Skip to main content

गटारी नव्हे दीप अमावस्या 3

 *शरीर सुदृढ आणि मन निकोप ठेवायचं असेल तर ,,,*
*शरीर रुपी ज्योतीला सुदृढ करण्यासाठी व्यायामाचा दिवा घासून पुसून नित्य पूजा हि केलीच पाहिजे*
काल परवा पासून आषाढ अमावस्या काय ते मेसेज येत आहेत
एक बर बहुतेक सारे हि आषाढ अमावस्या आहे हिला गटारी म्हणू नका वैगेरे सांगू लागले आहे बोलू लागले आहेत आणि तसे वागू हि लागले आहेत
पण,,,
मला उमजला तो अर्थ इथे सांगू इच्छितो,,
*दिवे दुधाने धुवावेत,,, म्हणजे शरीर रुपी प्राणज्योतीला रोज दूधच पाजा*
चहा नकोच,,,,😊
*पाटावर शुभ्रवस्त्र अंथरून त्याची पूजा करावी,,,, म्हणजे सकाळी उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे घालून व्यायाम करावा*
वेगवेगळी फुल वाहण्या ऐवजी तसे वेगवेगळे व्यायाम करावा,,,😊
*गोडाचा नैवेद्य,, म्हणजे जे काही गोड खाल ते नैवेद्या प्रमाणे सेवन करावे*
अती गोड नकोच,,,😊
*घरातील प्रत्येकाला औक्षण करावे,,, जस तुम्ही व्यायाम करायला सुरुवात केली आहे त्याच प्रमाणे घरातील इतरांना व्यायाम करावयास प्रवृत्त करा,,,*

*दुर्वा हे वंशवृद्धीचे प्रतीक,,नेमकेगणराय याच भूमीतले   साक्षात अग्निच मग त्याला शांत करण्यासाठी दुर्वांचा रस हा रोज प्यावा*
चिल्ड बियर रम व्हिस्की आदी तत्सम प्रकार म्हणजे आगच जी तुम्ही पोटात घालूच नये,,😊

*घरातील सुवासिनी सगळे दिवे एकत्र करून भोवतीरांगोळी घालून दिवे लावतात,, इथे एक प्रसंग खूप छान आहे,, श्यामची आई चित्रपटातील सारे मित्र आल्या बरोबर श्याम लपतो कारण त्याला पाण्याची भीती वाटत असते,, त्यावेळी त्याची आई कठोर होते आणि छडीने फोडते ती म्हणते माझा मुलगा 'ढ' अस सार गाव म्हंटल तरी चालेल पण माझा मुलगा 'घाबरट' आहे असं म्हंटलेलं बिलकुल चालणार नाही*
आपल्या घराच्या आरोग्यासाठी सुवासिनींन कडून हीच पूजा अपेक्षित आहे,,,😊

*पुढे पंचपक्वणांचा नैवेद्य दाखवला जातो,, म्हणजे अशा प्रकारे रोज व्यायाम केल्यावर वेगवेगळा आहार ठेवावा*
शिळ पाक उरलं सुरल अन्न हॉटेल रस्त्यावर खाऊ नये,,😊

*हे सारं करताना अर्थातच आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की ही जे काही जीवन ज्योत आपल्याला मिळालेली आहे ती आणखी एका दिव्य ज्योती कडूनच आणि हि ज्योत सर्वसाक्षी परमेश्वरच सूर्य नारायण जो स्वतः तेजोमय आहे आणि तेजाची आरती तेजानेच केली पाहिजे*
😊 *मग अर्थातच तेज कमवाव लागत ते कुठल्या बाजारात किंवा मेडिक्लेम पॉलिसीत नसत*

आणि हे सारं केलंत तरच
*"दीप सूर्यअग्निरूपसत्व तेजासां तेज उत्तमम | गृहाण मत्कृता पुजा सर्वकामप्रदो भव ||"*
अर्थ-- हे दीप तू सूर्यरूप अग्निरूप आहेस तेजा मध्ये तू उत्तम तेज आहेस माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि इच्छा पूर्ण कर,,,
म्हणजेच
*तुम्हला जर तेजाला हे आवाहन करायचं असेल की माझी प्रार्थना तू कबूल कर तर आधी तुम्ही प्रकाशमान झालं पाहिजे ताकदवान झालं पाहिजे सुदृढ शरीर झालं पाहिजे*
आणि मगच,,
गुरुजी जी प्रार्थना घेतात
*धर्मासाठी झुंझावे म्हणजे नक्की काय ते कळेल ते झुंजन म्हणजे फेसबुक व्हाट्स अप वर भांडण खण्डन करण्यात वेळ घालवणं नव्हे,,,*
बघा जमलं तर
मानामनातील अंधार मरगळ दूर करा
हिंदुत्वच रक्षण आपोआप होईल
जय श्रीराम
भूमकर
सुनील प्रभाकर भूमकर
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मुंबई

Comments

Popular posts from this blog

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्या तपकिरी गाई कड़े वळ

*नको देवराया अंत आता पाहू,,*

देवा ये लवकर तुझ्या पराक्रमाच्या गोष्टी खूप वाचल्या रे आमचा विश्वास ही आहेच त्यावर पण ये आता आता तूच या अदृश्य कोरोनाशी लढ आणि मुक्त कर☹ *प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी तू सदैव उभा राहतोस म्हणे,,* मग आमचे प्रयत्न दिसत नाही का रे देवा☹ जगाचा पालन कर्ता असलास तरी या भरतभूमीवर तुझं विशेष प्रेम,,सार जग सोडून तू तुझे सारे अवतार याच भरतवंशीयांसाठी सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच निर्दालन करण्यासाठी घेतलेस,,, *मग आजच असा निष्ठुर कठोर पाषाण हृदयी का झालास😏☹😡* अरे आम्ही तुझीच लेकरं ना रे मग आमची अवघ्या मनुष्य जातीची चाललेली परवड तुला दिसत नाही की अजून शेषशैये वरून उठायची वेळच झाली नाही की तुझा कुंभकर्ण झालाय देवा? *उठ रे दादा उठ*☹ मला माहिती आहे केवळ प्राण्यांची असलेली ही भूमी तू गुण्या गोविंदाने हे मनुष्यप्राणी ही राहतील या मोठया आशेने आम्हला ती  आंदण दिलीस☹ *पण आम्ही कपाळकरंटे रे ओरबाडली अक्षरशः ही भूमी ओरबाडली*😏😡 जीवन जगण्याच्या स्पर्धेत *आमचा बकासुर कधी झाला* ते आमचं आमच्याच कळलं नाही *आमचा हव्यास कधी संपेल माहिती नाही* आमची आयुष्य एकमेकांचा धर्म उणिदुनी काढण्यातच जाणा

राजा-माकड-आणि आपण ,,,

हि आहे एका आळशी आणि बुद्धू राजाची गोष्ट एकदा ह्या राजाला एक माकड काही तरी मदत करते. आणि त्यामुळे राजा त्याला आपला सेवक म्हणून तैनात करतो. प्रधान हे पाहून वैतागतो,राजाला समजावण्याचा प्रयत्न करतो पण राजा मानत नाही, प्रधान कपाळावर हात मारतो-  एकदा-दोनदा-तिनदा... असे ब-याचदा होते. एके दिवशी राजा झोपलेला असतो, माकड वारा घालत असते. एक माशी सारखी राजाच्या नाकावर बसायचा प्रयत्न करते. माकड तिला हकलायचा प्रयत्न करते, पण तरी ती पुन्हा पुन्हा येते म्हणून शेवटी चिडून माकड राजाच्या तलवारीने तिला मारायचा प्रयत्न करतो... आणि... राजाचे नाकच कापले जाते.. प्रधानजी हसतो... तात्पर्य -- ज्यांची लायकी नाही पात्रता नाही अशांच्या हातात जबाबदारी सोपवली कि काय होत ते हि गोष्ट सांगते ??,,,,,,,,,,,, आज नेमकी हि गोष्ट आठवायचं कारण ,,, शक्ती मिल कंपाउंड मध्ये जो फोटोग्राफर मुलीवर बलात्कार झाला त्यावर ईथे नेहमी प्रमाणे येवून सगळ्यांनी आपापली मत मांडली नेहमी प्रमाणे बांगड्या भरा ,चपलेने बडवा ,सरकार नालायक अशी मत मांडली गेली पण हि झाली फक्त चर्चा याच्या मुळाशी कुणीच प्रयत्न करू ईच्छित नाही आणि नेमकी कधी काळी वाचलेल