Skip to main content

जिंदगी फिर ना मिलेगी दोबारा,,,,,,,,,,,,

माझा मित्र जितेंद्र जोशी याच्या बर्याच आग्रहा वरून मी हा सिनेमा पहिला आणि,,,,,,,
हा सिनेमा म्हणजे नितांत सुंदर स्वानुभव ,,,,,
आधुनिक युगाच्या जीवनशैलीवर हसत खेळत बोचरी टीका करत
जीवनाचं तत्वज्ञान आपल्या समोर मांडतो,,,,,,,,
कि का जगाव? कस जगाव ?कुणासाठी जगाव? कधी जगाव ?
आपल्या  ईतक्या धावपळीचा खरच काही उपयोग आहे का?
उद्या जगण्यासाठी खरच आज मरण गरजेच आहे का ?
आजच्या एकंदरीतच हरवलेपणाच्या जगण्यावर ,,
भाष्य करणारा चित्रपट,,,,,'
घडाळ्याच्या काट्यावर ,,आणि मोबाईलच्या तालावर जगणार्यांनी
पाहावा असा चित्रपट,,,
मिळवायच्या शर्यतीत आपण आपल्याच माणसांपासून कसे
दूर जात आहोत हे सांगणारा चित्रपट,,,
जगण्यासाठी आपल्याला नक्की काय लागत ते सांगणारा चित्रपट,,,

तर हा सिनेमा आहे तीन घट्ट मित्रांचा ,,,,,,,,,,,
सुरवात होते अभय देओलच्या लग्न गाठी वरून ,,
आणि ठरत लग्न व्हायच्या आधी एक ब्याचालर पार्टी करावी
त्यासाठी तिघांनी बाहेर पडायचं अस ठरत ,,,,,,
पण, ह्रितिक साहेब  कामात गळ्यापर्यंत बुडालेले असतात
माझ्या मित्राच्या भाषेत श्वास घ्यायला देखील वेळ नसतो,,,,,
खूप मिनतवारी केल्यावर ह्रितिक साहेब या पार्टीला तयार होतात,,,
आणि पार्टी सुरु होते यासाठी तीन खेळाचं आयोजन केल असत ,
आणि हे खेळच एकदा समजले कि जीवनच तत्वज्ञान आपोआप समजत
आणि खेळ सुरु व्हायच्या आधीच सिनेमा हसतच पण फाडकन कानाखाली मारतो
आजच प्रातिनिधिक अस्त्र मोबाईल ह्रितिकच्या हातातलं ते सहजच फेकून दिल जात
आणि आपल्या नकळत संदेश जातो मित्रां बरोबर नातेवाईकां बरोबर
कुटुंबीय सोबत असताना नाटक सिनेमा पाहत असताना फोन बंद ठेवावा किंवा
किमान सायलेंट तरी ठेवावा ,,,,

पहिला खेळ असतो ,,,,,,,,,,
पाण्या खालाच जीवन समजून घेण ज्याला स्क्युबा डायविंग कि काय म्हणतात ,

पण प्रश्न असतो ह्रितिकचा त्याला साध पोहता हि येत नसत तिथे तो पाण्यात तेही खोल पाण्यात कसा काय जाणार ?
पण शिक्षिका कतरिना त्याला ते खूप सहजतेने शिकवते आणि ,,,?
आणि ते शिकवताना त्याला जीवनाच्या तरलतेचा अनुभव येतो.
पाण्यात राहूनही कोरड कस रहाव ते मासे शिकवतात ,,,,,
आलेच अश्रू डोळ्यात तर ते कसे गीळावेत ते पाणी शिकवत ,,

जीवनाच्या याच अंतर्मनाचा वेध घेण्यासाठी हा खेळ आयोजित केलेला असतो,,,,
आता दुसरा खेळ असतो,,,
हवाई उडीचा पण,,,,
आता पर्यंत कतरिनाशी बर्या पैकी सुत जुळलेल असत
आणि नेमकी ती टोम्याटो फेस्टिवलला जाणार असते ,,,,,,,,
पण यांचा तर कार्यक्रम ठरलेला असतो तो कसा काय बुडवणार,,,?
येथेच चित्रपट वेगळ वळण घेतो ,,,,,
जिंदगी फिर ना मिलेगी दोबारा,, आज आहे  क्षणाचा आनंद 
घ्या जिंदगी फिर,,,,, सागणारा नेमका क्षण ,,
कामाच्या बाबतीत काटेकोर असलेला ह्रितिक नेमकी येथेच
माघार घेवून सर्वानुमते टोम्याटो फेस्टिवलला जायचं ठरत,,,,,,,,
आणि तिथे गेल्यावर आणखी समजत
हा खेळ म्हणजे फक्त गंमत नव्हे टोम्याटो फेकून मारताना आधी स्वतःच्या हाताने
आधी कुस्करावा मगच तो दुसर्याला मारावा,,,,,,,,,

जीवनात असे बरेच प्रसंग येतात आपण सहज एखाद्याची सहज टिंगल टवाळी. करतो त्याच्या मनाचा जराही विचर करत नाही त्याला ती मस्करी कितपत सहन होईल
ह्याचा जराही विचार करत नाही आणि हा खेळ नेमक हेच शिकवतो,,,,,

आधी तो टोम्याटो कुस्करा मग फेकून मारा कारण तसाच मारला तर ,,,,
जोरात लागू शकेल भले तुमची त्याला दुखापत व्हावी अशी ईच्छ नसेल
पण त्याला तो टोम्याटो लागू शकतो तेव्हा,,
गंमत करा पण त्याचा आनंद दुसर्यला आणि तुम्हालाही मिळाला पाहिजे मस्करीची कुस्करी होता कामा नये,,,
जीवनात हे तत्वज्ञान आपण किती पाळतो,,,?

आणि पुढे दुसरा खेळ चालू होतो,,,,,,,,
आता पर्यंत तसे या जुळवून घेण्याच्या भूमिकेला सरसावलेले मित्र आता वार्यावर स्वार व्हायला तयार होतात 
आता त्यांना काही हजार फुट उंची वरून हेलीक्यापटर  मधून उडी मारायची असते ,,,,,,,आणि ह्रितिक आणि अभय उडी मारतात हि  आणि 
नेमकी कधी कधी कुणा कुणाला एका पाठिंब्याची गरज असते तीच गरज नेमकी खुशाल चेंडू फरहानला पडते .उडी मारायची आहे परंतु  हिमत नाही होत आणि तो ओरडतो अरे धकेलो मुझे ,,,,,,
आणि सारे मित्र हळुवार पणे वार्यावर स्वार होतात
उलट्या सुलट्या उड्या मारतात
गोल गोल फिरतात, हातात हात घालून गोल गोल राणी खेळतात.
आणि अगदी सहजच तिसर तत्वज्ञान समजत ,
जीवनात यशवी व्हयाच असेल तर कधी कधी तुम्हाला या महा सागरात ढकलून देणारा हि हवा.मात्र ढकलून देताना त्याला विश्वासाच प्याराशूट बरोबर आहे तू घाबरू नकोस हे सांगणारा
भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हेच तर ते तत्वज्ञान आहे ,,,,,,,,,,,,,
आता तिसरा खेळ सुरु होतो,,,,,,,,,
जीवनाच्या निर्णायक क्षणी तुमच्या निर्णय घेण्याच क्षमता आहे कि नाही हे तपासणारा तो खेळ,,,,,,,

तिघाही तो खेळ खेळायला येतात आणि परत निघतात घरी जायला ,,,
कारण तो खेळ असतो मारकुट्या बैलांच्या पुढे धावयाचा धावण साधसुध नसत.कदाचित गंभीर दुखापत, कायमच अपंगत्व , जीव जाणे असा प्रकार होणार असतो आधीच्या खेळांपेक्षा हि भयंकर डेंजर ,,,,,,,,,
नुसत बैलांना धावताना पाहिलं तरी धडकी भरावी असे ते माजलेले बैल असतात. परंतु परत एकदा कतरिना धावून येते त्यांचा विश्वास वाढवते
आणि ,,,,,,,,
पुन्हा नव्याने समजत "डर के आगे जीत है"
झाल शर्यत सुरु होते आणि काही अंतरावर जावून तिघंही लपून बसतात
पण शेवटी त्यांच्यातली ईच्छा शक्ती प्रबळ ठरते
भीतीवर स्वार होतात आणि ती शर्यत जिंकतात...
एका निर्णायक क्षणी ते तिघेही निर्णय घेतात यातून जगलो वाचलो तर
मी अमुक अमुक करेन आणि मग प्राण पणाला लावून ते जिंकतात
हे सार अनुभवायचा असेल तर ,,,,,,,,
हा सिनेमा पहिलाच पाहिजे
हा कुणा सिने नटाचा सिनेमा नाही
परंतु काम सगळ्यांची छान झाली आहेत,
प्रत्येक प्रसंगानुरूप जावेद अख्तरची कविता फरहानच्या मुखातून
ऐकण खरच खूप भारी अनुभव आहे
खरतर हा सिनेमा नाही हि आहे कविता जी
पडद्यावर हळुवार पणे उलगडत जाते आणि आपण त्या कवितेत
हळूच गुंतत जातो.

तेव्हा जीवन हे सुंदर आहे मित्रानो त्याचा भरभरून आनद घ्या
उगाचच हव्यासापोटी धावण्यात आणि मग रडण्यात काहीच अर्थ नाही
जीवन हे क्षणभंगुर आहे त्याचा आनंद आज नाही तर कधीच नाही
कारण ,,,,,,,,,
"जिंदगी फिर ना मिलेगी दोबारा "

Comments

  1. Hi Sunil,
    Jitendra Joshi commented on your note "सुंबरान: जिंदगी फिर ना मिलेगी दोबारा,,,,,,,,,,,,".
    Jitendra wrote: "sunder abhipraya"

    ReplyDelete
  2. Hi Sunil,
    Sagar Bhunje commented on your note "सुंबरान: जिंदगी फिर ना मिलेगी दोबारा,,,,,,,,,,,,".
    Sagar wrote: "agdee manatle bolas re"

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्या तपकिरी गाई कड़े वळ

*नको देवराया अंत आता पाहू,,*

देवा ये लवकर तुझ्या पराक्रमाच्या गोष्टी खूप वाचल्या रे आमचा विश्वास ही आहेच त्यावर पण ये आता आता तूच या अदृश्य कोरोनाशी लढ आणि मुक्त कर☹ *प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी तू सदैव उभा राहतोस म्हणे,,* मग आमचे प्रयत्न दिसत नाही का रे देवा☹ जगाचा पालन कर्ता असलास तरी या भरतभूमीवर तुझं विशेष प्रेम,,सार जग सोडून तू तुझे सारे अवतार याच भरतवंशीयांसाठी सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच निर्दालन करण्यासाठी घेतलेस,,, *मग आजच असा निष्ठुर कठोर पाषाण हृदयी का झालास😏☹😡* अरे आम्ही तुझीच लेकरं ना रे मग आमची अवघ्या मनुष्य जातीची चाललेली परवड तुला दिसत नाही की अजून शेषशैये वरून उठायची वेळच झाली नाही की तुझा कुंभकर्ण झालाय देवा? *उठ रे दादा उठ*☹ मला माहिती आहे केवळ प्राण्यांची असलेली ही भूमी तू गुण्या गोविंदाने हे मनुष्यप्राणी ही राहतील या मोठया आशेने आम्हला ती  आंदण दिलीस☹ *पण आम्ही कपाळकरंटे रे ओरबाडली अक्षरशः ही भूमी ओरबाडली*😏😡 जीवन जगण्याच्या स्पर्धेत *आमचा बकासुर कधी झाला* ते आमचं आमच्याच कळलं नाही *आमचा हव्यास कधी संपेल माहिती नाही* आमची आयुष्य एकमेकांचा धर्म उणिदुनी काढण्यातच जाणा

राजा-माकड-आणि आपण ,,,

हि आहे एका आळशी आणि बुद्धू राजाची गोष्ट एकदा ह्या राजाला एक माकड काही तरी मदत करते. आणि त्यामुळे राजा त्याला आपला सेवक म्हणून तैनात करतो. प्रधान हे पाहून वैतागतो,राजाला समजावण्याचा प्रयत्न करतो पण राजा मानत नाही, प्रधान कपाळावर हात मारतो-  एकदा-दोनदा-तिनदा... असे ब-याचदा होते. एके दिवशी राजा झोपलेला असतो, माकड वारा घालत असते. एक माशी सारखी राजाच्या नाकावर बसायचा प्रयत्न करते. माकड तिला हकलायचा प्रयत्न करते, पण तरी ती पुन्हा पुन्हा येते म्हणून शेवटी चिडून माकड राजाच्या तलवारीने तिला मारायचा प्रयत्न करतो... आणि... राजाचे नाकच कापले जाते.. प्रधानजी हसतो... तात्पर्य -- ज्यांची लायकी नाही पात्रता नाही अशांच्या हातात जबाबदारी सोपवली कि काय होत ते हि गोष्ट सांगते ??,,,,,,,,,,,, आज नेमकी हि गोष्ट आठवायचं कारण ,,, शक्ती मिल कंपाउंड मध्ये जो फोटोग्राफर मुलीवर बलात्कार झाला त्यावर ईथे नेहमी प्रमाणे येवून सगळ्यांनी आपापली मत मांडली नेहमी प्रमाणे बांगड्या भरा ,चपलेने बडवा ,सरकार नालायक अशी मत मांडली गेली पण हि झाली फक्त चर्चा याच्या मुळाशी कुणीच प्रयत्न करू ईच्छित नाही आणि नेमकी कधी काळी वाचलेल