Skip to main content

शहामृगी प्रेम

वयं झालं तरी अजुन यौवनात आम्ही !!👌👌👌
तुम्हांला शहामृगाच्या बाबतीतली एक गोष्ट माहिती आहे का ??

नर किंवा मादी शहामृग आयुष्यात एकदाच आपल्या साथीदारची निवड करतात....

साथीदार मिळाला कि ते जिवंत असेपर्यंत एकमेकांबरोबरच राहतात, एकमेकांची साथ सोडत नाहीत,,,
पण जंगलात रहाताना जर एकाचा मृत्यू झाला, काही कारणाने आणि तो मृत्यू दुसऱ्याने पहिला तर तो जिवंत असलेला शहामृग अन्नत्याग करतो ताबडतोब आणि बरोबर वीस दिवसांनी मरतो.....

बापरे,,,,परवा मी पुण्यात गेलो होतो त्या वेळेस हि माहिती मला जगप्रवासी सुधीर नाडगौडा यांच्याशी बोलताना कळाली आणि मी अस्वस्थ झालो......

हा विषय मनातून जाईना....!

इतके प्रेम......!!

इतकी निस्सीम साथ पक्षाच्या विश्वात असते का.......????

Great..........¡¡

शहामृगाला आपल्या जोडीदाराचा मृत्यू सहनच होत नाही....
पण तो मृत्यू त्याला कळलाच नाही तर तो जगतो....
हे जग वेगळेच आहे.....
...
.....
.......
रोज सकाळी फिरायला जातो तेव्हा अशा माणसातल्या शहामृगाच्या जोड्या मला भेटतात....
मला खुप आवडत त्यांच्याकडे पहायला.
बरोबर साडेआठ वाजता एक आजोबा टी शर्ट, ट्रॅक पॅन्ट, स्वेटर घालून आपल्या केस पिकलेल्या सुरकुतलेल्या गोड आजीच्या हाताला धरून हळूहळू येतात.......
दोघांनाही कमी ऐकायला येते बहुतेक........
मोठ्यांदा बोलतात.
..
आजोबा काहीतरी विचारतात...
आज्जी वेगळेच ऐकतात....
मग...
काहीतरी बोलतात....
....
ते ऐकून आजोबा आज्जीकडे बघून मस्त हसतात....
..मला त्यांच्यात शहामृग दिसतो.

मला पुण्यातले आज्जी आजोबा फार आवडतात, बालगंधर्व ला नाटक बघायला जातो तेव्हा अशा शहामृगाच्या जोड्या असतातच.

आज्जीच्या छोट्याशा अंबाड्यावर किंवा पोनीवर मोगऱ्याचा मस्त सुगंधी गजरा असतो...
आजोबांनी आपल्या थरथरत्या हातानी तो माळलेला असतो, आजोबा कडक इस्त्रीच्या शर्ट पॅन्ट मध्ये असतात.
आज्जी सलवार कमीज नाहीतर नाजूक किनार असलेल्या साडीत असतात......
मध्यंतरात एकमेकांचा हात धरून ते हळुहळु बाहेर जातात......
बटाटेवडा खातात...
कॉफी पितात मग परत नाटक पाहायला आत येतात....
नाटक संपलं की एकमेकांना सांभाळत रिक्षातून घरी जातात.........
....
किती रसिक,
म्हातारपण आहे हे....!!
एकदा मिलिंद इगळेच्या गारवा या फेमस गाण्याच्या प्रोग्रामला गेलो होतो,
तर त्या प्रोग्रॅमला निम्याहून अधीक शहामृगाच्या जोड्याच होत्या......
....
यांना पिकली पानं म्हणणं म्हणजे त्यांच्यांतल्या तरुण मनाचा अपमान करण नाही काय...!

उद्या जर अरजितसिंगच्या गाण्याच्या कार्यक्रमात हे शहामृग दिसले तर मला बिलकुल आश्चर्य वाटणार नाही....
पुण्यातले आजीआजोबा अभीं तो,
'मै जवान हूं' या मानसिकतेतच राहतात नव्हे तसे जगतात...
...
माझं काय आता.... वय झालं.
संपल सगळं अस जगणं यांना मान्यच नाही,,,

my God,,,
इतकी पॉझिटिव्ह एनर्जी येते कुठून यांच्यात.....
...
*वृथ्दापकाळ असा गोङ असावा ; असे ज्यांना वाटत असेल , त्या पती पत्नींनी त्यांच्यातील नाते - तरुणपणापासूनच जपा . सुखी व्हाल .*
किती मस्त आहे ना हे शहामृगी प्रेम !!!!!!!!!!!* 💞

*छानच नां ....👌....!!!!!!!!
*व्हाट्सएप*

Comments

Popular posts from this blog

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्या तपकिरी गाई कड़े वळ

*नको देवराया अंत आता पाहू,,*

देवा ये लवकर तुझ्या पराक्रमाच्या गोष्टी खूप वाचल्या रे आमचा विश्वास ही आहेच त्यावर पण ये आता आता तूच या अदृश्य कोरोनाशी लढ आणि मुक्त कर☹ *प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी तू सदैव उभा राहतोस म्हणे,,* मग आमचे प्रयत्न दिसत नाही का रे देवा☹ जगाचा पालन कर्ता असलास तरी या भरतभूमीवर तुझं विशेष प्रेम,,सार जग सोडून तू तुझे सारे अवतार याच भरतवंशीयांसाठी सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच निर्दालन करण्यासाठी घेतलेस,,, *मग आजच असा निष्ठुर कठोर पाषाण हृदयी का झालास😏☹😡* अरे आम्ही तुझीच लेकरं ना रे मग आमची अवघ्या मनुष्य जातीची चाललेली परवड तुला दिसत नाही की अजून शेषशैये वरून उठायची वेळच झाली नाही की तुझा कुंभकर्ण झालाय देवा? *उठ रे दादा उठ*☹ मला माहिती आहे केवळ प्राण्यांची असलेली ही भूमी तू गुण्या गोविंदाने हे मनुष्यप्राणी ही राहतील या मोठया आशेने आम्हला ती  आंदण दिलीस☹ *पण आम्ही कपाळकरंटे रे ओरबाडली अक्षरशः ही भूमी ओरबाडली*😏😡 जीवन जगण्याच्या स्पर्धेत *आमचा बकासुर कधी झाला* ते आमचं आमच्याच कळलं नाही *आमचा हव्यास कधी संपेल माहिती नाही* आमची आयुष्य एकमेकांचा धर्म उणिदुनी काढण्यातच जाणा

राजा-माकड-आणि आपण ,,,

हि आहे एका आळशी आणि बुद्धू राजाची गोष्ट एकदा ह्या राजाला एक माकड काही तरी मदत करते. आणि त्यामुळे राजा त्याला आपला सेवक म्हणून तैनात करतो. प्रधान हे पाहून वैतागतो,राजाला समजावण्याचा प्रयत्न करतो पण राजा मानत नाही, प्रधान कपाळावर हात मारतो-  एकदा-दोनदा-तिनदा... असे ब-याचदा होते. एके दिवशी राजा झोपलेला असतो, माकड वारा घालत असते. एक माशी सारखी राजाच्या नाकावर बसायचा प्रयत्न करते. माकड तिला हकलायचा प्रयत्न करते, पण तरी ती पुन्हा पुन्हा येते म्हणून शेवटी चिडून माकड राजाच्या तलवारीने तिला मारायचा प्रयत्न करतो... आणि... राजाचे नाकच कापले जाते.. प्रधानजी हसतो... तात्पर्य -- ज्यांची लायकी नाही पात्रता नाही अशांच्या हातात जबाबदारी सोपवली कि काय होत ते हि गोष्ट सांगते ??,,,,,,,,,,,, आज नेमकी हि गोष्ट आठवायचं कारण ,,, शक्ती मिल कंपाउंड मध्ये जो फोटोग्राफर मुलीवर बलात्कार झाला त्यावर ईथे नेहमी प्रमाणे येवून सगळ्यांनी आपापली मत मांडली नेहमी प्रमाणे बांगड्या भरा ,चपलेने बडवा ,सरकार नालायक अशी मत मांडली गेली पण हि झाली फक्त चर्चा याच्या मुळाशी कुणीच प्रयत्न करू ईच्छित नाही आणि नेमकी कधी काळी वाचलेल