Skip to main content

*हा देश संकल्प जगणाऱ्यांचा आहे*

 आजकाल हॅपी न्यू इयरच्या नावावर संकल्प सोडायचा ,धरायचा की करायचा (ट्रेंड) सुरू झालाय
संकल्प हे जगायचे पाळायचे असतात ते सोडायचे किंवा धरायचे नसतात ते प्रणापलीकडे जपायचे असतात
या भरत भूमीला हिंदुस्तानला संकल्प करण्यासाठी दिवस कधी पासून लागू लागलें??
हिंदू धर्म (कर्म) मुळात कर्माला प्राधान्य देणारा, त्याला जागण्यास प्रवृत्त करणारा, कर्माच पालन हाच तुझा धर्म सांगणारी ही संस्कृती
मग ते कर्माच पालन तुमचं तुमच्या आई वडील मुलं बायको बहीण, भाऊ सारे सोयरे, समाजाप्रती,,देशाप्रति,, तुमचं जे जे काही कर्तव्य आहे ते पालन करण्यास जीवाची ही बाजी लावण्यास पुढे मागे पाहू नका हे सांगणारी ही धर्मसंस्कृती याला संकल्प दिवस साजरे करायची पाळी का येऊ लागली??
*केवळ प्रेयसचा हव्यास वाढल्या मुळे*

*प्रेयस म्हणजे इंद्रियांना हवेहवेसे वाटणारे आणि श्रेयस म्हणजे आत्म्याला हितावह असणारे*

कवी अनिल लिहितात
मला आवडते वाट वळणाची, सरघसरणीची, पायफसणीची,,,तेव्हा
श्रेयस कशात हे आधी तुम्हला कळावे लागते
याच श्रेयसाची हाक राम कृष्णचा आदर्श बाळगणाऱ्या शिव शंभू पितापुत्रांना नन्तर लोकमान्य, सावरकर, सुखदेव राजगुरू भगतसिंग
या साऱ्या महभागांना आधी आली म्हणून स्वातंत्रसासाठी देहार्पण केलं
श्रेयस अस सहजी प्राप्त होत नसत, जीव पाखडावा लागतो त्यासाठी दिलेला शब्द पाळण्यासाठी जीवाचं रान करावं लागत
आला 31 st उचलली बाटली लावली तोंडाला
लावला dj नाचलो ढुंगण हलवत
आलं मनात केल सेलिब्रेशन अशी धमाल नसते या वाटेवर,,, *असतो तो फक्त त्याग*,,
श्रेयसा चरणी वाहावी लागते ते सत्य, निष्ठा, दुर्दम्य विश्वास,,, त्याला  *पर्याय*  नसतो
याच सत्य निष्ठा विश्वासापायी सत्यनिष्ठ राजा हरिशचंद्राने स्वप्नात दिलेलं ही वचन पाळलं
स्वप्नात दिलेल्या वचनपालनात साथ देणाऱ्या त्याच्या बायका मुलांनी
*15 लाख खात्यात जमा होतील असे कधी बोलले याची लिंक द्या असा उलट सवाल केला नाही*

*सत्याला पळवाट नसते*
*असतो तो फक्त प्रेयसाचा त्याग*,,,,
परंतु जसा राजा तशीच प्रजा
भूमकर
सुनील प्रभाकर भूमकर


Comments

Popular posts from this blog

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्य...

*नको देवराया अंत आता पाहू,,*

देवा ये लवकर तुझ्या पराक्रमाच्या गोष्टी खूप वाचल्या रे आमचा विश्वास ही आहेच त्यावर पण ये आता आता तूच या अदृश्य कोरोनाशी लढ आणि मुक्त कर☹ *प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी तू सदैव उभा राहतोस म्हणे,,* मग आमचे प्रयत्न दिसत नाही का रे देवा☹ जगाचा पालन कर्ता असलास तरी या भरतभूमीवर तुझं विशेष प्रेम,,सार जग सोडून तू तुझे सारे अवतार याच भरतवंशीयांसाठी सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच निर्दालन करण्यासाठी घेतलेस,,, *मग आजच असा निष्ठुर कठोर पाषाण हृदयी का झालास😏☹😡* अरे आम्ही तुझीच लेकरं ना रे मग आमची अवघ्या मनुष्य जातीची चाललेली परवड तुला दिसत नाही की अजून शेषशैये वरून उठायची वेळच झाली नाही की तुझा कुंभकर्ण झालाय देवा? *उठ रे दादा उठ*☹ मला माहिती आहे केवळ प्राण्यांची असलेली ही भूमी तू गुण्या गोविंदाने हे मनुष्यप्राणी ही राहतील या मोठया आशेने आम्हला ती  आंदण दिलीस☹ *पण आम्ही कपाळकरंटे रे ओरबाडली अक्षरशः ही भूमी ओरबाडली*😏😡 जीवन जगण्याच्या स्पर्धेत *आमचा बकासुर कधी झाला* ते आमचं आमच्याच कळलं नाही *आमचा हव्यास कधी संपेल माहिती नाही* आमची आयुष्य एकमेकांचा धर्म उणिदुनी काढण्यातच ...

आशेवर_असलेल्या_गाढवाची

 कृपया नमोंधांनी ही गोष्ट फार मनाला लावून घेऊ नये त्यांनी बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला अस म्हणत लांडोरच्या तालावर ताल धरावा आशेवर,,,,, काल माझे मित्र sameer gore यांनी घोड्याच चित्र टाकलं होतं आणि मला एकदम *#आशेवर_असलेल्या_गाढवाची* गोष्ट आठवली,,,, एक मस्त खाऊन पिऊन जाड जुड गाढव आणि दुसरं लुकड मरतुकड,,,, ते दोघे रोज नदीवर भेटत,,  दोघेही एकाच जातीचे असल्यामुळे एकमेकांची सुख दुःख हालचाल विचारत असत ,,, मग गप्पा मारता मारता मग काय ,,, अस बोलत ते धष्ट पुष्ट गाढव मग त्याच्या मालकाच कौतुक करत असे माझा मालक कसा चांगला आहे काम करून घेतो पण माझी काळजी ही तितकीच घेतो आणि भरपेट खायला देतो वेळच्या वेळी लागली तर दवा दारू ही करतो आराम करायला वेळ देतो थंडीत विशेष काळजी घेतो अगदी लहान मुलासारखं जपतो काय सांगू मित्रा अंथरून पांघरून ही घालतो खूप चांगला आहे *माझा मालक*,,,,, हे सारं ऐकताना दुसऱ्या गाढवाच्या डोळ्यात पाणी येत असे ,,, अरे काय सांगू मित्रा माझा मालक, उठता बसता लाथा घालतो वेळेवर जेवायला देत नाही अंथरून पांघरून सोड आजारी पडलो तर वेळेवर दवा दारू ही करत नाही,, अस ते गाढव रोजच तक्रार ...