Skip to main content

आज त्या निलकंठाचा उत्सव आहे,,,,

आज महाशिवरात्री आहे
सोमवारी आल्यामुळे त्याच महत्व अधिक,
भगवान शिव म्हणजे स्मशान जोगी, स्मशान म्हणजे सर्व काही संपले पण तिथली देवता म्हणजे शिव,,
आणि शिव म्हणजे कल्याण करणारी देवता चांगलं करणारी देवता,
आपल्या कडे यज्ञ करायची त्याला आहुती द्यायची परंपरा आहे या यज्ञात चांगल्याच वस्तू अर्पण करायच्या असतात चांगली वस्तू जाळली की त्याच होत #*भस्म*
भस्म हे पवित्र असते, हेच भस्म शिवाला देखील प्रिय असते, या सृष्टीत जे जे काही जळणार त्याची #*राख* होते, म्हणून आपले जीवन कार्य समाजातील वागणूक, नातेसंबंध, सामाजिक बंधिकली, जपत त्यानुसार सगळ्यांना आनन्द देत जीवन जगणं ही खरी #*शिवोपासना* त्यामुळे ह्या शरीराचे काम झाले की ते देखील अग्नीला अर्पण करायचे असते
त्याचे होते ते #*भस्म* पण आपण समाजात वावरतोच असे की त्याची #*राख* होते
मृत्यूचा ही उत्सव साजरा करणारी आपली परंपरा तेव्हा आपण ठरवायचं की आपली #*राख झाली पाहिजे की भस्म*
त्यामुळे संसारात राहून वैराग्य म्हणजे काय ते भगवान शिवां कडून शिकावं
प्रत्यक्ष ज्यांचं राहायचं स्थान कैलास ते सार त्यागून रमतात कुठे तर स्मशानात वैराग्य म्हणजे दारिद्र्यात राहणे अस बिलकुल नाही
घरात सगळं काही आहे परंतु त्यातून मन काढणं म्हणजे वैराग्य ज्याला महिनाभर उपाशी राहिला म्हणून उपवास घडला अस म्हणून चूक होईल तसच
वास्तविक सर्वच देवांना अमृत मिळावे म्हणून समुद्र मंथन केले होते राक्षसांनी सुरवातीलाच दारू घेतली
पण देवता मात्र अमृत येई पर्यंत कष्ट घेत राहिले परंतु जेव्हा त्यातून विष निघाले ते प्राशन केले ते फक्त भगवान शिवांनी
आज त्या निलकंठाचा उत्सव आहे
जगाच्या कल्याणासाठी भगवान शिव उपयोगी पडले,  त्यांचा हा उत्सव, भगवान शिवांनी विष प्राशन केले खरे परंतु ते ठेवले कंठातच ते गळ्याच्या खाली उतरू दिले नाही आणि बाहेर ही टाकले नाही
आणि आपण ज्यांचा हा उत्सव साजरा करत आहोत तो फक्त उपवासाच चमचमीत खाण्यासाठी,,
आपल्या ही आयुष्यात आपण देखील कुणाचा राग, कुणाचा द्वेष ,रुसवा, कुणी केलेला अपमान, रोजच्या रोज हे विषरूपी प्राशन करतच असतो
परंतु ठेवतो कुठे तर एकदम हृदयात
हृदयातून ते डोक्यात आणि मग ते उतरत कृतीत
,,,,,यातून नन्तर पश्चाताप करण्यात मग मात्र काहीच हशील नसतो
असली कुठली गोष्ट आलीच तर कुठे ठेवायची हे ज्याला कळलं त्यालाच त्यालाच #*शिवाराधना* समजली असच समजावं ,,,
हो त्यासाठी आपल्या आतल्या सत्कर्माचा ,सद्विचाराचा राम, ती साधना इतकी वाढवावी लागेल की बाहेरून विष देखील फिके पडेल तीच असेल खरी महाशिवरात्री
भूमकर
सुनील प्रभाकर भूमकर

!! हर हर महादेव !! सर्व शिवभक्तांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!!बम बम भोले !!💐💐💐💐💐💐💐💐🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Comments

Popular posts from this blog

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्या तपकिरी गाई कड़े वळ

*नको देवराया अंत आता पाहू,,*

देवा ये लवकर तुझ्या पराक्रमाच्या गोष्टी खूप वाचल्या रे आमचा विश्वास ही आहेच त्यावर पण ये आता आता तूच या अदृश्य कोरोनाशी लढ आणि मुक्त कर☹ *प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी तू सदैव उभा राहतोस म्हणे,,* मग आमचे प्रयत्न दिसत नाही का रे देवा☹ जगाचा पालन कर्ता असलास तरी या भरतभूमीवर तुझं विशेष प्रेम,,सार जग सोडून तू तुझे सारे अवतार याच भरतवंशीयांसाठी सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच निर्दालन करण्यासाठी घेतलेस,,, *मग आजच असा निष्ठुर कठोर पाषाण हृदयी का झालास😏☹😡* अरे आम्ही तुझीच लेकरं ना रे मग आमची अवघ्या मनुष्य जातीची चाललेली परवड तुला दिसत नाही की अजून शेषशैये वरून उठायची वेळच झाली नाही की तुझा कुंभकर्ण झालाय देवा? *उठ रे दादा उठ*☹ मला माहिती आहे केवळ प्राण्यांची असलेली ही भूमी तू गुण्या गोविंदाने हे मनुष्यप्राणी ही राहतील या मोठया आशेने आम्हला ती  आंदण दिलीस☹ *पण आम्ही कपाळकरंटे रे ओरबाडली अक्षरशः ही भूमी ओरबाडली*😏😡 जीवन जगण्याच्या स्पर्धेत *आमचा बकासुर कधी झाला* ते आमचं आमच्याच कळलं नाही *आमचा हव्यास कधी संपेल माहिती नाही* आमची आयुष्य एकमेकांचा धर्म उणिदुनी काढण्यातच जाणा

राजा-माकड-आणि आपण ,,,

हि आहे एका आळशी आणि बुद्धू राजाची गोष्ट एकदा ह्या राजाला एक माकड काही तरी मदत करते. आणि त्यामुळे राजा त्याला आपला सेवक म्हणून तैनात करतो. प्रधान हे पाहून वैतागतो,राजाला समजावण्याचा प्रयत्न करतो पण राजा मानत नाही, प्रधान कपाळावर हात मारतो-  एकदा-दोनदा-तिनदा... असे ब-याचदा होते. एके दिवशी राजा झोपलेला असतो, माकड वारा घालत असते. एक माशी सारखी राजाच्या नाकावर बसायचा प्रयत्न करते. माकड तिला हकलायचा प्रयत्न करते, पण तरी ती पुन्हा पुन्हा येते म्हणून शेवटी चिडून माकड राजाच्या तलवारीने तिला मारायचा प्रयत्न करतो... आणि... राजाचे नाकच कापले जाते.. प्रधानजी हसतो... तात्पर्य -- ज्यांची लायकी नाही पात्रता नाही अशांच्या हातात जबाबदारी सोपवली कि काय होत ते हि गोष्ट सांगते ??,,,,,,,,,,,, आज नेमकी हि गोष्ट आठवायचं कारण ,,, शक्ती मिल कंपाउंड मध्ये जो फोटोग्राफर मुलीवर बलात्कार झाला त्यावर ईथे नेहमी प्रमाणे येवून सगळ्यांनी आपापली मत मांडली नेहमी प्रमाणे बांगड्या भरा ,चपलेने बडवा ,सरकार नालायक अशी मत मांडली गेली पण हि झाली फक्त चर्चा याच्या मुळाशी कुणीच प्रयत्न करू ईच्छित नाही आणि नेमकी कधी काळी वाचलेल