Skip to main content

"सात जन्म हाच नवरा मिळून दे "

स्त्री मुक्ती वाल्या काही खुळ्या लोकांची एक दरवर्षी पडणारी पोस्ट असते .
ते लक्षात घेवून आधीच ही पोस्ट लिहितो आहे .

वट पौर्णिमेला स्त्रियांनी "सात जन्म हाच नवरा मिळून दे " असा वर मागायचा असतो
आणि वडाच्या झाडाची पूजा करायची असते . यावर
१] "नवरे" अशी पूजा कधी करणार ? आणि वर मागणार ?
२] हिंदू संस्कृतीत स्त्रियांवर अन्याय केला जातो
३] हिंदू संस्कृती पुरुष प्रधान आहे

अशी खुळचट तर्कटे उधळली जातात . आजकाल ज्ञानी लोक यांना उत्तरे द्यायच्या
भानगडीत पडत नाहीत . आणि जे लोक संस्कृतीचा आदर करतात पण याचे उत्तर
आचार हीन पणा मुळे विसरलेले असतात ते हात चोळत बसतात .

हिंदू संस्कृती असे मानते कि लग्न म्हणजे एकमेका समवेत जगताना एकमेकांना
ईश्वर बनण्याकडे प्रवृत्त करणे . ज्यायोगे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चारही प्राप्त
होतात . यात पहिली गोष्ट अशी असते कि लग्न होवून येताना प्रत्येक विवाहिता
आपल्या बरोबर अन्नपूर्णा आणते जिची स्थापना सासरच्या देव्हार्यात करतात .
नवर्याने रोज पूजा करताना अन्नपूर्णा स्वरूप पत्नीच्या व तिच्या माहेरच्या सर्व
कुल स्त्रियांचे प्रतिक असलेल्या त्या मूर्तीचे कृतज्ञता पूर्वक पूजन करायचे असते .
घरात इतर कुणी पूजा केली तर देवाला हात जोडताना कृतज्ञता पूर्वक स्मरण करून मोक्ष मिळे पर्यंत याच पत्नीची जन्मोजन्मी साथ मिळो आणि दोघांचेही कल्याण होवो अशी मनोमन प्रार्थना करायची असते . तिच्या मातुल कुळाला कृतज्ञता पूर्वक नमस्कार करायचा असतो [ सासूबाई नचे स्मरण करून =D ]

आता आपण सगळे आचार भ्रष्ट झालो आहोत त्यामुळे हे विसरलो . वास्तविक जे
स्त्रियांना वर्षातून एकदा सांगितले आहे ते पुरुषांना रोज करायला सांगितले आहे .
त्यामुळे हिंदू धर्मावर आरोप करण्या आधी स्त्री मुक्ती वाल्यांनी आपापल्या घरात
धर्मातल्या रीती पाळाव्यात .आई ने शिकवलेल्या गोष्टी मुलगे कधीही विसरत नाहीत . त्यामुळे मुलगे असलेल्या स्त्रीमुक्ती वाल्या महिलांनी आधी आपापल्या मुलांवर हे असे धर्मात सांगितलेले योग्य ते संस्कार करावेत. आणि आपले नवरे रोज हे पाळत नसतील तर त्यांनाही शिकवावे ((व्हाट्सएप वरून))

Comments

Popular posts from this blog

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्या तपकिरी गाई कड़े वळ

*नको देवराया अंत आता पाहू,,*

देवा ये लवकर तुझ्या पराक्रमाच्या गोष्टी खूप वाचल्या रे आमचा विश्वास ही आहेच त्यावर पण ये आता आता तूच या अदृश्य कोरोनाशी लढ आणि मुक्त कर☹ *प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी तू सदैव उभा राहतोस म्हणे,,* मग आमचे प्रयत्न दिसत नाही का रे देवा☹ जगाचा पालन कर्ता असलास तरी या भरतभूमीवर तुझं विशेष प्रेम,,सार जग सोडून तू तुझे सारे अवतार याच भरतवंशीयांसाठी सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच निर्दालन करण्यासाठी घेतलेस,,, *मग आजच असा निष्ठुर कठोर पाषाण हृदयी का झालास😏☹😡* अरे आम्ही तुझीच लेकरं ना रे मग आमची अवघ्या मनुष्य जातीची चाललेली परवड तुला दिसत नाही की अजून शेषशैये वरून उठायची वेळच झाली नाही की तुझा कुंभकर्ण झालाय देवा? *उठ रे दादा उठ*☹ मला माहिती आहे केवळ प्राण्यांची असलेली ही भूमी तू गुण्या गोविंदाने हे मनुष्यप्राणी ही राहतील या मोठया आशेने आम्हला ती  आंदण दिलीस☹ *पण आम्ही कपाळकरंटे रे ओरबाडली अक्षरशः ही भूमी ओरबाडली*😏😡 जीवन जगण्याच्या स्पर्धेत *आमचा बकासुर कधी झाला* ते आमचं आमच्याच कळलं नाही *आमचा हव्यास कधी संपेल माहिती नाही* आमची आयुष्य एकमेकांचा धर्म उणिदुनी काढण्यातच जाणा

राजा-माकड-आणि आपण ,,,

हि आहे एका आळशी आणि बुद्धू राजाची गोष्ट एकदा ह्या राजाला एक माकड काही तरी मदत करते. आणि त्यामुळे राजा त्याला आपला सेवक म्हणून तैनात करतो. प्रधान हे पाहून वैतागतो,राजाला समजावण्याचा प्रयत्न करतो पण राजा मानत नाही, प्रधान कपाळावर हात मारतो-  एकदा-दोनदा-तिनदा... असे ब-याचदा होते. एके दिवशी राजा झोपलेला असतो, माकड वारा घालत असते. एक माशी सारखी राजाच्या नाकावर बसायचा प्रयत्न करते. माकड तिला हकलायचा प्रयत्न करते, पण तरी ती पुन्हा पुन्हा येते म्हणून शेवटी चिडून माकड राजाच्या तलवारीने तिला मारायचा प्रयत्न करतो... आणि... राजाचे नाकच कापले जाते.. प्रधानजी हसतो... तात्पर्य -- ज्यांची लायकी नाही पात्रता नाही अशांच्या हातात जबाबदारी सोपवली कि काय होत ते हि गोष्ट सांगते ??,,,,,,,,,,,, आज नेमकी हि गोष्ट आठवायचं कारण ,,, शक्ती मिल कंपाउंड मध्ये जो फोटोग्राफर मुलीवर बलात्कार झाला त्यावर ईथे नेहमी प्रमाणे येवून सगळ्यांनी आपापली मत मांडली नेहमी प्रमाणे बांगड्या भरा ,चपलेने बडवा ,सरकार नालायक अशी मत मांडली गेली पण हि झाली फक्त चर्चा याच्या मुळाशी कुणीच प्रयत्न करू ईच्छित नाही आणि नेमकी कधी काळी वाचलेल