Skip to main content

भगवान श्री परशुरामाचा शाप ,बुद्धी आणि आपण

आज तक तेज वर संजय सिन्हा रोजच गोष्ट सांगत असतात आज त्यांच्या एका परिचिताची गोष्ट , एक दिवस त्यांचे एक परिचित त्यांना फोन करून त्यांच्या घरगुती समस्येबद्दल बोलतात मुलाची तक्रार करतात की मुलगा हाता बाहेर चालला आहे पैसे काय उधळतो लहान सहान गोष्टीवरून घरात बहीण बघत नाही आई लगेच धावून जातो आकांड तांडव करतो
मला काही तरी उपाय सांगा काय करू माझं तर डोकच चालायचं बंद झालंय? मी काय करू करता सावरता मुलगा असा हातून निसटून जातोय आणि मी काहीच करू शकत नाही बुद्धी भ्रष्ट झालीय काय करू काही उपाय सांगा?
तो फोन वर बोलत होता आणि इकडे ते ऐकत गप्प झालो होतो
मला माझे आणि त्या परिचिताचे दिल्लीत कामाला तरुणपणातील दिवस आठवत होते आम्ही दोघेही एकदमच दिल्लीत आलो होतो त्यावेळी माझ्या वडिलांनी सल्ला दिला होता *संजय खूप पैसे कमविशील इतकं तुझं शिक्षण झालं नक्कीच आहे मात्र किती आणि कसे ते मात्र तू ठरव,,,,*
मी अगदी त्याच रस्त्यावर नेटाने चालायचा प्रयत्न करत होतो आणि तो परिचित मात्र माझी टिंगल उडवत असे संजयजी तुम्ही गरिबी पाहिलेली नाही गरिबीचे चटके काय असतात तुम्हला माहीत नाही पैशाशिवाय पान हलत नाही पैसा भगवान नही पर भगवान से कम नही ,, काय काय ऐकवून तो माझी विचारांची खिल्ली उडवत असे
आज तोच माणूस मला फोन करून *माझी बुद्धी काम करत नाहीये काय करू सांगा असा सल्ला विचारत होता*
संजयजी ऐकताय ना? काही उपाय सांगा हो? तो बोलत होता आणि मी मात्र,,कर्ण आणि भगवान श्री परशुराम यांची कथा आठवत होतो,,,
ज्येष्ठ पांडव असूनही कपाळी भोग लिहून आलेला कर्ण एका रथ ओढणाऱ्या घोड्याला खरारा करणाऱ्या घरात लहानाचा मोठा होतो पण कर्णला आपला बाप जस आयुष्य जगत असतो ते त्याला मान्य नसत त्याला देखील राजकुमाराला शोभेस जीवन जगायचं असत मान मरातब मिळवायचा असतो पण नशीब,गरिबी आणि त्याची जात आडवी येते आधी तो द्रोणाचार्यांकडे जातो तर ते त्याला नाकारता की मी फक्त राजकुमारांना शिकवतो,,, मग पुढे तो परशुरामांकडे जातो तर ते ही त्याला नाकारतात ,मी फक्त ब्राम्हणांना शिकवतो अस सांगून टाळतात पण आता माघार नाही असं म्हणत कर्ण त्यांना खोटंच संगतो की होय मी ब्राम्हण आहे ,,, पुढे तो परशुरामाचा लाडका शिष्य होतो खूप विद्या तो त्यांच्याकडून शिकून घेतो उत्तम धनुर्धर होतो ,, पण नियती डूख धरून बसलेली च असते,,,
एक दिवस गुरू शिष्य जंगलात गेले असता
नियती परीक्षा घेतेच आणि कर्ण त्यात सपशेल नापास होतो
गुरू गर्जतात इतकी सहन करायची ताकद ब्राम्हणात नाहीच नाही खर खर सांग तू कोण आहेस? अर्थातच कर्ण खर खर सांगतो ,आणि संतापलेले भगवान परशुराम त्याला शाप देतात ,, जा इथे आता पळभर ही थांबू नकोस तुला वाटत असेल तू मला फसवून माझ्याकडून विद्या शिकून घेतलीस आता ती तुला जन्मभर पुरेल,, तर तुला सांगतो *ज्याक्षणी या विद्येची खरी गरज असेल त्याचक्षणी तू ही विद्या विसरून जाशील हतबल होशील हाती धनुष्य असून देखील प्रत्यांचा ओढायचा कसा हेच विसरून जाशील तुझी बुद्धीच काम करेंनाशी होईल*
तिकडून तो मित्र विचारत होता संजय मित्रा बोल काही तरी उपाय सांग ,,,काय सांगू?
मलाच प्रश्न पडला होता की काय सांगू?
तरीही धीर एकवटून त्याला बोललो की ,
तुझा मुलगा वाईट वागतोय याच आश्चर्य नाही, तुझी बुद्धी चलेनाशी झालीय याच आश्चर्य वाटतंय? तो म्हणाला म्हणजे? मी म्हणलो मी काय बोलू मित्रा तू समजदार आहेस ,,,,,?
 *ज्या ज्या कशी आपण हतबल होतो बुद्धी चलेनाशी होते
आपली मुलबाळ जी आपली शान असतात ती अशी वागतात? त्यावेळी प्रामाणिक पणे आठवायचं असत की खरच मी प्रामाणिकपणे जगतो का? कुणाशी लांडी लबाडी करून पैसे तर कमवत नाही ना?खोटी कागद पत्र सादर करून पैसे तर कमवत नाही ना? शेवटी जे करत असतो ते सुखी आंनदी जगण्यासाठीच ना?*
तात्पर्य:- केवळ दुसऱ्याकडे श्रीमंती आहे म्हणून ती मला ही मिळालीच पाहिजे असं जेव्हा केव्हा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आशा घटना घडतात तेव्हा आपली मती काम करेंनाशी होते तेव्हा मनात भगवान परशुरामांना आठवायचं जशी कर्ण ने खोट बोलून विद्या मिळवतो उत्तम धनुर्धर होतो तसे खोटे नाटे व्यवहार करून आपण माया तर जमवली नाही ना?
खोटे कागद पत्र करून कुठल्या जमीनी तर बळकवल्या नाही ना? कुणाला तरी बेघर करून आपल्या डोक्यावर तर छप्पर आलं नाही ना? अगदी सध्या शब्दात सांगायचे तर जस दर वर्षाला इन्कमटेक्स भरतो तेव्हा मागील बाकी पुढच्या वर्षात मिळवतो अगदी तसेच मनुष्य जन्म घेताना नवे आयुष्य गत जन्मातील पापपूण्या पेटारा सोबत घेऊनच येत असतो ते भोग भोगायचे असतात या जन्मात आणखी त्यात भर घालायची नसते परंतु मीच का ?
हा प्रश्न आला की पुढची सारी गणित बिघडतात आणि एक दिवस बुद्धी चालेनाशी होते.

Comments

Popular posts from this blog

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्या तपकिरी गाई कड़े वळ

*नको देवराया अंत आता पाहू,,*

देवा ये लवकर तुझ्या पराक्रमाच्या गोष्टी खूप वाचल्या रे आमचा विश्वास ही आहेच त्यावर पण ये आता आता तूच या अदृश्य कोरोनाशी लढ आणि मुक्त कर☹ *प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी तू सदैव उभा राहतोस म्हणे,,* मग आमचे प्रयत्न दिसत नाही का रे देवा☹ जगाचा पालन कर्ता असलास तरी या भरतभूमीवर तुझं विशेष प्रेम,,सार जग सोडून तू तुझे सारे अवतार याच भरतवंशीयांसाठी सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच निर्दालन करण्यासाठी घेतलेस,,, *मग आजच असा निष्ठुर कठोर पाषाण हृदयी का झालास😏☹😡* अरे आम्ही तुझीच लेकरं ना रे मग आमची अवघ्या मनुष्य जातीची चाललेली परवड तुला दिसत नाही की अजून शेषशैये वरून उठायची वेळच झाली नाही की तुझा कुंभकर्ण झालाय देवा? *उठ रे दादा उठ*☹ मला माहिती आहे केवळ प्राण्यांची असलेली ही भूमी तू गुण्या गोविंदाने हे मनुष्यप्राणी ही राहतील या मोठया आशेने आम्हला ती  आंदण दिलीस☹ *पण आम्ही कपाळकरंटे रे ओरबाडली अक्षरशः ही भूमी ओरबाडली*😏😡 जीवन जगण्याच्या स्पर्धेत *आमचा बकासुर कधी झाला* ते आमचं आमच्याच कळलं नाही *आमचा हव्यास कधी संपेल माहिती नाही* आमची आयुष्य एकमेकांचा धर्म उणिदुनी काढण्यातच जाणा

राजा-माकड-आणि आपण ,,,

हि आहे एका आळशी आणि बुद्धू राजाची गोष्ट एकदा ह्या राजाला एक माकड काही तरी मदत करते. आणि त्यामुळे राजा त्याला आपला सेवक म्हणून तैनात करतो. प्रधान हे पाहून वैतागतो,राजाला समजावण्याचा प्रयत्न करतो पण राजा मानत नाही, प्रधान कपाळावर हात मारतो-  एकदा-दोनदा-तिनदा... असे ब-याचदा होते. एके दिवशी राजा झोपलेला असतो, माकड वारा घालत असते. एक माशी सारखी राजाच्या नाकावर बसायचा प्रयत्न करते. माकड तिला हकलायचा प्रयत्न करते, पण तरी ती पुन्हा पुन्हा येते म्हणून शेवटी चिडून माकड राजाच्या तलवारीने तिला मारायचा प्रयत्न करतो... आणि... राजाचे नाकच कापले जाते.. प्रधानजी हसतो... तात्पर्य -- ज्यांची लायकी नाही पात्रता नाही अशांच्या हातात जबाबदारी सोपवली कि काय होत ते हि गोष्ट सांगते ??,,,,,,,,,,,, आज नेमकी हि गोष्ट आठवायचं कारण ,,, शक्ती मिल कंपाउंड मध्ये जो फोटोग्राफर मुलीवर बलात्कार झाला त्यावर ईथे नेहमी प्रमाणे येवून सगळ्यांनी आपापली मत मांडली नेहमी प्रमाणे बांगड्या भरा ,चपलेने बडवा ,सरकार नालायक अशी मत मांडली गेली पण हि झाली फक्त चर्चा याच्या मुळाशी कुणीच प्रयत्न करू ईच्छित नाही आणि नेमकी कधी काळी वाचलेल