Skip to main content

आज सकाळी सिंधुची दिनचर्या वाचली आणि,,,

*आज सकाळी २१ वर्षाच्या सिंधुची गेल्या ४/५ महिन्यातली दिनचर्या वाचली अन,,*

ऑलिम्पिकच्या निमित्ताने पुन्हा एकदा सिंधूसंस्कृतीचा उदय झाला आहे सारा देश रिओ ने झापटला होता हे 70 वर्षात पहिल्यांदाच अनुभवयास मिळालं
आता प्रश्न असा आहे की,,
चीन टोकियो सारखे देश जिथे वयाच्या चौथ्या वर्षी मानसी एक मूल ऑलिम्पिक साठी निवडले जाते आणि 12 वर्षाच्या खडतर तापश्चर्ये नन्तर त्याला ओलिम्पिकला धाडले जाते अशा देशांशी टक्कर द्यायला
आपले भारतीय जातात निवडले जातात *हेच खरं सुवर्णपदक जिंकल्यासारखं आहे*

*डे बाय डे आपली शोभा करवून घेणाऱ्या निलाजर्यांना काय कळणार??*
गेल्या ४/५दिवसात एक छान वाक्य फिरतंय,,,
*आता पदकं देखील फक्त बायकांनीच जिंकून आणायची का??😊*
विचार करण्या जोग आहे
निदान आपल्या देशात तरी परिस्थिती खूप अवघड आहे
घरकाम,शाळा ,कॉलेज,अभ्यास ,नवरा ,कुटुंब, नोकरी,धंदा सांभाळत
वर पदक देखील जिंकून आणायची??
आणि आपल्यकडे  एखादी मोठी स्पर्धा आली की जाग व्हायचं बास,,
परवाच वाचनात आलं ब्रिटन *ऑलिम्पिक साठी निवडल्या जाणाऱ्या खेळाडूंवर किमान ५० लाख पौंड खर्च करते*
चीन जापान टोकियो आणि इतर सारे
देश यांच्या यशाचं गुपित यातच लपल आहे,,
*आणि आपल्याकडे नेमकं काय चित्र दिसत??*
खरं तर यावर बोलू नये अशी परिस्थिती आहे,,
*लाईटबिल जास्त आहे अच्छा आधी भरा मग पुढच्या बिलात कमी करू असा कारभार*
आता त्या सिंधू दीपा साऱ्या जणीवर पैशांचा वर्षाव होईल अरे आधी का नाही *गुंतवणूक हा देखील कमाईचा मार्ग असतो हे आम्हाला मान्यच नाही*
देशाचं आपण देणं लागत असू तर निश्चितच देश हि काही देणं लागतोच ना??
का फक्त
*तुम्ही सबसिडी परत करा आम्ही ती आपसात वाटून घेऊ चा मंत्र जपणार आहोत??*
ऑलिम्पिक आपल्या देशात होईल
हे दिवास्वप्न असलं तरी निदान
ऑलिम्पिक पदक तरी किमान शेकड्यांनी आली पाहीजेत हे स्वप्न तरी नक्कीच देशबांधवा ने बाळगलं तरच
*सिंधुसंस्कृतीचा जपली जाईल*
पण साऱ्यांनीच मानसिकता बदलणं गरजेचं आहे
कारण सर्वसामान्य लोक आज ऑलिम्पिक पदक जिंकूनही आपल्या मुलांच्या बाबती
नकारात्मक विचारच करतात
ते विचारतात
*सुनील बता मुझे ये दौडनेसे ये सब खेलनसे क्या होणे वाला है??😳😷*
भूमकर
सुनील प्रभाकर भूमकर
एक पालक

Comments

Popular posts from this blog

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्या तपकिरी गाई कड़े वळ

*नको देवराया अंत आता पाहू,,*

देवा ये लवकर तुझ्या पराक्रमाच्या गोष्टी खूप वाचल्या रे आमचा विश्वास ही आहेच त्यावर पण ये आता आता तूच या अदृश्य कोरोनाशी लढ आणि मुक्त कर☹ *प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी तू सदैव उभा राहतोस म्हणे,,* मग आमचे प्रयत्न दिसत नाही का रे देवा☹ जगाचा पालन कर्ता असलास तरी या भरतभूमीवर तुझं विशेष प्रेम,,सार जग सोडून तू तुझे सारे अवतार याच भरतवंशीयांसाठी सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच निर्दालन करण्यासाठी घेतलेस,,, *मग आजच असा निष्ठुर कठोर पाषाण हृदयी का झालास😏☹😡* अरे आम्ही तुझीच लेकरं ना रे मग आमची अवघ्या मनुष्य जातीची चाललेली परवड तुला दिसत नाही की अजून शेषशैये वरून उठायची वेळच झाली नाही की तुझा कुंभकर्ण झालाय देवा? *उठ रे दादा उठ*☹ मला माहिती आहे केवळ प्राण्यांची असलेली ही भूमी तू गुण्या गोविंदाने हे मनुष्यप्राणी ही राहतील या मोठया आशेने आम्हला ती  आंदण दिलीस☹ *पण आम्ही कपाळकरंटे रे ओरबाडली अक्षरशः ही भूमी ओरबाडली*😏😡 जीवन जगण्याच्या स्पर्धेत *आमचा बकासुर कधी झाला* ते आमचं आमच्याच कळलं नाही *आमचा हव्यास कधी संपेल माहिती नाही* आमची आयुष्य एकमेकांचा धर्म उणिदुनी काढण्यातच जाणा

राजा-माकड-आणि आपण ,,,

हि आहे एका आळशी आणि बुद्धू राजाची गोष्ट एकदा ह्या राजाला एक माकड काही तरी मदत करते. आणि त्यामुळे राजा त्याला आपला सेवक म्हणून तैनात करतो. प्रधान हे पाहून वैतागतो,राजाला समजावण्याचा प्रयत्न करतो पण राजा मानत नाही, प्रधान कपाळावर हात मारतो-  एकदा-दोनदा-तिनदा... असे ब-याचदा होते. एके दिवशी राजा झोपलेला असतो, माकड वारा घालत असते. एक माशी सारखी राजाच्या नाकावर बसायचा प्रयत्न करते. माकड तिला हकलायचा प्रयत्न करते, पण तरी ती पुन्हा पुन्हा येते म्हणून शेवटी चिडून माकड राजाच्या तलवारीने तिला मारायचा प्रयत्न करतो... आणि... राजाचे नाकच कापले जाते.. प्रधानजी हसतो... तात्पर्य -- ज्यांची लायकी नाही पात्रता नाही अशांच्या हातात जबाबदारी सोपवली कि काय होत ते हि गोष्ट सांगते ??,,,,,,,,,,,, आज नेमकी हि गोष्ट आठवायचं कारण ,,, शक्ती मिल कंपाउंड मध्ये जो फोटोग्राफर मुलीवर बलात्कार झाला त्यावर ईथे नेहमी प्रमाणे येवून सगळ्यांनी आपापली मत मांडली नेहमी प्रमाणे बांगड्या भरा ,चपलेने बडवा ,सरकार नालायक अशी मत मांडली गेली पण हि झाली फक्त चर्चा याच्या मुळाशी कुणीच प्रयत्न करू ईच्छित नाही आणि नेमकी कधी काळी वाचलेल