Skip to main content

सुतलीने बांधला हत्ती,,,,

काही दिवस आगोदर एक गोष्ट वाचली होती ती अशी,,
आणि मला माझ्या प्रश्नच उत्तर  मिळाल
सुतलीने बांधला हत्ती,,,,
एका आश्रमा समोर एक हत्ती फिरत असे ,
तिथे येजा करनार्याना तो रोज त्रास देइ,
त्याच्या या त्रासला कंटालुन एक दिवस सारे शिष्य जमा झाले
आणि त्यांच्या रुषी कड़े त्याची तक्रार करून म्हणाले 
महाराज या हत्तीचा काही तरी बंदोबस्त करा 
महाराज आम्ही कंटाळलो.
गुरु महाराज या हत्तीला इथुन हाकलून देणे उचित ठरेल.
गुरुनी एक क्षण विचार केला आणि 
शिष्यांना
म्हणाले
सारे जन मिळून त्याचा पाय साखळ दंडाने बांधून ठेवा .
त्याप्रमाणे 
सार्यांनी
प्रयत्न करून त्या हत्तीला एका  वृक्षाला  
बांधून ठेवले.
हत्तीने काही दिवस पाय सोडवन्याचा अटोकाट प्रयत्न केला .
पण 
हळूहळू
तो शांत झाला .
२\३ महिन्यानी गुरुदेव म्हणाले आता त्या हत्तीला आता
एका 
दोरखंडाने
बांधा,,
शिष्य ,म्हणाले गुरुदेव साध्या 
दोरखंडाने
?
अहो तो राहिल का त्यात ?
मी सांगतो तस करा  विश्वास ठेवा ,
पुन्हा २\३ महिन्यानी गुरुदेव आले व म्हणाले आता ,,
तो दोर ही काढा आता साधी सुतळ घ्या त्याने हत्ती बांधा .
पण हत्ती काही जगाचा हलला नाही .
एकाच जागी तो शांत उभा होता.
सुतळ तोडून जायची इच्छा ही त्याला होत नव्हती .
सवईचा गुलाम झाला होता तो.
तात्पर्य -
मित्रानो ,,
हा जनता जनार्दन हा देखिल त्या हत्ती सारखाच.
आधी ,,
राजे-राजवाडे ,
मुसलमानी राजवट ,
इंग्रज या सार्या राजवटीनी लादलेली गुलामी
यामुले आजही या स्वतंत्र भारतातील
स्वतंत्र नागरिक गुलामीच्या स्थितीच आहेत
ते सवईचे गुलाम झाले आहेत
गुलामीच्या मनःस्थितिच आहेत सारे
या सार्याना स्वतः च्या ताकदिची कल्पना नाही
जाणीव नाही.
आणि आम्ही सुशिक्षित?
कुठलाही प्रश्न न सोडवने या पलिकडे
कोंग्रेस्सने कुठल काम केल याचा
फिरून पुन्हा एकदा विचार करा आणि या ,,
गुलामीच्या सवईतून बाहेर या.
कठिन नाही अवघड तर मुलीचा नाही
राज्य चोरांच्या हाती सोपवून
आपण आपला बंगला आपली गाड़ी
याचाच विचार करू तर ती,,
उंटाच्या पाठी वरची शेवटीची काडी..ठरेल !

Comments

Popular posts from this blog

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्या तपकिरी गाई कड़े वळ

*नको देवराया अंत आता पाहू,,*

देवा ये लवकर तुझ्या पराक्रमाच्या गोष्टी खूप वाचल्या रे आमचा विश्वास ही आहेच त्यावर पण ये आता आता तूच या अदृश्य कोरोनाशी लढ आणि मुक्त कर☹ *प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी तू सदैव उभा राहतोस म्हणे,,* मग आमचे प्रयत्न दिसत नाही का रे देवा☹ जगाचा पालन कर्ता असलास तरी या भरतभूमीवर तुझं विशेष प्रेम,,सार जग सोडून तू तुझे सारे अवतार याच भरतवंशीयांसाठी सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच निर्दालन करण्यासाठी घेतलेस,,, *मग आजच असा निष्ठुर कठोर पाषाण हृदयी का झालास😏☹😡* अरे आम्ही तुझीच लेकरं ना रे मग आमची अवघ्या मनुष्य जातीची चाललेली परवड तुला दिसत नाही की अजून शेषशैये वरून उठायची वेळच झाली नाही की तुझा कुंभकर्ण झालाय देवा? *उठ रे दादा उठ*☹ मला माहिती आहे केवळ प्राण्यांची असलेली ही भूमी तू गुण्या गोविंदाने हे मनुष्यप्राणी ही राहतील या मोठया आशेने आम्हला ती  आंदण दिलीस☹ *पण आम्ही कपाळकरंटे रे ओरबाडली अक्षरशः ही भूमी ओरबाडली*😏😡 जीवन जगण्याच्या स्पर्धेत *आमचा बकासुर कधी झाला* ते आमचं आमच्याच कळलं नाही *आमचा हव्यास कधी संपेल माहिती नाही* आमची आयुष्य एकमेकांचा धर्म उणिदुनी काढण्यातच जाणा

राजा-माकड-आणि आपण ,,,

हि आहे एका आळशी आणि बुद्धू राजाची गोष्ट एकदा ह्या राजाला एक माकड काही तरी मदत करते. आणि त्यामुळे राजा त्याला आपला सेवक म्हणून तैनात करतो. प्रधान हे पाहून वैतागतो,राजाला समजावण्याचा प्रयत्न करतो पण राजा मानत नाही, प्रधान कपाळावर हात मारतो-  एकदा-दोनदा-तिनदा... असे ब-याचदा होते. एके दिवशी राजा झोपलेला असतो, माकड वारा घालत असते. एक माशी सारखी राजाच्या नाकावर बसायचा प्रयत्न करते. माकड तिला हकलायचा प्रयत्न करते, पण तरी ती पुन्हा पुन्हा येते म्हणून शेवटी चिडून माकड राजाच्या तलवारीने तिला मारायचा प्रयत्न करतो... आणि... राजाचे नाकच कापले जाते.. प्रधानजी हसतो... तात्पर्य -- ज्यांची लायकी नाही पात्रता नाही अशांच्या हातात जबाबदारी सोपवली कि काय होत ते हि गोष्ट सांगते ??,,,,,,,,,,,, आज नेमकी हि गोष्ट आठवायचं कारण ,,, शक्ती मिल कंपाउंड मध्ये जो फोटोग्राफर मुलीवर बलात्कार झाला त्यावर ईथे नेहमी प्रमाणे येवून सगळ्यांनी आपापली मत मांडली नेहमी प्रमाणे बांगड्या भरा ,चपलेने बडवा ,सरकार नालायक अशी मत मांडली गेली पण हि झाली फक्त चर्चा याच्या मुळाशी कुणीच प्रयत्न करू ईच्छित नाही आणि नेमकी कधी काळी वाचलेल