Skip to main content

आज त्या निलकंठाचा उत्सव आहे,,,,

आज महाशिवरात्री आहे
सोमवारी आल्यामुळे त्याच महत्व अधिक,
भगवान शिव म्हणजे स्मशान जोगी, स्मशान म्हणजे सर्व काही संपले पण तिथली देवता म्हणजे शिव,,
आणि शिव म्हणजे कल्याण करणारी देवता चांगलं करणारी देवता,
आपल्या कडे यज्ञ करायची त्याला आहुती द्यायची परंपरा आहे या यज्ञात चांगल्याच वस्तू अर्पण करायच्या असतात चांगली वस्तू जाळली की त्याच होत #*भस्म*
भस्म हे पवित्र असते, हेच भस्म शिवाला देखील प्रिय असते, या सृष्टीत जे जे काही जळणार त्याची #*राख* होते, म्हणून आपले जीवन कार्य समाजातील वागणूक, नातेसंबंध, सामाजिक बंधिकली, जपत त्यानुसार सगळ्यांना आनन्द देत जीवन जगणं ही खरी #*शिवोपासना* त्यामुळे ह्या शरीराचे काम झाले की ते देखील अग्नीला अर्पण करायचे असते
त्याचे होते ते #*भस्म* पण आपण समाजात वावरतोच असे की त्याची #*राख* होते
मृत्यूचा ही उत्सव साजरा करणारी आपली परंपरा तेव्हा आपण ठरवायचं की आपली #*राख झाली पाहिजे की भस्म*
त्यामुळे संसारात राहून वैराग्य म्हणजे काय ते भगवान शिवां कडून शिकावं
प्रत्यक्ष ज्यांचं राहायचं स्थान कैलास ते सार त्यागून रमतात कुठे तर स्मशानात वैराग्य म्हणजे दारिद्र्यात राहणे अस बिलकुल नाही
घरात सगळं काही आहे परंतु त्यातून मन काढणं म्हणजे वैराग्य ज्याला महिनाभर उपाशी राहिला म्हणून उपवास घडला अस म्हणून चूक होईल तसच
वास्तविक सर्वच देवांना अमृत मिळावे म्हणून समुद्र मंथन केले होते राक्षसांनी सुरवातीलाच दारू घेतली
पण देवता मात्र अमृत येई पर्यंत कष्ट घेत राहिले परंतु जेव्हा त्यातून विष निघाले ते प्राशन केले ते फक्त भगवान शिवांनी
आज त्या निलकंठाचा उत्सव आहे
जगाच्या कल्याणासाठी भगवान शिव उपयोगी पडले,  त्यांचा हा उत्सव, भगवान शिवांनी विष प्राशन केले खरे परंतु ते ठेवले कंठातच ते गळ्याच्या खाली उतरू दिले नाही आणि बाहेर ही टाकले नाही
आणि आपण ज्यांचा हा उत्सव साजरा करत आहोत तो फक्त उपवासाच चमचमीत खाण्यासाठी,,
आपल्या ही आयुष्यात आपण देखील कुणाचा राग, कुणाचा द्वेष ,रुसवा, कुणी केलेला अपमान, रोजच्या रोज हे विषरूपी प्राशन करतच असतो
परंतु ठेवतो कुठे तर एकदम हृदयात
हृदयातून ते डोक्यात आणि मग ते उतरत कृतीत
,,,,,यातून नन्तर पश्चाताप करण्यात मग मात्र काहीच हशील नसतो
असली कुठली गोष्ट आलीच तर कुठे ठेवायची हे ज्याला कळलं त्यालाच त्यालाच #*शिवाराधना* समजली असच समजावं ,,,
हो त्यासाठी आपल्या आतल्या सत्कर्माचा ,सद्विचाराचा राम, ती साधना इतकी वाढवावी लागेल की बाहेरून विष देखील फिके पडेल तीच असेल खरी महाशिवरात्री
भूमकर
सुनील प्रभाकर भूमकर

!! हर हर महादेव !! सर्व शिवभक्तांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!!बम बम भोले !!💐💐💐💐💐💐💐💐🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Comments

Popular posts from this blog

पुन्हा ते कधी हरले नाहीत,,

ऑलिंपिक ज्योतीचे गुरुवारी ग्रीस मध्ये प्राचीन ओलीमपिया येथे पारंपारिक  पद्धतीने प्रज्वलन करण्यात आले. या ऑलिंपिकची एक आठवण  ऑलिंपिक स्पर्धेत बास्केट बॉल हा एक प्रसिध्द खेळ , बास्केटबॉल चा समावेश १९३६ मध्ये करण्यात आला  तो पर्यंत ८ ऑलिंपिक स्पर्धेत ६३ सामने खेळताना अमेरिका एकही सामना हरला नव्हता. १९७२ मध्ये म्युनिच ऑलिंपिक या खेळातील सुवर्णपदकासाठी  अमेरिका रशिया याच्यात सामना झाला ,,आणि, सामन्याचे काही सेकंद बाकी असताना अमेरिकेने ५०\४९ अशी आघाडी  घेवून चेंडू रशियाच्या हातात दिला रशियाने  टाईम-आउट मागीतला ,अमेरिकेने तो नियमबाह्य असल्याचे  अपील केले , मात्र ते अपील पंचांनी फेटाळले, रशियन खेळाडूने चेंडू बास्केट करण्याचा प्रयत्न केला पण चेंडू काही केल्या  बास्केट होईना , पंचांनी सामना संपल्याची शिट्टी वाजवली आणि,, सामना अमेरिकेचा हाती गेला पंचांनी अमेरिका जिंकल्याचे घोषित केले, अमेरिका जिंकली पण ,,, गोष्ट ईथे संपत नाही , आता रशियन समर्थकांनी स्कोररला घेराव घातला, त्याने  पंचांच्या आदेशां नंतरही घड्याळ ३ सेकंदांनी रिसेट केले नव्...

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्य...

आशेवर_असलेल्या_गाढवाची

 कृपया नमोंधांनी ही गोष्ट फार मनाला लावून घेऊ नये त्यांनी बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला अस म्हणत लांडोरच्या तालावर ताल धरावा आशेवर,,,,, काल माझे मित्र sameer gore यांनी घोड्याच चित्र टाकलं होतं आणि मला एकदम *#आशेवर_असलेल्या_गाढवाची* गोष्ट आठवली,,,, एक मस्त खाऊन पिऊन जाड जुड गाढव आणि दुसरं लुकड मरतुकड,,,, ते दोघे रोज नदीवर भेटत,,  दोघेही एकाच जातीचे असल्यामुळे एकमेकांची सुख दुःख हालचाल विचारत असत ,,, मग गप्पा मारता मारता मग काय ,,, अस बोलत ते धष्ट पुष्ट गाढव मग त्याच्या मालकाच कौतुक करत असे माझा मालक कसा चांगला आहे काम करून घेतो पण माझी काळजी ही तितकीच घेतो आणि भरपेट खायला देतो वेळच्या वेळी लागली तर दवा दारू ही करतो आराम करायला वेळ देतो थंडीत विशेष काळजी घेतो अगदी लहान मुलासारखं जपतो काय सांगू मित्रा अंथरून पांघरून ही घालतो खूप चांगला आहे *माझा मालक*,,,,, हे सारं ऐकताना दुसऱ्या गाढवाच्या डोळ्यात पाणी येत असे ,,, अरे काय सांगू मित्रा माझा मालक, उठता बसता लाथा घालतो वेळेवर जेवायला देत नाही अंथरून पांघरून सोड आजारी पडलो तर वेळेवर दवा दारू ही करत नाही,, अस ते गाढव रोजच तक्रार ...