Skip to main content

*शांताबाई-स्वाभिमान आणि आरक्षण*

गोष्ट तशी अलिकडचीच
कोल्हारपुरातील गडहिंग्लज गावातील 70 वर्षीय *नाभिक समाजातील* शांताबाई यादवांची,,
12 व्या वर्षी लग्न झालेल्या शांताबाई ऐन 30त च विधवा झाल्या पदरी चार मुली वडिलोपार्जित 3 एकर दिराने बळकवलेली
अशा स्थितीत कुणावरही अवलंबून न राहता नवऱ्याचा पारंपरिक व्यवसाय सुरू केला परन्तु *एक बाई केस कापणार?*
चार मुली आणि गरिबी सोबत आता समाजाच्या तर्फे कुचाळक्या,अवहेलना,बदनामीच पदरी पडली,,, आणि
*एकेदिवशी नाट्यमय घटना घडली,,,*
गावातील एक प्रतिष्ठित व्यक्ती (बहुदा सरपंच) हरिभाऊ कडूकर या सद्गृहस्तान शांताबाईंना भर चौकात बोलावलं आणि त्या माऊलीला आपली दाढी कटिंग करायला सांगितली विस्फारलेल्या नजरेने सार गाव ती घटना पहात होत, दाढी कटिंग झाली *हरिभाऊंनी आपली सारी प्रतिष्ठा पणाला लावून लोकांना आवाहन केलं या बाईंनी स्वाभिमानाने जगण्यासाठी हा व्यवसाय सुरू केला आहे त्यांची कुचेष्टा अवहेलना मी खपवून घेणार नाही आशा तर्हेने त्या बाईंच्या कामाला प्रतिष्ठा मिळवून दिली* पुढे त्यावर अजय कुरणे यांनी *बलुत* नावाचा लघुपट ही काढला,,
आज हे सारं आठवायचं कारण,,,
आरक्षण गोंधळ जो अभूतपूर्व चालू आहे,,
*माझा मा श्री बाळासाहेबांच्या आरक्षण भूमिकेला पूर्ण पाठिंबा आहे आरक्षण फक्त आणि फक्त आर्थिक निकषावर ,,*
असो दुर्दैवाने हे कुणाला मान्य नाही,
*एक मराठा लाख मराठा देखील आरक्षण रद्दच करा ची ठाम भूमिका घेत नाही,*
*समान नागरी कायदा आणण्याची ताकद 56 इंच मध्ये ही नाही,*
पण मराठा आरक्षण आंदोलनातला एक *महत्वाचा प्रश्न आहे की bc ला फी कमी जवळ पास नाहीच पण आम्हला मात्र न परवडणारी फी भरावी लागते त्या अभावी
आम्ही शिक्षण घेऊ शकत नाही त्यामुळे पुढे नोकऱ्या नाही,,,* ( ज्वलंत प्रश्न)
मग आज समस्त मराठा समाजाने जो *मराठा धनिक वर्ग आहे* त्यांनी हरिभाऊ कडुकर यांची भुमीका घ्यायला काहीच हरकत नाही श्री कडुकर यांनी जस शांताबाई यांच्या व्यवसायला सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली आपलं वजन वापरून अनेक मराठ्यांची जी कॉलेजेस आहेत त्यात या गरीब होतकरू मुलांना
त्यांना परवडेल अशी फी घेऊन शिक्षण द्यायला काय हरकत नसावी समाजाने समाजाच ऋण फेडायची ही नामी संधी आहे त्यातही जमत नसेल तर मराठा समाजाने आपल्याच गरीब बांधवांना मदत करून व्यवसायिक बनण्यास ही मदत करता येऊ शकेल,
*मराठा समाजाच्या बॅंका, पतसंस्था, साखर कारखाने, कृषी उत्पन्न समित्या,सूत गिरण्या, हातमाग, सहकारी सूत गिरण्या, दूध उत्पादक संघ, सहकारी मार्केटिंग, कॉलेजेस, दन्त महाविद्यालये, बाजार समित्या, पेट्रोल पम्प, मद्याचे कारखाने,
1960 पासूनचे काँगेस काळातील ते आज पर्यंतचे मराठा आमदार खासदार*
आपल्या जातीतल्या नेत्यांना आपण मोठं केलं. पण त्यांनी फक्त स्वत:चे घर भरलेत. स्वत:च्या मुलांना नातेवाईकांना मोठं केलं. आणि आपण मात्र राहिलो अल्पभूधारकच, द्रारिद्र्यरेषेखालीच, गरीबच.
आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आणि गरीब मराठ्यांच्या परिस्थितीसाठी कारणीभूत हे आपलेच सरंजामी नेते आहेत. दुसरे कुणी नाही. म्हणून आता तरी जागा हो मराठ्या.
एका तरी गरीब मराठा मुलाला यांच्या संस्थेच्या वैद्यकीय,इंजनियरिंग,मैनेजमेंट कॉलेज ला यानी फुकट एडमिशन दिलीय का?
यांच्या संस्थेत यांचीच मुले संचालक असतात.पुतणे,भाचा, मेहुना,दाजी,चुलता,सुन,जावई, मावशी,काका,आत्या ,आत्याचा नवरा,नातू, अगदी लाम्बचा नातेवाईक कूवत नसताना पदावर असतो.
जरा सगळ्या मराठा नेत्यांचे नाते संबंध तपासा. त्यांचा संबंध प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सत्तेच्या मग तो कारखाना असो की सोसाइटी इथे असलेला दिसून येईल.
हे एक सर्कल आहे जे सत्तेच्या आसपास फिरते.
तुम्हाला ते सर्कल मधे येउच देत नाहीत

हा मॅसेज इतका शेअर करा की हा मॅसेज आपल्या नेत्यांपर्यंत पोहोचायला हवा. मेसेज वाचून आपल्या नेत्यांना स्वत:चीच लाज वाटायला हवी आपल्याच स्वार्थी नेत्यांमुळेच झाला नाही. सत्तेचा मलिदा सत्ताधारी व स्वतःमधे वाटून खाल्ला. आतातरी जागे व्हा,






Comments

Popular posts from this blog

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्या तपकिरी गाई कड़े वळ

*नको देवराया अंत आता पाहू,,*

देवा ये लवकर तुझ्या पराक्रमाच्या गोष्टी खूप वाचल्या रे आमचा विश्वास ही आहेच त्यावर पण ये आता आता तूच या अदृश्य कोरोनाशी लढ आणि मुक्त कर☹ *प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी तू सदैव उभा राहतोस म्हणे,,* मग आमचे प्रयत्न दिसत नाही का रे देवा☹ जगाचा पालन कर्ता असलास तरी या भरतभूमीवर तुझं विशेष प्रेम,,सार जग सोडून तू तुझे सारे अवतार याच भरतवंशीयांसाठी सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच निर्दालन करण्यासाठी घेतलेस,,, *मग आजच असा निष्ठुर कठोर पाषाण हृदयी का झालास😏☹😡* अरे आम्ही तुझीच लेकरं ना रे मग आमची अवघ्या मनुष्य जातीची चाललेली परवड तुला दिसत नाही की अजून शेषशैये वरून उठायची वेळच झाली नाही की तुझा कुंभकर्ण झालाय देवा? *उठ रे दादा उठ*☹ मला माहिती आहे केवळ प्राण्यांची असलेली ही भूमी तू गुण्या गोविंदाने हे मनुष्यप्राणी ही राहतील या मोठया आशेने आम्हला ती  आंदण दिलीस☹ *पण आम्ही कपाळकरंटे रे ओरबाडली अक्षरशः ही भूमी ओरबाडली*😏😡 जीवन जगण्याच्या स्पर्धेत *आमचा बकासुर कधी झाला* ते आमचं आमच्याच कळलं नाही *आमचा हव्यास कधी संपेल माहिती नाही* आमची आयुष्य एकमेकांचा धर्म उणिदुनी काढण्यातच जाणा

राजा-माकड-आणि आपण ,,,

हि आहे एका आळशी आणि बुद्धू राजाची गोष्ट एकदा ह्या राजाला एक माकड काही तरी मदत करते. आणि त्यामुळे राजा त्याला आपला सेवक म्हणून तैनात करतो. प्रधान हे पाहून वैतागतो,राजाला समजावण्याचा प्रयत्न करतो पण राजा मानत नाही, प्रधान कपाळावर हात मारतो-  एकदा-दोनदा-तिनदा... असे ब-याचदा होते. एके दिवशी राजा झोपलेला असतो, माकड वारा घालत असते. एक माशी सारखी राजाच्या नाकावर बसायचा प्रयत्न करते. माकड तिला हकलायचा प्रयत्न करते, पण तरी ती पुन्हा पुन्हा येते म्हणून शेवटी चिडून माकड राजाच्या तलवारीने तिला मारायचा प्रयत्न करतो... आणि... राजाचे नाकच कापले जाते.. प्रधानजी हसतो... तात्पर्य -- ज्यांची लायकी नाही पात्रता नाही अशांच्या हातात जबाबदारी सोपवली कि काय होत ते हि गोष्ट सांगते ??,,,,,,,,,,,, आज नेमकी हि गोष्ट आठवायचं कारण ,,, शक्ती मिल कंपाउंड मध्ये जो फोटोग्राफर मुलीवर बलात्कार झाला त्यावर ईथे नेहमी प्रमाणे येवून सगळ्यांनी आपापली मत मांडली नेहमी प्रमाणे बांगड्या भरा ,चपलेने बडवा ,सरकार नालायक अशी मत मांडली गेली पण हि झाली फक्त चर्चा याच्या मुळाशी कुणीच प्रयत्न करू ईच्छित नाही आणि नेमकी कधी काळी वाचलेल