Skip to main content

*तानसेन गुरुपौर्णिमा आणि बाळासाहेब*

 *||श्री गुरुवे नमः ||*


अकबराच्या दरबारी जी नवरत्न होती त्यात एक *संगीत सम्राट तानसेन* देखील होते

मात्र हे तानसेन कुठे घडले कि आभाळातून डायरेक्ट अकबराच्या दरबारात गेलं काय नाही तर त्यांना हि गुरु होते,,

तर अशा या संगीत सम्राट तानसेनचे गुरु होते *स्वामी हरिदास,,,*

एकदम व्रतस्थ साधक जणू साधुचं,,

निःस्पृह असे ऋषितुल्य *स्वामी हरिदास* सर्वांना च आदरणीय वंदनीय आणि अशा गुरूंचे शिष्य होते संगीत सम्राट तानसेन,,

या शिष्याला त्यांनी भरभरून दिले

आणि तानसेनाने अपार मेहनत घेत त्यावर चार चांद लावले

कीर्ती सर्वदूर पसरली आणि अकबराच्या दरबारात नवरत्न म्हणून ओळखले जाऊ लागले

एकदिवस अकबराने तानसेन आणि त्यांचे गुरु स्वामी हरिदास यांना आमंत्रित केले 

सगळ्यात उच्च आसनावर गुरु स्वामी हरिदास विराजमामान झाले होते

खालोखाल तानसेन दरबार खचाखच भरला होता,

आता दोघे हि गुरुशिष्य गाणार होते

त्यामुळे एक अत्यंनदाची लहर पसरली होती

आणि श्रीस्वामी हरिदास यांचं गायन सुरु झालं सारा दरबार मंत्रमुग्ध होऊन गाणं श्रवण करत होता

खूप मोठया टाळ्यांच्या कडकडाटात गाणं त्यांचं समाप्त झालं

सारेजण त्यांचा जयजयकार करत होते

आता वेळ होती तानसेन यांच्या सुरेल गायकीची तानसेन यांनी तंबोरा लावला आणि गायनाला सुरुवात केली आणि त्यादिवशी शिष्य गुरुवरचढ ठरला

तानसेन यांचं गायन गुरु पेक्षाही खूपच भारी झालं साऱ्या दारबाराने कौतुकाचा वर्षाव केला

अगदी त्यांच्या गुरु स्वामी यांनी त्यांची गायकी कौतुकास पात्र आहे म्हणत प्रांजळपणे खूप खुल्या दिलाने कौतुक केलं शाबासकी दिली,,

बादशहाने देखील कौतुक करत त्याला मोहरांचे *एक तबक* भरून बक्षीस दिले,,,

गुरु म्हणून स्वामी हरिदास यांचाही राजाने सत्कार केला आणि त्यांना

*दोन तबके मोहरा*बक्षीस देण्यात आल्या,,

हे पाहून तानसेन मात्र मनातून खट्टू झाला 

*गुरु पेक्षा भारी गाऊन मला एकच तबक आणि गुरूला दोन तबक???*

अकबराला हि नाराजी लक्षात आली

त्याने बिरबलाला याचा खुलासा करायला सांगितले


खुलासा----

*बिरबल म्हणाले स्वामी हरिदास आणि तानसेन या दोघांचे हि गायन उत्तम झाले त्यामुळे त्या दोघांनाही एक एक तबक मोहरांनी भरलेलं देण्यात आलं मात्र ,,,,,*

*स्वामी हरिदासांना मोहरांचं एक तबक जास्त देण्यात आलं कारण त्यांनी तानसेन यांच्या सारखा उत्तम अद्वितीय शिष्य घडवला त्याबद्दल देण्यात आले आहे*

आणि तानसेनाच्या मनात गुरुपौर्णिमेच्या चंद्राचा लक्ख प्रकाश पडेल

तात्पर्य---

*गुरूने शिष्य घडवायचा असतो* *स्वतःची असलेली विद्या हि वाटायची असते ती स्वतः कडे ठेवायची नसते आणि तानसेन यांनी एकही शिष्य घडवला नाही ते स्वतः मोठे झाले परंतु त्यांनी परंपरा निर्माण केली नाही*


ता क---

*आज आम्ही देखील हिंदुहृद्यय सम्राट श्रीमान बाबासाहेब ठाकरे यांना मानतो कारण ते स्वतः आभाळा पेक्षाही मोठे होते आणि आम्हा लोकांना शिवसैनिकांना देखील शिवसैनिक हि सर्वोच पदवी देऊन त्या आभाळाला हि लाज वाटेल इतकं मोठं केलं आहे*


भूमकर

सुनील प्रभाकर भूमकर

कडवट शिवसैनिक

Comments

Popular posts from this blog

पुन्हा ते कधी हरले नाहीत,,

ऑलिंपिक ज्योतीचे गुरुवारी ग्रीस मध्ये प्राचीन ओलीमपिया येथे पारंपारिक  पद्धतीने प्रज्वलन करण्यात आले. या ऑलिंपिकची एक आठवण  ऑलिंपिक स्पर्धेत बास्केट बॉल हा एक प्रसिध्द खेळ , बास्केटबॉल चा समावेश १९३६ मध्ये करण्यात आला  तो पर्यंत ८ ऑलिंपिक स्पर्धेत ६३ सामने खेळताना अमेरिका एकही सामना हरला नव्हता. १९७२ मध्ये म्युनिच ऑलिंपिक या खेळातील सुवर्णपदकासाठी  अमेरिका रशिया याच्यात सामना झाला ,,आणि, सामन्याचे काही सेकंद बाकी असताना अमेरिकेने ५०\४९ अशी आघाडी  घेवून चेंडू रशियाच्या हातात दिला रशियाने  टाईम-आउट मागीतला ,अमेरिकेने तो नियमबाह्य असल्याचे  अपील केले , मात्र ते अपील पंचांनी फेटाळले, रशियन खेळाडूने चेंडू बास्केट करण्याचा प्रयत्न केला पण चेंडू काही केल्या  बास्केट होईना , पंचांनी सामना संपल्याची शिट्टी वाजवली आणि,, सामना अमेरिकेचा हाती गेला पंचांनी अमेरिका जिंकल्याचे घोषित केले, अमेरिका जिंकली पण ,,, गोष्ट ईथे संपत नाही , आता रशियन समर्थकांनी स्कोररला घेराव घातला, त्याने  पंचांच्या आदेशां नंतरही घड्याळ ३ सेकंदांनी रिसेट केले नव्...

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्य...

आशेवर_असलेल्या_गाढवाची

 कृपया नमोंधांनी ही गोष्ट फार मनाला लावून घेऊ नये त्यांनी बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला अस म्हणत लांडोरच्या तालावर ताल धरावा आशेवर,,,,, काल माझे मित्र sameer gore यांनी घोड्याच चित्र टाकलं होतं आणि मला एकदम *#आशेवर_असलेल्या_गाढवाची* गोष्ट आठवली,,,, एक मस्त खाऊन पिऊन जाड जुड गाढव आणि दुसरं लुकड मरतुकड,,,, ते दोघे रोज नदीवर भेटत,,  दोघेही एकाच जातीचे असल्यामुळे एकमेकांची सुख दुःख हालचाल विचारत असत ,,, मग गप्पा मारता मारता मग काय ,,, अस बोलत ते धष्ट पुष्ट गाढव मग त्याच्या मालकाच कौतुक करत असे माझा मालक कसा चांगला आहे काम करून घेतो पण माझी काळजी ही तितकीच घेतो आणि भरपेट खायला देतो वेळच्या वेळी लागली तर दवा दारू ही करतो आराम करायला वेळ देतो थंडीत विशेष काळजी घेतो अगदी लहान मुलासारखं जपतो काय सांगू मित्रा अंथरून पांघरून ही घालतो खूप चांगला आहे *माझा मालक*,,,,, हे सारं ऐकताना दुसऱ्या गाढवाच्या डोळ्यात पाणी येत असे ,,, अरे काय सांगू मित्रा माझा मालक, उठता बसता लाथा घालतो वेळेवर जेवायला देत नाही अंथरून पांघरून सोड आजारी पडलो तर वेळेवर दवा दारू ही करत नाही,, अस ते गाढव रोजच तक्रार ...