Skip to main content

जिंकूनही हरलेली ती,,,😔😔😔

ज्या महाभंगांना आपल्या बायकोचे ,मुलीचे, नातेवाईक स्त्रियांचे,किंवा ज्यां मुलींना सेल्फी काढत
सतत व्हाट्सआप ,फेसबुक, इन्स्टाग्रामवर फोटो छोटे छोटे स्वतःचेच व्हिडीओ अपलोड करायची सवय आहे त्या सर्वांनी आवर्जून हा लेख वाचवा
कालच्या लोकसत्तात चतुरंग पुरवणीत आलेला हा लेख,,,
एका विकृत माणसाने एका स्त्रीचा नग्न व्हिडीओ सोशल मीडिया वर वायरल केला
*दुर्दैव हे त्या स्त्रीचा चेहरा होता केरळ मधील शोभा साजु चा*,,
त्या नन्तर या प्रकरणाची कुठलीही शहानिशा न करता या तीन मुलांच्या आईला सरळ टाकून दिले
ती ओरडून ओरडून सांगत राहिली की हा व्हिडीओ माझा नाही पण तिचा आवाज ऐकणार कुणीच नव्हतं,,,
एका व्हिडीओ मुळे कुणाचं कुटुंब, कुणाचं आयुष्य, कुणाचं घर उध्वस्त होतंय याचा जराही विचार न करता तो सहा मिनिटांचा व्हिडीओ अनेकांनी जराही विचार न करता फॉरवर्ड केला,,
परंतु स्वाभिमानी शोभा या सगळ्यांच्या विरोधात ठाम उभी राहिली हा व्हिडीओ माझा नाही खुशाल शहानिशा करा अस सांगत थेट पोलिसांकडे तिने तक्रार केली, तिथून ती सायबर गुन्ह्या कडे गेली ,
तब्बल तीन वर्षांनी हा व्हिडीओ तिचा नाही हे सिद्ध झाले
परंतु या तीन वर्षात तिची मुलं तीच घर नवरा त्या एक व्हिडीओ ने हिरावून घेतलं होत,,,
नवऱ्याच्याच फार्म मधील एका कर्मचाऱ्याने2015 ला हा व्हिडीओ वायरल केला इतकंच हाती आलंय त्याला अटक ही झालीय
पण तो तयार कुणी केला याचा तपास अजूनही सुरूच आहे त्याला शिक्षा व्हायलाच हवी हा शोधाचा निर्धार आहे
आज शोभा एकटी आहे मुलं सुद्धा विरोधात गेलीत
पण तरीही ती लढणार आहे
ज्या कुणी हे अधम कृत्य केले त्याला धडा शिकवायचा आहे
*पण सोशलाधिन आपण सारे यातून काही धडा घेणार की नाही????*

Comments

Popular posts from this blog

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्या तपकिरी गाई कड़े वळ

*नको देवराया अंत आता पाहू,,*

देवा ये लवकर तुझ्या पराक्रमाच्या गोष्टी खूप वाचल्या रे आमचा विश्वास ही आहेच त्यावर पण ये आता आता तूच या अदृश्य कोरोनाशी लढ आणि मुक्त कर☹ *प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी तू सदैव उभा राहतोस म्हणे,,* मग आमचे प्रयत्न दिसत नाही का रे देवा☹ जगाचा पालन कर्ता असलास तरी या भरतभूमीवर तुझं विशेष प्रेम,,सार जग सोडून तू तुझे सारे अवतार याच भरतवंशीयांसाठी सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच निर्दालन करण्यासाठी घेतलेस,,, *मग आजच असा निष्ठुर कठोर पाषाण हृदयी का झालास😏☹😡* अरे आम्ही तुझीच लेकरं ना रे मग आमची अवघ्या मनुष्य जातीची चाललेली परवड तुला दिसत नाही की अजून शेषशैये वरून उठायची वेळच झाली नाही की तुझा कुंभकर्ण झालाय देवा? *उठ रे दादा उठ*☹ मला माहिती आहे केवळ प्राण्यांची असलेली ही भूमी तू गुण्या गोविंदाने हे मनुष्यप्राणी ही राहतील या मोठया आशेने आम्हला ती  आंदण दिलीस☹ *पण आम्ही कपाळकरंटे रे ओरबाडली अक्षरशः ही भूमी ओरबाडली*😏😡 जीवन जगण्याच्या स्पर्धेत *आमचा बकासुर कधी झाला* ते आमचं आमच्याच कळलं नाही *आमचा हव्यास कधी संपेल माहिती नाही* आमची आयुष्य एकमेकांचा धर्म उणिदुनी काढण्यातच जाणा

राजा-माकड-आणि आपण ,,,

हि आहे एका आळशी आणि बुद्धू राजाची गोष्ट एकदा ह्या राजाला एक माकड काही तरी मदत करते. आणि त्यामुळे राजा त्याला आपला सेवक म्हणून तैनात करतो. प्रधान हे पाहून वैतागतो,राजाला समजावण्याचा प्रयत्न करतो पण राजा मानत नाही, प्रधान कपाळावर हात मारतो-  एकदा-दोनदा-तिनदा... असे ब-याचदा होते. एके दिवशी राजा झोपलेला असतो, माकड वारा घालत असते. एक माशी सारखी राजाच्या नाकावर बसायचा प्रयत्न करते. माकड तिला हकलायचा प्रयत्न करते, पण तरी ती पुन्हा पुन्हा येते म्हणून शेवटी चिडून माकड राजाच्या तलवारीने तिला मारायचा प्रयत्न करतो... आणि... राजाचे नाकच कापले जाते.. प्रधानजी हसतो... तात्पर्य -- ज्यांची लायकी नाही पात्रता नाही अशांच्या हातात जबाबदारी सोपवली कि काय होत ते हि गोष्ट सांगते ??,,,,,,,,,,,, आज नेमकी हि गोष्ट आठवायचं कारण ,,, शक्ती मिल कंपाउंड मध्ये जो फोटोग्राफर मुलीवर बलात्कार झाला त्यावर ईथे नेहमी प्रमाणे येवून सगळ्यांनी आपापली मत मांडली नेहमी प्रमाणे बांगड्या भरा ,चपलेने बडवा ,सरकार नालायक अशी मत मांडली गेली पण हि झाली फक्त चर्चा याच्या मुळाशी कुणीच प्रयत्न करू ईच्छित नाही आणि नेमकी कधी काळी वाचलेल