Skip to main content

बलिदान मास आणि विस्टन चर्चिल

गुरुजींच्या संपर्कात आलो आणि मग गुरुजींनी सांगितलेल्या वाटेवर बिनबोभाट चालायचं इतकंच माहिती त्यांच्या सांगितलेल्या गेलेल्या शिकवणुकीत
बलिदान मास देखील येतो आणि मी तो कसोशीने पाळतो,,,काल पासून अनेकांनी मुंडन केलेले फोटो fb वर टाकलेत, कुणी गोड वर्ज्य ,,यर कुणी अनवाणी महिनाभर,,कुणी कुणी आपण कसा बलिदान मास करणार वैगेरे  वैगेरे टाकलं आहे.
आता दोन गोष्टी आहेत,,,,
साधारण 3/4 वर्षापूर्वी एका परिचित आमच्या जोशी बाईकडे गेलो होतो कामा निमित्त,, गप्पा टप्पा चालल्या होत्या बाई म्हणाल्या बस चहा ठेवते
मी म्हंटल नको नको मी चहा घेत नाही
बर मग कालच गावाहून कडकडे (लाडू) मी त्याला ही नकोच म्हंटल , सध्या गोड खात नाही मी
मी अत्यन्त गोडघाशा हे माहीत असल्या मुळे आश्चर्याने त्यांनी विचारलं का रे काय झालं???
मग मी सांगितलं की आमचा बलिदान मास चालू आहे ना मग मी एकच वेळ जेवतो आणि काहीही गोड खात नाही,,
मग ते का कशासाठी कुणासाठी कुणीसांगितलं वैगेरे वैगेरे सांगितलं
आधी वाटलं की हे ऐकून त्यांना बर वाटेल
पण त्या रागावल्या छे छे असलं काही करून काही उपयोग आहे का ? उगाच नको ते उद्योग अरे दिवसभर तुझं एक तर मेहनतीचं काम कुणी सांगितलं ,,,, मी जास्त हुज्जत घातली नाही कारण त्या माझ्यावरील प्रेमामुळे बोलत होत्या,,
दुसरी गोष्ट निनादराव बेडेकरांनी सांगितलेली आठवण ते एकदा युरोप मध्ये फिरत होते इंग्लडला वैगेरे गेले होते
मारलब्रो म्हणजे विस्टन चर्चिल ज्याने स्वतःच्या ताकदीवर देशाला वाचवलं मी आपलं गमतीने
एव्हडा मोठा माणूस तुमच्या देशातला त्याचे इथे कुठे पुतळे स्मारक वैगेरे काही दिसत नाही रे
आमच्या एकट्या पुण्यात फक्त महाराजांचे 8/10 तरी पुतळे असतील आणि इतका मोठा चर्चिल त्याचा पुतळा नाही???
तर त्या मित्राने दोन तीन वेळा माझ्या या कुत्सित प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं पण मी जेव्हा मुद्दाम पुन्हा विचारल तो चर्चिल आमच्या रक्तात आहे
ते स्मारक पुतळे वैगेरे तुमच्या कडे,,,इतकी मस्त सणसणीत कानाखाली त्याने मारली की मी गप्पच झालो
हे सार ऐकून माझं डोकं फेखील विचार करू लागलं की अरे खोटं काय आहे यात,,
एकीकडे बाबासाहेबांची महाराजांवरची पुस्तकाच्या पुस्तक खपत आहेत
महाराष्ट्रात अनेक लोक शिवचरित्रावर व्याख्यान देत आहेत
गुरुजीं सारखे तर शिवशंभू पितापुत्र हिंदूं रक्त गटाच्या व्हाव्यात म्हणून अव्याहत पणे प्रयत्न करत आहेत
पण तरीही देशासकट महाराष्ट्र् बलात्कारात अव्वल आहे ही अभिमानाची गोष्ट आहे का??
तेव्हा सर्व धारकर्यांना आणि शिवभक्तांना हात जोडून एक नम्र विनंती आहे
फक्त दाढी राखली, कपाळावर चंद्रकोर काढली
हातात तलवारी धरत सेल्फी अपलोड केले
बलिदान मासानिमित्ताने उपवास केले हे असे दाखवण्या पुरते शिवराय नकोत
महाराज तुमच्या दिसण्यात नव्हे तर असण्यात हवेत रक्ताच्या नसानसात हवेत
तेव्हा या बलिदान मासात उपास तपास जरूर करा पण शिवचरित्राची किमान दोन पान वाचा,,,
किमान 5 बैठका 5 सूर्यनमस्कार त्यांनतर रोज एक वाढवत जा किमान रोज 2 किमी धावा
बलिदान मास असाही करून पहा
शिवशंभू पितापुत्रणांना अभिप्रेत धर्माच रक्षण होईल ते याच मार्गाने
भूमकर
सुनील प्रभाकर भूमकर
धारकरी श्री शिवप्रतिष्ठान

Comments

Popular posts from this blog

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्या तपकिरी गाई कड़े वळ

*नको देवराया अंत आता पाहू,,*

देवा ये लवकर तुझ्या पराक्रमाच्या गोष्टी खूप वाचल्या रे आमचा विश्वास ही आहेच त्यावर पण ये आता आता तूच या अदृश्य कोरोनाशी लढ आणि मुक्त कर☹ *प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी तू सदैव उभा राहतोस म्हणे,,* मग आमचे प्रयत्न दिसत नाही का रे देवा☹ जगाचा पालन कर्ता असलास तरी या भरतभूमीवर तुझं विशेष प्रेम,,सार जग सोडून तू तुझे सारे अवतार याच भरतवंशीयांसाठी सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच निर्दालन करण्यासाठी घेतलेस,,, *मग आजच असा निष्ठुर कठोर पाषाण हृदयी का झालास😏☹😡* अरे आम्ही तुझीच लेकरं ना रे मग आमची अवघ्या मनुष्य जातीची चाललेली परवड तुला दिसत नाही की अजून शेषशैये वरून उठायची वेळच झाली नाही की तुझा कुंभकर्ण झालाय देवा? *उठ रे दादा उठ*☹ मला माहिती आहे केवळ प्राण्यांची असलेली ही भूमी तू गुण्या गोविंदाने हे मनुष्यप्राणी ही राहतील या मोठया आशेने आम्हला ती  आंदण दिलीस☹ *पण आम्ही कपाळकरंटे रे ओरबाडली अक्षरशः ही भूमी ओरबाडली*😏😡 जीवन जगण्याच्या स्पर्धेत *आमचा बकासुर कधी झाला* ते आमचं आमच्याच कळलं नाही *आमचा हव्यास कधी संपेल माहिती नाही* आमची आयुष्य एकमेकांचा धर्म उणिदुनी काढण्यातच जाणा

राजा-माकड-आणि आपण ,,,

हि आहे एका आळशी आणि बुद्धू राजाची गोष्ट एकदा ह्या राजाला एक माकड काही तरी मदत करते. आणि त्यामुळे राजा त्याला आपला सेवक म्हणून तैनात करतो. प्रधान हे पाहून वैतागतो,राजाला समजावण्याचा प्रयत्न करतो पण राजा मानत नाही, प्रधान कपाळावर हात मारतो-  एकदा-दोनदा-तिनदा... असे ब-याचदा होते. एके दिवशी राजा झोपलेला असतो, माकड वारा घालत असते. एक माशी सारखी राजाच्या नाकावर बसायचा प्रयत्न करते. माकड तिला हकलायचा प्रयत्न करते, पण तरी ती पुन्हा पुन्हा येते म्हणून शेवटी चिडून माकड राजाच्या तलवारीने तिला मारायचा प्रयत्न करतो... आणि... राजाचे नाकच कापले जाते.. प्रधानजी हसतो... तात्पर्य -- ज्यांची लायकी नाही पात्रता नाही अशांच्या हातात जबाबदारी सोपवली कि काय होत ते हि गोष्ट सांगते ??,,,,,,,,,,,, आज नेमकी हि गोष्ट आठवायचं कारण ,,, शक्ती मिल कंपाउंड मध्ये जो फोटोग्राफर मुलीवर बलात्कार झाला त्यावर ईथे नेहमी प्रमाणे येवून सगळ्यांनी आपापली मत मांडली नेहमी प्रमाणे बांगड्या भरा ,चपलेने बडवा ,सरकार नालायक अशी मत मांडली गेली पण हि झाली फक्त चर्चा याच्या मुळाशी कुणीच प्रयत्न करू ईच्छित नाही आणि नेमकी कधी काळी वाचलेल