Skip to main content

आचार्य अत्रे..... विलक्षण हजरजबाबी व्यक्तीमत्व

स्व. राष्ट्रपती व्ही.व्ही.. गिरी यांना आठ मुले होती.
त्याबद्दल अत्र्यांच्या ' मराठा ' वर्तमानपत्रात 
बरीच गमतीदार चर्चा होत असायची.
अत्र्यांनी
गिरी ,सौ. गिरी आणि,,  
त्यांच्या आठ मुलांचा फोटो प्रसिद्ध केला
आणि त्याखाली हेडिंग दिले
'' गिरी आणि त्यांची ' काम ' गिरी ''
.....
कार..
अत्र्यांची परिस्थिती जरा खालावलेली होती. 
त्यात त्यांची कार बिघडली म्हणून ते 
पायी पायी कामासाठी जात होते. 
तेवढ्यात त्यांना त्यांचा विरोधक भेटला 
त्याने खवचटपणें विचारले
' काय बाबूराव आज पायी पायी, 
काय कार विकली की काय?'
अत्रे म्हणाले. 'अरे आज तुम्ही एकटेच? 
वहिनी दिसत नाही बरोबर ?
कुणाबरोबर पळून बिळून गेल्या की काय ?
.....
'' एकटा पुरतो ना ?''
आचार्य अत्रे विधानसभेत निवडून आले होते.
मात्र ते विरोधी पक्षात होते. सत्ताधारी कॉन्ग्रेसचे संख्याबळ जास्त होते.
अत्रे एकटे सरकारवर तुफान हल्ला चढवित असत.
अत्रे ग्रामीण भागाच्या दौर्
यावर असतांना पत्रकारांनी त्यांना विचारले,
' अत्रेसाहेब तुम्ही विधानसभेत सरकारला बरोबर कोंडीत पकडता
पण त्यांच्या संख्याबळापुढे तुम्ही एकटे कसे पुरणार ? ''
बाजूच्या शेतातील बळवंतरावांना अत्र्यांनी विचारले ,
'' बळवंतराव कोंबड्या पाळता की नाही ? ''
'' तर . चांगल्या शंभर कोंबड्या हायेत की ! ''
'' आणि कोंबडे किती ?''
'' फक्त एक हाये ''
'' एकटा पुरतो ना ?''
उपस्थितांमध्ये प्रचंड हंशा उसळला
पत्रकारही त्या हंशात सामील झाले.

......
तुम्ही कोण रे टिकोजीराव ?
पुण्यातील एका बोळातून अत्रे 
एकदा सायकलवर चालले होते.
रस्याला उतार होता आणि नेमके

त्यांच्या सायकलचे ब्रेक लागेनात
समोरून एका माणसाची प्रेतयात्रा येत होती.
जाताजाता अत्र्यांचा प्रेताला धक्का लागला 
आणि प्रेत खाली पडले.
लोक भडकले.. अत्र्यांच्या अंगावर ओरडू लागले.
तेव्हा अत्रे शांतपणे म्हणाले,
'अहो ज्याला धक्का लागला आहे 
तो काहीच बोलत नाही
आणि आरडाओरडा करणारे 
तुम्ही कोण रे टिकोजीराव ?' 

Comments

  1. www.Marathi Mann.in
    to me

    show details Dec 2 (2 days ago)

    masssssssst re

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

पुन्हा ते कधी हरले नाहीत,,

ऑलिंपिक ज्योतीचे गुरुवारी ग्रीस मध्ये प्राचीन ओलीमपिया येथे पारंपारिक  पद्धतीने प्रज्वलन करण्यात आले. या ऑलिंपिकची एक आठवण  ऑलिंपिक स्पर्धेत बास्केट बॉल हा एक प्रसिध्द खेळ , बास्केटबॉल चा समावेश १९३६ मध्ये करण्यात आला  तो पर्यंत ८ ऑलिंपिक स्पर्धेत ६३ सामने खेळताना अमेरिका एकही सामना हरला नव्हता. १९७२ मध्ये म्युनिच ऑलिंपिक या खेळातील सुवर्णपदकासाठी  अमेरिका रशिया याच्यात सामना झाला ,,आणि, सामन्याचे काही सेकंद बाकी असताना अमेरिकेने ५०\४९ अशी आघाडी  घेवून चेंडू रशियाच्या हातात दिला रशियाने  टाईम-आउट मागीतला ,अमेरिकेने तो नियमबाह्य असल्याचे  अपील केले , मात्र ते अपील पंचांनी फेटाळले, रशियन खेळाडूने चेंडू बास्केट करण्याचा प्रयत्न केला पण चेंडू काही केल्या  बास्केट होईना , पंचांनी सामना संपल्याची शिट्टी वाजवली आणि,, सामना अमेरिकेचा हाती गेला पंचांनी अमेरिका जिंकल्याचे घोषित केले, अमेरिका जिंकली पण ,,, गोष्ट ईथे संपत नाही , आता रशियन समर्थकांनी स्कोररला घेराव घातला, त्याने  पंचांच्या आदेशां नंतरही घड्याळ ३ सेकंदांनी रिसेट केले नव्...

एकच थप्पड पण तीच वेळीच मारली असती तर?

माझ्या लहान पणी ऐकलेली गोष्ट एका चोराची एक लहान मुलगा त्याला कुणीच खेळायला घेत नसे. या गोष्टीचा आईला हि त्याच्या खूप राग येत असे वाईट वाटत असे एकदा काय झाल त्या खेळणाऱ्या मुलांचा बॉल चुकून या मुलाच्या घरात शिरतो त्या मुलाची आई तो बॉल आलेला पाहते आणि आपल्या मांडी खाली लपवते.  जेणे करून तो आपल्या मुलाला खेळायला मिळेल. ती खेळणारी मुल येतात आणि "काकू आमचा बॉल आला का हो ईकडे "अस विचारतात. आई अर्थातच नाही अस खोटच सांगते मुलगा हे सर पाहत असतो आणि त्यातून काय बोध घ्यायचा तो घेतो . हळू हळू त्या लहान मुलाला हि तशीच सवय लागते तो लहान सहन चोर्या करू लागतो . आणि आईला आणून देवू लागला.आई हि माझ्या राजा म्हणून त्याला कुरवाळत असे. कालांतराने तो थोडा मोठा झाल्यावर तो मोठ्या चोर्या करू लागला . मग अर्थातच पुढे डाके घालू लागला आणि एक दिवस डाका घालायला गेला असता त्याच्या हातून खून होतो अथक प्रयत्ना नंतर पोलीस त्याचा छडा लावतात आणि त्याला मुद्देमालासकट अटक करतात खटला होतो न्यायालय त्याला फाशीची सजा सुनावत. आणि तो दिवस उजाडतो त्याच्या फाशीचा ,,, न्यायालय त्याला शेवटची ईच्छ विचारते तो...

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्य...