Skip to main content

घड्याळ, अभिमन्यू आणि लॉक डाऊन,,,,,

 सध्या महाभारत आणि लॉक डाऊन सुरू आहे,,,
महाभारत युद्धात अभिमन्यू चक्रव्यूह भेदताना दिसणार आहे,, हे सगळं आठवायचं कारण आमच्या घरातलं *जुन घड्याळ,,,*  मी साधारण 11 वीत होतो त्यावेळी ते घड्याळ थोडं बिघडलं होत किती ही चावी दिली काटे उलट सुलट फिरवलं तरी ते कधी मागे कधी पुढे पळत असे योग्य वेळच दाखवत नसत एक दोन जणांना ते दाखवलं पण त्यांनी सांगितलं आम्ही बनवत नाही ,,, एक दिवस मात्र घरात कुणी नाही हे बघत माझ्यातला मॅकेनिक जागा झाला ,,म्हंटल बघू तरी काय ते खोलून,,, पण ते खोल्ल मात्र नेमका काय बिघाड तो लक्षात येईना,, शेवटी नाद सोडला ,, पण खरी अडचण तर पुढे होती ,, ते घड्याळ उघडायला तर उघडलं पण आता ते पुन्हा फिटिंग करणं अवघड होतं त्यात बापाचे फटके बसणार ते वेगळंच होत,,,, घाबरत घाबरत मी ते कसबस फिट करत होत तस भिंतीवर लटकवल,, थोड्या वेळाने वडील आले त्यांनी ते घड्याळ एका चांगल्या हुशार घड्याळवाल्याकडे नेलं त्याला सांगितलं की चालताय पण सारख पुढे मागे होतय,,
अर्थातच ते घड्याळ त्याने उघडलं आणि वडिलांना सांगितलं अहो तुम्ही म्हणताय की घड्याळ चालू आहे पुढे मागे होतंय,, वडील म्हणाले हो,,
त्यावर ते घड्याळ माझ्या वडिलांना दाखवत म्हणाला अहो हे पुढे मागे तर सोडा काहीही चालणार नाही हे बघा याचा एकही पार्ट त्या जागी नाही यातले बरेचसे पार्ट यात नाहीत देखील असंही हे घड्याळ आता जास्त रिपेर होत नाही त्यात तुम्ही पार खोलून आणलेत,,
वडील त्याला काहीच बोलले नाहीत गुपचूप ते घड्याळ ते घरी घेऊन आले त्यांनतर ते *घड्याळ जे अडगळीत पडलं ते पडलं*,,,,
त्यावर त्यांनी मला जो दम रुपी प्रसाद द्यायचा तो अर्थातच दिला *अर्धवटराव ठरवला गेलो*,,,
सध्या लोकडाऊन आणि महाभारत बघताना म्हणूनच ती अभिमन्यूची गोष्ट आठवली,,,,
महाभारत काळात अभिमन्यू देखील अर्धवट माहितीच्या आधारे युद्धात मारला गेला कारण *चक्रव्यूहातून बाहेर पडायचा मार्गच माहिती नव्हता*,,,
आज सुद्धा बऱ्याचअभिमन्यूनना लॉक डाऊन तोडायचा आहे जरूर तोडावा पण यातुन सुटकेचा मार्ग माहिती आहे का??
ते तुम्ही ठरवा
निदान जो पर्यंत उपायांचा मार्ग कळत तो पर्यंत कितीही अप्रिय वाटला तरी *लॉक डाऊन तर हवाच आहे*
भूमकर
सुनील प्रभाकर भूमकर

Comments

Popular posts from this blog

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्या तपकिरी गाई कड़े वळ

*नको देवराया अंत आता पाहू,,*

देवा ये लवकर तुझ्या पराक्रमाच्या गोष्टी खूप वाचल्या रे आमचा विश्वास ही आहेच त्यावर पण ये आता आता तूच या अदृश्य कोरोनाशी लढ आणि मुक्त कर☹ *प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी तू सदैव उभा राहतोस म्हणे,,* मग आमचे प्रयत्न दिसत नाही का रे देवा☹ जगाचा पालन कर्ता असलास तरी या भरतभूमीवर तुझं विशेष प्रेम,,सार जग सोडून तू तुझे सारे अवतार याच भरतवंशीयांसाठी सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच निर्दालन करण्यासाठी घेतलेस,,, *मग आजच असा निष्ठुर कठोर पाषाण हृदयी का झालास😏☹😡* अरे आम्ही तुझीच लेकरं ना रे मग आमची अवघ्या मनुष्य जातीची चाललेली परवड तुला दिसत नाही की अजून शेषशैये वरून उठायची वेळच झाली नाही की तुझा कुंभकर्ण झालाय देवा? *उठ रे दादा उठ*☹ मला माहिती आहे केवळ प्राण्यांची असलेली ही भूमी तू गुण्या गोविंदाने हे मनुष्यप्राणी ही राहतील या मोठया आशेने आम्हला ती  आंदण दिलीस☹ *पण आम्ही कपाळकरंटे रे ओरबाडली अक्षरशः ही भूमी ओरबाडली*😏😡 जीवन जगण्याच्या स्पर्धेत *आमचा बकासुर कधी झाला* ते आमचं आमच्याच कळलं नाही *आमचा हव्यास कधी संपेल माहिती नाही* आमची आयुष्य एकमेकांचा धर्म उणिदुनी काढण्यातच जाणा

राजा-माकड-आणि आपण ,,,

हि आहे एका आळशी आणि बुद्धू राजाची गोष्ट एकदा ह्या राजाला एक माकड काही तरी मदत करते. आणि त्यामुळे राजा त्याला आपला सेवक म्हणून तैनात करतो. प्रधान हे पाहून वैतागतो,राजाला समजावण्याचा प्रयत्न करतो पण राजा मानत नाही, प्रधान कपाळावर हात मारतो-  एकदा-दोनदा-तिनदा... असे ब-याचदा होते. एके दिवशी राजा झोपलेला असतो, माकड वारा घालत असते. एक माशी सारखी राजाच्या नाकावर बसायचा प्रयत्न करते. माकड तिला हकलायचा प्रयत्न करते, पण तरी ती पुन्हा पुन्हा येते म्हणून शेवटी चिडून माकड राजाच्या तलवारीने तिला मारायचा प्रयत्न करतो... आणि... राजाचे नाकच कापले जाते.. प्रधानजी हसतो... तात्पर्य -- ज्यांची लायकी नाही पात्रता नाही अशांच्या हातात जबाबदारी सोपवली कि काय होत ते हि गोष्ट सांगते ??,,,,,,,,,,,, आज नेमकी हि गोष्ट आठवायचं कारण ,,, शक्ती मिल कंपाउंड मध्ये जो फोटोग्राफर मुलीवर बलात्कार झाला त्यावर ईथे नेहमी प्रमाणे येवून सगळ्यांनी आपापली मत मांडली नेहमी प्रमाणे बांगड्या भरा ,चपलेने बडवा ,सरकार नालायक अशी मत मांडली गेली पण हि झाली फक्त चर्चा याच्या मुळाशी कुणीच प्रयत्न करू ईच्छित नाही आणि नेमकी कधी काळी वाचलेल