Skip to main content

वेळ कशी बदलते पहा--अरनॉल्ड

जगप्रसिद्ध बाॅडीबिल्डर, माजी गव्हर्नर, हाॅलीवूड स्टार अभिनेता अरनॉल्ड श्वार्झनेगर यांनी त्यांच्या स्वतःच्या पुतळ्याखाली रस्त्यावर झोपलेला एक छायाचित्र पोस्ट केल आणि खिन्नपणे लिहिली *वेळ कशी बदलते*.. त्याने हे वाक्य लिहिले कारण तो फक्त वृद्ध झालाय म्हणून नव्हे परंतु तो कॅलिफोर्नियाचा गव्हर्नर असताना त्याने या स्वतःच्या शिल्पाचे अनावरण केले होते..    एका हॉटेल प्रशासनाला स्वतःचे शिल्प ठेवण्याची परवानगी दिली होती तेव्हा हॉटेल अधिकार्यांनी अरनाॅल्डला सांगितले की  *"कोणत्याही वेळी आपण येऊन आपल्या नावावर एक खोली आरक्षित करू शकता"*. पण हल्ली जेव्हा अरनॉल्ड हॉटेल मध्ये रूम बुक करण्यास गेले तेव्हा हाॅटेल प्रशासनाने त्यांना हॉटेल पूर्णपणे बुक असल्याबद्दल सांगितले त्यामुळे कोणतीही रूम आपणास मिळू शकणार नाही असे असे सांगितले...
मग अरनॉल्डनी एक कव्हर आणले आणि स्वतःच्या पुतळ्याखाली झोपले आणि लोकांना कल्पना करायला सांगितले मी असा का पुतळ्या शेजारी झोपलो आहे ...?
ते सांगू इच्छित होता की जेव्हा माझ्याकडे पद होते तेव्हा लोकं माझी स्तुती करत होते आणि जेव्हा मी पद गमविले , तेव्हा हाॅटेल प्रशासन ते वचन विसरले आणि त्यांनी आपले वचन पूर्ण केले नाही....
 *होय, वेळ बदलली आहे.*
आपल्या स्थितीवर किंवा  आपल्या शक्तीवर किंवा आपल्या बुद्धिमत्तावर कधी अतिविश्वास ठेवू नका. हे सर्व टिकणार नाही.
आपल्या पदाचा , सत्तेचा , संपत्तीचा कधीही गर्व करू नका कारण हे शाश्वत नाही .

Comments

Popular posts from this blog

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्या तपकिरी गाई कड़े वळ

*नको देवराया अंत आता पाहू,,*

देवा ये लवकर तुझ्या पराक्रमाच्या गोष्टी खूप वाचल्या रे आमचा विश्वास ही आहेच त्यावर पण ये आता आता तूच या अदृश्य कोरोनाशी लढ आणि मुक्त कर☹ *प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी तू सदैव उभा राहतोस म्हणे,,* मग आमचे प्रयत्न दिसत नाही का रे देवा☹ जगाचा पालन कर्ता असलास तरी या भरतभूमीवर तुझं विशेष प्रेम,,सार जग सोडून तू तुझे सारे अवतार याच भरतवंशीयांसाठी सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच निर्दालन करण्यासाठी घेतलेस,,, *मग आजच असा निष्ठुर कठोर पाषाण हृदयी का झालास😏☹😡* अरे आम्ही तुझीच लेकरं ना रे मग आमची अवघ्या मनुष्य जातीची चाललेली परवड तुला दिसत नाही की अजून शेषशैये वरून उठायची वेळच झाली नाही की तुझा कुंभकर्ण झालाय देवा? *उठ रे दादा उठ*☹ मला माहिती आहे केवळ प्राण्यांची असलेली ही भूमी तू गुण्या गोविंदाने हे मनुष्यप्राणी ही राहतील या मोठया आशेने आम्हला ती  आंदण दिलीस☹ *पण आम्ही कपाळकरंटे रे ओरबाडली अक्षरशः ही भूमी ओरबाडली*😏😡 जीवन जगण्याच्या स्पर्धेत *आमचा बकासुर कधी झाला* ते आमचं आमच्याच कळलं नाही *आमचा हव्यास कधी संपेल माहिती नाही* आमची आयुष्य एकमेकांचा धर्म उणिदुनी काढण्यातच जाणा

राजा-माकड-आणि आपण ,,,

हि आहे एका आळशी आणि बुद्धू राजाची गोष्ट एकदा ह्या राजाला एक माकड काही तरी मदत करते. आणि त्यामुळे राजा त्याला आपला सेवक म्हणून तैनात करतो. प्रधान हे पाहून वैतागतो,राजाला समजावण्याचा प्रयत्न करतो पण राजा मानत नाही, प्रधान कपाळावर हात मारतो-  एकदा-दोनदा-तिनदा... असे ब-याचदा होते. एके दिवशी राजा झोपलेला असतो, माकड वारा घालत असते. एक माशी सारखी राजाच्या नाकावर बसायचा प्रयत्न करते. माकड तिला हकलायचा प्रयत्न करते, पण तरी ती पुन्हा पुन्हा येते म्हणून शेवटी चिडून माकड राजाच्या तलवारीने तिला मारायचा प्रयत्न करतो... आणि... राजाचे नाकच कापले जाते.. प्रधानजी हसतो... तात्पर्य -- ज्यांची लायकी नाही पात्रता नाही अशांच्या हातात जबाबदारी सोपवली कि काय होत ते हि गोष्ट सांगते ??,,,,,,,,,,,, आज नेमकी हि गोष्ट आठवायचं कारण ,,, शक्ती मिल कंपाउंड मध्ये जो फोटोग्राफर मुलीवर बलात्कार झाला त्यावर ईथे नेहमी प्रमाणे येवून सगळ्यांनी आपापली मत मांडली नेहमी प्रमाणे बांगड्या भरा ,चपलेने बडवा ,सरकार नालायक अशी मत मांडली गेली पण हि झाली फक्त चर्चा याच्या मुळाशी कुणीच प्रयत्न करू ईच्छित नाही आणि नेमकी कधी काळी वाचलेल