Skip to main content

राजा झालेल माकड

||श्री नथुरामाय नमः ||
भरतपुरच्या जंगलात एकदा चिंतनबैठक झाली आणि हे पारंपरिक गादी चालवणारे राजे हवेत कशाला? गेल्या70 वर्षात जंगलाचा बट्ट्याबोळ करून टाकला आहे आता इतर जंगलात जशी लोकशाही नांदते तसेच आपण ही इथे निवडणुका घेऊ आणि निवडणूक लढवू असा विचार सगळ्यांनी केला आणि शेवटी बहुमताच्या जोरावर तिथे एक जमातीतील एक वयस्कर माकड राजा झालं,,
त्या जंगलात जरी हत्ती घोडे उंट वाघ सिंह गेंडा राहत असले तरी त्या जंगलात माकडांची संख्या जास्त होती त्या जोरावर तो राजा झाला होता
आता कुठल्याही समस्या असल्या की जनता त्या नव्या राजांकडे आश्वासक नजरेने जात असे जात असे परंतु त्याच्या कडे समस्या घेऊन गेले की माकड या झाडावरून त्या झाडावर उड्या मारत असे
हळू हळू हा प्रकार जनतेच्या लक्षात येऊ लागला की हा समस्या सोडवण्याकडे दुर्लक्ष करत असतो
आणि इकडे तिकडे उड्या मारत या जंगलातून त्या जंगलात फक्त फिरत असतो समस्या सोडवत तर नाहीच वर समस्या निर्माण करतो
जनता तक्रार करू लागली तसे तो आणि त्याचे साथीदार बोलू लागले बघा,,, *आमच्या प्रयत्नात कुठे कमतरता आहे काय? आम्हला जे येत ते मी करतोच करतो माझ्या प्रयत्नात कुठे कसूर असेल तर सांगा?* तस माकड हुशार होत बहुमताचा विचार त्याने आधीच करून ठेवला होता त्यामुळे जंगलात जरी त्याच्या विरोधात असंतोषाच वातावरण असलं तरी बहुसंख्य जमात माकडांची होती आणि #राज्य_माकडांच_होत,,,,
विशेष विनंती--- ह्या गोष्टीचा कुठल्याही चालू वर्तमानशी संबंध नाही वाटल्यास निव्वल योगायोग मानावा,, पण का कुणास ठाऊक ही गोष्ट वाचताना असली भिकरचोट लोकशाही मी मानत नाही असे शब्द कानाखाली जाळ काढल्यासारखे माझ्या ही कानावर आदळत आहेत

Comments

Popular posts from this blog

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्या तपकिरी गाई कड़े वळ

*नको देवराया अंत आता पाहू,,*

देवा ये लवकर तुझ्या पराक्रमाच्या गोष्टी खूप वाचल्या रे आमचा विश्वास ही आहेच त्यावर पण ये आता आता तूच या अदृश्य कोरोनाशी लढ आणि मुक्त कर☹ *प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी तू सदैव उभा राहतोस म्हणे,,* मग आमचे प्रयत्न दिसत नाही का रे देवा☹ जगाचा पालन कर्ता असलास तरी या भरतभूमीवर तुझं विशेष प्रेम,,सार जग सोडून तू तुझे सारे अवतार याच भरतवंशीयांसाठी सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच निर्दालन करण्यासाठी घेतलेस,,, *मग आजच असा निष्ठुर कठोर पाषाण हृदयी का झालास😏☹😡* अरे आम्ही तुझीच लेकरं ना रे मग आमची अवघ्या मनुष्य जातीची चाललेली परवड तुला दिसत नाही की अजून शेषशैये वरून उठायची वेळच झाली नाही की तुझा कुंभकर्ण झालाय देवा? *उठ रे दादा उठ*☹ मला माहिती आहे केवळ प्राण्यांची असलेली ही भूमी तू गुण्या गोविंदाने हे मनुष्यप्राणी ही राहतील या मोठया आशेने आम्हला ती  आंदण दिलीस☹ *पण आम्ही कपाळकरंटे रे ओरबाडली अक्षरशः ही भूमी ओरबाडली*😏😡 जीवन जगण्याच्या स्पर्धेत *आमचा बकासुर कधी झाला* ते आमचं आमच्याच कळलं नाही *आमचा हव्यास कधी संपेल माहिती नाही* आमची आयुष्य एकमेकांचा धर्म उणिदुनी काढण्यातच जाणा

राजा-माकड-आणि आपण ,,,

हि आहे एका आळशी आणि बुद्धू राजाची गोष्ट एकदा ह्या राजाला एक माकड काही तरी मदत करते. आणि त्यामुळे राजा त्याला आपला सेवक म्हणून तैनात करतो. प्रधान हे पाहून वैतागतो,राजाला समजावण्याचा प्रयत्न करतो पण राजा मानत नाही, प्रधान कपाळावर हात मारतो-  एकदा-दोनदा-तिनदा... असे ब-याचदा होते. एके दिवशी राजा झोपलेला असतो, माकड वारा घालत असते. एक माशी सारखी राजाच्या नाकावर बसायचा प्रयत्न करते. माकड तिला हकलायचा प्रयत्न करते, पण तरी ती पुन्हा पुन्हा येते म्हणून शेवटी चिडून माकड राजाच्या तलवारीने तिला मारायचा प्रयत्न करतो... आणि... राजाचे नाकच कापले जाते.. प्रधानजी हसतो... तात्पर्य -- ज्यांची लायकी नाही पात्रता नाही अशांच्या हातात जबाबदारी सोपवली कि काय होत ते हि गोष्ट सांगते ??,,,,,,,,,,,, आज नेमकी हि गोष्ट आठवायचं कारण ,,, शक्ती मिल कंपाउंड मध्ये जो फोटोग्राफर मुलीवर बलात्कार झाला त्यावर ईथे नेहमी प्रमाणे येवून सगळ्यांनी आपापली मत मांडली नेहमी प्रमाणे बांगड्या भरा ,चपलेने बडवा ,सरकार नालायक अशी मत मांडली गेली पण हि झाली फक्त चर्चा याच्या मुळाशी कुणीच प्रयत्न करू ईच्छित नाही आणि नेमकी कधी काळी वाचलेल