानसिंग तोमर म्हणून जन्माला येतो ते त्यालाच समजत नाही,,,
कारण स्वतःला तो डाकू मानतच नसतो ,,
तो स्वतःला बंडखोर मानत असतो,,,,
आणि एका चांगला धावपटू आपली शर्यत कधीही अर्धवट सोडत नसतो ,,
आणि पानसिंगच ध्येय आता निश्चित होत न्याय मिळवण ,,,,
यश येवो व अपयश ,,,,,,
हे सार लिहिताना आज सकाळीच आपल्या
कबड्डीपटूनच  आगमनाचा फोटो वृत्तपत्रात पहिला
त्याखाली कोण कोण काय काय त्यांना देणार हे हि लिहल होत
आणि सार किती वर वरच आहे ह्याचा अनुभव मलाही आहे
माझेही वडील चांगले हुतुतू खेळणारे होते कबड्डी आल आणि ते मागे पडले पाडले,,,
आजच्या घडीला ज्याच्या बरोबर मी कबड्डी खेळत लहानाचा मोठ्ठा झालो
त्यापैकी दोघी तर माझ्या बहिणीच आहेत आणि खेळाडू म्हणून
सरकारने त्यांना काय मदतीचे दिवे ओवाळलेत ते मलाही माहित आहे ,
आजही त्या दोघी सकाळी उठतात कामाला जातात आणि काम सुटल्यावर घरी येतात .
आणि आज त्यांनी हि हे सर सहन करत वयाची ५०शि पार केली आहे.
त्यांना न कुणी जाहिरात देत ,नाही सिनेमा ,अगदी
सरकारी कोट्यातल घरही त्यांच्या साठी सोप्प नाही ,,
आणि सचिन तेंडुलकरला नेव्हीत काय घेतात
त्याला कॅप्टन काय बनवतात
त्या धोनीला लष्करात काय घेतात का तर म्हणे आदर्श म्हणून ,,,?
अरे आदर्श ठेवायचा तर ह्या पानसिंग तोमरचा त्याच्या सारख्या
असणाख्या खेळाडूनचा ठेवा आणि किमान नसेल ठेवायचा
असा आदर्श तर त्याचा निदान गप्पा तरी नका मारू,,,,
काय दिल नाही सचिनला तरही घरात काय तर म्हणे
जिम बांधायचं आहे पोहायचा तलाव बांधायचा आहे परवानगी ध्यावी
आणि त्यासाठी या देशाचे नेतेच मदतीला नाही तर यावर सार्या देशाच एकमत असत
कि सचिन हे मिळाला पाहिजे ते मिळाल पाहिजे
अरे ज्या पद्धतीने तुम्हा सर्वाना एक कांदे बटाटेवला कृपा शंकर
या भैयाने जमवलेली संपत्ती पाहून राग येतो तितकाच
किंबहुना त्याही जास्त राग या क्रिकेटर्सला  मिळत असलेला सवलती बद्दल राग आला पाहिजे.
आणि आता तर काय सचिनला भारत रत्न,,,,,,
का नाही मग पानसिंग तोमर सारखे सुभेदारच्या हुद्यावर असलेली माणसे
डाकू होणार?
तात्पर्य-ह्या "स्क्र्याच" गोष्टीचा शेवट त्या माणसाने त्या लहान मुलाला
काहीही न बोलता मदत केली येथेच नाही संपत
तर त्याचा शेवट एक सणसणीत कानाखाली मारून जातो
ज्याच्या गाडीच नुकसान झालेलं असतो तो ती गाडी मनात
आणतो तर सहज दुरुस्त केली असती पण तो ती पत्रा चेपलेली
नवीकोरी गाडी तशीच ठेवतो न जाणो पुन कुणाला
अशी मदत मागायची पाळी आळी तर ती माझ्या हातून
चुकून का होईना नाकारली जावू नये आणि त्या निमित्ताने
गाडीवरचा "स्क्र्याच " मनावर कायम कोरला जाईल...........
आणि चुकूनही माझ्या हातून चूक होणार नाही,,,


Comments

  1. chan ahe gosht,,,,,sachinachya babatit boltal tr tyala bharat ratn dila pahije pn tya adhi nana patekar yaani sangitalya pramane pahilyanda bharatache hoky madhe vikram gajavalelya tya vyektila bharat ratn purskar dyava ani mg sachin la....tyavar kahi vaad nahi....mla tyanch naav aathvat nahi ahe :))))

    ReplyDelete
  2. अरे ज्या पद्धतीने तुम्हा सर्वाना एक कांदे बटाटेवला कृपा शंकर
    या भैयाने जमवलेली संपत्ती पाहून राग येतो तितकाच
    किंबहुना त्याही जास्त राग या क्रिकेटर्सला मिळत असलेला सवलती बद्दल राग आला पाहिजे.
    आणि आता तर काय सचिनला भारत रत्न,,,,,,
    का नाही मग पानसिंग तोमर सारखे सुभेदारच्या हुद्यावर असलेली माणसे
    डाकू होणार?

    ReplyDelete
  3. सुनील ,
    कालच संसदेत सर्व पक्ष्याचा खासदारांनी अन्न हजारे विरोधात गोंधळ केला कारण अन्न तें म्हणाली की सर्व खासदार करपत आहेत.वास्तविक ते खरे आहे. पण तय्ना तो अपमान वाटला , आम्ही कायदे करतो आणि आम्हालाच दोष देता म्हणजे काय .संसद सार्वभौम आहे ना ? , हा संसौधेचा अपमान आहे .वगैरे .तुझे अर्तीच्ले पण तेच म्हणते आहे .त्या मिरच्या चांगल्लायाच झोंबल्या आहेत .

    दाते

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्या तपकिरी गाई कड़े वळ

*नको देवराया अंत आता पाहू,,*

देवा ये लवकर तुझ्या पराक्रमाच्या गोष्टी खूप वाचल्या रे आमचा विश्वास ही आहेच त्यावर पण ये आता आता तूच या अदृश्य कोरोनाशी लढ आणि मुक्त कर☹ *प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी तू सदैव उभा राहतोस म्हणे,,* मग आमचे प्रयत्न दिसत नाही का रे देवा☹ जगाचा पालन कर्ता असलास तरी या भरतभूमीवर तुझं विशेष प्रेम,,सार जग सोडून तू तुझे सारे अवतार याच भरतवंशीयांसाठी सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच निर्दालन करण्यासाठी घेतलेस,,, *मग आजच असा निष्ठुर कठोर पाषाण हृदयी का झालास😏☹😡* अरे आम्ही तुझीच लेकरं ना रे मग आमची अवघ्या मनुष्य जातीची चाललेली परवड तुला दिसत नाही की अजून शेषशैये वरून उठायची वेळच झाली नाही की तुझा कुंभकर्ण झालाय देवा? *उठ रे दादा उठ*☹ मला माहिती आहे केवळ प्राण्यांची असलेली ही भूमी तू गुण्या गोविंदाने हे मनुष्यप्राणी ही राहतील या मोठया आशेने आम्हला ती  आंदण दिलीस☹ *पण आम्ही कपाळकरंटे रे ओरबाडली अक्षरशः ही भूमी ओरबाडली*😏😡 जीवन जगण्याच्या स्पर्धेत *आमचा बकासुर कधी झाला* ते आमचं आमच्याच कळलं नाही *आमचा हव्यास कधी संपेल माहिती नाही* आमची आयुष्य एकमेकांचा धर्म उणिदुनी काढण्यातच जाणा

राजा-माकड-आणि आपण ,,,

हि आहे एका आळशी आणि बुद्धू राजाची गोष्ट एकदा ह्या राजाला एक माकड काही तरी मदत करते. आणि त्यामुळे राजा त्याला आपला सेवक म्हणून तैनात करतो. प्रधान हे पाहून वैतागतो,राजाला समजावण्याचा प्रयत्न करतो पण राजा मानत नाही, प्रधान कपाळावर हात मारतो-  एकदा-दोनदा-तिनदा... असे ब-याचदा होते. एके दिवशी राजा झोपलेला असतो, माकड वारा घालत असते. एक माशी सारखी राजाच्या नाकावर बसायचा प्रयत्न करते. माकड तिला हकलायचा प्रयत्न करते, पण तरी ती पुन्हा पुन्हा येते म्हणून शेवटी चिडून माकड राजाच्या तलवारीने तिला मारायचा प्रयत्न करतो... आणि... राजाचे नाकच कापले जाते.. प्रधानजी हसतो... तात्पर्य -- ज्यांची लायकी नाही पात्रता नाही अशांच्या हातात जबाबदारी सोपवली कि काय होत ते हि गोष्ट सांगते ??,,,,,,,,,,,, आज नेमकी हि गोष्ट आठवायचं कारण ,,, शक्ती मिल कंपाउंड मध्ये जो फोटोग्राफर मुलीवर बलात्कार झाला त्यावर ईथे नेहमी प्रमाणे येवून सगळ्यांनी आपापली मत मांडली नेहमी प्रमाणे बांगड्या भरा ,चपलेने बडवा ,सरकार नालायक अशी मत मांडली गेली पण हि झाली फक्त चर्चा याच्या मुळाशी कुणीच प्रयत्न करू ईच्छित नाही आणि नेमकी कधी काळी वाचलेल