Skip to main content

बघतोस काय मुजरा कर😂🤣😂🤣

*बघतोस काय मुजरा कर❓*
खरं तर युट्युबवर तो *पोवाडा नामक गाण ऐकलं* तेव्हाच तार सटकली होती पण तरीही,,
जितेंद्र जोशी माझा आवडता हिरो
त्यातही एक अमराठी मराठी लोकांना
त्यांच्या दुर्गसम्पत्तीच जतन केले तर
तर महाराष्ट्राच्या विकासाला कसा हातभार लावू शकतो आणि त्यातूनच
आपली *दुर्गवैभव* कस वाचवता येईल त्यातूनचं आपली संस्कृती जपली जाईल आणि त्यातही
महाराज आणखी घराघरात नव्हे तर
प्रत्येकाच्या काळजात जातील,,
हे सांगण्यासाठी एक अमराठी पुढे येतो
हेच खूप कौतुकास्पद होत माझ्यासाठी,,,
पण
*सिनेमाची सुरवात आणि शेवट*
एव्हड्या दोनच गोष्टी परिणामकारक आहेत बाकी,,, *हे राम*
या सिनेमात एक छान मुद्दा घेतला आहे तो म्हणजे *शिवस्मारकाचा*
कि 1600 कोटी त्या स्मारकावर खर्च करण्यापेक्षा ते या गडकिल्यांवर खर्च करा हे *गडकोट म्हणजे महाराजांचं स्मारक*
मग असला *टुकार* सिनेमा कढण्यापेक्षा प्रथम त्यांनीच
त्या *सिनेमाला आलेला खर्च आणि महाराजांच्या नावावर केलेली लंडन वारी टाळली असती तर निदान माझ्या मते निदान एक गडाच तरी नक्कीच संवर्धन झालं असत,,*
हो टुकारच,,,,कारण,,
गावरान भाषा आणि गावातील लोक दाखवताना केवळ भाषेची गम्मत म्हणून
खुद्द हिरो म्हणजे शिवभक्त नानासाहेब जेव्हा *संडासला जायच्या निमित्ताने- मुलगा आधी गेलेला असतो त्याच नाव संभाजी या संभाजी नावाची जी काही मोडतोड हिरो करतो त्याला तोड नाही*
गावरान सिनेमा दाखवतात दाखवता तो शिवराळ कधी होतो
हे पाहून वरून कदाचित *दादा* हि शरमेने मान नक्कीच खाली घालतील यात शंका नाही
त्यातही *६५ किलोची तलवार*
इतिहास हा असा का हे सारे
*सु-शिक्षित लोक* हास्यास्पद करतात देव जाणे❓
आणि तेही आजच्या काळात सारी
*अभ्यासू मंडळी आजूबाजूला असताना❓*
त्यातही हे सारे आधुनिक मावळे
स्वतःला शिवभक्त समजणारे मोबाईल इंटरनेट वापरणारे महाराजांची तलवार आणण्यासाठी
थेट लंडन गठतात 😳❓
कुठलाही प्लान नाही आणि असला  तरीही ते शक्य आहे का❓
फक्त
सुरवातीलाच सांगितल्या प्रमाणे
शेवट जो दाखवला तो खूप चांगला संदेश देतो
हिरो ला स्वप्नात रोज एक स्वार आणि एक जमिनीत खुपसलेली तलवार दिसत असे
सगळा भ्रमनिरास झालेला हताश झालेला हिरो त्या रात्री पुन्हा झोपतो
नेहमी प्रमाणे त्याला ते स्वप्न पडत पण आज मात्र ते पूर्ण स्वप्न असत,,
त्या स्वप्नात त्याला साक्षात्कार होतो
कि जर
*ह्या गडकिल्यांचं जतन आपणच केलं पाहिजे कुठलंहीसरकार ते करणार नाही हे गडकिल्ले हीच आपली भवानी आहे तीच जतन हे आपणच केलं पाहिजे*
असा सुंदर संदेश देत सिनेमा संपतो
आणि चला निदान काही तरी चांगलं पदरात पडलं हे समाधान घेऊन घरी येतो
*ता.क.*
आता पर्यंत शिवशंभू पितापुत्र हे केवळ नफ्याच साधन म्हणून इथल्या राजकारण्यांनी वर्षोनुवर्षे वापरले पण
सिनेमावाले त्या नावाला *हास्यास्पद* बनवू पहात आहेत असच दिसतंय😏😏😏
भूमकर
सुनील प्रभाकर भूमकर

Comments

Popular posts from this blog

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्या तपकिरी गाई कड़े वळ

*नको देवराया अंत आता पाहू,,*

देवा ये लवकर तुझ्या पराक्रमाच्या गोष्टी खूप वाचल्या रे आमचा विश्वास ही आहेच त्यावर पण ये आता आता तूच या अदृश्य कोरोनाशी लढ आणि मुक्त कर☹ *प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी तू सदैव उभा राहतोस म्हणे,,* मग आमचे प्रयत्न दिसत नाही का रे देवा☹ जगाचा पालन कर्ता असलास तरी या भरतभूमीवर तुझं विशेष प्रेम,,सार जग सोडून तू तुझे सारे अवतार याच भरतवंशीयांसाठी सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच निर्दालन करण्यासाठी घेतलेस,,, *मग आजच असा निष्ठुर कठोर पाषाण हृदयी का झालास😏☹😡* अरे आम्ही तुझीच लेकरं ना रे मग आमची अवघ्या मनुष्य जातीची चाललेली परवड तुला दिसत नाही की अजून शेषशैये वरून उठायची वेळच झाली नाही की तुझा कुंभकर्ण झालाय देवा? *उठ रे दादा उठ*☹ मला माहिती आहे केवळ प्राण्यांची असलेली ही भूमी तू गुण्या गोविंदाने हे मनुष्यप्राणी ही राहतील या मोठया आशेने आम्हला ती  आंदण दिलीस☹ *पण आम्ही कपाळकरंटे रे ओरबाडली अक्षरशः ही भूमी ओरबाडली*😏😡 जीवन जगण्याच्या स्पर्धेत *आमचा बकासुर कधी झाला* ते आमचं आमच्याच कळलं नाही *आमचा हव्यास कधी संपेल माहिती नाही* आमची आयुष्य एकमेकांचा धर्म उणिदुनी काढण्यातच जाणा

राजा-माकड-आणि आपण ,,,

हि आहे एका आळशी आणि बुद्धू राजाची गोष्ट एकदा ह्या राजाला एक माकड काही तरी मदत करते. आणि त्यामुळे राजा त्याला आपला सेवक म्हणून तैनात करतो. प्रधान हे पाहून वैतागतो,राजाला समजावण्याचा प्रयत्न करतो पण राजा मानत नाही, प्रधान कपाळावर हात मारतो-  एकदा-दोनदा-तिनदा... असे ब-याचदा होते. एके दिवशी राजा झोपलेला असतो, माकड वारा घालत असते. एक माशी सारखी राजाच्या नाकावर बसायचा प्रयत्न करते. माकड तिला हकलायचा प्रयत्न करते, पण तरी ती पुन्हा पुन्हा येते म्हणून शेवटी चिडून माकड राजाच्या तलवारीने तिला मारायचा प्रयत्न करतो... आणि... राजाचे नाकच कापले जाते.. प्रधानजी हसतो... तात्पर्य -- ज्यांची लायकी नाही पात्रता नाही अशांच्या हातात जबाबदारी सोपवली कि काय होत ते हि गोष्ट सांगते ??,,,,,,,,,,,, आज नेमकी हि गोष्ट आठवायचं कारण ,,, शक्ती मिल कंपाउंड मध्ये जो फोटोग्राफर मुलीवर बलात्कार झाला त्यावर ईथे नेहमी प्रमाणे येवून सगळ्यांनी आपापली मत मांडली नेहमी प्रमाणे बांगड्या भरा ,चपलेने बडवा ,सरकार नालायक अशी मत मांडली गेली पण हि झाली फक्त चर्चा याच्या मुळाशी कुणीच प्रयत्न करू ईच्छित नाही आणि नेमकी कधी काळी वाचलेल