Skip to main content

ससा आणि कासव

अर्थात सुखी आणि शांततामय सहजीवनासाठी
ससा आणि कासव पार्ट २
ससा आणि कासवाची गोष्ट तर आपण सर्वांना माहितच आहे .
ससा आणि कासव मध्ये शर्यत लागते आणि
ससा वनात गाजर, गवत आणि पाणी पिवून झोपतो आणि
कासव मंद गतीने येते आणि पुढे निघून जाते .

आणि शर्यत जिंकते .........
यातून बोध ईतकाच कि आपल ध्येय गाठताना टंगळ मंगळ करून चालत नाही
संथ का होईना पण ध्येयाच्या दिशेने चालत राहा
यश तुमचेच विजय तुमचाच. पण,,,,,,,
१- खरतर येथे गोष्ट संपली पाहिजे कारण तात्पर्य तर समजल
तरी दुर्दैवाने तसे होत नाही .
या दोघांचे काही मित्र तर काही शत्रूही असतात .
ते सशाला बाजूला घेतात आणि त्याचे कान भरतात
आणि कुठेतरी सशालाही ते सलत असत कि साला कासव मला हरवतो?
आणि त्या दोघांचे शत्रू नेमके त्याच्या या मनस्थितीचा फायदा घेतात.
झाल ससा परत कासवा कडे येतो आणि परत त्याला शर्यत लावायचा
आग्रह करतो. आणि यावेळी तो पूर्ण सावध राहतो ,
गृहपाठ पक्का करतो ठरवल्याप्रमाणे तो रानात कुठेही
आराम करत नाही काहीही खात पीत नाही आणि शर्यत जिंकतो.
येथेही बोध ईतकाच कि आपल ध्येय गाठताना टंगळ मंगळ करून चालत नाही
तर कठोर परिश्रमाला पर्याय नाही आपल्या ध्येयावर लक्ष्य ठेवलं तर
यश तुमचेच विजय तुमचाच. पण,,,,,,,
२- गोष्ट येथेही संपत नाही .ते हितशत्रू परत त्या सशाला चिडवायला येतात ,
त्याला बोलतात काय रे तू आधी तर तुला कासवानेच हरवल न?
आता जिंकलास त्यात काय मोठ्ह तू जिंकणारच होता अरे तू कुठे ?
आणि तो कुठे ? तुझी आणि त्याची बरोबरी तरी आहे का?
आणि सशालाही  यशाची खुमखमी असतेच. विजयाची नाश त्याची डोक्यात गेली असते .
परत त्याच्या मनस्थितीचा फायदा घेत ते हितशत्रू त्याला
पुन्हा शर्यत लाव आता तू जिंकशील तर खरा अस म्हणत हरबरयाच्या झाडावर चढवतात .
झाल पुन्हा ससा कासवा कडे येतो  आणि परत शर्यत लावावी असा आग्रह धरतो,
आता मात्र कासव सावध होत आणि तेही तयार होत आणि सशाला सांगत
हो नक्कीच आपण परत शर्यत लावू, पण आता अस करू
त्या जंगलातून जायचा आता मला आलाय कंटाळा आपण मार्ग बदलू,, चालेल?
आपण ती समोर नदी आहे ना पलीकडे जे मंदिर आहे त्याला हात लावू  चालेल?
विजयाच्या धुंदीत असलेला ससा लगेच हो बोलतो,
आणि फसतो ,,,,,,,,,,,
शर्यत सुरु होते ससा चांगला जोर लावून धावतो कासवा पुढे जातो हि ,
पण,,,,,,,, नेमक नदीकिनारी येवून तो थांबतो,
कारण नदी पलीकडे कसा जाणार ?
कासव नेहमी प्रमाने हळू हळू येत त्याचं डोळ्यासमोर ते सहज नदीत उतरत
आणि देवळाला हात लावत,,,,,,,,,आणि शर्यत जिंकत.
आता यातून बोध काय मिळाला तर
यशाच्या धुंदीत कधी राहू नये आणि नेहमी आपले कान नाक डोळे
हे उघडे ठेवावे, आणि तसे जर केले तर यश तुमचेच विजय तुमचाच,
३-
गोष्ट येथेही संपत नाही.हित शत्रू परत गोळा होतात आणि सश्याला
भडकवतात कायरे साला तुला कासवाने फसवल, तू मूर्ख आहेस
एक कासव तुला हरवत काय तुझी लायकी?
असे अनेक प्रश विचारून त्याला भंडावून सोडतात ,
जा त्या कासवाला हरव नाही तर ससा जमातीला कलंक आहे
काय नि काय ,,,,,,,,,
काय करायचं काय करायचं त्याच काही डोक चालत नाही
कासवाच बदला कसा घ्यायचा त्याला कसा हरवायचा
या विचारात त्या दोघांच्या हि मैत्रीत वितुष्ट येते .
हितशत्रू हे पाहून खुश होत असतात आणि ईकडे
सशाच्या डोळ्यावरची झोप उडालेली असते काय करायचं?
हा एकच प्रश्न त्याच्या समोर असतो,,,,,,,
आणि त्याची घालमेल त्या दोघांचा हि मित्र माकड
वर झाडावर बसून बघत असत त्याला मात्र या दोघांची मैत्री
परत पूर्वी सारखी व्हावी अशी ईच्छ असते ,
तो सशाला ते सार समजावून सांगतो आणि सांगतो तू आता परत
कासवाकडे जा तुला शर्यतच लावायची आहे ना?
मी सांगतो तशी लाव जा,,,,,,,,,,
ससा परत कासव कडे जातो आणि परत शर्यतीचा प्रस्ताव त्याच्या समोर ठेवतो
कासव मात्र आधीच्या प्रसंगातून सावध झालेलं असत त्याला त्याच
शक्तिस्थान काय ते समजलेल असत. त्यानुसार तो परत तो नदीपालीकादाचा रस्ता सुचवतो,,,,,,,,
आणि ससाही त्याला तयार होतो कासव त्याला समजावत अरे तू परत शर्यत हरशील
कशाला शर्यत लावतोस ?
तेव्हा ससा म्हणतो नाही मित्रा आज मी
मी जिंकाव म्हणून नाही आलो आपण जिंकाव म्हणून आलो आहे.
कासव म्हणत ते कस काय?
ससा म्हणतो बघ मित्रा तुला
कळल आहे तू
कुठे जिंकतोस आणि आणि मला
कळल आहे मी कुठे हरतो ,,,,,,
मग आता तुला मी त्या नदीपर्यंत घेवून जातो
आणि नदीपलीकडे तू मला घेवून जा,,,,,,,,,,
आपल्या पैकी कुणीही हरणार नाही
आणि शर्यत जिंकल्याचा आनंद दोघांना हि मिळेल.
तात्पर्य -
आपल्या अवती भवती असे बरेच लोक असतात ज्यांना
शर्यत जिंकायची असते पण आपण स्वतःलाच जिंकवत असतो
आपल्या जिंकण्याने आपले मित्र नातेवाईक दुखी होत असतील
 संबंध बिघडत असतील हे आपल्या गावी हि नसत 

आपली मुल आपल्या पासून दुरावत असतील कल्पना ही नसते
यशाची धुंधी हि अशीच असते तिला मित्र, नातेवाईक,सगेसोयरे,
समाज, आपली स्वतःची बायका पोर, कुणाशी काही हि देणघेण नसत.
आणि अशा तर्हेने आपण समजा पसून दूर फेकले जातो .
मग नित्य नियमाने सुया टोचून घेतो
दंडात आणि मनात हि...............

आणि  कुठे तरी हे ही वाटत हे जे शहानपण  आहे ते आपल्या 
मराठी आणि हिन्दुत्ववादी पक्षांना कधी कळणार  ?

मनसेची ही ताकद आहे तिथे सेना आणि भाजपा ऩे त्याना मदत करावी 
जिथे सेनेची ताकद आहे तिथे मनसेने आणि जिथे भाजपची तिथे 
या दोघांनी मदत करावी आणि काहीही करून 
विरोधकांच्या थोबाडीत मारावी आपली एकी दाखवावी.
आणि कोंग्रेस नावाच गवत कायमच उखडून टाकाव..... 

Comments

Popular posts from this blog

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्या तपकिरी गाई कड़े वळ

*नको देवराया अंत आता पाहू,,*

देवा ये लवकर तुझ्या पराक्रमाच्या गोष्टी खूप वाचल्या रे आमचा विश्वास ही आहेच त्यावर पण ये आता आता तूच या अदृश्य कोरोनाशी लढ आणि मुक्त कर☹ *प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी तू सदैव उभा राहतोस म्हणे,,* मग आमचे प्रयत्न दिसत नाही का रे देवा☹ जगाचा पालन कर्ता असलास तरी या भरतभूमीवर तुझं विशेष प्रेम,,सार जग सोडून तू तुझे सारे अवतार याच भरतवंशीयांसाठी सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच निर्दालन करण्यासाठी घेतलेस,,, *मग आजच असा निष्ठुर कठोर पाषाण हृदयी का झालास😏☹😡* अरे आम्ही तुझीच लेकरं ना रे मग आमची अवघ्या मनुष्य जातीची चाललेली परवड तुला दिसत नाही की अजून शेषशैये वरून उठायची वेळच झाली नाही की तुझा कुंभकर्ण झालाय देवा? *उठ रे दादा उठ*☹ मला माहिती आहे केवळ प्राण्यांची असलेली ही भूमी तू गुण्या गोविंदाने हे मनुष्यप्राणी ही राहतील या मोठया आशेने आम्हला ती  आंदण दिलीस☹ *पण आम्ही कपाळकरंटे रे ओरबाडली अक्षरशः ही भूमी ओरबाडली*😏😡 जीवन जगण्याच्या स्पर्धेत *आमचा बकासुर कधी झाला* ते आमचं आमच्याच कळलं नाही *आमचा हव्यास कधी संपेल माहिती नाही* आमची आयुष्य एकमेकांचा धर्म उणिदुनी काढण्यातच जाणा

राजा-माकड-आणि आपण ,,,

हि आहे एका आळशी आणि बुद्धू राजाची गोष्ट एकदा ह्या राजाला एक माकड काही तरी मदत करते. आणि त्यामुळे राजा त्याला आपला सेवक म्हणून तैनात करतो. प्रधान हे पाहून वैतागतो,राजाला समजावण्याचा प्रयत्न करतो पण राजा मानत नाही, प्रधान कपाळावर हात मारतो-  एकदा-दोनदा-तिनदा... असे ब-याचदा होते. एके दिवशी राजा झोपलेला असतो, माकड वारा घालत असते. एक माशी सारखी राजाच्या नाकावर बसायचा प्रयत्न करते. माकड तिला हकलायचा प्रयत्न करते, पण तरी ती पुन्हा पुन्हा येते म्हणून शेवटी चिडून माकड राजाच्या तलवारीने तिला मारायचा प्रयत्न करतो... आणि... राजाचे नाकच कापले जाते.. प्रधानजी हसतो... तात्पर्य -- ज्यांची लायकी नाही पात्रता नाही अशांच्या हातात जबाबदारी सोपवली कि काय होत ते हि गोष्ट सांगते ??,,,,,,,,,,,, आज नेमकी हि गोष्ट आठवायचं कारण ,,, शक्ती मिल कंपाउंड मध्ये जो फोटोग्राफर मुलीवर बलात्कार झाला त्यावर ईथे नेहमी प्रमाणे येवून सगळ्यांनी आपापली मत मांडली नेहमी प्रमाणे बांगड्या भरा ,चपलेने बडवा ,सरकार नालायक अशी मत मांडली गेली पण हि झाली फक्त चर्चा याच्या मुळाशी कुणीच प्रयत्न करू ईच्छित नाही आणि नेमकी कधी काळी वाचलेल