Skip to main content

फसवले गेलेल्या वडिलांचं मृत्यू पत्र

आटपाट देशातील एका नगरीतील सत्य घटना,,
मरणासन्न अवस्थेत वडील पलंगावर पडलेले आहेत आणि त्यांच्या त्या मरणासन्न यातनेत वडिलांना आपल्याला काहीच मदत करता येत नाही अशा निराश आणि चिंताक्रांत अवस्थेत तिघे भाऊ वडिलांच्या पायाशी बसून आहेत

त्याही अवस्थेत आपल्या मुलांची काळजी वाहणारे वडील त्या मुलांना आश्वस्त करतात मुलांनो, " मी उधार ज्यांच्याकडून घेतलं होतं, ती उधारी सगळी चुकवली आहे, जी येणी येणार होती ती देखील वसूल करून ठेवली आहे, त्यांची समान वाटणी मी तुम्हा भावात करून ठेवली आहे
राहत घर मुलींच्या लग्नासाठी घेतलल कर्ज फेडल आहे त्यामुळे काळजी नाही
फक्त एका जागी मोठी रक्कम अडकून बसली आहे
तुम्हा भावंडांना ती वसूल झाली तर आपापसात समसमान वाटून घ्या,
रोख रक्कम हाती मिळेल हे लक्ष्यात आल्यावर त्याही परिस्थतीत भावांचे डोळे लकाकले, तिघेही एकदम बोलले बाबा जस तुम्ही सांगाल तस सांगा कुणाकडून किती रक्कम येणे बाकी आहे?
वडील बोलले माहीत नाही कधी माझे प्राण निघून जातील म्हणून तळघरात एक कपाटात संपत्ती वाटप आणि येणाऱ्या त्या रोख रकम बद्दल लिहल आहे-
मी मेल्या नन्तरच ते पत्र सविस्तर वाचा

आणि दुसऱ्याच दिवशी वडिलांनी जगाचा निरोप घेतला सगळं क्रियाकर्म सोपस्कार 10 वा 12वा पार पडल्यावर
ते तिघे भाऊ लगबगीने तळघरातील कपटाकडे धावले इतके धरुन ठेवलेला संयम आवरू शकत नव्हते, कधी एकदा ते पत्र काढतो आणि रक्कम किती ? आणि तिघात त्याची वाटणी कशी करता येईल याचाच विचार करत त्यांनी ते पत्र बाहेर काढलं ,, आंनद अतिरेकाने थरथरत्या हाताने ते पत्र ते वाचू लागले त्यात लिहल होत



"2014 मध्ये श्री नरेंद्र दामोरदरदास मोदी या नावाच्या प्रधान सेवकाने 15 लाख देण्याचा वायदा केला होता ते मिळाले की आपापसात 5 लाख या प्रमाणे 15 लाख वाटून घ्या.
तुमचा असहाय बाबा

Comments

Popular posts from this blog

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्या तपकिरी गाई कड़े वळ

*नको देवराया अंत आता पाहू,,*

देवा ये लवकर तुझ्या पराक्रमाच्या गोष्टी खूप वाचल्या रे आमचा विश्वास ही आहेच त्यावर पण ये आता आता तूच या अदृश्य कोरोनाशी लढ आणि मुक्त कर☹ *प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी तू सदैव उभा राहतोस म्हणे,,* मग आमचे प्रयत्न दिसत नाही का रे देवा☹ जगाचा पालन कर्ता असलास तरी या भरतभूमीवर तुझं विशेष प्रेम,,सार जग सोडून तू तुझे सारे अवतार याच भरतवंशीयांसाठी सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच निर्दालन करण्यासाठी घेतलेस,,, *मग आजच असा निष्ठुर कठोर पाषाण हृदयी का झालास😏☹😡* अरे आम्ही तुझीच लेकरं ना रे मग आमची अवघ्या मनुष्य जातीची चाललेली परवड तुला दिसत नाही की अजून शेषशैये वरून उठायची वेळच झाली नाही की तुझा कुंभकर्ण झालाय देवा? *उठ रे दादा उठ*☹ मला माहिती आहे केवळ प्राण्यांची असलेली ही भूमी तू गुण्या गोविंदाने हे मनुष्यप्राणी ही राहतील या मोठया आशेने आम्हला ती  आंदण दिलीस☹ *पण आम्ही कपाळकरंटे रे ओरबाडली अक्षरशः ही भूमी ओरबाडली*😏😡 जीवन जगण्याच्या स्पर्धेत *आमचा बकासुर कधी झाला* ते आमचं आमच्याच कळलं नाही *आमचा हव्यास कधी संपेल माहिती नाही* आमची आयुष्य एकमेकांचा धर्म उणिदुनी काढण्यातच जाणा

राजा-माकड-आणि आपण ,,,

हि आहे एका आळशी आणि बुद्धू राजाची गोष्ट एकदा ह्या राजाला एक माकड काही तरी मदत करते. आणि त्यामुळे राजा त्याला आपला सेवक म्हणून तैनात करतो. प्रधान हे पाहून वैतागतो,राजाला समजावण्याचा प्रयत्न करतो पण राजा मानत नाही, प्रधान कपाळावर हात मारतो-  एकदा-दोनदा-तिनदा... असे ब-याचदा होते. एके दिवशी राजा झोपलेला असतो, माकड वारा घालत असते. एक माशी सारखी राजाच्या नाकावर बसायचा प्रयत्न करते. माकड तिला हकलायचा प्रयत्न करते, पण तरी ती पुन्हा पुन्हा येते म्हणून शेवटी चिडून माकड राजाच्या तलवारीने तिला मारायचा प्रयत्न करतो... आणि... राजाचे नाकच कापले जाते.. प्रधानजी हसतो... तात्पर्य -- ज्यांची लायकी नाही पात्रता नाही अशांच्या हातात जबाबदारी सोपवली कि काय होत ते हि गोष्ट सांगते ??,,,,,,,,,,,, आज नेमकी हि गोष्ट आठवायचं कारण ,,, शक्ती मिल कंपाउंड मध्ये जो फोटोग्राफर मुलीवर बलात्कार झाला त्यावर ईथे नेहमी प्रमाणे येवून सगळ्यांनी आपापली मत मांडली नेहमी प्रमाणे बांगड्या भरा ,चपलेने बडवा ,सरकार नालायक अशी मत मांडली गेली पण हि झाली फक्त चर्चा याच्या मुळाशी कुणीच प्रयत्न करू ईच्छित नाही आणि नेमकी कधी काळी वाचलेल